Posts

Showing posts with the label काँग्रेस

कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या

Image
 कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित दि.18 कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.  सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?  सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपद...

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव

Image
 शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव शरद पवारांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडाली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांनी आपल्या भूमिका प्रतिक्रिया आग्रहीपणे मांडण्यास सुरुवात केली आणि शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांना विनंती व विनवणी केली जात आहे पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील आज पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचा आयोजन करून एकत्रितपणे ठराव संमत करण्यात आला या ठरावांमध्ये शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा व कार्याध्यक्ष ची निर्मिती करून या पदावर ती त्यांना योग्य असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी आणि कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्षाचा कारभार चालवा शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तेच प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच पद या पदावर ती कोणाचीही नेमणूक केली जाऊ नये फक्त त्यां...

आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

Image
 आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट  बाजार समितीतील अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस    नीरा दि.२०               पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 142 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचं भाजपच्यावतीने सांगण्यात येतं आहे . तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेनं ही सहभाग घेतला आहे.त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र विजयी मतदान आघाडीच्या बाजूला आहे.त्यामुळे इतर पक्ष ऐनवेळी माघारी घेतात की, निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागेल.दुपारी तीन नंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल .      नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील काळात बिनविरोध किंवा का...

राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?

Image
  राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?  नवीदिल्ली दि.१५ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मु...

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितिच्या निवडणुकीत भाजप करणार एन्ट्री

Image
  नीरा कृषी उत्पन्न बाजार समितिच्या निवडणुकीत भाजप करणार एन्ट्री१८जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शामराजे कुंभार यांची माहिती  नीरा दि.२   पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध पार पाडली जाते. मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टीच्यावतीने सर्व १८ जागांवर उमेदवार उभे करून मतदानाने उमेदवारांची निवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी भाजपला बिनविरोध निवडणूक नको असल्याचे नीरा शहर भाजपचे अध्यक्ष शामराजे कुंभार यांनी म्हटलंय.     पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती मागील काही वर्षापासून हालाखीचे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक कशी पारपाडता येईल याबाबत प्रयत्नशील असतात. मागील पंधरा वर्षात तीन निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी, त्याचबरोबर विद्यमान आ. संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतरे यांनी सुद्धा नेहमीच...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

Image
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द नवी दिल्ली दि.२४ देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यां...

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

Image
 सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप. आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ?  काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी     सासवड दि.२४             पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला.             केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप प...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

Image
 काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा  सुरत येथील न्यायालयानं सुनावली शिक्षा  मुंबई दि.१३     2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी केलेल वक्तव्य राहुल.गांधी यांच्या एका वक्तव्याने ते चांगलेच आदचानित आले आहेत.मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? राहुल गांधीयांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता त्यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे        सन 2019 साली राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगि...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन

Image
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन    सासवड दिनांक. ३०     अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले याबाबत शनिवार (दिनांक 29) रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक पारपडली या बैठकीत मोटरसायकल रॅली काढण्याचं जाहीर करण्यात आले   पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३.नोव्हेंबर रोजी सासवड ते लोणावळा अशी ही मोटार सायकर रॅली कढण्यात येणार आहे .आज सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गणेश जगताप ,तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरूगे , व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.