अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब
अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब पुरंदर | दिवे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी दिवे घाटातून मार्गक्रमण करतात. हा सोहळा निश्चित तारखेला होतो, हे माहिती असतानाही दिवे घाटातील रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. अपूर्ण रस्त्यामुळे पालखीला घाट पार करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला आणि यामुळे वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड गजरात माऊलींच्या पालखीने सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. ऐतिहासिक दिवे घाटातून पालखीचे आगमन उत्साहात झाले असले, तरी अपूर्ण रस्ता, खडी, धूळ आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे पालखीच्या हालचाली संथ झाल्या. लाखो वारकऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागली. वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया द...