Posts

Featured Post

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.

Image
 नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू  चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.  पुरंदर :       पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चारचाकी व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाले आहेत. दुचाकीस्वार अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. गणेष बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे (ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिरोज अल्लाउदीन सय्यद (वय ४७ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा यांनी जेजुरी पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.       याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. ७ जुलै)  दुपारी  सव्वा चार वाजता सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. ११ सी. क्यु  २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे ...

पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात! तुमचं नाव यादीत आहे का?

Image
पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात!  तुमचं नाव यादीत आहे का?  पुणे :        पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी २ हजारांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे वर्षभरात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.       यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे काही भागात पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. काही ठिकाणी पेरणीच पुन्हा करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. अशा वेळी केंद्र सरकारकडून मिळणारे २ हजार रुपये हे त्यांच्यासाठी खूप उपयोगाचे ठरतील. म्हणून सगळे शेतकरी हप्ता कधी जमा होतोय, याकडे लक्ष ठेवून आहेत.         अनेक जण म्हणत होते की जून महिन्याच्या शेवटी हप्ता मिळेल. पण अजून पर्यंत तो जमा झालेला नाही. आता अशी शक्यता आहे की १८ जुलै २०२५ रोजी बिहारमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ...

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढवणार नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस.

Image
 🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढणार  नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस.  पुरंदर :       पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील वीर धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर अद्याप पावसाने विश्रांती घेतली नाही. परिणामी त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून सोमवारी (दि.८ जुलै) सकाळी ६ वाजता विसर्ग वाढवण्यात येणार असून नीरा नदीच्या पात्रात ९ हजार ६९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू होतं आहे.         नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      वीर धरण ८०.८९ टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणात एकुण क्षमतेच्या ६८ टक्के पाणीसाठा झाला ...

शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा

Image
 शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा इंदापूरसह राज्यातील शाळांना निर्देश; विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट मोफत द्या पुणे | 2 जुलै २०२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) व मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम वसूल करू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे. ही कारवाई श्री. गणेश मोहन गुप्ते आणि श्री. प्रशांत कोरडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालये हे प्रमाणपत्र देताना प्रति विद्यार्थी ₹२०० बेकायदेशीरपणे घेत आहेत. संचालनालयाचा कडक इशारा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/(५५/१५)/समन्वय कक्ष, दिनांक ४ जानेवारी २०१६ नुसार, विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम मागणे नियमबाह्य असून, अशा प्रकारची वसुली झाल्यास शाळांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी व ...

नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास

Image
नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास  पुरंदर :  नीरा ता.पुरंदर येथील प्रभाग २ मधिल एका घरात चोरी झाल्याची तक्रार नीरा पोलीसांत देण्यात आली आहे. रोख रक्कम दहा हजार, आईचे व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याची लेखी तक्रार वसीम रफीक बगवान (रा.नीरा वाई नं.२) यांनी दिली आहे.      नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वसीम रफीक बगवान यांच्या घराचे बांधकाम चालू असलेया मुळे बागवान त्यांचे घरचे आई, वडील भंडारी यांच्या घरी घर भाड्याने घेऊन राहत आहे. २८ जून रोजी रात्री त्यांच्या घरातील पैसे व दागिने चोरीला गेले आहे. रोख रक्कम दहा हजार व आईचे दागिने व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेलेला आहे. बगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार आईचा दोन तोळ्याचा राणीहार, एक तोळ्यांचे दोन तीन प्रकारचे कानातले, लहान बाळाचे मनगटे, बहीणीचे अडिच तोळ्यांचा गंठण व दिड तोळ्यांचा लेक्लेस चोरांनी लंपास केल्याचे तोंडी सांगितले. या चोरीचा पोलीसांनी तपास होण्यासाठी अर्ज केला आहे.  दरम्यान त्याच रात्री चारच्या सुमारास संशयास्पदरीत्या एक व्यक्ती या परिसरात चालत जाताना दिसत असल्याचे दोन ठ...

धक्कादायक विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Image
धक्कादायक  विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू  फलटण :         राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठ्ठल रुक्मिनी सह माऊली माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढपुराकडे चालली आहेत. ज्ञानोबा तुकाराम नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेला एका वारकरी विसाव्यासाठी थांबले. मात्र, अचानक या वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.      संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वडजल ते तांबेमळा दरम्यान निंबाळकर वस्ती येथे नामदेव किसन मारकड वय ८० रा. न्हावी ता. इंदापूर जिल्हा पुणे हे विश्रांती घेत होते व तेथेच झोपी गेले. पालखी पुढे निघाल्यावर नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कारासाठी गावी नेले. फलटण पोलिस ठाण्यात आकस्म...

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम

Image
 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम  पुरंदर दि.२५ :       पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचे सुपुत्र, प्रगतशील अंजीर व सीताफळ शेती व्यावसायिक हनुमंत शिवदास लवांडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून मूळचे लातूरचे पण सध्या नारायणपूर येथे राहत असलेले अभिनव शंकर हलसे व अनिकेत शंकर हलसे या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.      उच्चशिक्षण घेण्याची अतोनात इच्छा असलेल्या हलसे बंधूंची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण घेणे जिकीरीचे झाले होते. हा विषय पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या १९९२ ते १९९४ अकरावी बारावी कला विभागाचा मित्र-मैत्रिणींच्या सदाबहार जिव्हाळा मित्र परिवाराला कळविला. त्या सर्वांनी हनुमंत लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या वतीने त्यांच्या शुभहस्ते सासवड मधील प्रसिद्ध हॉटेल मोहिनी येथे हलसे बंधूंन...