Posts

Showing posts with the label पुणे

जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी

Image
 जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी     हॉस्पिटल अनाधिकृत, असल्याचे म्हणत री. पा. इ करणार मुख्याधिकारी कार्याल्यासमोर हलगी नाद आंदोलन  जेजुरी :     महाराष्टाचे कुलदैवत म्हणून जेजुरी सर्वत्र सुपरिचित आहे. याठिकाणी बहुवीध प्रांतातून, प्रदेशातून लोक वास्तव्यास आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने येथे देशाच्या काना कोपऱ्यातून येऊन लोक उदर निर्वाह करीत आहेत. तशाच काहींशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादन नं करता, कोणत्या तरी डॉक्टर च्या हाता खाली कंपाउंडर म्हणून शिकलेल्या व जुजबी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने मल्हार नगरीत दवाखाना नव्हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.      याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेजुरी येथे सिंह मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने पुणे -पंढरपूर पालखी महामार्गा लगत हॉस्पिटल सुरु आहे. पूर्वी छोट्या स्वरूपात जुन्या जेजुरी येथे एका खोलीत हे सुरु होते. आत्ता मात्र एखाद्या मल्टि नॅशनल हॉस्पिटलला लाजवेल अशा स्वरूपात हे हॉस्पिटल सुरु आहे. या...

स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात

Image
 स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात     गराडे दि.९(वार्ताहर) :     दिवे गावाजवळील जाधववाडी ( ता. पुरंदर ) येथील कुमार सर्जेराव आढाळगे यांच्या घरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे वस्तू जळून नुकसान झाले होते. ही बातमी समजताच स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जगताप यांनी संसार उपयोगी वस्तू देऊन आढाळगे परिवाराला मदतीचा हात दिला.     यावेळी त्यांच्या समवेत स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुर शिवरकर ,माधव शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव , राजू आढाळगे,श्रीकांत जाधवराव, भगवान आढाळगे, सोमनाथ आढाळगे उपस्थित होते.    याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जाधववाडी येथे कुमार आढाळगे,आई जयश्री आढाळगे पत्नी करिष्मा आढाळगे यांचे राहते घर आहे. हे तिघेही मजूर कामानिमित्त सासवडला गेले होते. सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. शेजारील ग्रामस्थांना घरातून  धुराच...

पुण्यात सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, पाच जणांवर गुन्हा, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

Image
आंबेगाव, पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चौघानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे त्यांनी त्या घटनेचा विडिओ तयार करून दुसऱ्याला पाठवला.त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणी आता चौघाविरोधात पारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, दोन अल्पवयीन मुले, सर्व रा. धामणी ता. आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून दोघीं अल्पवयीन बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोप...

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,

Image
-मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू, भोर दि. 10  मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं ह्या तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नावय.14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय. वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली  येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे.  मोहीत हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली...

पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.

Image
 पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.  नीरा :  दि. २८          पुरंदर तालुक्यात कोव्हिड रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात यापूर्वी दोन रुग्णांचे अहवाल बाधित आले असुन, आता सुपे (खुर्द) येथील एक युवकाचा सोमवारी कोरोना बाधित अहवाल आला आहे.     मागील आठवड्यात सासवड शहर व वनपुरी येथे प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आला होते. ते दोघे आता पुर्ण बरे झाले असुन, सोमवारी पुण्यातील सिरम कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी कंपनीत करण्यात आली होती. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील पानवडी रोडवरील सुपे (खुर्द) येथील एक व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसून तो होम आश्युलेशन मध्ये आहे. त्यांच्या संपर्कातील १३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली आहे.

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

Image
 सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप. आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ?  काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी     सासवड दि.२४             पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला.             केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप प...

निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात

Image
 करणी बाधेतून त्या सात जणांची हत्या ? निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात दौंड:       दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात सहा दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता या सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायकत धक्कदायक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील नातेवाईंकानीच म्हणजेच चुलत भावनेचं संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. जादूटोणा केला असल्याच्या संशयातून या हत्या केल्याचे समजत असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.         भीमा नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.    यामध्ये मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू (५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातो...

माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड

Image
 माजी मंत्री विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी निवड पुरंदर दि. १८    पुरंदर_हवेलीचे माजी आमदार ,माजी मंत्री,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे...तज्ञ सदस्य म्हनून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.     शिवतारे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत.पुणे जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रवादी विरोधात आक्रमक आघाडी घेतली आहे . पूर्वी पासूनच ते शरद पवार, अजित पवार,आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार टीका करतात.शिवतारे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मतदार संघात बांधनिही सुरू केली आहे .बारामती, इंदापूर, भोर अशा तालुक्यातून दौरे करून जनसंपर्क वाढवत राष्ट्रवादीच्या गोटात फोडा फोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवतारे हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवणीस यांचे जवळचे मानले जातात.. शिवसेनेत जरी असले तरी देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवड...

भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू

Image
  भोर मध्ये विजेचा शॉक लागून चारजणांना मृत्यू नदीत मोटार सोडत असताना झाला अपघात पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने घडली दुर्घटना      भोर दि.१५            पुण्यातील भोर तालुक्यातील निगडे गावात विजेचा शॉक लागून चारजण जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडलीय आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये बापलेकांचा ही समावेश आहे.   यामध्ये विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव यांचा मृत्यू झालाय.. चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल, महावितरण राजगड पोलीस, आरोग्य विभाग दाखल झाले आहे. घटनास्थळी व गावांमध्ये आक्रोश सुरू आहे.....

पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती

Image
 पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले : एस. एम. देशमुख यांची माहिती  पुणे  :   मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर निदर्शने झाली. पिंपरी चिंचवड येथेली दलित संघटनांनी पाटलांवर शाईफेक केली. याचे वार्तांकन व व्हिडीओ शुटींग करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना रविवारी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. याबाबत विविध पत्रकार संघटनांसह मराठी पत्रकार परिषदेने निषेध व्यक्त करत आंदोलनाची भुमिका घेतल्याने रात्री उशिरा पत्रकार वाकडे यांना सोडण्यात आल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.       पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांना अटक झाली, तर तब्बल ११ पोलीस निलंबित करण्याया हलचाली सुरू आहेत. त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा सरळ सरळ पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटली. मराठी पत्रकार परिषदेने या विषयाच्या अनुषंगाने तात...

पुणे, पेढे आणि उंदराचं औषध! आत्महत्या वाटणारी घटना हत्या असल्याचं कसं कळलं?

Image
  पु णे :   अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. पण नंतर मुलीने लग्नासाठी तगादा लावताच तिची थेट हत्या करण्यात आली. पण ही हत्या नसून आत्महत्या आहे , असा बनाव आरोपीकडून रचण्यात आला होता. अखेर हे सगळं प्रकरण पोलिसांच्या तपासातून उघड झालंय. ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात घडलीय. गेल्या 2 वर्षापासून आरोपीचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते , अशीही माहिती समोर आलीय. अल्पवयीन मुलीला जबरदस्ती आरोपीनं पेढे खायला दिला होता. या पेढ्यात उंदराचं विष कालवण्यात आलं होतं , असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. दरम्यान , प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणारी ही घटना हत्याकांडाचा प्रकार होता , हे आता उघड झालंय. धक्कादायक पाऊल रोहिदास करोटे नावाच्या आरोपीचे एका अल्पवयीन मुलासोबत संबंध होते. रोहिदास याने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. पण जेव्हा मुलगी लग्नासाठी आरोपी रोहिदास याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला , तेव्हा आरोपीने अल्पवयीन मुलीला संपवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचललं होतं. रोहिदास यान...

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.

Image
 मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.  अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन  पिंपरी :          राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे तयारी व इतर बाबींची माहिती घेतली, तसेच या अधिवेशनासाठी म्हणून राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये हे अधिवेशन होत असल्याने हा पिंपरी चिंचवड शहराचा गौरव आहे असे उद्गार यावेळी काढले.          अधिवेशन कोठे होत आहे, त्या स्थळाबाबतची माहिती, पत्रकारांच्या निवास व्यवस्थेबाबतची माहिती तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती अजित पवार यांनी यावेळी घेतली. या बैठकीस आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, ...

पुरंदरचा पोपट भर सभेत थोबाडात चप्पल खाणार : नाव न घेता नक्की हा इशारा कोणाला ?

Image
  पुरंदरचा पोपट भर सभेत थोबाडात चप्पल खाणार : नाव न घेता  हा  इशारा कोणाला ? सासवड दि.२७ पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून या विमानतळाच्या विरोधासाठी तयार झालेली संघर्ष समिती आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळते आहे.     महिलांच्यावतीने "विमानतळाच्या नावाखाली गल्लीबोळात भुंकणारा पोपट लवकरच भर सभेत थोबाडात चप्पल खाणार" अशा कशाचे स्टिकर सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.        यामुळे विमानतळ संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली असल्याचे सध्या पाहावयास मिळते. तालुक्यातील काही नेते विमातळाचा आग्रह धरत आहेत त्यामुळे बधितांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.       कोणाचे ही नाव न घेता पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सभेत चप्पल कोण खाणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे खरंच हा नेता सभेत चप्पल खाणार का?      सध्या सरकारमध्ये असलेल्या आमदारांना देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आह...

शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण

Image
  शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण  पुरंदर दि.२६   पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील महात्मा  ज्योतिबा फुले विधुलयाच्या    1990- 91 च्या दहावीच्या विध्यथ्यानी एकत्र येत शिवरी येथील वन विभागाच्या जागेत वृक्षा रोपण केलंय. हे वृक्ष मोठे होई पर्यंत याकडे लक्ष दिले जाणार आहे.साधारण 150 झाडांचे रोपण या वेळी करण्यात आले आहे..       यावेळी महेंद्र इंगळे, विकास ताम्हणे, हनुमंत वाबळे संदीप जगताप, प्रमोद जगताप, गंगाधर कामथे, राजेश इभाड, संतोष आबनावे, नाना होले, अनंता पोरे, प्रफुल्ल इंगळे, सोपान खेगरे, दत्तात्रय कदम, जालिंदर लिंबोरे, चंद्रशेखर कामथे, प्रकाश कामथे, गोरख कामथे, पुंडलिक आबनावे, सुनील कामथे, दत्ता लिंभोरे, कपिल काळाने कैलास कामथे, अनंता पोरे, असे असंख्य वर्गमित्र उपस्थित होते या वृक्षारोपणाचा दोन वर्षाचं टार्गेट ठेवून हे काम करण्यात आले झाडे पूर्ण होईपर्यंत त्याला पाणी दिले जाणार आहे.त्याच बरोबर यांची निगा राखली जाणार आहे.

४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी घेतलाआढावा

Image
  ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा  प्र मुख विश्वस्त एस.एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी घेतलाआढावा  पिंपरी चिंचवड : दि.२६ पिंपरी चिंचवड येथे होणारया मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी काल आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.. मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे..अधिवेशनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे.. काल एस.एम देशमुख, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पिंपरी चिचवड येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला.. परिषदेचे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडियाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सुरज साळवी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे.. अधिवेशनासाठी विविध १२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.. प्रत्येक समिती प्रमुखांनी आपल्यावरील जबाबदारीच्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली.. २००० पत्रकार बसू शकतील अशा वातानुकूलित सभागृहात परि...

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार शिवाजीराव शिर्के यांना प्रदान

Image
 पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार शिवाजीराव शिर्के यांना प्रदान पुणे दि.२५ पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक शिवाजीराव शिर्के यांना प्रदान करण्यात आला आहे. आज रविवारी दि.२६ रोजी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.        पिंपरी चिंचवड आणि परिसरात पत्रकारितेचे बीज रुजवण्या साठी भा.वी कांबळे यांनी प्रयत्न केले त्यांच्या बरोबरच शिवाजीराव शिर्के यांनी सुद्धा या भागात आदर्श पत्रकारिता केली.आज वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धाते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करीत आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघ...

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार

Image
 चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार पुणे दि.२३   - टाकळी हाजी ता. शिरूर येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी दि. २२ रोजी रात्री एका महिलेचा खून करण्यात आला आहे. ललिता महादेव काळे अस मयत महिलेच नाव आहे. तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने निघृन वार करून खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये शेजारी शेजारी पाच कुटुंब राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता.          त्यांचे दोघांचे कायमच भांडण होत होते, काल गुरुवारी दि. २२ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली तेव्हा दोघांचे भांडण झाले होते, आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. असे ललिताची बहीण चांदणी हिने सांगितले असून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी...

पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे

Image
 पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे     पुणे दि.२३ पुणे येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत कमानीवर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्री काळे फासाल्याची घटना समोर आली आहे. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात काळे फासून निर्मला सीतारामन यांचा फोटो खराब करण्यात आला आहे.या प्रकारामुळे या परिसरातील राजकीय वातावरण चांगलं तापले आहे.      अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. पुणे येथील सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथे आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमानिमित्त गुरुवारी स्वागत कमल लावण्यात आली होती. या फ्लेक्सच्या कमानीवर काही समाजकंटकांनी रात्री काळे बसले आहे. तसेच याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही  

लंपी मुळे यावर्षीचा भाद्रपद बैलपोळा नाही पंचायत समिती पुरंदर पशुसंवर्धन विभागाचे आदेश

Image
        लंपी मुळे यावर्षीचा भाद्रपद बैलपोळा नाही पंचायत समिती पुरंदर पशुसंवर्धन विभागाचे आदेश    नीरा  दि.२१            पुरंदर तालुक्यात सध्या लंपी रोगाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आज अखेर २८ जनावरे लंपी बाधित आढळली आहेत.त्यामुळे पंचायत समिती पुरंदरच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षी बैल पोळा साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत.या बाबतचे पत्र सरपंच ,पोलीस पाटील ,तलाठी यांना देण्यात आले आहे.      यानुसार पुरंदर तालुक्यातही या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने  संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.त्यामुळे लंम्पी चर्म रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे/ म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे इत्यादीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल मोठया प्रमाणावर एकत्र येऊन त्यांची मिरणुक काढली जाते. परंतु सध्याच्या परि...

नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले. चारही धराणातून विसर्ग वाढवला.

Image
 नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले. चारही धराणातून विसर्ग वाढवला.  पुरंदर दि.१६             राज्यात गेली काही दिवस दमदार पावसाने बँटींग केली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. क्षमतेपेक्षा धरणात पाणी येण्याचे प्रमाण ही वाढत आहे, परिणामी धरणातून पाणी सोडण्याचा वेग वाढवावा लागत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. शुक्रवारी वीर धरणातून नीरा नदिच्या पात्रात तब्बल ४३ हजार ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.      शुक्रवार दि.१६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून निरा खोऱ्यातील धरणातून पाण्याच विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणातून ७ हजार क्युसेक्सने, निरा-देवघर ३ हजार ३१६ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर विर धरणातून ३४ हजार ४५९ क्युसेक्सने पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जात होते. त्यानंतर दिवसभरात नीरा खोऱ्यातील धरण साखळीत पाण्याचे प्रमाण वाढते राहिल्याने सायंकाळी ०५ वाजल्या नंतर चारही धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. भाटघर धरणातून ११ हजार ८०० क्युसेक्सने, निरा-द...