पोस्ट्स

राजकीय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

इमेज
 महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार   जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा  बारामती ( पुणे)    महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केले आहे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं असा इशारा हाके यांनी दिला आहे.   लक्ष्मण हाके हे शनिवारी रात्री पुरंदर तालुक्यातील निरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हाके यांनी यावेळी अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटि...

ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ?

इमेज
  ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ?  ही तर वैचारिक दिवाळखोरी : विजय शिवतारे  नीरा दि.३१     लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, आपला पैसा खर्च केला, त्यांना अजित पवार आपल्या पक्षामधून उमेदवारी देतात हे फारच आश्चर्यजनक असल्याचे   शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही पुरंदर मधून ताकद पणाला लावली म्हणून तरी सुनेत्रा पवार यांना 90 हजारापेक्षा जास्त मते मिळाली. अजित पवारांचे हे वागणं समजण्या पलीकडचे असल्याचे म्हणत, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अस विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. ते आज नीरा येथे माध्यमांशी बोलत होते.       विजय शिवतरे यांनी आज नीरा येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. घराघरात जाऊन विजय शिवतारे यांनी मतदारांशी संपर्क साधला. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फारच कमी कालावधी असल्यामुळे आपला कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता विजय शिवतरे हे आता कामाला लागले आहेत.या दरम्यान त्यांनी नीरा ...

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

इमेज
पुणे : संपूर्ण देशांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार यांचा यांचा पराभव केला. देशात सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनिता पवार यांची राज्यसभेवर निवड करावी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचविसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त पुण्यात पक्ष कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते व दीपक मानकर व राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ठराव मांडण्यात आला या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनिता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती...

वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
 वाल्हे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामीण भागातील ९७६ विक्रमी रक्तदात्यांनी केले रक्तदान. वाल्हे (दि.२९) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्टवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने, वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हास्ते करण्यात आले.या आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ग्रामीण भागातील विक्रमी संख्येत रक्तदान करून, या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, प्रा.संतोष नवले, उद्योजक सुनिल पवार, गोरख कदम, हनुमंत पवार, संदेश पवार, दादासाहेब राऊत, अभि दुर्गाडे आदींसह अनेक मान्यवर, तरूण वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यां प्रत्येक रक्तदात्यांस प्रशस्तिपत्र उपस्थित मान...

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

इमेज
 फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल     मुंबई दि १८ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप- शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बे-बनाव येतोय, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला...

गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर

इमेज
 गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर सासवड : गुरोळीच्या (ता. पुरंदर) उपसरपंच पदी संदीप खेडेकर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायतच्या विशेष निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच मोहिनी मस्कु खेडेकर या होत्या .तसेच सहाय्यक म्हणून ग्रामसेविका अनिता भोस यांनी काम पाहिले गावची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती . सत्ताधारी गटांत ठरल्याप्रमाणे मधुकर खेडेकर यांनी राजीनामा दिला . त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती . त्या जागे करीता संदीप खेडेकर यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली . खेडेकर हे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचे खाजगी सचिव प्रशांत खेडेकर यांचे बंधू होत. पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नूतन उपसरपंच खेडेकर हे समर्थक आहेत .यावेळी कार्यक्रमास गुरोळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, माजी उपसरपंच मधुकर खेडेकर, सदस्य जीवन खेडेकर, रेणुका खेडेकर, सुरेश भोसले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. 

नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व- वासुदेव काळे

इमेज
  नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व-  वासुदेव काळे चांबळी येथे भाजप नेते जालिंदर कामठे आयोजित मन की बात  कार्यक्रम गराडे दि. 26 (वार्ताहर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामातून सध्या भारत देशाचा गतिमान विकास सुरू आहे. एकखांबी नेतृत्वामुळे गतिमान निर्णय घेतले जात आहेत. नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.     चांबळी (ता. पुरंदर ) येथे पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना श्री. काळे बोलत होते.     यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस माऊली शेळके, पुरंदर तालुका भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत रणवरे, संघटक शिवाजी शेंडकर, अनिल कामठे, गौरव कामठे, गणेश शेंडकर, रमेश कामठे, मधुसूदन शेंडकर, विशाल शे...

सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

इमेज
 सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा सासवड दि.३  पुरंदर मधील सर्व दिव्यांग, विधवा, निराधार यांना ताकद देण्याचे प्रामाणिक प्रयत्न यापुढे मी करणार आहे. पिवळी शिधापत्रिकासाठी पात्र दिव्यांगांनी माझ्या संपर्क कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करावी त्यांना घरपोच पिवळी शिधापत्रिका मिळण्याची मी व्यवस्था करतो तसेच पिवळी शिधापत्रिकासाठी कोणालाही १ रु सुद्धा देऊ नका तसेच कोणीही दिव्यागांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे तसेच लवकरच पुरंदर मधील दिव्यांगाचा महा मेळावा घेण्यात येईल अशी घोषणा शिंदे गटाचे गटनेते तसेच प्रवक्ता विजय शिवतारे यांनी यावेळी केली. एमआरडी अंतर्गत असणाऱ्या ३५ गावातील दिव्यांग बांधवांनी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केले.           सासवड ( ता पुरंदर ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दादा जाधवराव सांस्कृतिक भवनामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पुरंदर यांच्...

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला

इमेज
  एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला जळगाव : दि.१३       शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना खोचक टोला लगावला आहे. गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येने खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असे देखील महाजन यांनी म्हटले आहे.     ...

अनिकेत जगताप यांच्यासह युवकांचा शिवसेनेत प्रवेश

इमेज
 ताथेवाडीत काँग्रेसला खिंडार   अनिकेत जगताप यांच्यासह युवकांचा शिवसेनेत प्रवेश   पुरंदर दि.        ताथेवाडी (सासवड) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार संजय जगताप यांचे समर्थक अनिकेत जगताप यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह अनेक युवकांनी सेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम ताथेवाडी येथे पार पडला.           अनिकेत जगताप हे सासवड शहरातील एक प्रथितयश व्यावसायिक मानले जातात.  त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला येथे चांगले बळ मिळणार आहे. त्यांनी आपल्या वाढदिवशी सेनेत प्रवेशाचा मनोदय जाहीर केला होता. यावेळी बोलताना ना. शिवतारे म्हणाले, मागील अडीच तीन वर्षात तालुक्यात विकासाचा खेळखंडोबा झाल्याने युवकांचा आणि सामान्य माणसाचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील महत्त्वाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात पळवले गेले. तालुक्याच्या आमदारांनी पुरंदरशी गद्दारी करत बार...

राष्ट्रवादीने पाच मते ठेवली राखून

इमेज
 राष्ट्रवादीने पाच मते ठेवली राखून मुंबई दि.२० राष्ट्रवादीने  काँगेस पक्षाने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवली आहेत.त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील उत्सुकता आता वाढली आहे.त्यातच  असताना  एक भाजपा एक नेता  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेला आहे.            भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. शिवसेनेच्या आमदारांची बस  यायला उशीर झाला होता. वाहतूक कोंडीत ही बस अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. श उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत. या नि...

सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा,

इमेज
 सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा, राज्य सरकारने घेतलाय निर्णय  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती पुणे:        बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता आपल्या गावात बालविवाह झाल्यास व त्याची नोंद घेतल्यास गावकारभारी म्हणजेच सरपंचांन दोषी धरत त्यांचे पद जाऊ शक्ते. याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांंनी दिली आहे. आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा फटका सरळ गावकीचे पुढारपण करणाऱ्यांना बसणार आहे. राज्य सरकारने या कायद्याची कठोर अंमलबजावणीचे संकेतच दिले असूून त्याविषयी  च् गंभीरतेचा इशारा दिला आहे. गावात बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. एवढयावरच न थांबता राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती...

आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे

इमेज
 आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे  भाजप मोटार सायकल रॅलीचे नीरा येथे उत्साहात स्वागत नीरा दि.१२    केंद्र सरकारने आठ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .जाणतेसाठी उपयुक्त अशी अनेक कामे केली.ही कामे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवीत.त्याचा लाभ आणि त्याची माहिती जनतेला मिळायला हवी, म्हणून आजा भाजपाच्यावतीने दिवे ते नीरा असे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे आणि नीरा येथे रॅली च्या समारोपाच्या वेळी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने केलेली कामे आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचे ते म्हणाले. पुरंदर तालुक्यात आज (दि.१२)  रोजी पुरंदर भाजपाच्यावतीने मोटार सायकल  रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील दिवे ते नीरा अशा मार्गावर पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम  जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला सासवड, जेजुर, वाल्हा, नीरा या प्रमुख शहरा बरोबरच अनेक गावातून या रॅलीचे स्वागत करण्यात...

नीरा पालखीतळा समोरील रस्त्याचे काम सुरू: आता खड्डा बुजणार

इमेज
 नीरा पालखीतळा समोरील रस्त्याचे काम सुरू: आता खड्डा बुजणार  पालखी सोहळ्या पूर्वी काम पूर्ण करण्याचे उपसरपंच राजेश काकडे यांचे आश्वासन  नीरा दि.१०      नीरा येथील पालखीतळा समोरील रस्ता नव्याने करण्याच्या कामाला आज पासून सुरवात करण्यात आली आहे. नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांच्या उपस्थितीत आज दि.१० रोजी या कामाला सुरवात करण्यात आली.या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वारकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असे. अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.       पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा विसावा असलेल्या नीरा येथील पालखीतळा समोर दर वर्षी मोठा खड्डा पडलेला असतो. हा खड्डा कायम स्वरुपी बुजविण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली होती. वृत्तपत्रे आणि माध्यमांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख  यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचन...

पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर : उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती

इमेज
  पालखीतळा समोरील रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजुर : उपसरपंच राजेश काकडे यांची माहिती   नीरा दि.७     नीरा ( ता. पुरंदर) येथील पालखीतळाच्या समोरील खड्डा बुजवून तो रस्ता चांगला करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजय जगताप यांच्या पुढाकाराने एक कोटीचा निधी मंजूर झाला असून येत्या २२ तारखे पूर्वी तो रस्ता पूर्ण होईल अशी माहिती निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.   नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक ७ जून रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे ,उपसरपंच राजेश काकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाले की, नीरा शहरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देत आहेत. ग्रामपंचायतीने पाठ पुरावा केल्यानंतरच कामे मंजुर होत असतात.कोणीही मी पत्र दिलं म्हणून काम झालं म्हणून ठीमकी मिळवण्याची गरज नाही.कारण या कामांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मगणीं केली तेव्हाच ती कामे मंजूर होत असतात.   नीरा- शिवत...

शिवसेनेने सर्व आमदार बोलावले मुंबई मध्ये

इमेज
 शिवसेनेने सर्व आमदार बोलावले मुंबई मध्ये  मते फुटू नयेत म्हणून खबरदार  मुंबई: दि.६ राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या मुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी होणार, असा छातीठोक दावा भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून केला जात आहे. धनंजय महाडिक यांना जिंकवण्यासाठी आमदारांच्या मतांची जुळवाजुळवी झाल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यामुळे आता शिवसेनेकडून आपले आमदार फुटू नयेत,यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल व्हा, असा आदेश दिल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाईल. जेणेकरून भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावणे शक्य होणार नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांचे...

जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ, उपाध्यक्षपदी रत्नकांत तांबे बिनविरोध.

इमेज
 जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ, उपाध्यक्षपदी रत्नकांत तांबे बिनविरोध. वाल्हे (दि.२६) जेऊर (ता. पुरंदर) येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर भिकोबा धुमाळ व उपाध्यक्षपदी रत्नकांत साधू तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार (दि. २३ एप्रिल ) अटीतटीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा तेरा शून्य असा धुरळा उडवत  सोसायटी ताब्यातील ठेवण्यात यश मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता.  सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने भैरवनाथ-जयमल्हार विकास परिवर्तन पॅनेलचा तेरा-शून्य असा धुरळा उडवत सोसायटीवर निर्विवाद सत्ता कायम राखली. दोन्ही पॅनेलमधील घमाशान लढाईनंतर सत्ताधारी श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने स्वत:च्या ताब्यातील सोसायटी ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. दरम्यान, सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटल्यानंतर बुधवार (दि.२५) जेऊर येथील, जेऊरग...

सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप

इमेज
 सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप पुणे दि.२७     राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत. तर त्या सर्व टोळीचा प्रमुख असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातूनच ते काहीही बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत.' ना घर का ना घाट का' अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य बिघाडलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोकेदायक आहे. त्यामुळे त्यांनी घरी जावे घरातील माय माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहत असेल दोन घास खावे. आणि मानसिक आजारावर उपचार करून आराम करावा.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.      चंद्रकांत पाटील यांची जीभ पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्या वर घसली होती. मासानात जा असा शब्द त्यांच्या तोंडातून निघाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा मानसिक दिवाळखोरीच...

ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे?

इमेज
 ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे?    मुंबई दि.२५       ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यामुळे याला मोठे उधाण आले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्यात यावी असं म्हटल आहे. 'एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे' असं पवार यांनी म्हटलंय. मुंबईतील ' वाय. बी. चव्हाण' सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा पारपडला यावेळी पवार बोलत होते. पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपलाही सुनावले. शरद पवार यांनी म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या लोकसंख्या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आज ओबीसी जनगणनेची मागणी होते आहे. एकदा देशाला कळू द्या ओबीसी संख्या या भारत देशामध्ये किती आहे ?हीच मागणी बिहारमधील मुख्यमंत्र्यांनी देखील केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र केंद्रातील सरकार हे ओबीसी जनगणना होऊ देणार नसल्याचे त्यांन...

इंधन दर कपातीवर शरद पवार काय म्हणाले?... केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देत इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा काल केली होती, त्यामुळे महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळणार आहे. या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. "काही ही नसल्यापेक्षा बरं आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे.

इमेज
 इंधन दर कपातीवर शरद पवार काय म्हणाले?... केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देत इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा काल केली होती, त्यामुळे महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळणार आहे. या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. "काही ही नसल्यापेक्षा बरं आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे.