आल्याच्या शेतीतून शेतकरी झाला लखपती
पाऊने दोन एकरात घेतले २७ टन आल्याचे उत्पादन सेवानिवृत्ती नंतर संभाजी काकडे यांची शेती मध्ये भरारी नीरा दि.९ नीरा नजीक असलेल्या निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे Sambhajirao Kakade यांनी आपल्या शेतात आल्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिलं वर्ष तोट्यात गेले असले तरी यावर्षी त्यांना आल्याला चांगला बाजार मिळाला आहे.यावेळी त्यांन प्रतिटन 66 हजाराचा भाव मिळाला आहे.त्यामुळे आल्या पासून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. नींबुत येथील संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते. 2021 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले . यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरवात केली. आपल्या शेता पैकी पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली.विशेष म्हणजे पपईच्या बागेत अंतर पीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले आहे. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10 हजाराचा भाव मिळाला.त्यामुळे पाहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावने दोन एकर क्षेत्रात आल्याची पुन्हा लागव...