“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!” मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात
“१७ वर्षे मृत्यूचा महामार्ग… आणि सरकारला टोलची घाई!” मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामावर टोलवसुली सुरू; पत्रकारांचा संताप उसळला, सरकारवर निष्काळजीपणाचा घणाघात खारपाडा : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हजारो नागरिकांचे जीव गेले, लाखो प्रवासी त्रस्त झाले आणि कोकणाचा विकास अक्षरशः खिळून राहिला. मात्र एवढ्या गंभीर वास्तवाकडे डोळेझाक करत सरकारने अपूर्ण महामार्गावरच टोलवसुली सुरू केल्याने संतापाची लाट उसळली आहे. “रस्ता पूर्ण नाही, पण टोल मात्र पूर्ण!” अशा शब्दांत पत्रकारांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत खारपाडा येथे उग्र आंदोलन छेडले. तब्बल २० वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकारांनी आता सरकारला थेट इशारा दिला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात ३०० हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते. काळे शर्ट, काळ्या टोप्या आणि सरकारविरोधी फलक हातात घेत पत्रकार रस्त्यावर उतरले तेव्हा स्...