Friday, September 30, 2022

डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु : मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत

 डिजिटल मिडीयातील पत्रकारांना अधिस्विकृती देणे सुरु : मराठी पत्रकार परिषदेकडून या उपक्रमाचे स्वागत



मुंबई- केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यायला सुरूवात केली आहे.. मनी कंट्रोल डॉट कॉम या युट्यूब चॅनलच्या सहसंपादक सुमी दत्ता याच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. ही डिजीटल मिडीयातील पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पीआयबीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी एक नियमावली तयार केली.. त्या नियमावलीचा आधार घेत सुमी दत्ता यांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज केला होता.. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सुमी दत्ता यांचा अर्ज मंजूर केला गेला.. आता त्यांना अधिस्वीकृती मिळाली आहे..


महाराष्ट्रात देखील डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यासाठी नियमावली तयार करावी आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती दिली जावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने यापुर्वीच केली आहे.. पीआयबीच्या नियमांचा हवाला देत मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषद आता त्याचा पाठपुरावा करत राहतील.. नव्या बदलाला आज विरोध होत असला तरी सर्वांनाच हे बदल स्वीकारावे लागतील.. डिजिटल मिडियातील पत्रकारांना संघटीत करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मिडिया परिषद हे नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.. डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजीटल मिडीया परिषदेशी जोडून घ्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, September 28, 2022

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर

 मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर




मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज परिषदेच्या नऊ विभागीय सचिवांच्या नावांची घोषणा केली आहे... नव्या विभागीय सचिवांची मुदत दोन वर्षांची असेल..

नवे विभागीय सचिव पुढील प्रमाणे

1) *दीपक कैतके* 

  (मुंबई विभाग )

2) *जे. डी. पराडकर संगमेश्वर* (कोकण विभाग,-- ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड)

3) *किशोर महाजन, मालवण* (कोल्हापूर विभाग :- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्हा)

4) *अरूण नाना कांबळे, पिंपरी-चिंचवड*

(पुणे विभाग : पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा)

5) *रोहिदास हाके,धुळे* 

( नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव अहमदनगर जिल्हे)

6) *बालाजी सूर्यवंशी, औरंगाबाद*

: ( संभाजीनगर विभाग, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्हे)

7) *सचिन शिवशेट्टे, उदगीर* : (लातूर विभाग,:- लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्हे)

8) *अमर राऊत, मेहकर* (अमरावती विभाग,:- अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम)

9) *संजय देशमुख, नागपूर*:- ( नागपूर विभाग, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,)


विभागीय संघटक, महिला संघटक आणि अन्य पदांसाठीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.. नवनियुक्त विभागीय सचिवांचे एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. नवे विभागीय सचिव संघटनेचा विस्तार आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Monday, September 26, 2022

पुरंदरचा पोपट भर सभेत थोबाडात चप्पल खाणार : नाव न घेता नक्की हा इशारा कोणाला ?

 पुरंदरचा पोपट भर सभेत थोबाडात चप्पल खाणार : नाव न घेता  हा  इशारा कोणाला ?


सासवड दि.२७

पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून या विमानतळाच्या विरोधासाठी तयार झालेली संघर्ष समिती आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळते आहे.


    महिलांच्यावतीने "विमानतळाच्या नावाखाली गल्लीबोळात भुंकणारा पोपट लवकरच भर सभेत थोबाडात चप्पल खाणार" अशा कशाचे स्टिकर सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.


       यामुळे विमानतळ संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली असल्याचे सध्या पाहावयास मिळते. तालुक्यातील काही नेते विमातळाचा आग्रह धरत आहेत त्यामुळे बधितांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.


      कोणाचे ही नाव न घेता पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सभेत चप्पल कोण खाणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे खरंच हा नेता सभेत चप्पल खाणार का?

     सध्या सरकारमध्ये असलेल्या आमदारांना देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे यातच आमदार संतोष बांगर यांचे प्रकरण ताजे आहे.पुरंदर तालुक्यातील नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार का ? यामुळे माजी आमदारांची व नेत्यांची सुरक्षितता वाढवावी लागण्याची शक्यता आहे.

शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण

 शिवरी येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केले वृक्षारोपण



 पुरंदर दि.२६


  पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील महात्मा  ज्योतिबा फुले विधुलयाच्या    1990- 91 च्या दहावीच्या विध्यथ्यानी एकत्र येत शिवरी येथील वन विभागाच्या जागेत वृक्षा रोपण केलंय. हे वृक्ष मोठे होई पर्यंत याकडे लक्ष दिले जाणार आहे.साधारण 150 झाडांचे रोपण या वेळी करण्यात आले आहे..

      यावेळी महेंद्र इंगळे, विकास ताम्हणे, हनुमंत वाबळे संदीप जगताप, प्रमोद जगताप, गंगाधर कामथे, राजेश इभाड, संतोष आबनावे, नाना होले, अनंता पोरे, प्रफुल्ल इंगळे, सोपान खेगरे, दत्तात्रय कदम, जालिंदर लिंबोरे, चंद्रशेखर कामथे, प्रकाश कामथे, गोरख कामथे, पुंडलिक आबनावे, सुनील कामथे, दत्ता लिंभोरे, कपिल काळाने कैलास कामथे, अनंता पोरे, असे असंख्य वर्गमित्र उपस्थित होते या वृक्षारोपणाचा दोन वर्षाचं टार्गेट ठेवून हे काम करण्यात आले झाडे पूर्ण होईपर्यंत त्याला पाणी दिले जाणार आहे.त्याच बरोबर यांची निगा राखली जाणार आहे.


Sunday, September 25, 2022

४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी घेतलाआढावा

 

४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा प्रमुख विश्वस्त एस.एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी घेतलाआढावा 



पिंपरी चिंचवड : दि.२६

पिंपरी चिंचवड येथे होणारया मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा एस.एम देशमुख यांनी काल आढावा घेऊन समाधान व्यक्त केले..

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे..अधिवेशनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे.. काल एस.एम देशमुख, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पिंपरी चिचवड येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला..

परिषदेचे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, डिजिटल मिडियाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सुरज साळवी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे.. अधिवेशनासाठी विविध १२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.. प्रत्येक समिती प्रमुखांनी आपल्यावरील जबाबदारीच्या तयारीची माहिती बैठकीत सादर केली.. २००० पत्रकार बसू शकतील अशा वातानुकूलित सभागृहात परिषदेचे हे ऐतिहासिक अधिवेशन होत आहे.. . येणारया पत्रकार प्रतिनिधींची निवास व्यवस्था उत्तम ठेवली जाणार आहे.. पुणे स्टेशन आणि शिवाजी नगर बस स्थानक येथे स्वागत कक्ष उभारण्यात येत असून पाहुण्यांना तेथून निवास व्यवस्थेच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असेल.. कार्यक्रम स्थळी आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहे..

स्मरणिका दर्जेदार, वाचनीय आणि संग्राह्य व्हावी यासाठी संपादक मंडळाचा प्रयत्न असेल.. रूचकर भोजणाची मेजवाणी पत्रकारांना मिळणार आहे..त्याचा मेनू देखील तयार करण्यात आला आहे.. रात्री मनोरंजनासाठी "महाराष्ट्राची लोकधारा" हा दोन तासांचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे..

दोन दिवसांच्या या अधिवेशनात भरगच्च कार्यक्रम असतील, मुलाखत, चर्चासत्र, आणि तरूण आमदारांच्या माध्यमांकडून अपेक्षा हा परिसंवाद असेल..यामध्ये आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्रणिती शिंदे, रोहित पवार आदि आमदारांना निमंत्रित करण्यात येत आहे.. "आम्ही टीव्ही अँकर" या कार्यक्रमात अँकरचे अनुभव ऐकता येणार आहेत..हा सर्व दिमाखदार सोहळा राज्यातील जनतेला पाहता यावा यासाठी सोहळा फेसबुक लाइव्ह केला जाणार आहे.. युट्यूबच्या संपादकांनी देखील आपल्या चॅनेलवरून हा सोहळा लाइव्ह करावा अशी त्यांना विनंती करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.. पत्रकार कक्षातून बातम्या पाठविण्याची सर्व व्यवस्था केली जाणार आहे.. 

अधिवेशनास मान्यवर राजकीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.. अधिवेशन पत्रकारांचे आहे तर उद्घाटन देखील एका मान्यवर पत्रकाराच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 कालच्या बैठकीस ५० पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.. "२०१५ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अधिवेशनापेक्षाही यंदाचे अधिवेशन भव्य दिव्य होईल" याची मला खात्री आहे असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला... पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशन होत असल्याबद्दल ही एस.एम देशमुख यांनी आनंद व्यक्त केला.

वाल्हे परिसरात खरीप पिकांचे पंचनाम्यास सुरूवात.

 वाल्हे परिसरात खरीप पिकांचे पंचनाम्यास सुरूवात.



वाल्हे (दि.२५) वाल्हे (ता.पुरंदर) व  परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने, पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 


परिसरातील बाजरी, कांदा, तुर, भुईमूग, मका, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिके हातची गेली असून, फळबागादेखील नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजरी पिक तर गेले असुन कांदे ही नासले असुन, भुईमूगाच्या शेंगाना करे उगवायला लागले आहेत. यामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याधर्तीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामे सुरू केल्याची माहिती गावकामगार तलाठी नीलेश अवसरमोल यांनी दिली.


मागील दोन - तीन वर्षांपासून खरीप - रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जात आहे.


या वर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीला पाऊसाने ओढ दिली होती. मात्र, खरीप हंगामात शेवटच्या टप्प्यात, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साठून पिकांचे नुकसान आहे.


 खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, कांदा, सोयाबीन, सूर्यफूल, मका आदी पिकांबरोबर ऊस व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा लागणीचा ऊस शेतामध्ये पाणी धरून राहिल्याने कुजून गेल्याने ऊस उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडला आहे. तर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यादेखील मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या असून, मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढग येत आहेत. खरीप हंगामातील काही पिके काढणीस आली असून, आता पुन्हा पाऊस आल्यास, यावर्षी खरीप हंगामा हाती लागेल की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल आणि कृषी विभागांना अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी झाली नसल्याने पंचनाम्यांना उशीर झाला होता.


 वाल्हे परिसरामध्ये कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई - पीक पाहणी नोंदवून गावकामगार तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


या प्रसंगी गावकामगार तलाठी नीलेश अवसरमोल, कृषी सहायक मयुरी नेवसे, कृषी सहाय्यक गीता पवार, कोतवाल आनंद पवार यासह शेतकरीवर्ग हेमंत सूर्यवंशी, भरत महांगडे, शशिकांत पवार, अमोल महामुनकर, सुरेश पवार, गणेश महांगडे आदी शेतकरीवर्ग उपस्थित होते.



फटाके फोडून, पेढे वाटून वाल्हे येथे शिवसैनिकांचा जल्लोष.

 फटाके फोडून, पेढे वाटून वाल्हे येथे शिवसैनिकांचा जल्लोष.



वाल्हे (दि. २५) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर उच्च न्यायालयाने मूळ शिवसेनेला परवानगी दिल्यानंतर, वाल्हे (ता. पुरंदर) येथील शिवसैनिकांनी फटाके फोडून पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला.


शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यामध्ये शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामधील रस्सीखेच न्यायालयापर्यंत पोचली होती.

त्यामुळे शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा कोण घेणार याविषयी प्रचंड राजकीय उत्सुकता होती. उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी आज परवानगी दिल्याने वाल्हे येथील शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

 या वेळी बोलताना माजी सभापती गिरीश पवार म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयातील लढाई अजून राहिली असून तीही आम्ही जिंकू. पण, उच्च न्यायालयाचा निकाल हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयाची नांदी असून यावर्षीचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्य असा होईल".


या वेळी माजी सभापती गिरीश पवार व जेष्ठ शिवसैनिक सुरेश पवार यांच्या हस्ते बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी, मोतीराम गावडे, सचिन पवार, दत्तात्रेय राऊत, भाऊसाहेब पवार, नवनाथ पवार, हरीश दुबळे, शिरीष पवार, गणेश पवार, रवींद्र लंबाते, सचिन जाधव, शिवाजी माने, सुजित रणनवरे, समीर पवार, शिवाजी माने आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार शिवाजीराव शिर्के यांना प्रदान

 पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार शिवाजीराव शिर्के यांना प्रदान



पुणे दि.२५


पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक शिवाजीराव शिर्के यांना प्रदान करण्यात आला आहे. आज रविवारी दि.२६ रोजी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


       पिंपरी चिंचवड आणि परिसरात पत्रकारितेचे बीज रुजवण्या साठी भा.वी कांबळे यांनी प्रयत्न केले त्यांच्या बरोबरच शिवाजीराव शिर्के यांनी सुद्धा या भागात आदर्श पत्रकारिता केली.आज वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धाते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करीत आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, सरचिटणीस प्रवीण शिर्के, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवे गोविंद वाकडे, व मान्यवर उपस्थित होते.



 यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,परिषद अध्यक्ष शरद पाबळे, प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मार्गदर्शन केले. देशमुख म्हणाले की, भा.वी. कांबळे यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकारितेला एक नवा आयाम दिला. शिवाजीराव शिर्के यांनी त्यांना खंबीर साथ दिली.त्यांचा सन्मान हा यथोचित आहे. त्याच बरोबर या पुढे भा.वी.कांबळे यांच्या नावाने पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सचिव नाना कांबळे यांनी केले. सूत्र संचालन मारुती बाने यांनी केले तर आभार माधुरी गोराड यांनी मानले.




Friday, September 23, 2022

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी जेऊर येथील विजय तांबे यांची नियुक्ती

 प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी जेऊर येथील विजय तांबे यांची नियुक्ती





नीरा दि.२३

पूरंदर तालुक्यातील जेऊर येथे राहणारे आणि दिव्यांग व्यक्तींना नेहमीच मदत करणारे विजय तांबे यांची प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

        शिरूर येथे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव व महिला अध्यक्ष अनिता कदम यांनी नियुक्तीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते तांबे यांना दिले आहे.विजय तांबे यांनी यापूर्वी पुरंदर तालुका अध्यक्षपद भूषविले आहे. संघटनेने  मुबंई. दिल्ली गुजरात .पुणे सह इतर सर्व ठिकाणी केलेल्या आंदोलनात  ते कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते  संघटन मध्ये त्यांचे चांगले काम आहे.त्याच्या १० वर्षाच्या कार्याची दखल घेऊन  त्यांना पुणे जिल्हा सचिव पद देण्यात आले आहे.याबाबत बोलताना तांबे म्हणाले की,'संघटनेने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी चांगल्या प्रकारे पारपडील .प्रत्येक अपंग व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील '

कुंभारवळण येथे एकाचा खून : सासवड पोलिसात मयताच्या भावाने दिली फिर्याद

 कुंभारवळण येथे एकाचा खून : सासवड पोलिसात मयताच्या भावाने दिली फिर्याद 



सासवड दि.२३

   


       पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ कुंभारवळण येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अशोक साधू जगताप याचा मृत्यू झाला आहे.


 याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील कुंभारवळ येथील वीट भट्टीवर ही घटना घडली आहे.या ठिकाणी एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सासवड येथे राहणारे व मयत व्यक्तीचा भाऊ असलेल्या सतीश साधू जगताप यांनी दिली आहे. या प्रकरणी त्यांनी निलेश गायकवाड या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.निलेश याने त्यांच्या भावाला दगड विटा व काठीच्या साह्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत सासवड पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.



शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय : आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर

   शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाला कोर्टातील पहिला विजय :

      आता दसरा मोळवा कोणार शिवाजी पार्कवर



मुंबई दि.२३

राज्यात स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेने अनेक वेळा कोर्टाच्या दरवाजे ठोठावले मात्र थांबा आणि वाट पहा या पलीकडे शिवसेनेच्या वाट्याला काहीच आले नव्हते. मात्र आज शिवसेनेला कोर्टामधून पहिल्यांदा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हा पहिला विजय म्हणायला हरकत नाही.


     शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा असलेला दसरा मेळावा अडचणीत आला होता. शिवतीर्थावर परवानगी मिळत नसल्याने किंवा ती द्यायला वेळ लावत असल्याने सेनेन कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हा निर्णय सुद्धा लंबवला जातोय काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब आहे.

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार

 चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून: पती फरार



पुणे दि.२३

  - टाकळी हाजी ता. शिरूर येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी दि. २२ रोजी रात्री एका महिलेचा खून करण्यात आला आहे. ललिता महादेव काळे अस मयत महिलेच नाव आहे. तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने निघृन वार करून खून केला आहे.


म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये शेजारी शेजारी पाच कुटुंब राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता.

         त्यांचे दोघांचे कायमच भांडण होत होते, काल गुरुवारी दि. २२ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली तेव्हा दोघांचे भांडण झाले होते, आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. असे ललिताची बहीण चांदणी हिने सांगितले असून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औट पोस्ट येथे याबाबत फिर्याद देण्यात आली आहे.


निर्मला सीतारामन यांनी बारामती येथे घेतला पुरण पोळीचा आस्वाद

 निर्मला सीतारामन यांनी बारामती येथे घेतला पुरण पोळीचा आस्वाद



पुणे दि.२३


      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रीयन जेवण म्हणजेच पुरणपोळीचा आस्वाद घेतला.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. राजकीय वर्तुळात त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बारामती शहरात भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी भोजन केले.



गावडे यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने जेवणाची मेजवानी त्यांना देण्यात आली. महाराष्ट्रीयन जेवणात पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे. पुरणपोळीसह, मसाले भात, मिरचीचा ठेचा, पुरी पुलावा, बटाटा भाजी, भजी, कोथिंबीरीची वडी, आलू पातळ भाजी, छोला उसळ, साधा भात, वरण, तूप कोशिंबीर आधी पदार्थ जेवणात ठेवण्यात आले होते.



<

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन



जेजुरी दि.२३

    

      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी साडे नऊ वाजता जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले.



   यावेळेत त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दौडचे आ राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर, सचिन पेशवे, आ.माधुरी मिसाळ, आ. बाळा भेगडे त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खंडोबाचे दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले. गडकोटातील बालदारीत झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे

 पुणे येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा स्वागत पर कमानीवर फसले काळे 



   पुणे दि.२३


पुणे येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या स्वागत कमानीवर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्री काळे फासाल्याची घटना समोर आली आहे. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात काळे फासून निर्मला सीतारामन यांचा फोटो खराब करण्यात आला आहे.या प्रकारामुळे या परिसरातील राजकीय वातावरण चांगलं तापले आहे.


     अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. पुणे येथील सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथे आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमानिमित्त गुरुवारी स्वागत कमल लावण्यात आली होती. या फ्लेक्सच्या कमानीवर काही समाजकंटकांनी रात्री काळे बसले आहे. तसेच याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही  

Thursday, September 22, 2022

खासदार सुळेंची कामे दाखवा व हजार रुपये मिळवा, शिवतारे समर्थकांचे राष्ट्रवादीला आव्हान

 खासदार सुळेंची कामे दाखवा व हजार रुपये मिळवा, शिवतारे समर्थकांचे राष्ट्रवादीला आव्हान




पुरंदर दि.२२


शिवतारे यांनी साधी अंगणवाडी काढली नसल्याचं विधान युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे. तुमच्याच गावातील सासवड परिंचे वीर रस्ता, परिंचे हरणी रस्ता, १७ सिमेंट सस्थानक, पिलाणवाडी बंद जलवाहिनी अशी जवळपास ३५ कोटींची कामे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही खासदार सुप्रिया सुळे यांची फक्त ३५ लाखांची कामे दाखवा अशा शब्दात युवासेनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष मंदार गिरमे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष डॉ. राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, सुरज जगताप, मंगेश भिंताडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


       गिरमे म्हणाले, विजय शिवतारे यांनी मागच्या पाच वर्षात पुरंदर तालुक्याचा कायापालट केला हे संपूर्ण तालुका जाणतो. विद्यमान खासदार आणि आमदारांनी पुरंदर तालुक्याची मागच्या तीन वर्षात वाट लावली. शिवतारेंच्या काळात पुरंदर हवेली तालुका निधीच्या बाबतीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता. आता कार्यसम्राट आमदार खासदारांच्या काळात तालुका खालून पहिल्या क्रमांकावर असतो. शहराध्यक्ष डॉ. दळवी म्हणाले, शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात ४०३ किलोमीटर रस्ते, ४५० पेक्षा जास्त बंधारे, ११०० शेततळी, प्रशासकीय इमारत, जेजुरी रुग्णालय, क्रीडासंकुल, आरटीओ कार्यालय, धान्य गोदामे असे असंख्य प्रकल्प तालुक्यात आणले. केंद्राकडून खासदारांनी १५ वर्षात आणलेला एक प्रकल्प दाखवावा असे आव्हान यावेळी श्री. दळवी यांनी दिले. यावेळी युवासेनेचे सूरज जगताप म्हणाले, शिवतारे यांनी नगर जिल्ह्यात आधीच मंजूर असलेला साखर उद्योग विकत घेतला आहे.



ताई फक्त खड्डे बुजवा - डॉ. रणपिसे


      पुरंदर तालुक्यात सुळे यांच्या अखत्यारीत हडपसर सासवड जेजुरी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. खासदारांना विचारा त्यावरचे खड्डेसुद्धा कधी बुजवणार. या रस्त्यावर लोक रोजच्या रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात. खासदारांनी निदान केंद्राकडून तेवढा रस्ता तरी नीट नेटका राहील एवढी काळजी घ्यावी असा टोला नगरसेविका अस्मिता रणपिसे यांनी लगावला.


पुरंदर तालुक्यात राजुरी परिसरात हनुमंत भगत यांच्या मंजूर कारखान्याची राष्ट्रवादीने कशी वासलात लावली या अनुभवातूनच त्यांनी तसा निर्णय घेतला आहे. कारखाना उभारण्यासाठी हवाई अंतराची मर्यादा असते. पुरंदर तालुक्याच्या चारही दिशांना हवाई अंतराच्या मर्यादित आधीच कारखाने असल्याने नवीन कारखाना होणे अशक्य आहे. आणि शक्य असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असेल तर साखर उद्योगात निपुण असलेल्या पवार कुटुंबाला सांगून राष्ट्रवादीने इथे एखादा प्रकल्प उभा करावा असा टोला सूरज जगताप यांनी लगावला.


यावेळी नगरसेविका अस्मिता रणपिसे, सचिन भोंगळे, सागर मोकाशी, धनंजय म्हेत्रे, सुरज जगताप, अविनाश बडदे, मंगेश भिंताडे, अनिकेत जगताप, आदेश जाधव, गणेश फडतरे, नितीन कुंजीर आदी उपस्थित होते.





डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार : एस.एम.देशमुख

डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा राज्यभर होणार : एस.एम.देशमुख



पुणे दि.२२


महाराष्ट्रात सहा हजारांच्या आसपास यु ट्यूब चॅनल्स आणि न्यूज पोर्टल्स कार्यरत आहेत..अगदी तालुक्यात आणि गाव पातळीवर देखील युट्यूब चॅनल्स जाळे विणले गेले आहे.. उद्याची गरज लक्षात घेऊन सरकार देखील युट्यूब चॅनल्स नोंदणीसाठी नवी व्यवस्था सुरू करीत आहे.. महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांसाठी पुरस्कार योजना यापुर्वीच सुरू केलेली आहे.. या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषद नव्या बदलापासून दूर राहू शकत नाही.. काळाची गरज लक्षात घेऊन 

मराठी पत्रकार परिषदेने देखील डिजिटल मिडिया परिषद नावाची स्वतंत्र विंग सुरू केलेली आहे.. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.. राज्यातील पुणे, सातारा, बीड, भंडारा आणि अन्य जिल्ह्यात हे काम वेगात सुरू आहे..सर्व जिल्ह्यात सदस्य नोंदणी आणि अस्थाई शाखा सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये डिजिटल मिडिया परिषदेचा एक मेळावा पुण्यात घेण्यात येईल.. तेथेच राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडली जाईल..

डिजिटल मिडिया परिषद हा मराठी पत्रकार परिषदेचाच एक अंगिकृत उपक्रम असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे सर्व नियम डिजिटल मिडिया परिषदेवर देखील बंधनकारक असतील.. डिजिटल मिडिया परिषद ही वेगळी संघटना नसून तालुका आणि जिल्हा संघांना पूरक अशी व्यवस्था असल्याने डिजिटल मिडियाने जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघाशी सलोख्याचे संबंध ठेऊनच काम करावे अशी अपेक्षा आहे.. जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषदेने हातात हात घालून, परस्परांना पूरक ठरेल असे काम करीतच मराठी पत्रकार परिषदेने उभी केलेली चळवळ पुढे न्यायची आहे..

पुण्यात होणारया डिजिटल मिडिया परिषदेच्या मेळाव्यात डिजिटल मिडियाची रचना, स्वरूप आणि कार्याबद्दल चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.. तूर्त सदस्य नोंदणीसाठी सर्व जिल्हा आणि तालुका संघांनी डिजिटल मिडिया परिषदेला मदत करावी  असे एस एम देशमुख यांनी म्हटले आहे.

Wednesday, September 21, 2022

लंपी मुळे यावर्षीचा भाद्रपद बैलपोळा नाही पंचायत समिती पुरंदर पशुसंवर्धन विभागाचे आदेश

        लंपी मुळे यावर्षीचा भाद्रपद बैलपोळा नाही

पंचायत समिती पुरंदर पशुसंवर्धन विभागाचे आदेश



   नीरा  दि.२१


           पुरंदर तालुक्यात सध्या लंपी रोगाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आज अखेर २८ जनावरे लंपी बाधित आढळली आहेत.त्यामुळे पंचायत समिती पुरंदरच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षी बैल पोळा साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत.या बाबतचे पत्र सरपंच ,पोलीस पाटील ,तलाठी यांना देण्यात आले आहे.

     यानुसार पुरंदर तालुक्यातही या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने  संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.त्यामुळे लंम्पी चर्म रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे/ म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे इत्यादीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल मोठया प्रमाणावर एकत्र येऊन त्यांची मिरणुक काढली जाते. परंतु सध्याच्या परिस्थितीत असे झाल्यास लंम्पी चर्मरोग प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रसार रोखण्यासाठी बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास बंदी घालण्यात येत आहे. तरी ग्रामपंचायतीनी नोटीस बोर्ड, फलेक्स किंवा दवंडी देवून सर्व पशुपालकांना याबाबत अवगत करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


         प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४ नुसार पशुपालक इतर व्यक्ती यांनी रोग प्रादुर्भावाबाबत काळजी घेणे बंधनकारक राहील. तसेच अधिनियमातील बाबीचे उल्लंघन झाल्यास कलम ३९, ३२ व ३३ मधील तरतुदीनुसार कारवाई करणेसाठी पोलीस पाटील यांनी पशुसंवर्धन विभागास सहाय्य करावे. असे आदेशात म्हटले आहे


पुरंदर मध्ये आढळली २८ जनावरे लंपी बाधित

       पुरंदर मध्ये आढळली २८ जनावरे लंपी बाधित



पुरंदर दि.२१


     पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथील इनामके मळ्यात लम्पीचे पहिले जनावर मागील काही दिवसांपूर्वी आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने त्वरित इनामके मळ्यापासून पाच किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणात सुरुवात केली होती.


  त्यानंतर पुरंदर तालुक्यांमध्ये एकूण २८ जनावरे लम्पी आजाराचे ग्रस्त आहेत. यातील ५ जनावरे बरी झाली असून, तालुक्यामध्ये आजअखेर १० हजार जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय विभागामार्फत पूर्ण झाले आहे. इनामके मळा, पांगारे, भिवरी या तीन एलएसडी ईपीसेंटरमध्ये ८ हजार ५३७ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यासाठी आत्तापर्यंत ९ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता.


परंतु, तालुक्यातील विविध ठिकाणी लम्पीग्रस्त जनावरे आढळत असल्याने प्रशासनाकडे अजून लशींची मागणी केली आहे. तालुक्यातील सासवडनजीक असलेल्या इनामके मळ्याच्या पाच किलोमीटर क्षेत्रामध्ये ६ हजार १७ गाईवर्गीय जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. तर, भिवरीमध्ये १ हजार २०० व पांगारे येथे १ हजार २०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशासनाकडे पुरंदर तालुक्यातील भिवरी, पांगारे, जवळार्जुन, माळशिरस त्यासोबतच पुढे उद्भभणार्‍या गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी १२ हजार लशींची मागणी प्रशासनाकडे केली होती

        दरम्यान पुरंदर तालुक्यासाठी प्रशासनाच्या वतीने १२ लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.याबाबतची माहिती गुळूंचे येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भंडलकर यांनी दिली आहे त्यामुळे आता पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.तर काही भागात पशुपालकांनी या पूर्वीच खाजगी पशुवैद्याकडून लंपीचे लसीकरण करून घेतले आहे.


 दरम्यान गायीवर्गीय जनावरांच्या दुधापासून मानवामध्ये हा विषाणू प्रवेश करीत नाही. त्यामुळे गाईच्या दुधापासून मानवाला कुठलाही धोका नाही. पशुवैद्यकीय तज्ञ व अभ्यासक सांगत आहेत.

Tuesday, September 20, 2022

नीरा जवळच आढळले लंपी बाधित जनावर :नीरा आणि परिसरात लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू

 नीरा जवळच आढळले लंपी बाधित जनावर :नीरा आणि परिसरात लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू



नीरा दि.२१


    पुरंदर तालुक्यातील नीरा आणि परिसरात आज बुधवार पासून लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरवांत करण्यात आली आहे. नीरा पासून जवळच असलेल्या बारामती तालुक्यातील फरांदे नगर मध्ये लंपिचा एक रुग्ण आढळून आलंय... त्यामुळे त्यापासून पाच किलोमीटर परिघात असलेल्या गावातून आता लंपी प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येत आहेत

      आज बुधवारी सकाळी पशुवैद्यकिय विभागाची टीम नीरा येथे दाखल झाली यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भंडलकर यांच्या नेतृत्वाखाली . डॉ.के टी.लाड, डॉ. भुषण लोखंडे,डॉ गणेश मोरे,डॉ. किरण खळदकर यांची टीम लसीकरण करीत आहे.नीरा आणि परिसरासाठी आज ५०० लस उपलब्ध झाली असून आज दिवस भरात ५०० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे त्याच बरोबर आणखी 12 हजार लस उपलब्ध झाली असून जवळच्या इतर गावातील जनावरांचे सुध्धा लसीकरण केण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संभाजी भंडलाकर यांनी दिली आहे. लोकांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 तर नीरा येथील सरपंच तेजश्री काकडे व माजी उपसरपंच सुदाम बंडगर यांनी लोकांना आपल्या जनावरांचे लासिकर करून घेण्याचे आवाहन केले आहे.



वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ?

 वेदांता प्रकल्पावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज ?



मुंबई दि.२०



  वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातही नाराजीचा सूर फिरून येवू लागला आहे.हा प्रकल्प महाराष्ट्र रहावा अशी मागणी या गटातून होत आहे.

        

         राज्यात सध्या वेदांत प्रकल्पावरून विरोधकांनी रान उठवले आहे.त्यामुळे शिंदे सरकारची प्रतिमा खराब झाली आहे.राज्यात लोकांकडून नाराजीचा सुर येताना दिसतो आहे.त्यातच आता शिदे समर्थक आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. वेदांता प्रकल्प हातातून निसटल्यानंतर शिंदेगटात नाराजीचा सूर आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्य सरकारची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावीत, असा आमदारांचा सूर आहे. उद्योग मंत्री उदय सामंत दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील रस्ते आणि वेदांता प्रकल्पावर चर्चा होणार असल्याची माहीती आहे.

पुरंदर विमानतळा बाबत आत्ता पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एमआयडीसी कडे देण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

 पुरंदर विमानतळा बाबत आत्ता पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल एमआयडीसी कडे देण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश



पुरंदर दि.२०


पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूसंपादन कायद्यानुसार करण्याचे निश्चित करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्रकल्पाबाबत आतापर्यंत केलेल्या सर्व कार्यवाहीचा कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमधील जुन्याच जागेत विमानतळ प्रकल्प करण्याचे जाहीर केले आहे. तसेच याबाबतची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, एमएडीसी, एमआयडीसी आणि भूसंपादनासाठी नेमलेल्या उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राव यांनी पुरंदर विमानतळाच्या जुन्या जागेबाबत निश्चित केलेल्या जमिनीच्या सर्वेक्षण क्रमांकाचे सर्व तपशीलवार अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.


नियोजित विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेले नकाशे, बाधित गावातील जागांचे सर्वेक्षण क्रमांक हे एमआयडीसीसोबत सामाईक केल्यास त्याच्या मदतीने एमआयडीसी देखील स्वतंत्र नकाशे तयार करेल. त्यामुळे अधिसूचना जारी करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अधिसूचना जाहीर केल्यानंतर भूसंपादनासाठी पुढील कार्यवाही करून जमिनीच्या मुल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि एमएडीसीच्या सहकार्याने मार्गी लावून जमिनीच्या भूसंपादनासाठीचे पर्याय निश्चित करण्यात येणार आहेत, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

        याबाबत बोलताना समन्वय अधिकारी दीपक नलावडे म्हणाले की,विमानतळ प्रकल्पाच्या कामाच्या कार्यवाहीबाबत विभागीय आयुक्तांनी एमएडीसीने भूसंपादन करण्यासाठी केलेले सर्वेक्षण, क्रमांक व खातेनिहाय गावांचे नकाशे, आराखडे आणि आतापर्यंतचे कागदोपत्री अहवाल एमआयडीसीकडे देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



सासवड आणि जेजुरी येथे "महासेवा दिनाचे" आयोजन लोकांच्या तक्रारीचे करण्यात येणार निवारण

 सासवड आणि जेजुरी येथे "महासेवा दिनाचे" आयोजन

  लोकांच्या तक्रारीचे करण्यात येणार निवारण



पुरंदर दि.२०


  पुरंदर तालुक्यातील सासावड आणि जेजुरी नगर परिषदेच्या हद्दीत दिनांक 21 सप्टेंबर रोजी " महासेवा दिनाचे" आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी प्रशद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

          राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व विभागांकडील प्रलंबित संदर्भ अर्ज/ तक्रारी यांचा निपटारा करण्या बाबत आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण पुणे जिल्हयात एकाच वेळी म्हणजेच दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी "महासेवा दिन " आयोजित करणेत आला आहे. त्याचा नागरिक, विद्यार्थी, लाभार्थी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन या कार्यक्रमाचे नियंत्रण व समन्वय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी महसूल मंडळ भागातील गावांकरिता व सासवड आणि जेजुरी नगरपालिकेकरिता महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सासवड येथील नगर परिषद कार्यालय व जेजुरी येथील सांस्कृतिक भवन येथे सकाळी १०.३० वाजले पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

     या कार्यक्रमामध्ये महसुल, नगरविकास, आरोग्य, कृषी विभाग व इतर सर्व विभागांच्या योजनांचा लाभ व तक्रारीचा निपटारा होणार आहे.त्याच बरोबर योजनांचा तात्काळ लाभ देण्यात येईल व नविन अर्ज स्विकारले जातील.

 यामध्ये प्रामुख्याने

    संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना यांचे अर्ज स्विकारले जातील. प्रकरणीकामी तलाठी यांचेकडील आवश्यक दाखले तात्काळ वितरीत केले जातील.


हक्कनोंदणी :- एकंदर कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, अज्ञान पालन करणार नोंद कमी करणे, बँक बोजा कमी करणे

बाबतचे अर्ज स्विकारले जातील.

आधारकार्ड आधारकार्डमधील दुरुस्ती नविन आधारकार्ड काढून देणे.

   शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढविणे, नावात दुरूस्ती करणे, दुबार शिधापत्रिका देणे याबाबत तात्काळ कार्यवाही करणेत येईल.

 ज्या खातेदारांची पी. एम. किसान ekye अद्याप पूर्ण झालेली कागदपत्रे दाखल केल्यास तात्काळ ekyc करून देण्यात येईल.

 मतदान कार्डला आधारकार्ड Link करणे.

 जातीचे दाखले, नॉनक्रिमिलिअर, उत्पन्न, रहिवास व इतर दाखले देणे, वितरित करणे व नविन अर्ज स्विकारले जातील

कृषी विषयक सेवांबाबत माहिती देण्यात येईल.

त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी व मार्फत औषोधोपचार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.


नगरपालिका विभागा मार्फत नविन नळ जोडणी, अर्ज स्विकारणे, कर आकारणी प्रमाणपत्र देणे, जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देणे, बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र देणे, झोन दाखला देणे,


महावितरण विभागा मार्फत 

नविन विज जोडणीबाबतचे अर्ज स्विकारले जातील.असे  

महसूल विभागा मार्फत सांगण्यात आले आहेत.


Monday, September 19, 2022

घरेच नाहीत...नोटीस बजवायची कुठे ?

 घरेच नाहीत...नोटीस बजवायची कुठे ?

गुळुंचे तलाठी कारवाई प्रकरणात ग्रामस्थांचा प्रशासनावर हल्लाबोल



नीरा दि.१९


  "ज्यांची मतदार यादीतून नावे कमी करण्याबाबत आक्षेप घेतले होते त्यात अनेकजणांची घरेच गावात नाहीत. मग तलाठ्यांनी नोटीस कुठल्या घरावर बजवायची होती ?" असा संतप्त सवाल करत प्रशासनावर हल्लाबोल केला. नितीन निगडे, अक्षय निगडे यांनी तसे निवेदन आज पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत व मतदान अधिकारी उत्तम बडे यांना दिले.

   गावकामगार तलाठी महाजन यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय दबावनाट्य असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. वास्तविक मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत बीएलओ काम पाहतात. मग, सगळ्या गावांच्या मतदारांच्या पंचनाम्याची जबाबदारी तालाठ्यांवर टाकणे कायद्याच्या विसंगत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुबार व बोगस मतदार कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या गेल्या नव्हत्या तर मग तहसील कार्यालयात मतदार उपस्थित कसे राहिले ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

    एकीकडे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतदार यादीचे शुद्धीकरण करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून नावे समाविष्ट करण्याचे आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींत्व कायदा १९५० च्या कलम 32 प्रमाणे दोन ठिकाणी मतदान यादीत नावे असणाऱ्या मतदारांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी नितीन निगडे व इतरांनी आज केली. नेमक्या किती जणांना नोटिसा मिळाल्या नाहीत किंवा किती जणांच्या पंचनाम्यावर स्वाक्षरी मिळाली नाही याबाबत निकालात काहीही स्पष्टता नसल्याने सगळीच प्रक्रिया सदोष कशी असू शकेल असाही प्रश्न आता ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. दरम्यान, कमी केलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करू नयेत अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशारा निगडे यांनी दिला आहे.


"बेकायदा पद्धतीने राजकीय दबावाने तलाठी महाजन यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. केवळ मतदानापूरते लोक आणले जातात याचा फायदा एका गटाला होत आहे. शिक्षणसंस्थेतील अनेक बदली होऊन गेलेल्या शिक्षकांची नावे देखील कमी नाहीत. लोकशाहीची ही शोकांतिका आहे." - नितीन निगडे, अर्जदार, गुळुंचे.

Sunday, September 18, 2022

पुणे सासवड महामार्गावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात,१ ठार ५ जखमी

  

पुणे सासवड महामार्गावर शिवशाही बस आणि  कंटेनरचा भीषण अपघात,१ ठार ५ जखमी  



पुरंदर दि.१९


       सध्या राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पंढरपूर येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही एसटी बस जोरात होती. बस चालकाला चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली.

या बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. याशिवाय कंटनेरचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बचावकार्य करण्यात आलं.

Friday, September 16, 2022

जाणून घ्या वीर धरणातून सकाळी सहा वाजले पासून किती होतोय पाण्याचा विसर्ग

 नीरा नदी काठच्या लोकांसाठी आता दिलासा दायक बातमी आहे .नीरा नदीतून सोडण्यात येनाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट



पुरंदर दि.१७


        काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी नीरा नदिणपत्रार पात्रात वीर धरणातून ४३७३४ क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत होते .त्यामुळे नीरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.नीरा नदीवरील काही पुल पाण्या खाली गेले होते.त्यामुळे सासवड वीर लोणंद हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


       दरम्यान आज शनिवारी सकाळी सहा वाजल्या पासून वीर धरणातून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी घट करण्यात आली आहे..त्यामुळे आता नीरा नदीची पूर स्थिती कमी होणार आहे .त्यामुळे नीरा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी वीर धरणातून ४३८३३ क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं होत.ते कमी करून आज सकाळी सहा वाजले पासून १५९११ क्युसेक करण्यात आलंय त्यामुळे नीरा नदी आता धोक्याचा पातळी पेक्षा कमी वाहते आहे . नदीकाठच्या लोकांना आता दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. याबाबतची माहिती पाठबांधरे विभागाकडून देण्यात आली आहे.





सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

 सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद



पुरंदर दि १६



             पुरंदर तालुक्यातील वीर धरणा मधून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून 43733 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. त्यामुळे वीर धरणाच्या लगत नीरा नदीपात्रामध्ये सासवड वीर लोणंद मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.... वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होतेय त्यामुळे वीरधरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे वीर धारणा जवळच असलेला पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सासवडहून - वीरमार्गे - लोणंदला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा पुरंदर तालुका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे 

नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले. चारही धराणातून विसर्ग वाढवला.

 नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले. चारही धराणातून विसर्ग वाढवला. 




पुरंदर दि.१६

    

       राज्यात गेली काही दिवस दमदार पावसाने बँटींग केली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. क्षमतेपेक्षा धरणात पाणी येण्याचे प्रमाण ही वाढत आहे, परिणामी धरणातून पाणी सोडण्याचा वेग वाढवावा लागत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. शुक्रवारी वीर धरणातून नीरा नदिच्या पात्रात तब्बल ४३ हजार ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 




    शुक्रवार दि.१६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून निरा खोऱ्यातील धरणातून पाण्याच विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणातून ७ हजार क्युसेक्सने, निरा-देवघर ३ हजार ३१६ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर विर धरणातून ३४ हजार ४५९ क्युसेक्सने पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जात होते. त्यानंतर दिवसभरात नीरा खोऱ्यातील धरण साखळीत पाण्याचे प्रमाण वाढते राहिल्याने सायंकाळी ०५ वाजल्या नंतर चारही धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. भाटघर धरणातून ११ हजार ८०० क्युसेक्सने, निरा-देवघर धरणातून ०५ हजार ०६० क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर वीर धरणाच्या सर्वच्या सर्व नऊ मोऱ्यातून तब्बल ४३ हजार ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

Thursday, September 15, 2022

अनिकेत जगताप यांच्यासह युवकांचा शिवसेनेत प्रवेश

 ताथेवाडीत काँग्रेसला खिंडार 

 अनिकेत जगताप यांच्यासह युवकांचा शिवसेनेत प्रवेश



  पुरंदर दि.

       ताथेवाडी (सासवड) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार संजय जगताप यांचे समर्थक अनिकेत जगताप यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह अनेक युवकांनी सेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम ताथेवाडी येथे पार पडला. 


         अनिकेत जगताप हे सासवड शहरातील एक प्रथितयश व्यावसायिक मानले जातात.  त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला येथे चांगले बळ मिळणार आहे. त्यांनी आपल्या वाढदिवशी सेनेत प्रवेशाचा मनोदय जाहीर केला होता. यावेळी बोलताना ना. शिवतारे म्हणाले, मागील अडीच तीन वर्षात तालुक्यात विकासाचा खेळखंडोबा झाल्याने युवकांचा आणि सामान्य माणसाचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील महत्त्वाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात पळवले गेले. तालुक्याच्या आमदारांनी पुरंदरशी गद्दारी करत बारामतीशी इमान ठेवलं. आपल्या हक्काचं विमानतळ, गुंजवणीचं पाणी आणि राष्ट्रीय बाजार हे प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाल्यानंतर हे सगळे प्रकल्प पुन्हा तालुक्यात आणण्यात यश आलं. काँग्रेसच्या आमदारांनी तालुका दहा वर्ष मागे ठेवून ठेवला म्हणून युवक आणि सामान्य मतदार आता शिवसेनेकडे झुकला आहे असेही शिवतारे म्हणाले. 


      यावेळी बोलताना अनिकेत जगताप म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजयबापू शिवतारे यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आम्ही युवकांनी सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात तालुक्यात परिवर्तन होणार असून शिवतारे यांच्या नेतृत्वाशिवाय तालुक्याला पर्याय नाही हे मागील तीन वर्षात लोकांना जाणवले आहे असेही श्री. जगताप म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला जि. प सदस्य दिलीप यादव, उमेश गायकवाड, शहरप्रमुख डॉ राजेश दळवी, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, नियोजन समितीचे माजी सदस्य कुंडलिक जगताप, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, नितीन कुंजीर, प्रशांत वांढेकर, मंगेश भिंताडे, मिलिंद इनामके,सुरज माने,ओंकार जगताप, अविनाश बडधे, अक्षय कामठे, सागर मोकाशी, धनंजय म्हेत्रे, गणेश इनामके, राजेश शिंदे, आदेश जाधव, अनिकेत जगताप, तेजस भोंडे, आदेश साळुंखे, सूरज जगताप, रोहित ताम्हाणे, स्वप्नील गायकवाड, रुपेश वढणे, सौरभ म्हेत्रे, बबलू झुरंगे, हेमंत कामठे, ओंकार जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, September 12, 2022

रास्त धान्य दुकानाची निविदा पुन्हा भरण्याची संधी द्या!

 रास्त धान्य दुकानाची निविदा पुन्हा भरण्याची संधी द्या!




बेलसर दि.12(वार्ताहर):- महाराष्ट्र शासनाचे रास्त भाव शिधावाटप दुकाने परवाने मंजूर करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्याकडील अर्जानुसार पुरंदर तालुक्यातील 18 गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानांचे परवाने मिळवण्यासाठी 1 जुलै रोजी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु तालुक्यातील बेलसर येथील महिलांना व बचत गटांना कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासनाकडून व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळाली नसल्याने काही ग्रामस्थ आणि महिला दुकानाच्या परवाना बाबतीत अनभिज्ञ होत्या . निविदा पुन्हा भरण्याची संधी बचत गटांना मिळण्याबाबतची मागणी महिला करीत आहेत.



पुरंदर तालुक्यातील 18 गावांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीतल्या निवेदा 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान मागविण्यात आल्या होत्या. परंतु प्रशासनाने व संबंधित विभागाने कोणतीही प्रसिद्धी या निविदाच्या बाबतीत केले नाही. त्यामुळे बेलसर मधील बचत गट अनेक महिला बचत गट यापासून वंचित राहिल्या तर बेलसर मधील क्रांतीज्योती ग्रामसंघ बेलसर यांच्या एकूण 40 महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशासनाकडे त्यासोबतच जिल्हाधिकारी व तहसीलदार पुरंदर यांच्याकडे निविदा भरण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.



बेलसर मधील उमेद अभियानातील जवळपास 40 गटांमधील कोणत्याच महिलेला याबद्दल माहिती मिळाली नसल्याने त्या स्वस्त धान्य दुकानाच्या निविदा भरण्यासाठी गेल्या नाहीत त्यामुळे पुरवठा शाखेकडे सदर महिला सह यांचा अर्ज सादर करणार असल्याची माहिती यावेळी सरगम महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता बुधे यांनी दिल. तसेच 40 महिला बचत गटांमधील महिलांना रेशन स्वस्त धान्य दुकान मिळणे बाबतचा अर्ज करता आला नाही त्यामुळे सदर निविदा पुन्हा प्रकाशित होऊन अर्ज भरण्याची संधी मिळावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी महिला बचत गटांमार्फत करण्यात आली.



फेरनिविदा काढण्यासंदर्भात बेलसर मधील महिला बचत गटांच्या मार्फत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, तहसीलदार पुरंदर व जिल्हा अधिकारी पुरवठा शाखा यांच्याकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांकडून देण्यात आली. बेलसर येथील आंबेडकर भावनांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आसमा मुजावर, वनिता जगताप, प्रियंका चव्हाण, सविता बुधे, अश्विनी जगताप, सुजाता हिंगणे, अन्नपूर्णा जगताप यांनी आपले मत व्यक्त केले.



26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना तक्रारी अर्ज करूनही दखल नाही


बेलसर मधील ग्रामस्थ विजय गरुड यांनी 26 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुरवठा शाखा व तहसीलदार पुरंदर यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज केला होता. परंतु त्या अर्जाची कोणतीच दखल खात्याने घेतलेली नाही. तर विजय गरुड यांच्या म्हणण्यानुसार गाव कामगार तलाठी यांच्याकडे रास्त धान्य दुकान परवाना बद्दल माहिती विचारली असता मला काही माहीत नाही मी माहिती घेऊन सांगते अशी माहिती देण्यात आली असल्याचे गरुड यांनी सांगितले.

Saturday, September 10, 2022

पिसे सोसायटी च्या चेअरमन पदी हनुमंत मुळीक बिनविरोध

 पिसे सोसायटी च्या चेअरमन पदी हनुमंत मुळीक बिनविरोध :



सासवड:प्रतिनिधी दि.१०

पिसे (ता.पुरंदर )येथील म्हस्कोबा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हनुमंत गोविंद मुळीक व व्हाईस चेअरमनपदी अलका रावसो मुळीक यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बागवान मॅडम यांनी जाहीर केले.

   यावेळी संस्थेचे सचिव सोमनाथ चव्हाण उपस्थित होते या निवडणुकीत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलने श्रीनाथ म्हस्कोबा सहकार पॅनलचा पराभव करून १३ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या परंतु तीन अपत्य असल्यामुळे भानुदास बाळकृष्ण मुळीक याना चेअरमनपद गमवावे लागले.त्यामुळे ती जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले.श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलमधून अलका रावसो मुळीक,गोपीनाथ बाबुराव मुळीक,नवनाथ बापूराव मुळीक,बाळासो काशिनाथ सांगळे,रमलविठ्ठल मुळीक ,हनुमंत गोविंद मुळीक ,मोहन धोंडिबा मुळीक,पोपट नाथू मुळीक,रोहिदास सोपाना मुळीक,लहानू पर्वती मुळीक बिनविरोध निवड झालेले २ उमेद्वार निवृत्ती दत्तू चव्हाण, लक्ष्मण सुदाम जगताप झे उमेद्वार शिवसेनेचे विजयी झाले होते.

   शिवसेनेच्या वतीने विजयी उमेदवारांचा सासवड येथे सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना नेते रमेश इंगळे व हरिभाऊ लोळे रामदास (बापू)मुळीक ,माजी सरपंच गणेश मुळीक.माजी उपसरपंच सोमनाथ मुळीक,सोसायटी चे चेअरमन आप्पा मुळीक ,प्रकाश आनंदराव मुळीक,माजी उपसरपंच संदीप मुळीक,शांताराम रघुनाथ रघुनाथ मुळीक ,भुजंग गुलाब मुळीक ,पोपट गुळंब,प्रेमचंद कुटे,लता बाळासो मुळीक,ईश्वर मुळीक ,आदेश मुळीक ,अक्षय मुळीक ,पत्रकार हनुमंत वाबळे ,पत्रकार बापू मुळीक ,संतोष ठोंबरे आदी उपस्थित होते.

    तर शिवसेनेची एकजूट विचार विनिमय सध्या करूनच हि निवडणूक चांगल्या मताने शिवसेनेने एक हाती विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा फडकावला असल्याचे व्हाईस चेअरमन अलका मुळीक यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

नीरा येथे निर्माल्य दान उपक्रमाला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद

 नीरा येथे निर्माल्य दान उपक्रमाला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद

       पाण्यात जाणारे तीन टन निर्माल्य करण्यात आले जमा




नीरा  : १०


     नीरा (ता.पुरंदर) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जन ना च्या वेळी राबवलेल्या निर्माल्य दान उपक्रमाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी सुमारे तीन टन निर्माल्य जमा करण्यात आले. हे सर्व निर्माल्य नदी पात्रात टाकल्याने होणारे नदी प्रदूषण यामुळे टाळले आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे लोकांकडून कौतुक होत आहे.

      

     नीरा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या शेकडो श्रीसेवकांनी स्वयंस्फुर्तीनी या अभियानात सहभाग घेतला. सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे निर्माल्य जमा करण्यात आले.सुरवातीला निर्माल्य कलशामध्ये व नंतर तीन ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये जमा केले. गणपती मुर्ती विसर्जन करते वेळी फुलांचे हार, दुर्वा, पाने, नारळ, फळे, प्रसाद आदी साहित्य नदीपात्रात टाकले जाते. त्यामुळे नदीतील पाणी दुषित होते, ते टाळण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जनाला आलेल्या भाविकांना या सदस्यांनी निर्माल्य नदीत न टाकता आमच्याकडे जमा करण्याचे आवाहन केले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्माल्य गोळा करून त्याचे खत करण्यात येणार असुन पुढील काळात ते खत वृक्षांना टाकण्यात येणार आहे.

      नीरा नदीच्या दत्तघाटावर नीरा, लोणंद परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हजारो भाविक येतात. सुमारे अडीच हजार गणेश मुर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आव्हानाला परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. 


पिंपरे येथे सहा कारचा विचित्र अपघात

 पिंपरे येथे सहा कारचा विचित्र अपघात

  पुढच्या ने ब्रेक दाबल्याने पाठीमागील कार आदळल्या एकमेकावर



 नीरा दि.१०


    पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथे आज शनिवारी पुणे पंढरपूर मार्गावर विचित्र अपघात झालाय . नीरा डाव्या

कालव्या शेजारी सोमेश्वर टायर दुकानापुढे एका चारचाकी गाडीने जाग्यावरच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या पाच ते सहा गाड्या एकमेकांवर येऊन आदळल्या

  यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी या वाहनांचे मोठे नुकसान झालय.


     सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणेच्या दिशेने आलेल्या व पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चारचाकी गाड्या एका पाठोपाठ एकमेकांवर आदल्याने गाड्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. कोणकोणाला धडकले आहे. कोणालाच समजले नसल्याने त्या ठिकाणी दोन तासापेक्षा अधिक काळ भांडणे सुरू होती .त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.. दरम्यान स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन ही भांडणे मिटवली व वाहतूक सुरू करण्यात आली. याबाबतची माहिती पिंपरे येथील राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते अभय थोपटे यांनी दिली.



वीर धरणात एक जण बुडाला :

 वीर धरणात एक जण बुडाला 



 वीर 


गणपती विर्सजनास वीर धरणात गेलेल्या लोणंद एमआयडीसी मधील तरूण कामगार बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोणंदच्या एका कंपनीतील कामगार गणपती विर्सजन करण्यासाठी वीर धरणामध्ये गेला असता, गणपती विर्सजन करताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली. 


वीर धरणात गणपती विर्सजन करताना बुडालेल्या कामगाराचे


नाव संताराम गौर असे असून तो उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येतेय

 बुडालेल्या कामगाराचा शिरवळ पोलिसांनी शोध मोहिम सुरू

केली असून, त्याच्या शोधासाठी पाचगणी येथील रेस्क्यू टीम

पाचारण केली आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुडालेला तरुण सापडण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शोधमोहिम सुरू असून बुडालेल्या या तरुणाचे नातेवाईक काठावरच बसून आहेत.




Tuesday, September 6, 2022

नीरा येथील बुवासाहेब ओढयावरील पुल गेला वाहून

 नीरा येथील बुवासाहेब ओढयावरील पुल गेला वाहून

  नगर सातारा व नीरा - बारामती मार्ग झाला बंद



  नीरा दि.७


   नीरा (ता.पुरंदर) येथे बुवासाहेब ओढ्याला आलेल्या पुरामुळे या ओढ्यावरील तात्पुरता पूल वाहून गेला आहे. यामुळे निरेहुन मोरगाव कडे जाणारा सातारा - नगर हायवे तसेच निरा - बारामती रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे या भागातील लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.


पुरंदर तालुक्यातील निरा जवळ बुवासाहेब ओढ्यावर गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम चालू आहे. जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन उंच पुल बांधण्यात येतो आहे. मात्र गेली अनेक दिवस या पुलाचे काम ठेकेदाराने बंद ठेवले आहे या ठेकेदाराने वाहतुकीसाठी तात्पुरता कच्चा फुल बांधला होता. पावसामुळे हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याचे माध्यमांनी अनेक वेळा दाखवून दिलं होतं. मात्र तरी देखील प्रशासन व स्थानिक नेते मंडळी यांनी याकडे दुर्लक्ष केलं. काल रात्री गुळूंचे राख कर्नलवाडी नावळी या भागामध्ये प्रचंड असा पाऊस झाला. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी बुवासाहेब ओढ्यात आले. त्यामुळे रात्री हा फुल मोठ्या प्रमाणात वाहून गेला.

       आता या वाहून गेलेला पुलामुळे नगर - सातारा आणि बारामती - निरा हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व बांधकाम विभागातील केलेल्या दुर्लकक्षा मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया निरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांनी दिली आहे.

एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट



नीरा. दि.७


        राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मराठी पत्रकार परिषदेसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मुख्यमंत्री यांचे बरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

        यावेळी शिष्ठमंडळाने पत्रकार पेन्शन, अधिस्वीकृती समिती, व्दैवार्षिक पडताळणी, म्हाडा आणि सिडको घरकुलांच्या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय, पत्रकार आरोग्य योजना आदि संदर्भात विविध विभागाची एक बैठक घ्यावी अशी मागणी शिष्ठमंडळाने केली. ती मंजूर करीत मुख्यमंत्र्यांनी गणपतीनंतर संबंधित विभाग आणि पत्रकार संघटनांची व्यापक बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

            मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदिंचा समावेश होता..

Sunday, September 4, 2022

जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते.आमदार ऍड राम शिंदे

 जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते.

                   आमदार ऍड राम शिंदे



  वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा


 जेजुरी  वार्ताहर।   दि ४ योग्य वेळी ,योग्य ठिकाणी मार्गदर्शन मिळाले नाही तर त्या व्यक्तीचे आयुष्य भरकटते. ज्ञानदानाचे पवित्र कार्य गुरुजन सातत्याने करतात. त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षक सुसंस्कारित पिढी घडवण्याचे कार्य करतात .जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. असे प्रतिप्रादन आमदार ॲड. राम शिंदे यांनी केले. 


       पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ॲड. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलावडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,पुणे विभाग सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर ,खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन एम. के. गायकवाड, समाजसेवक शब्बीरभाई शेख, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे , प्राचार्य नंदकुमार सागर, शिक्षकनेते सुधाकर जगदाळे ,हिवरे गावच्या सरपंच पूनम कुदळे, उपसरपंच रामदास कुदळे , ग्रामपंचायत सदस्य मनोज कुटे,विकास गायकवाड, माजी उपसरपंच रमेश कुदळे, धर्माजी गायकवाड, सचिन लिंभोरे, शांताराम दळवी ,विठ्ठल मेमाणे, धीरज जगताप, बापूसाहेब मेमाणे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते .


        शिक्षण संचालक मीना शेंडकर म्हणाल्या यांनी गेली 21 वर्ष वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात .त्याचबरोबर विविध सामाजिक कामेही सातत्याने होत आहेत . त्याबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे यांचे अभिनंदन केले. 

शिक्षक गुणवंत पुरस्कारार्थी शाळानिहाय पुढील प्रमाणे - पी. एस. मेमाणे ( शिक्षणविस्तारधिकारी पं.स.पुरंदर) ,प्रतिभा बोत्रे (केंद्रप्रमुख गराडे ),ईस्माईल सय्यद, (प्राचार्य पुरंदर कॉलेज, सासवड), रविंद्र निगडे (बेलसर ),दत्तात्रय धिंदळे( पिसर्वे), नितीन कोलते (शिवरी), मोहन नातू (रिसे), हेमंत जगताप (जेजुरी ),सुग्रीव चव्हाण( कोथळे ), ज्ञानेश्वर वाघमारे( वाघापूर) संगिता रामदासी (सासवड ),कांतीलाल कोलते ( जवळार्जुन), स्मिता बोराटे (हिवरे), संदिप खेडकर ( भिवरी), सुरेश गोरे (नायगाव), उज्वला कांबळे (घोरपडेवाडी ) ,शितल लोणकर( पिलाणवाडी), दत्तात्रय गायकवाड (धालेवाडी), सुवर्णा जगताप (गुरोळी) , ईश्वर पाटील (हनुमानवाडी), विजय कापरे (कुदळेवाडी), प्रकाश मारणे( सासवड ),राहुल आबनावे (कोळविहीरे), अशोक भगत (काळदरी), भाऊसाहेब उघडे (खानवडी ) .

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालींदर कामठे यांनी केले‌. सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले. आभार प्राचार्य सुनिता रायुडू यांनी मानले. बातमी सोबत फोटो पाठवित आहे. 

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...