निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात

 करणी बाधेतून त्या सात जणांची हत्या ?

निघोज'च्या 'त्या' सात जणांची हत्याच!! चारजण ताब्यात



दौंड:

      दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात सहा दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता या सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायकत धक्कदायक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील नातेवाईंकानीच म्हणजेच चुलत भावनेचं संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. जादूटोणा केला असल्याच्या संशयातून या हत्या केल्याचे समजत असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. 


       भीमा नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


  यामध्ये मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू (५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले होते. १७ तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज मधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते.

          परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी 1 वाजता यवत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?