आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण नक्कीचं वाचेल; डॉ.प्रा.दिगंबर दुर्गाडे
"आपण केलेल्या रक्तदानातून, कोणातरी एका व्यक्तींचे प्राण नक्कीच वाचत असतो. कधी काळी याच रक्तामुळे कळत - नकळत आपल्या नातलागांचाही प्राण वाचतो.. त्यामूळे प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य, सामाजिक कर्तव्य, म्हणून रक्तदान करायलाच हवे"; असे मत, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे येथे मानले.
रविवार (दि. २४) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात 'भव्य रक्तदान' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. दुर्गाडे बोलत होते.
यावेळी वाल्हे गावाचे सरपंच अमोल खवले, नीरा- वाल्हा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष उत्तमराव धुमाळ, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्ष कोमल निगडे, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, राजेश चव्हाण, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सुर्यकांत भुजबळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे समन्वयक अशोक बरकडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष किरण गदादे, शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बरकडे, मुंबई सेवादल अध्यक्ष हनुमंत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष समदास भुजबळ, राष्ट्रवादी सरचिटणीस दादासाहेब मदने, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थ तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.