Posts

Showing posts from July, 2022

नीरा येथे येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी

Image
 नीरा  येथे  येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी     पुरंदर तालुक्यातील नीरा येथे साहित्यरत्न, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आज सकाळी नीरा ग्रामपंचायत, अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान व नीरा ग्रामस्थ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .    नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते पतीमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विरज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण ,प्रमोद काकडे,अभिषेक भालेराव,सुनील चव्हाण, अनंता शिंदे,वकील आदेश गिरमे,अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे राष्ट्रवादीचे अजित जैन,भारतीय बौध्द महासंघाचे दादा गायकवाड यांचासह नीरा आणि परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.

कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग

Image
 कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग  नीरा दि.१     पुरंदर तालुक्यातील निरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे राहिलाच राहिला . तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. याबाबतची घटना समोर आलीय.         रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत हिंघटना ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंहिनाचा भाग माघारी आणून या दोन्ही रेल्वेभाग जोडले.यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वेचे किंवा स्थानिक लोकांच झालं नाही. मात्र रेल्वेचा कपलिंग तुटून अर्धी रेल्वे (म्हणजे गार्डचा भाग) पिंपरे येथील फाटकात उभी राहिली. तर अर्धी गाडी रेल्वे ( इंजिन कडील अर्धा भाग) स्टेशन मध्ये गेली. यामुळे पिंपरे आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत आले होते.        मालवाहू गाडी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या धोका नव्हता. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅ...

पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.

Image
 पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.  व्यापाऱ्याचे तीन तोळे सोने केले लंपास  नीरा :         नीरा (ता.पुरंदर) येथे पोलिस असल्याचा बनाव करून भररस्त्यात जेष्ठ व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाम रामचंद्र सोनी (वय ७३) यांची सोन्याची एक चैन व एक अंगठी असे तीन तोळे सोने लंपास करुन चोरांनी पोबारा केला आहे. याबाबत सोनी यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .          याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शाम सोनी हे शनिवार दि. ३० जुलै रोजी दुपारी ०३:१५ च्या सुमारास रहदारी असलेल्या पालखी महामार्गावरील नीरा रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल जवळ चालत होते. त्याचवेळी एका अनोळखी इसमाने मोटरसायकल वरून येऊन पोलीस असल्याचा बहाना करत ओळखपत्र दाखविले. फिर्यादी यांना म्हणाला की या ठिकाणी चोऱ्या होतात, आम्ही तपासणी करीत आहोत. तुम्ही तुमचे हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन माझे ताब्यात द्या. असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील चैन त्या इसमाचे ताब्यात दि...

पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या पाण्यात आत्महत्या

Image
 पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या  पाण्यात  आत्महत्या     वीर दि.३० खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमध्ये वीर धरण परिसरातील नीरा नदीच्या पात्रामध्ये पुणे येथील व्यापारी सुरज हणमंत सुंदर (वय ४२,रा.पुणे) असे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान सुरज सुंदर यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज शिरवळ पोलीसांनी वर्तविला आहे.          याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे येथील जमीन व्यवहार व लाइजनिंगचा व्यवसाय करणारे सुरज सुंदर हे बुधवार दि.२७ जुलै रोजी पुणे येथील घरामधून पैश्यांचे काम आहे असे सांगत घरातून कार (क्रं.एमएच-०२-डिजे-४७६१) घेऊन बाहेर आले होते. यावेळी सुरज सुंदर यांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान व्हिडिओ दूरध्वनीद्वारे पत्नी ज्योती सुंदर यांना आला असता त्यांनी मी हरलो आहे व सिधुला मुलगा आर्यनवर लक्ष ठेवण्यास सांग मी माझे जीवन संपवणार आहे असे सांगितले.दरम्यान,गुरुवार दि.२८ जुलै रोजी सुरज सुंदर यांनी आणलेली...

कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल

Image
 कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल   कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वे गाडीने गुरवारी नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री अचानक 5 तासांचा ब्लॉक घेतला .यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच परीक्षेसाठी निघालेले परीक्षार्थी व आजारी असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. येथील रेल्वे प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.दरम्यान येथील कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्थानिक तरुणांना मदतीला घेत या प्रवाशांना मदत पोचविण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली गेल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चिडचिड वाढल्याचा पाहायला मिळाले     दिनांक 28 जुलै रोजी पुणे कोल्हापूर रेल्वे लईन काही कामानिमित्त दिवस भर बंद ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी कोल्हापूर वरुन गोंदिया ला जाणारी गाडी नंबर 11039 या रेल्वे ने तब्बल नीरा रेल्वे स्टेशन वर चक्क 5 तासांचा ब्रेक घेतला. प्रवाशांनी आणि कोल्हापूर वरुन पुण्यामध्ये परीक्षेला जा...

राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे

Image
 *राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे* : *एस.एम.देशमुख यांची सरकारकडे मागणी*  *वडवणी* : राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे आणि त्यासाठी जागा आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त *एस.एम देशमुख* यांनी केली.. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शेषराव जगताप होते.. एस.एम देशमुख पुढे म्हणाले, शासन जिल्हा स्तरावर पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी देते मात्र तालुका स्तरावरील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात बदल करीत प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी दिला पाहिजे.. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.. वडवणी नगर पालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे केले आहे तेथील एखादा गाळा नगरपालिकेने पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना देखील देशमुख यांनी य...

पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; पाहा जिल्हापरिषद निवडनुकीसाठी गटनिहाय आरक्षण

Image
 पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली  वाया ;  पाहा  जिल्हापरिषद निवडनुकीसाठी  गटनिहाय आरक्षण  पुणे जिल्हा परिषदेच्या पुरंदर तालुक्यातील पाच गटांसाठी आरक्षण खालील प्रमाणे.  मांडकी - परींचे  = सर्वसाधारण  दिवे - गराडे =   सर्वसाधारण महिला पिसर्वे - माळशिरस = सर्वसाधारण  वाल्हा - नीरा = सर्वसाधारण महिला बेलसर - कोळविहिरे = सर्वसाधारण महिला.

पुरंदर पंचायत समिती आरक्षणाने दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी बांधले गुढग्याला बाशींग

Image
 पुरंदर पंचायत समिती आरक्षणाने दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी बांधले गुढग्याला बाशींग  नीरा :    पुरंदर पंचायत समितीत पुर्वी आठ सदस्य होते, आता जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे पुरंदर पंचायत समितीत आता सदस्य संख्या दहा झाली आहे. पैकी पाच सदस्य महिला राखीव आहेत. सर्वसाधारण महिला दोन जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दोन जागा, अनुसूचित जाती महिला एक जागा, सर्वसाधारण जागेसाठी तीन जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा राखीव असे आरक्षण सोडत झाली आहे. या अनपेक्षित सोडती मुळे तालुक्यातील काही दिग्गजांचा हिरमोड तर काहींनी आताच गुढग्याला बाशींग बांधण्याची तयारी सुरु केली आहे.        आज गुरवारी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात दौंड पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्रा उपस्थित चिठ्ठ्या टाकून रोटेशन पद्धतीने आरक्षण सोड करण्यात आली.  पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुक 2022          गण आरक्षण  परींच...

रस्त्याच्या रुंदीकरणात हजारो झाडांची होणार कत्तल

Image
 रस्त्याच्या रुंदीकरणात हजारो झाडांची होणार कत्तल वाल्हे दि.२७    आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या विस्तारीकरणात जेजुरी ते निरा दरम्यान हजारो झाडांची कत्तल होणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम नुकतच सुरू झाले आहे. यामध्ये जेजुरी वाल्हे दरम्यानच्या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल सध्या सुरू आहे. या झाडांची कत्तल न करता त्याची दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लागवड केली जावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.   पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी ते नीरा यादरम्यानच्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून वाहन चालकांना दिलासा मिळावा अपघात कमी व्हावे म्हणून अनेक दिवसापासून लोक मागणी करत आहेत. या रस्त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याच्याकडेला असलेली अनेक झाडे यामध्ये उध्वस्त होत आहेत. प्रशासनाने ही झाडे काढून टाकून देऊ नयेत तर या झाडांचं पुनर्वसन केलं जावं. अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत. ही झाडे साधारण सरसकट काढून फेकून दिले जात आहेत. ती फेकून न देता या झाडांची योग्य ठिकाणी लागवड केल्यास निसर्गाचे होणार नु...

सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
 सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सासवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन    पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सासवड नगर परिषद व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी दिली असून, जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.      उद्या दिनांक 29 जुलै रोजी हा मेळावा सासवडनगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी या मेळाव्यात येऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. मेळाव्याला येताना इच्छुक तरुणांनी शाळा सोडल्याचा दाखला,मार्कशिट ,आधार कार्ड, पॅनकार्ड , बँकेचे पासबुक जागेचे कागदपत्र, असल्यास प्रकल्पाचा अहवाल घेऊन यावे असे सांगण्यात आले आहे. उद्या दिनांक 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे

सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते

Image
 सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते बिगर शेती अर्थात एन ए चा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणूक ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल.  सासवड दि.२८     पुरंदर तालुक्यातील  तहसील कार्यालयात बिगर शेतीचा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसात नायब तहसीदार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 468,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी अल्तापहुसेन बाबासाहेब पाटील याने मार्च 2022 मध्ये  हिवरे येथील गट नं.829,830,831,832,833 या शेतजमीन गटाचे फाळणीबारा नुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का असे तेथील तलाठी यांना विचारले.यासाठी  तलाठी निलम देशमुख यांना त्यांचेकडे असलेली एन.ए. ऑर्डर  ही दाखविली. तलाठी यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येत नाही. तुम्ही कजाप करुन आणा, त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत. असे सांगितले. त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी तलाठी यांना या गटाचा पंचानामा करुन मागितल...

शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी

Image
 शहीद शंकर शिंदे यांच्या त्या पत्राच्या आठवणीने पिंगोरीकरांच्या डोळ्यात पुन्हा आले पाणी कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना करण्यात आले अभिवादन      दि.२६          आज दि.२६ जुलै रोजी  देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदे यांच्या पिंगोरी गावात सुद्धा आज कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले.             पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी मध्ये आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज गावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारगिल मध्ये झालेल्या लढाईत पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे यांना वीरमरण आले होते. लढाई सुरू असताना रणांगणामधून त्यांनी आपल्या पत्नीला  पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची आठवण आज पिंगोरकरांना पुन्हा आली युद्धभूमीवर अ...

शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान; अंकुश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक

Image
 शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान:  अंकुश माने  सहाय्यक पोलीस निरीक्षक  जेजुरी    वार्ताहर दि २४  शैक्षणिक,सामाजिक,पत्रकारिता व धार्मिक क्षेत्रात नितीन राउत यांचे काम उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी व समाज घडविण्यासाठी त्यांचे योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून  सर्व सामान्यांना न्याय देवून सामाजिक,धार्मिक विषयांवर त्यांनी सतत लिखाण केले आहे. आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सर्वच क्षेत्रात त्यांचे नावलौकिक आहे असे मनोगत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केले.       जेजुरी उद्योजक संघ व केबीसी यांच्या वतीने सेवापुर्तीच्या निमित्ताने मुख्याध्यापक नितीन राउत यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी एमआयडीसीतील जिमाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सचिव राजेश पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, डॉ.मोनाली कुटे, डॉ.विश्वास नाझीरकर,उ...

आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण नक्कीचं वाचेल; डॉ.प्रा.दिगंबर दुर्गाडे

Image
 आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण नक्कीचं वाचेल;  डॉ.प्रा.दिगंबर दुर्गाडे    "आपण केलेल्या रक्तदानातून, कोणातरी एका व्यक्तींचे प्राण नक्कीच वाचत असतो. कधी काळी याच रक्तामुळे  कळत - नकळत आपल्या नातलागांचाही प्राण वाचतो..  त्यामूळे प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य,  सामाजिक कर्तव्य,  म्हणून  रक्तदान करायलाच हवे"; असे मत, पुणे  जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे येथे मानले.   रविवार (दि. २४) विरोधी पक्षनेते   अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त   वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत  कार्यालयात 'भव्य रक्तदान' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.  दुर्गाडे बोलत होते.  यावेळी वाल्हे गावाचे सरपंच अमोल खवले, नीरा- वाल्हा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष उत्तमराव धुमाळ, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष कोमल निगडे, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, राजेश चव्हाण, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सुर्यकांत भुजबळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे समन्वयक अशोक बरकडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष क...

सरकारने नोकरी देणे बंद केले आहे. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात यावे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे

Image
सरकारने नोकरी देणे बंद केले आहे. तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात यावे माजी कुलगुरू डॉ.पंडितराव पलांडे जेजुरी वार्ताहर दि २३ सरकारने शिक्षणावरील खर्च कमी केला आहे. सर्वच क्षेत्रात नोकऱ्या देणे बंद केले आहे. सरकारच्या नोकरीची वाट न पाहता तरुणांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे व या व्यवसायातून इतरांना नोकरीची संधी निर्माण करून द्यावी असे आवाहन माजी कुलगुरू आणि कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूरचे संस्थापक डॉ.पंडितराव पलांडे यांनी केले.          पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील श्री मल्हार शिक्षण मंडळ व विद्या महामंडळ प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नितीन राउत व काशिनाथ भोंग यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमा वेळी डॉ पंडितराव पलांडे बोलत होते.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे,कार्यध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सासवड बार असोशिएशनचे अध्यक्ष अड धनंजय भोईटे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले,सामाजिक कार्यकर्ते अड नितीन कुंजी...

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

Image
 अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप  निरा ःप्रतिनिधी दि 22     महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेतेअजितदादा पवार  यांच्या वाढ दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य  कांचनदादा निगडे देशमुख यांनी   निरा-शिवतक्रार  येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना   खाऊ वाटप केले .  यावेळी आपल्या मनोगतात कांचन दादा यांनी  अजितदादा पवार यांच्या शैक्षणिक कामातील भरीव योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.उपाध्यक्ष राजेश चव्हाण, पुणे जिल्हा काँग्रेस ओ बी सी सेल अध्यक्ष राजेंद्र बरकडे ,निरा शिवतक्रार ग्रामपंचायत सदस्य संदीप  धायगुडे ,प्रगती पत संस्थेचे संचालक अरविंद जेधे उपस्थित होते मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .  संदीप धायगुडे यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शाळा शिवतक्रारचे दुरुस्ती काम चालू असुन याकामी आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं . मुख्याध...

अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त वीर येथे शालेय साहित्याचे वाटप

Image
 अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त वीर येथे शालेय साहित्याचे वाटप वीर दि.२२      राज्याचे माजी उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या वाढ दिवसा निमीत्त आज शुक्रवार दि.२२ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे त्याच बरोबर माळवाडी,रामोशीवाडा,समगीर  वाडी,बनकरवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळपास २२५ रायटिंग पॅडचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीर व सोमेश्वरच्या माजी संचालक  सौ ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्यावतीने  करण्यात आले हे वाटप करण्यात आले. यावेळी  माजी आमदार अशोकराव टेकवडे, तर पुणे जि.मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे ,मा.जि.अध्यक्ष विजयराव कोलते,आदर्श जि.प.सदस्य हेमंतकुमार माहूरकर, आदर्श जि.प.सदस्य सुदामआप्पा इंगळे,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव,सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मा. संचालिका सौ.ऋतूजाताई धुमाळ,ज्येष्ठ नेते श्री राजेंद्र ...

वाल्हेकरांवर संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही

Image
 वाल्हेकरांवर  संत ज्ञानेश्वर माऊली रुसली ; परतीचा मुक्काम वाल्हे येथे केला नाही वाल्हे. दि.१८ संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात असतो. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजचा मुक्काम या विद्यालयात न करता दौडज येथील भैरवनाथ मदिरत  केला आहे. आज सायंकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामासाठी आला होता मात्र वाल्हे येथे मुक्काम न करता हा सोहळा मुक्कामासाठी दौंडज येथे गेला. दरम्यान वाल्हेकर ग्रामस्थांनी पालखी सोहळा प्रमुखांना वाल्हे येथेच  मुक्काम करण्याची विनंती केली होती. मात्र नाराज झालेल्या पालखी सोहळ्यातील कारभाऱ्यांनी वाल्हे ते मुक्काम न करता पालखी सोहळा दौंडज येथे नेला. यानंतर  दौंडज येथील  मंदिरात पालखी सोहळ्याचे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हेकरांवर रुसण्याची ही दुसरी वेळ आहे. माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे येथे आल्यावर   खांद्यावर पालखी घेऊन गावातून जात असतो. ही प्रथा सुद्धा बंद करण्यात आली आणि आ...

परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.

Image
 परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.   नीरा :  दि.१८     संत  ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी  सोहळा आषाढी एकादशी  नंतर आता  परतीचा प्रवास करतो आहे.आज (दि.१८) हा सोहळा  पाडेगाव येथील मुक्काम.आटोपून पुणे जिल्ह्याच्या दिशेने निघाला.आहे त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. 'माऊली माऊलीच्या गजरात माऊलींच्या ' पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.         सातारा जिल्हयातील पाडेगाव येथील कालचा मुक्काम होता. आज सोमवारी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुखांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब रणदिवे चोपदार, दिनकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 'माऊली माऊलींच्या' जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना ठिक सव्वानऊ वाजता स्नान घातले.           माऊलींचे स्नान...

बापरे !! हा दिवे घाट आहे की खड्ड्यांचा घाट: दिवे घाटात खड्ड्यांचे साम्राज्य

Image
 दिवे घाटात खड्ड्यांचे साम्राज्य ; वाहन चालकांना करावी लागते कसरत  पुरंदर दि.१७     पुरंदर तालुक्यात पुणे येथून येत असताना लागणारा अवघड चढणीचा आणि तीव्र वळणांचा दिवेघाट हा वाहन चालकांसाठी सध्या कसरतीचा मार्ग बनला आहे. दिवेघाटात दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पावसाळ्यात खड्डे पडलेले आहेत .आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खड्ड्यात चुकवताना वाहन चालवताना अतिशय कसरत करावी लागत आहे.        खड्ड्यात वाहने आपटून वाहनांचाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. चार चाकी दुचाकी चालकांना तर या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे या खड्यांमध्ये आधळून वाहन चालकांचे अपघात देखील होत आहेत. दुचाकी स्वरांना रात्रीच्या अंधारामध्ये व पावसामध्ये या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि या खड्ड्यांमध्ये वाहने आपटत आहेत. परंतु या कशाचीही फिकीर प्रशासनाला राहिलेली नाही. पाऊस पडला आणि सालाबाद प्रमाणे खड्डे देखील आता घाटामध्ये पडलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काही दिवसा पूर्वीच दिवे घाटातून गेलेला आहे. पालखी सोहळा पू...

वीर धरणातून आज १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरु

Image
 वीर धरणातून आज १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरु.  वीर धरण ९८.९१ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार.  नीरा : १६            नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही, परिणामी आता भाटघर धरण ५४.३१ टक्के, नीरा-देवधर ४७.७४ टक्के, वीर धरण ९८.९१ टक्के, तर गुंजवणी धरण ७४.०१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाचे तीन दरवाजे एका फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.          शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिल्याने धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरण...

सासवड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.

Image
 सासवड उत्पादन शुल्क विभागाची मोठी  कारवाई. गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्य वाहतूक प्रकरणी केली कारवाई सासवड दि १६         गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले  मद्य महाराष्ट्रात विक्री साठी आणल्या प्रकरणी  सासवड उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई  भोर तालुक्यातील सारोळा येथे करण्यात आली आहे.     याबाबत सासवड येथी उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की,दिनांक १५ जुलै रोजी  राज्य् उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार सारोळा गावचे हद्दीत, बँगलोर-पुणे महामार्ग क्र. ४ वर, हॉटेल नानाचीवाडी समोर, रोडवर सापळा लावुन संशयित वाहनांची तपासणी करीत असता, संशयित ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मदयसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळुन आला. त्यावरुन ट्रक चालक नामे सुरेश चंद्रा कलाल वय ३६ वर्षे रा. सियाल मांग्री घाटी, पो. लसाणी, ता. देवगड जि. राजसंबंद व किसनलाल प्यारचंद खटीक वय २८ वर्षे रा. धानेन, ता. कोमलगढ, जि. राजसंबंद यांना जागीच ...

वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार

Image
 वीर धरणातून आज १५ हजार १३१२ क्युसेक्सने विसर्ग होणार.  वीर धरण ९७.८३ टक्के भरले : आता नीरा दुथडी वाहणार. नीर : नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही परिणामी शनिवारी दुपारी भाटघर धरण ५३.९३ टक्के, नीरा देवधर ४६.५३ टक्के, वीर धरण ९७.८३ टक्के, तर गुंजवणी धरण ७३.५१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाच्या चार दरवाजे एक फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.          शुक्रवारी सकाळ पासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ व...

वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेस वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू.

Image
 वीर धरणातून ६ हजार ११८ क्युसेस वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू.  वीर धारण ९३  टक्के भरले नीरा :  दि.१५,        नीरा नदिच्या धरण साखळीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुरंदर व खंडाळा तालुक्याची सिमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धारण ९० टक्के भरले असून. शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून नीरा नदीपत्रात ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.     शुक्रवारी सकाळी आकरा वाजल्यापासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नीरा नदीपत्रात एकून ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे.        पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वां...

वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार

Image
 वीर धरणातून पुढील २४ तासात पाणी सोडणार वीर धरणात ८२.५६ टके पाणीसाठा नीरा : १४       पुरंदर व खंडाळा तालुक्याच्या सिमेवरुन वाहत असलेल्य नीरा नदिवरील वीर धरणात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ९.५० टीएमसी क्षमता असलेल्या वीर धरणात गुरवारी सकाळ पर्यंत ७.७६ टीएमसी म्हणजे ८२.५६ टक्के भरल्याने आता पुढिल २४ तासांत केंव्हाही धरणातून पाणी सोडण्याची सुचाना धरण प्रशासनाने केली आहे.       धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. १४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.३२ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी झाला असून धरण ८२.५३% इतके भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संततधार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आव्हान धरण प्रशासनाने केले आहे.

गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा : प्रा. निवेदिता पासलकर.

Image
 गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा : प्रा. निवेदिता पासलकर. सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी   नीरा :      "गुरुचे स्थान आयुष्यात आहेच, आपण आपल्या आयुष्यात इतरांचेही चांगले गुरु व्हावे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर योग्य गुरुची साथ असेल तर आयुष्य यशस्वी होते. गुरुचे आयुष्यातील स्थान पुरातन काळापासून वंदनीय मानले गेले आहे. गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा." असे मार्गदर्शन प्राचार्य निवेदिता पासलकर यांनी केले.        नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात बुधवार (दि.१३) रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी झाली. यावेळी प्रा. पासलकर बोतल होत्या. पर्यवेक्षक उत्तम लोहकरे आणि सर्व सेवकांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवी ते दहावी अखेरील विद्यार्थिनींनी सुंदर शुभेच्छापत्र तयार केली व शाळेतील शिक्षकांना देण्यात आली. विद्यार्थिनींनी गुरुचे महत्व दर्...

नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण नाही : १९ जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

Image
  नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण नाही १९   जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या संदर्भात आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांठिया समितीने सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी पुढील सुनावणी येत्या १९ जुलैला होणार असून , तोपर्यंत पुढील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू नये , असे निर्देश कोर्टाने दिले. न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमाेर या प्रकरणाची सुनावणी झाली. निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारतर्फे तुषार मेहता यांनी केली. ओबीसी आरक्षणासंदर्भात जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नियुक्त केला आहे. आयोगाचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. या अहवालाचा अभ्यास होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी राज्य सरकारतर्फे केली. त्यावर , आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या...

6 जण प्रवास करीत असलेली स्कॉर्पिओ नाल्यात गेली वाहून

Image
  नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केळवदजवळ एका नाल्यामध्ये स्कॉर्पिओ अडकली असून त्यामध्ये असलेले 6 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. सतरापूर आणि नांदा गावांमधून वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहात असताना स्कॉर्पिओ चालकानं गाडी नेण्याचं भलतं धाडस केलं. मात्र पाण्याचा मोठा लोंढा आला आणि स्कॉर्पिओ वाहून गेली. एका खडकाला गाडी अडकली मात्र त्यातून प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, असं दृष्यांवरून दिसतंय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यातील कुणी बचावलं असण्याची शक्यता फारच कमी असल्याचं मानलं जातंय. या धक्कादायक घटनेमुळे भलतं धाडस कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. हे सुद्धा वाचा

लोकशाही मध्ये पोलिसी राज नको; जामीन मिळण्यासाठी सोपा कायदा कारा ; सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

Image
 लोकशाही मध्ये पोलिसी राज नको; जामीन मिळण्यासाठी सोपा कायदा कारा ; सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना नवी दिल्ली : दि.१३    लोकशाहीत पोलीस राज्य आहे, असा आभास कधीच निर्माण केला जाऊ शकत नाही. कारण, दोन्ही संकल्पना एकमेकांच्या विरुद्ध आहेत. असे निरीक्षण करून सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे .त्याच बरोबर केंद्र सरकारला जामीन मंजूर करणे सुलभ करण्यासाठी 'बेल ॲक्ट'च्या स्वरूपात विशेष कायदा आणण्याची शिफारस केली. सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या निकालातील निर्देशांचे उल्लंघन व कलम ४१ आणि ४१अ सीआरपीसी (पोलीस केव्हा अटक करू शकतात) चे उल्लंघन करून होणाऱ्या अनावश्यक अटकेमुळे ही समस्या उद्भवली आहे, असे म्हटले आहे. अनावश्यक अटक टाळण्याचे निर्देश निर्देशांचे पालन करण्यात तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा आढळल्यास न्यायालयाने तो उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. सीआरपीसीच्या कलम ४१ आणि ४१ अ चे पालन न झाल्यास आरोपी जामिनासाठी पात्र आहे. जामिनावर विचार करताना, जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीला हजर केले जाते तेव्हा किंवा पोलिसांनी अशा प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यावर पुन्हा स्वतंत्र जामीन अर्जाची गरज...

डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंदीला आव्हान, शासनाच्या २०१२ च्या 'त्या' अध्यादेशाला न्यायालयाकडून स्थगिती

Image
  डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस बंदीला आव्हान , शासनाच्या २०१२ च्या ' त्या ' अध्यादेशाला न्यायालयाकडून तूर्त स्थगिती मुंबई-           सरकारी नोकरी करणाऱ्या  डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यास मनाई करणारा राज्य सरकारचा २०१२ च्या अध्यादेशाला डॉक्टरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्याची दखल घेत खंडपीठाने ' त्या ' अध्यादेशाला तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने ऑगस्ट २०१२ रोजी अध्यादेश काढून खाजगी सेवा देण्यावर बंधने घातली आणि त्या ऐवजी डॉक्टरांना विशेष व्यवसाय रोध भत्ता सुरू केला. मात्र , या अध्यादेशामुळे डॉक्टरांचे नुकसान होत असल्याचा दावा करत डॉक्टरांनी या निर्णयाला २०१२ मध्ये मॅट कडे दाद मागितली. मॅटने सरकारचा निर्णय योग्य ठरवत २०१४ साली डॉक्टरांची मागणी फेटाळून लावली. मॅटच्या या निर्णयाला पुण्यातील भोर येथील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ अनिल राठोड यांनी ॲ ड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर न्या. एस. व्ही. गंगाप ू...

महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Image
 महापालिका स्टाफ नर्स भरतीला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची माहिती पिंपरी, १३ जुलै - पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागात मानधनावर 15 वर्षांपासून काम करणारे, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणा-या स्टाफ नर्स, एएनएम यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा ठरावाकडे दुर्लक्ष करुन पालिका प्रशासनाने राबविलेल्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच महापालिका सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावावर 6 आठवड्यात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी निर्णय घ्यावा. याचिकाकर्ता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या 123 सभासदांना कामावरुन कमी करु नये असा आदेशही न्यायालयाने दिला. त्यामुळे या स्टाफ नर्सला मोठा दिलासा मिळाला असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे समन्वयक  शशांक इनामदार, सल्लागर अॅड. सुशील मंचरकर, अमोल घोरपडे, दीपक पाटील, राहुल शितोळे आणि संघटनेच्या सभासद बह...