ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ?

 

ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ? 

ही तर वैचारिक दिवाळखोरी : विजय शिवतारे







 नीरा दि.३१


    लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, आपला पैसा खर्च केला, त्यांना अजित पवार आपल्या पक्षामधून उमेदवारी देतात हे फारच आश्चर्यजनक असल्याचे  

शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही पुरंदर मधून ताकद पणाला लावली म्हणून तरी सुनेत्रा पवार यांना 90 हजारापेक्षा जास्त मते मिळाली. अजित पवारांचे हे वागणं समजण्या पलीकडचे असल्याचे म्हणत, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अस विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. ते आज नीरा येथे माध्यमांशी बोलत होते.



      विजय शिवतरे यांनी आज नीरा येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. घराघरात जाऊन विजय शिवतारे यांनी मतदारांशी संपर्क साधला. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फारच कमी कालावधी असल्यामुळे आपला कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता विजय शिवतरे हे आता कामाला लागले आहेत.या दरम्यान त्यांनी नीरा येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. आणि महायुती मधून मला यापूर्वी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . याबाबत त्यांनी लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. सासवड येथील पालखीतळावर झालेल्या सभेमध्ये पुढचा पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतरेच असतील या मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याची आठवण करून दिली.

       त्याचबरोबर तुम्ही (राष्ट्रवादीने) उमेदवार वेगळा दिला असेल तर तुम्ही महायुती मानत नाहीत का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. इतर ठिकाणी बंडखोरी झाली म्हणून तुम्ही या ठिकाणी बंडखोरी करणार असाल तर ते शक्य नाही असं देखील ते म्हणाले. तीस हजार लोकांसमोर तुम्ही शब्द दिला आणि जर आता तुम्ही दुसऱ्याला एबी फॉर्म देत असल तर तुमच्या शब्दाला काही किंमत नाही का ?असं विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे. मी एकदा तुमच्याशी दुश्मनी केली ती तुम्ही पाहिली आता दोस्ती केली आहे. तर ती मी शेवटपर्यंत दोस्ती निभावणार. आता तुम्ही काय कराल ते तुमचं तुमच्याजवळ. आता इथून पुढे जो काय निर्णय घ्यायचा तो जनता घेणार आहे. असं म्हणत यांनी आपला राग व्यक्त केला.



       महायुतीचे सरकार आणण्यासाठी चार तारखेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यातून मार्ग काढतील असा विश्वास विजय शिवतरे यांनी व्यक्त केला आहे.ज्या व्यक्तीने पवार यांच्या पत्नीला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावली, प्रचंड पैसा खर्च केला. त्यालाच जर उमेदवारी दिली जात असेल तर हे दुर्दैव आहे. याला वैचारिक दिवाळखोरी म्हणावे लागेल. एखाद्याकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसा आहे म्हणून त्याला उमेदवारी देणे योग्य आहे का ? असा प्रश्न विजय शिवतरे यांनी उपस्थित केला.

     महायुतीमध्ये संभाजी झेंडे आणि विजय शिवतरे यांच्या उमेदवारी अर्जा मुले तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कोण अर्ज माघारी येतो याकडे पुरंदर करायचे लक्ष लागले आहे.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?