मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी
मंजूर विहीर पूर्ण; निधी मात्र अडकला, शेतकरी कर्जबाजारी मनरेगा योजनेतील अनागोंदीचा फटका; जवळार्जुन येथील शेतकऱ्याची व्यथा नीरा पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गावातील शेतकरी सुरेश रामचंद्र टेकवडे यांना मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक सिंचन विहिरीचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळूनही निधी अडकल्याने आणि आवश्यक मस्टर न भरल्याने शेतकऱ्याला कर्जाचा मोठा बोजा सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, गट क्रमांक २९४ मधील वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ३० मे २०२५ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी ४ लाख ९९ हजार ९६४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून काम सुरू करण्यास सांगितल्याचे शेतकरी सुरेश टेकवडे यांनी सांगितले. टेकवडे यांनी कर्ज काढून स्वतःच्या खर्चातून विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही त्यांना मंजूर निधी मिळालेला नाही. मनरेगा योजनेअंतर्गत आवश्यक असलेले मस्टर अद...