जाणून घ्या वीर धरणातून सकाळी सहा वाजले पासून किती होतोय पाण्याचा विसर्ग

 नीरा नदी काठच्या लोकांसाठी आता दिलासा दायक बातमी आहे .नीरा नदीतून सोडण्यात येनाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट



पुरंदर दि.१७


        काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी नीरा नदिणपत्रार पात्रात वीर धरणातून ४३७३४ क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत होते .त्यामुळे नीरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती.नीरा नदीवरील काही पुल पाण्या खाली गेले होते.त्यामुळे सासवड वीर लोणंद हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


       दरम्यान आज शनिवारी सकाळी सहा वाजल्या पासून वीर धरणातून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी घट करण्यात आली आहे..त्यामुळे आता नीरा नदीची पूर स्थिती कमी होणार आहे .त्यामुळे नीरा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी वीर धरणातून ४३८३३ क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं होत.ते कमी करून आज सकाळी सहा वाजले पासून १५९११ क्युसेक करण्यात आलंय त्यामुळे नीरा नदी आता धोक्याचा पातळी पेक्षा कमी वाहते आहे . नदीकाठच्या लोकांना आता दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर सासवड वीर लोणंद मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. याबाबतची माहिती पाठबांधरे विभागाकडून देण्यात आली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.