पोस्ट्स

Featured Post

अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब

अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब  पुरंदर | दिवे :        संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी दिवे घाटातून मार्गक्रमण करतात. हा सोहळा निश्चित तारखेला होतो, हे माहिती असतानाही दिवे घाटातील रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. अपूर्ण रस्त्यामुळे पालखीला घाट पार करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला आणि यामुळे वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.         "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड गजरात माऊलींच्या पालखीने सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. ऐतिहासिक दिवे घाटातून पालखीचे आगमन उत्साहात झाले असले, तरी अपूर्ण रस्ता, खडी, धूळ आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे पालखीच्या हालचाली संथ झाल्या. लाखो वारकऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागली.        वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया द...

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार

इमेज
 पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा.योगेश खरात यांचा सत्कार इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.योगेश मारुती खरात यांनी डॉ.भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 'इम्पॅक्ट ऑफ फूड डिलिव्हरी स्टार्टअप्स ऑन हॉटेल इंडस्ट्री इन पुणे विषयावर संशोधन प्रबंध सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली. या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रा. खरात यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,डॉ. प्रशांत शिंदे,डॉ.विलास बुवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,खजिनदार वीरबाला पाटील,विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग,विश्वस्त शंकर रणसिंग यांनी प्रा.खरात...

वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला

इमेज
  वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला शासकीय कामात अडथळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण, पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलिसांत गुन्हा जेजुरी | प्रतिनिधी पिसर्वे (ता. पुरंदर) येथील साईलिला हॉटेलवर सुरू असलेल्या वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महावितरणचे प्रधानतंत्रज्ञ विक्रम किसनराव तुपे (वय ४१, रा. खंडोबानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते, गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते (सर्व रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पिसर्वे येथील साईलिला हॉटेलमध्ये वीजचोरीची तपासणी व कारवाई करीत होते. यावेळी त्यांनी संबंधितांना शासकीय ओळखपत्र दाखवून कारवाईबाबत माहिती दिली. मात्र, आर...

पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन; "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी

इमेज
पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन;  "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी  मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. "माफी मान्य नाही, गुन्हा दाखल करा" या स्पष्ट भूमिकेसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर निषेध आंदोलने करण्यात आली.  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पत्रकारांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.  आंदोलनादरम्यान पत्रकारांनी "पत्रकारांचा अपमान सहन करणार नाही", "पत्रकारांवर हल्ला खपवून घेणार नाही", "पत्रकार एकता जिंदाबाद" आणि "माफी नाही, कारवाई हवीच" अशा जोरदार घोषणा देत संबंधित खासदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका

इमेज
पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका  सासवड :       लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच "मारून टाकीन" अशी धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर केवळ निषेधाच्या घोषणा करून भागणार नाही, तर कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे, असे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बी.एम. काळे यांनी व्यक्त केले      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मिडिया परिषद पुणे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सासवड पोलीस स्टेशनचे निरिक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देऊन भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.  यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक बी.एम. काळे, डिजिटल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भरत निगडे, राज्य सरचिटणीस राहुल शिंदे, दत्ता भोंगळे, पुरंदर तालुका पत्...

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

इमेज
 वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस      पिंगोरी, ता. पुरंदर : आजच्या काळात वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च, पार्ट्या आणि दिखाव्याला फाटा देत वाल्हे येथील युवक चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पिंगोरी येथील मुक्ताई वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप केले. पिंगोरी येथे उद्योजक लक्ष्मण कदम व त्यांच्या पत्नी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परंतु शिक्षण घेण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून मुक्ताई वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासह शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची व्यवस्था करण्यात येत असून त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडत नाही. सध्या या वसतिगृहात सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस याच विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे ...

मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी

इमेज
 मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी मनरेगा योजनेतील अनागोंदीचा फटका; जवळार्जुन येथील शेतकऱ्याची व्यथा   नीरा    पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावातील शेतकरी सुरेश रामचंद्र टेकवडे यांना मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळूनही निधी अडकल्याने आणि आवश्यक मस्टर न भरल्याने शेतकऱ्याला कर्जाचा मोठा बोजा सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गट क्रमांक २९४ मधील वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ३० मे २०२५ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी ४ लाख ९९ हजार ९६४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून काम सुरू करण्यास सांगितल्याचे शेतकरी सुरेश टेकवडे यांनी सांगितले. टेकवडे यांनी कर्ज काढून स्वतःच्या खर्चातून विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही त्यांना मंजूर निधी मिळालेला नाही. मनरेगा योजनेअंतर्गत आवश्यक असलेले मस्टर अद...