Type Here to Get Search Results !

नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व- वासुदेव काळे

 


नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व-  वासुदेव काळे


चांबळी येथे भाजप नेते जालिंदर कामठे आयोजित मन की बात  कार्यक्रम


गराडे दि. 26 (वार्ताहर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामातून सध्या भारत देशाचा गतिमान विकास सुरू आहे. एकखांबी नेतृत्वामुळे गतिमान निर्णय घेतले जात आहेत. नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

    चांबळी (ता. पुरंदर ) येथे पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना श्री. काळे बोलत होते.

    यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस माऊली शेळके, पुरंदर तालुका भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत रणवरे, संघटक शिवाजी शेंडकर, अनिल कामठे, गौरव कामठे, गणेश शेंडकर, रमेश कामठे, मधुसूदन शेंडकर, विशाल शेंडकर, अंकुश कोलते, बाबू कामठे, मंगेश कामठे, श्रेयस कामठे,शरद दळवी आदीसस्ह चांबळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

    जालिंदर कामठे म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात भारत महासत्ता बनेल. सर्व घटकांबरोबर शेती व शेतकरी वर्गाला लाभदायी योजना भारतीय जनता पार्टी राबवत आहे त्याचा शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा.

    मन की बात कार्यक्रमाद्वारे शेवटच्या घटकातील सर्वसामान्य माणसाचे कौतुक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात हे कौतुकास्पद आहे.  सभा व मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. तेथे खरं नाही तर बरं बोललं जाते. भाजपाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत, पीएम किसान योजना, प्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना मुळे गोरगरीब लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे‌

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर कामठे यांनी केले. सूत्रसंचालन माऊली शेळके यांनी केले. आभार शिवाजी शेंडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies