Thursday, March 31, 2022

शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार

 दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या चक्क अपक्ष.

शरद विजय सोसायटीची निवडणूक रंगतदार. 



पुरंदर : 

       कर्नलवाडीच्या शरद विजय सोसायटीच्या निवडणूकीच्या रणांगणात दोन्ही पँनल प्रमुखांचा पुतण्या मात्र अपक्ष निवडणूक लढवत आहे. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. एक उमेदवार आधीच बिनविरोध आला आहे. आता १२ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्य रणांगणात असणार आहेत. 


     निरा परिसरात स्वमालकीची दुमजली इमारत असलेल्या शरद विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कर्नलवाडीची समिती सदस्यांची निवडणूकीचे अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया नुक्तीच संपली. १३ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. भानुदास यदू पाटोळे हे अनु. जाती/जमातीया प्रवर्गातून आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक लढवत असुन दोन्ही पँनलचे प्रमुखांचे पुतण्ये कृष्णराव शिवाजी निगडे हे स्वतंत्रपणे (बिनविरोध) आपले नशीब आजमवत आहेत. त्यामुळे निवडणुकीत वेगळा रंग आला आहे.


      सर्वसाधारण सदस्यांसाठी ८ जागा आहेत. दोन्ही गटांपैकी ८ व १ अपक्ष असे १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ज्योतिर्लिंग/ज्योतिबा गावकरी प्रगती पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे ज्ञानदेव बुवासाहेब निगडे, विजय विठ्ठल कोंडे, दिलीप बबन निगडे, बाळासाहेब विठ्ठल निगडे, रणजित सतिश निगडे, प्रमोद देवीदास निगडे, श्रीकांत सुरेश निगडे, निलेश दिलीप भोसले. महिला प्रतिनिधी प्रवर्गासाठी संगीता राजेंद्र निगडे, शुभांगी विजय निगडे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नरेंद्र दगडोबा रासकर. तर भ.वी. जाती/जमाती प्रवर्गातून ज्योतीराम बबन कर्णवर निवडणूक लढवत आहेत.



 ज्योतीबा क्रुषी विकास पँनलचे उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण : अशोक आबासाहेब निगडे, अशोक ज्ञानेश्वर निगडे, दत्तात्र्य तुकाराम निगडे, दशरथ लालासो निगडे, बाळकृष्ण अवचितराव निगडे, रामदास बाजीराव निगडे, पोपट जयसिंग भोसले, रघुनाथ सिताराम शेंद्रे. महिला प्रतिनिधी प्रवर्गासाठी प्रभावती शिवाजी निगडे, विमल बाळासाहेब निगडे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून तानाजी भिकनाथ नेवसे तर भ.वी. जाती/जमाती प्रवर्गातून शंकर लक्ष्मण वाघापूरे निवडणूक लढवत आहेत.


१९९४ साली गावातील मान्यवरांनी व भुमिपुत्रांनी ही संस्था स्थापन केली. स्थापने पासून सलग या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावर्षी काही किरकोळ तात्विक वाद झाल्याने ही निवडणूक मैत्रीपूर्ण वातावरणात होत आहे.

Wednesday, March 30, 2022

जेजुरीतल थकीत घरपट्टी, पाणीपट्टीवर आता दरमहा दोन टक्के दंड आकाराला जाणार : नगरपरिषदेची माहिती.

 जेजुरीतल थकीत  घरपट्टी, पाणीपट्टीवर  आता दरमहा दोन टक्के दंड आकाराला जाणार : नगरपरिषदेची माहिती.



 जेजुरी दि.३०


       पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगर परिषदेच्या वतीने एक एप्रिलपासून थकीत मिळकत करा वर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  देण्यात आली आहे. याबाबतचे एक निवेदन नगरपरिषदेच्यावतीने प्रसिद्धीसाठी आज दिनांक ३० मार्च रोजी देण्यात आलंय 


  जेजुरी नगर परिषदेच्यावतीने वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे. मात्र अनेक मिळकतदार ही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करत आहेत. लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी  व इतर कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र तरी देखील लोक घरपट्टी भरत नाहीत. काही लोकांचे तीन ते चार वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे दिनांक एक एप्रिल २०२२  पासून या थकित घरपट्टीचे रकमेवर दोन टक्के दरमहा दंड लावण्याचा निर्णय नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६० अ नुसार हा दंड आकारण्यात येणार असून लोकांनी तातडीने घरपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuesday, March 29, 2022

अल्पवयीन मुलीशी विवाह करून लैंगिक अत्याचार; पती, सासरा व नंदे विरोधात फिर्याद

 अल्पवयीन मुलीशी विवाह करून लैंगिक अत्याचार; पती, सासरा व नंदे विरोधात  फिर्याद दाखल.



   जेजुरी दि.३०

    पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिचा मानसिक छळ केल्या प्रकरणी पुण्यातील तिघा विरोधात जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी .द.वि.क. 498(अ) ,376(2),354(अ),504,506,बा.लैंगिक. अ.स.अधि.2012चे.कलम.4,6,8,10, 12 व बालविवाह प्रतिबंधक अधिनयम2006चे कलम 9प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारी नुसार तिचा विवाह ओंकार सुरेश बेनकर रा.गणेश नगर धायरी पुणे यांचेशी लावण्यात आला होता.लग्नानंतर मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिच्या परवानगी शिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सासरा सुरेश ज्ञानबा बेनकर याने ही तिचा विनय भंग केला. हा सर्व प्रकार तिने नणंद कल्याणी सुरेश बेनकर हिला सांगितला मात्र तिने हा प्रकार आईवडिलांना सांगू नकोस असे म्हणत चाकूचा धाक दाखवला. व जीवे मारण्याची धमकी दिली अश्या प्रकारची फिर्याद दिनांक २९/३/२०२२ रोजी दिली आहे .


  याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनवलकर करीत आहेत.

सासवड येथे घरपट्टी न भरणाऱ्या तीन मिळकत दारांवर जप्तीची कारवाई

 सासवड येथे घरपट्टी न भरणाऱ्या तीन मिळकत दारांवर जप्तीची कारवाई



सासवड दि.२९


पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी वसूल करण्याची मोहीम सध्या जोरदार सुरू आहे .नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले होते. मात्र तरीदेखील घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यास सहकार्य न करणाऱ्या तीन मिळकत दारांवर नगरपरिषदेच्यावतीने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.


सासवड नगरपरिषदेच्यावतीने घरपट्टी वसुलीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकामार्फत सासवड शहरामध्ये घरोघरी जाऊन घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे या मोहिमेला सासवड शहरातील बहुतांश लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र तरी देखील काही लोक ही घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. अनेक वर्षे थकीत असलेल्या लोकांवर आता नगरपरिषदेच्यावतीने जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला जातो आहे.तर पाणी पट्टी थकवणाऱ्या मिळकतदारांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात येत आहे. काल दिनांक 28 मार्च रोजी नगर परिषदेच्यावतीने तीन मतदारांची मिळकत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर या मिळकतदारांनी तातडीने आपली घरपट्टी भरली. त्यानंतर सासवड नगर परिषदेच्या वतीने पुन्हा जप्त केलेल्या या मिळकती मिळकत दाराच्या ताब्यात देण्यात आल्या. असल्याची माहिती मुख्याधिकारी निखील मोरे यांनी आज दिनांक 29 रोजी दिली आहे.



माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..

 माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा..




 माळशिरस दि.२९


  पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरामध्ये र दिनांक 27 28 आणि 29 मार्च या दिवशी किरणोत्सव सोहळा रंगला होता, सूर्याची किरणे या तीन दिवशी थेट शंभू महादेवाच्या पिंडीवर पडत असल्याचा अनुभव येथील भक्तांनी याची डोळा याची देही अनुभवला

      पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील, पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात दर वर्षी २७ मार्च २८ मार्च आणि २९ मार्च असा सलग तीन दिवस किरणोत्सव सोहळा होत असतो. गेल्या तीन वर्षांमध्ये हा योग भुलेश्वर भक्तांना पाहता आला नव्हता. कोरोणा या विषाणूजन्य आजारामुळे सलग तीन वर्ष न पाहता आलेला किरणोत्सव... या वर्षी सलग तीन दिवस उपस्थित राहून भुलेश्वर भक्तांनी पाहण्याचा आनंद घेतला... यावेळी 'हर हर महादेव' 'भुलेश्वर महाराज की जय', असा जयघोष करत भक्तगणांनी भुलेश्वराचे दर्शन घेतले. 

Monday, March 28, 2022

सोमुर्डी येथे शेतात खांब रोवण्यावरून मारामारी चार जना विरोधत सासवड पोलिसात फिर्याद दाखल

 सोमुर्डी येथे शेतात खांब रोवण्यावरून मारामारी चार जना विरोधत सासवड पोलिसात फिर्याद दाखल



सासवड दि.२८


   पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथे शेतामध्ये खांब रोवण्याच्या वादातून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324,323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात सोमुर्डि येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महिला सुनंदा मारुती कुराडे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता व पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी पाडुरंग काळुराम जगदाळे, गणेश बाळु जगदाळे , सोमनाथ भाऊ जगदाळे तिघे रा. गराडे ता. पुरंदर जि पुणे व अजीत लक्ष्मण कु-हाडे रा. सोमर्डी ता पुरंदर जि पुणे 

यांनी गट नंबर५०४ मध्ये पोल रोवल्याच्या कारणावरून फिर्यादी याना कळकाचे काठीने डोक्यात व पाठीवर मारहाण केली.त्याच बरोबर त्यांचे पती हे भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही काठीने मारहाण केली व शिविगाळ दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची फिर्याद दिली आहे. याबाबत अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.

ढाब्यावर जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला कोल्ड्रिंक्सच्या बाटलीने मारहाण.

 ढाब्यावर जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला कोल्ड्रिंक्सच्या बाटलीने मारहाण. 



 सासवड दि.२८


    पुरंदर तालुक्यातील सासवड येथे  ढाब्यावरून जेवण आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला  दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने डोक्यात कोल्डड्रिंकची बाटली डोक्यात मारून जखमी केले आहे.  या संदर्भात सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांन भारतीय दंड विधान कलम 324,504  नुसार गुन्हा दाखल केला आहे.


     याबाबत  सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  याबाबत  प्रमोद वसंतराव टकले वय ४६ वर्ष धंदा शेती रा.सोपानगर, सासवड ता.पुरंदर जि.पुणे  यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते व त्यांचे मित्र सासवड येथील  उत्तम ढाबा येथे जेवण आणणे करीता गेले असता तेथे असणारा इसम  विनायक सतिश जगताप रा.कोडीत नाका, सोपानदेव मंदीरा शेजारी, सासवड ता.पुरंदर जि.पुणे  हा दारू पिऊन तिथे आला. यावेळी  फिर्यादी  व  त्यांचा  मित्र संभाजी असे बसले  होते.  त्यांचे जवळ येवुन  तो संभाजी यास शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ करू नको असे म्हणत असताना त्याने त्याच्या हातातील कोल्ड्रींगची बाटली फिर्यादी च्या  डोक्यात मारून त्यांना जखमी केले. याबाबत  सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतचं अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत... 


एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवते:- डॉ.नितीन सावंत

 एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवते:- डॉ.नितीन सावंत



    नीरा दि.२८


   रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवते. त्यामूळे प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.असे आवाहन डॉ. नितीन सावंत यांनी केले आहे.



   पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राजेश भाऊ काकडे सामाजिक विकास संस्था  व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सामान्य रुग्णालय  सातारा यांच्या माध्यमातून  नीरेचे सरपंच राजेश काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.नितीन सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.यावेळी निरेतील प्रसिद्ध डॉ. निरंजन शहा,अभय तळवलकर,डॉ.रोहन लकडे,आशिष शहा, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,  सदस्य राधा माने,वैशाली काळे, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, आनंद शिंदे, माजी उपसरपंच विजय शिंदे, सुदाम बंडगर, दीपक.काकडे,वैशाली निगडे, धनंजय निगडे इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.  कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सदस्य  नाना जोशी,गणेश वाघमारे, गणेश तातुसकर,रणजित निगडे,दीपक मोरे,आंनता वेदपाठक  इत्यादींनी केले होते.


यावेळी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सामान्य रुग्णालय साताराचे डॉ.आरती पाटणे , कृष्णनंत दीक्षित,प्रियांका माने, रवींद्र जाधव,करण भालेराव.मिलिंद साठे,शेष मागाडे, मच्छिंद्र रसाळ,प्रदीप धेंबरे इत्यादींनी या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय सेवा दिली.


Friday, March 25, 2022

कोरोना काळात पोलीस पाटलांचे मोलाच सहकार्य मिळाले : तहसीलदार रुपाली सरनोबत

 

कोरोना काळात पोलीस पाटलांचे मोलाच सहकार्य मिळाले : तहसीलदार रुपाली सरनोबत



  सासवड दि.२५

     देशात कोरोनाने  थैमान घातले असताना राज्यात पोलीस पाटलांनी मोलाच सहकार्य केले. पोलीस पाटील महसूल विभागाकडून इतर वेळी दुर्लक्षित राहतो. पण महामारीच्या काळात पोलीस पाटलांनी केलेले काम वाखाणण्या जोगे आहे .असे म्हणत पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी पोलीस पाटलांच्या कामाचे कौतुक केले.



    सासवड ता. पुरंदर येथे आज पुरंदर तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व पोलीस पाटील मार्गदर्शन शिबिराचे आयीओजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत बोलत होत्या.या प्रसंगी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,जेजुरी पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सासवड पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप ,पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील ,पश्चिम विभाग अध्यक्ष   दादा काळभोर, पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष तृप्ती मांडेकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजयराव कुंजीर, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष  हर्षदा सपकाळ,  पुरंदर तालुका अध्यक्ष उमेश तळेकर, उपाध्यक्ष मोहन इंगळे, त्याच बरोबर नवनिर्वाचित कार्यकारिणी,  विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.



    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, दादा काळभोर, साहेबराव राळे पाटील, तृप्ती मांडेकर, उमेश तळेकर इत्यादींनी आले मनोगत व्यक्त केले.राज्याचे अध्यक्ष बालासाहेब  शिंदे पाटील म्हणाले की, पोलीस पाटील गावपातळीवर काम करतो त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा विना कारण पूर्व ग्रह धरून पोलीस पाटलाविरोधात तक्रारी केल्या जातात. अशा वेळी प्रशासनाने पोलीस पाटलाला त्याची बाजू मांडायची संधी द्यायला हवी.त्याच बरोबर प्रशासनाने देखील त्याच्या पाठीशी खंबीर उभे रहायला हवे.तरच गाव पातळीवर पोलीस पाटील खंभीर पणे काम करू शकेल.संघटनेच्या माघ्यमातून राज्य सरकारकडे पाठ पुरावा करून अनेक प्रश्न सोडवण्यात यश आले आहे.पोलीस पाटलांनी संघटीत रहायला हवे.त्याच बरोबर प्रशासकीय कामाची जबाबदारी पूर्ण करायला हवी.  कार्यक्रम पारपाडण्यासाठी  पोलीस पाटील  राजेंद्र भास्कर,कुंडलिक  तांबे,राहुल शिंदे,दिनेश जाधव,दीपक जाधव,दिनेश खोमणे,प्रियांका चव्हाण,अमोल लोळे,अक्षय शिदे,विनायक गायकवाड,सुरज जगदाळे,कल्पेश वाडकर,विद्या ताकवले, आरती जगताप,इत्यादींनी परिश्रम घेतले.     

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका सावंत,श्रीकांत राणे,मोहन इंगळे, यानी केले प्रास्तविक उमेश तळेकर यांनी तर आभार सचिन दळवी   यांनी  मानले

   

 


   कोरोन काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या पाटलांना विमा द्या

      कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस पाटलांचा कोरोन मुळे मृतू झाला.या पैकी शासनाने फक्त सहा लोकांनाच ५० लाखाचा विमा दिला मात्र अजूनही ४० हून जास्त पाटलांच्या वारसांना विमा रक्कम मिळाली नाही. शासनाने पोलीस पाटलांना फ्रंट लाईन वर्कारचा दर्जा दिला आणि काम करायला लावले पाटलांनी संकट पाहून स्वतःला झोकून देऊन काम केले. मात्र आता कोतोनात मृतू पावलेल्या लोकांना शासन विमा देताना दिरंगाई करीत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.अन्यथा वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येवू असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे  

Wednesday, March 23, 2022

मुळशी,वेल्हा, हवेलीच्या दुर्गम भागातील वाडीवस्तीवर लवकरच विद्युतीकरण

 मुळशी,वेल्हा, हवेलीच्या दुर्गम भागातील वाडीवस्तीवर लवकरच विद्युतीकरण 

      नियोजन मंडळातून १२ कोटीचा निधी मंजूर 

                          प्रवीण शिंदे - (सदस्य पुणे विद्युत मंडळ) यांची माहिती.



जेजुरी   वार्ताहर   दि २३  पुणे जिल्ह्यातील मुळशी,वेल्हा,व हवेली तालुक्यातील अतिशय डोंगर दऱ्यांच्या दुर्गम प्रदेशातील वाड्या ,वस्ती व पाड्या पर्यंत स्वातंत्र्या नंतरहि  दुर्गमतेमुळे वीज आलेली नाही.  पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार,बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मुळशी,वेल्हा व हवेली तालूक्यातील दुर्गमभागातील डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांवर विद्युतीकरणासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील काही गावात पहिल्या टप्प्यात काम सुरु होत असल्याचे पुणे विद्युत मंडळाचे सदस्य व बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी  बोलताना सांगितले.


   

    मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असणारे वेगरे वाडीवस्ती,कोंदुर वाडीवस्ती,मोसे येथील दादवलीवस्ती,अडमाळ येथील पासलकरवस्ती,वांजळे येथील रामवाडी,जताडे येथील कुडलेवस्ती,पोमगाव येथील कातरवस्ती .    वेल्हे तालुक्यातील धिसर ढेबेवस्ती, धानेप धनगरवस्ती,घावर वाडीवस्ती,भागीनघर, भट्टी – घावदरायेथील ढेबेवस्ती,सूरवड वाडीवस्ती, माणगाव कुंभतलवस्ती, रुळे येथील काळूबाईचावाडा,शिरकोली- घरकुलवस्ती, कुरण – मोरेवस्ती,खामगाव – तळजाईवस्ती. वरोती,कोंढवली, केतकावाने ,दादवडी वाडीवस्ती,वरघड येथील बिरोबावाडी,        तसेच हवेली तालुक्यातील आगळम्बे येथील ठाकरवाडी व धनगरवाडा या दुर्गम भागातील वाड्या  वस्तीवर पहिल्यांदाच विद्युतीकरण होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले.


      बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी ,वेल्हा,हवेली,भोर,या तालुक्यातील दुर्गम भागातील आणि डोंगरदऱ्यातील वाड्या वस्तीवर विजेचे जाळे पसरविण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे यांनी केले असून उर्वरित गावात स्वातंत्र्यानंतर अंधार नाहींसा होणार असल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले.  


 

Tuesday, March 22, 2022

क्षयरोग रोगावर वेळीच उपचार घ्या.आणि भारतातून क्षयरोग हद्दपार करा.: बाळासाहेब भंडलकर

 क्षयरोग रोगावर वेळीच उपचार घ्या.आणि भारतातून क्षयरोग हद्दपार करा.: बाळासाहेब भंडलकर



 नीरा दि.२३


   क्षयरोग  अर्थात टीबी हा आजार पूर्णपणे बरा होणार असून वेळीच उपचार घेतले तर तो लवकर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे लोकांनी बाबत घाबरून न जाता वेळीच उपचार करून घ्यावेत आणि आपला देश क्षयरोग मुक्त देश करून या. क्षय रोगाला आपण  या देशातून हद्दपार करूया. असे आवाहन निरा येथील आरोग्य सहाय्यक बापूसाहेब  भंडलकर यांनी केले आहे.


   नीरा (ता.पुरंदर) येथे जगातीक क्षयरोग दिनानिमित्त  क्षयरोग जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.आज दि.२३ रोजी नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांना क्षयरोग बाबत माहिती देण्यात आली.यावेळी क्षयरोग तालुका निरीक्षक फिरोज महात,आरोग्य सहिका सत्यभामा म्हेत्रे, आरोग्य सहायक  बेबी तांबे  आशास्वयंसेविका आशा सुर्यवंशी,स्मिता टिके इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


    यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्य सहाय्यक भंडलकर म्हणाले की,आज आपण क्षयरोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहेत.ज्या प्रमाणे आपण पोलिओला भारतातून हद्दपार केले आहे. त्याच प्रमाणे टी.बी. अर्थात क्षय रोगला ही हद्दपार करूयात. क्षय रोग नियंत्रणात आपण मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे.आता आपल्याकडील क्ष्यारोगाच प्रमाण नगण्य आहे.मात्र आपल्याकडे क्षयरोगाचा एकही बाधित रुग्ण ठेवायचा नाही.त्याच्यावर उपचार करून त्याला पूर्ण बरा करायचे आहे.शासन अशा रुग्णावर मोफत उपचार करीत आहे.त्यामूळे ज्यांना क्षयरोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी तातडीने त्यावर उपचार घ्यावेत. प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण  रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात यावर मोफत उपचार केले जात आहेत.१५ दिवसा पेक्षा जास्त दिवस खोकला असेल तर त्या लोकांनी क्षयरोग संदर्भात चाचणी करून घ्यावी.वेळीच रोगाचे निदान झाले तर लवकर उपचार करून रोग ही लवकर बरा होईल.

पांडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी संजय जगताप तर व्हा.चेअरमनपदी महादेव कामथे

 पांडेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी संजय जगताप तर व्हा.चेअरमनपदी महादेव कामथे



जेजुरी प्रतिनिधी दि.22



     पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील, पांडेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संजयअण्णा जगताप यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. तर व्हॉईस चेअरमनपदी महादेव कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली  आहे.


    पांडेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण १३ सदस्यां पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे  ९  तर  काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले होते.  संचालकपदाची निवडणूक सुद्धा  बिनविरोध पारपडली होती . 


     आज दिनांक 22 मार्च रोजी चेअरमन व्हॉईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयअण्णा जगताप यांनी  चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच महादेव कामथे यांनी व्हाईस चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत या दोघांचेच  अर्ज प्राप्त झाले .त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला मदने यांनी जाहीर केले. या निवडीनंतर ग्रामस्थांनी चेअरमन व्हॉईस चेअरमन या दोघांचाही सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पंढरीनाथकाका सोनवणे,   माजी सरपंच प्रताप रासकर,उत्तमराव शिंदे,संदीप रोमन, मनोहर झेंडे, नितीन रोमन, त्याचबरोबर पांडेश्वर गावचे पोलीस पाटील अरुण धुमाळ तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.



      या निवडीनंतर बोलताना संजयअण्णा जगताप म्हणाले की, लोकांनी मला सलग दुसऱ्यांदा सोसायटीच्या चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली. सोसायटीचा कारभार नेहमीच पारदर्शक राहिला आहे. आणि यापुढे सुद्धा तो पारदर्शक राहील. सर्वसामान्य सभासदाच्या भल्यासाठी आम्ही आत्तापर्यंत काम केलं आणि इथून पुढे सुद्धा करणार आहोत. सभासदांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करून तर दाखवूच  पण त्यांनी दाखवलेल्या  विश्वासाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.

महिलांनी कॅन्सर तपासणी करून घ्यावी ; डॉ.मनीषा मगर यांचे आवाहन

 महिलांनी कॅन्सर तपासणी करून घ्यावी ; डॉ.मनीषा मगर यांचे आवाहन 



 नीरा येथे  कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन 


नीरा दि.२२


     पुरंदर तालुक्यातील नीरा येथे   अँनको  लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा व निरा  प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने कॅन्सर तपासणी शिबिरचे आयोजन  आज दिनांक 22 मार्च रोजी  नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात   आले आहे. यावेळी डॉ.मनीषा मगर यांनी महिलांनी कॅन्सर तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

   आज दिवसभर नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर तपासणी करण्यात येत आहे.तोंडाचा कॅन्सर ,घशाचा कॅन्सर,फुफुसाचा 

कॅन्सर,स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर,आतड्याचा, किडनी व मुत्रसायचा कॅन्सर इत्यादी तपासी करण्यात येत आहे. कॅन्सर रोग निदान झालेल्या रुग्णांना महात्मा.ज्योतिबा फुले जन धन आरोग्य योजने अंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्ड  धारकांना मोफत उपचार केले जाणार आहेत. यावेळी डॉ.मनीषा मगर म्हणाल्या की,  कॅन्सर हा पूर्ण बरा होणारा आजार आहे.त्यामुळे त्याच वेळीच निदान होणं आवश्यक आहे.कॅन्सरच प्रमाण सध्या वाढले आहे.त्यामुळे लोकांनी वेळीच कॅन्सर बाबत तपासणी करणे गरजेचे आहे.

         यावेळी डॉ. मनिषा मगर, डॉ. सुरेश साबळे हे तपासणी करत आहेत.तर त्यांना  उमंग पवार गौरव भोई, सुनीता आढागळे, रूपाली साळुंखे नितीन जगदाळे हे अँनकोचे सहकारी   कर्मचारी   मदत करीत आहेत. त्याचबरोबर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. समीक्षा कांबळे, डॉक्टर नरेश बागुल, आरोग्यसेविका बेबी तांबे,आरोग्य सेवक बाळासाहेब भंडलकर,लॅब टेक्निशियन मनीषा जाधव, संगम कर्वे, शुभांगी चव्हाण सत्वशीला बंडगर, तुकाराम मुलमुले,अक्षय चव्हाण आशा स्वयंसेविका आशा सुर्यवंशी आणि स्वाती गायकवाड त्यांना सहकार्य करीत आहेत. आज दिवसभर ही तपासणी सुरू असणार आहे.


Monday, March 21, 2022

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांना आदर्श सरपंच पुरस्कार

 पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांना आदर्श सरपंच पुरस्कार



जेजुरी   वार्ताहर  दि 21 पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष व भोसलेवाडी गावचे सरपंच राजेंद्र नामदेव भोसले यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . 

         पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या हस्ते राजेंद्र भोसले यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे,वीरधवल जगदाळे,तसेच संतोष भोसले,मोहन भोसले,बबन भोसले,मनोज घाटे,चंद्रकांत भोसले,तुळशीराम भांडलकर आदी उपस्थित होते .



       पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसलेवाडी गावात पाणी शुद्धीकरण प्रकल्प,पिण्याच्या पाण्याची योजना,अंत्यविधीसाठी प्रथमच स्मशानभूमी,शाळा दुरुस्ती व मूलभूत सुविधा,शहरात अंतर्गत रस्ते,गटारे,खा सुप्रिया सुळे यांच्या फांडातून स्मशानभूमी पर्यंत रस्ते,उज्जवल गॅस योजनेतून गावात 204 लाभार्थीना लाभ,तसेच कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी व अन्नधान्य वाटप आदी कोट्यवधी रुपयांची कामे केली असल्याचे सरपंच राजेंद्र भोसले यांनी सांगितले . 


         

कोथळे गावाचे सरपंच शहाजी जगताप यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार

 कोथळे गावाचे सरपंच शहाजी जगताप यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार



जेजुरी   वार्ताहर  दि २० पुरंदर तालुक्यातील कोथळे गावचे सरपंच शहाजी सदशिव जगताप यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. 


       यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे,वीरधवल जगदाळे, कोथळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वंदना जगताप,सदस्य अभिजित जगताप, बापुसो जगताप,नीरा कृषी उत्पन्न समितीचे संचालक अड धनंजय भोईटे, माजी सरपंच वसंत आबा जगताप,पोलीस पाटील आबा भंडलकर,शशिकांत जगताप,सुहास जगताप,अमोल जगताप,वैभव जगताप,सौरभ जगताप,संजय काकडे,भारत काकडे ,ग्रामसेवक पिसे आदी उपस्थित होते.


        पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप तसेच भारत सरकारचे आयडीएस अधिकारी राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षात कोथळे गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा,सीसीटीव्ही यंत्रणा ,गायराना वृक्ष लागवड, पिण्याची पाणी योजना,स्मशानभूमी,दशक्रियाविधी घाट,ओढा खोलीकरण,बंधारे,दफनभूमी,गावात अंतर्गतरस्ते,ग्राम्पंचायत इमारत,शाळांची दुरुस्ती,मंदिरांचा जीर्नोधार अशी सुमारे साडे तीन कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून गावाचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे सरपंच शहाजी जगताप यांनी सांगितले.



         

वाल्हे येथे साजरी करण्यात आली तिथीनुसार शिवजयंती

 वाल्हे येथे साजरी करण्यात आली तिथीनुसार शिवजयंती

वाल्हे दि.२१



  पुरंदर तालुक्यातील नीरा येथे साजरी करण्यात आली तिथीनुसार शिवजयंती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,सरपंच अमोल खवले,माजी जिप सदश्य आझादभाऊ पवार यांच्या हस्ते येथिल शिव स्मारकास पुष्पहार करून  छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.


    आज राज्यभरात आज दिनांक 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जातेय.पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे सुधा आज तिथी नुसार जयंती साजरी करण्यात आली.  पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,सरपंच अमोल खवले,माजी जिप सदश्य आझादभाऊ पवार यांच्या हस्ते येथिल शिव स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले व 'जय भवानी जय शिवाजी','छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी मा.सरपंच महादेव चव्हाण,मा.उपसरपंच सूर्यकांत भुजबळ,मा तंटामुक्ती अध्यक्ष सतिश सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदश्य किरण कुमठेकर,कांताकाका पवार,दिपक कुमठेकर, बजरंग पवार उद्योजक सुनिल पवार,दादा मदने,जितेंद्र शहा,गोरख कदम,जगदीश पवार,कुंडलीक पवार,विनोद शहा युवक अध्यक्ष संदेश पवार,सुजीत राऊत,अभि दुर्गाडे,अमित झेंडे  व इतर मान्यवर उपस्थीत होते

Sunday, March 20, 2022

प्राध्यापकाकडून २०० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण

 

प्राध्यापकाकडून २०० हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण 

 


भोपाळ :

          शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. येथील नॅशनल लॉ युनिव्हसिटीचे प्राध्यापक तपन मोहंतीच्या विरोधात पोलिसांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. सेक्सुअल हरॅसमेंटअंतर्गत दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रोफेसर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी त्यांच्या लेक्चरला बसायला घाबरत होती.

गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिंनीसोबत गैरवर्तणूक

स्टूडेंट्स बार असोसिएशनशी संबंधित विद्यार्थ्यांनी आरोपी प्रोफेसरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्यात त्याचं कृत्य समोर आलं आहे. आरोपी गेल्या 20 वर्षांपासून विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक करीत होता. तो मुलींना परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवित होता. आणि त्यांच्यावर जबरदस्ती करीत होता.

200 हून अधिक मुलींसोबत गैरकृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षात अनेक विद्यार्थिनींनी आरोपी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठ प्रशासनात त्याची वरपर्यंत ओळख आहे. यामुळे हा विरोध मोठ्या स्तरापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो बचावला जात होता. मात्र भीतीमुळे मुली काहीही सांगायला घाबरत होत्या. तर काहींनी याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकी देऊन गप्प करण्यात आलं.

पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागेल : शरद पवार

 

            पुरंदर विमानतळाचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागेल : शरद पवार



  सुपे दि .२०

                      पुरंदर विमानतळाची बैठक येत्या पंधरा दिवसात दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयात होणार असुन यासाठी देशाचे संरक्षणमंत्री , नागरी व्यवस्था मंत्री , महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे माझ्यासह बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन याठिकाणी विमानतळा विषयी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज सुपे येथे दिली आहे .पवार हे आज सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या  इमारतीची कामाची पाहिणी करण्या करिता आले होते.  यावेळी येथील प्राचार्य राहुल पाटील व योगेश पाटील यांस बरोबर चर्चा करून याठिकाणी सुविधा विषयी माहिती घेत विद्या प्रतिष्ठानचा इंग्लिश मिडीअम स्कुल व कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी संख्येचा आढावा घेतला , या विद्यालयाचा विद्यार्थी संख्येचा माहिती घेत दोन्ही प्राचार्याचे कौतुक केले , ग्रामीण रूग्णालयाची पाहणी व नियोजीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागे संदर्भात माहिती शरद पवार यांनी घेतली,

 

तसेच जागेची पाहणी करून इमारत केंव्हा तयार होईल. ग्रामिण भागातील किती विद्यार्थ्यांची सोय होईल, शैक्षणिक सुविधा काय असतील, अशी बारकाईने माहिती पवार यांनी या वेळी घेतली.तसेच सुपे कारखेल, उंडवडी मार्गची व मोरगाव सुपा पाटस अष्टविनायक मार्गाची देेखिल माहििती घेतली.

 

  जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नियमीत मिळते का. पाऊस झाला का. या वेळी कोणती पिके घेतली आहेत. ऊस किती लावला आहे. माझ्या वेळेचे कार्यकर्ते आता कोण कोण आहेत. त्यांची तब्येत कशी आहे. अनेक आजी- माजी व जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे घेऊन त्यांनी विचारपूस केली,

 

यावेळी जेष्ठ कार्यकर्ते संजय दरेकर , बबननाना बोरकर , बापुराव चांदगुडे , नंदाताई खैरे ,शंकरराव चांदगुडे, सुपे गावचे उपसरपंच मल्हारी खैरे ,शौकत कोतवाल आदी जेष्ठ मान्यवर उपस्थिती होते .

त्याच बरोबर  राष्ट्रवादी कॉग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वत किरण गुजर , माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव , माजी सभापती  निता बारवकर , पोपट पानसरे ,सपे ग्रामपंचायत सदस्य मुनीर डफेदार , संपत जगताप, अशोक लोणकर, राजकुमार लव्हे ,रोहन सरोदे इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

एमआयएमचा आघाडीतील समावेश म्हणजे शिळूप्यातील गप्पा: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते यांची प्रतिक्रिया.

 

एमआयएमचा आघाडीतील समावेश म्हणजे शिळूप्यातील गप्पा: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते यांची प्रतिक्रिया.

 


 नीरा दि.२०

   काल पासून राज्यभरात एमआयएमचा महाविकास आघाडीत समावेश होणार यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया ही येत आहेत.

राष्ट्रवादीचे  जेष्ठ नेते व प्रवक्ते विजय कोलते  यांनी याबाबत बोलताना या केवळ सिळूप्याच्या गप्पा असल्याच म्हटलंय. त्याच बरोबर असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आघाडीकडे आला नाही आणि येणार ही नाही आणि आला तरी तो स्वीकारणे शक्य नाही. अस त्यांनी म्हटलंय.

       काल पासून राज्यभरात एमआयएमचा महाविकास आघाडीतील सामावेश बाबत वर्तमान पत्र आणि इलेक्ट्रोनिक मिडीया व सोशल मिडीया यावर जोतदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे  जेष्ठ नेते व प्रवक्ते विजय कोलते  यांनी मात्र असह प्रकारचा कोणताही प्रस्थाव नसल्याच त्यांनी  म्हटले  आहे. त्याच बरोबर हा विषय इथच थांबवावा असाही त्यांनी म्हटलं आहे.वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि दूरदर्शन वरील सगळी माहिती लक्षात घेता विनाकारण महाराष्ट्र मध्ये एका बाबीची चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना कोलते म्हणाले की, ‘एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीत येणार त्याबद्दलची चर्चा विनाकारण वाढवलेली आहे. एखाद्या लग्न समारंभामध्ये सहज गप्पा मारताना तुम्ही असे करा  मी असे करतो असं आपण म्हणतो तसा हे झाले आहे याला कोणताही आधार नाही  माध्यमांनी त्याला विनाकारण प्रसिद्धी दिली आणि  चर्चा सुरू झाली. माध्यम प्रश्न उत्तरे करायला लागली. तर असा  कुठलाही अधिकृत प्रस्ताव महाविकासआघाडी आलेला नाही. तो येण्याची शक्यता नाही. आणि  चुकून तो आला तरी तसा प्रस्थाव  स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. कारण जातीवादाचा विचार करणारा पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या निधर्मवादी पक्षांशी जुळवून घेणे शक्य नाही. हे होणे नाही. परंतु चर्चा मात्र वाढत गेली. म्हणून आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो या गोष्टी होणार नाहीत. यावर अधिक चर्चा करायची गरज नाही. आवश्यकता नाही त्यामुळे अशा टाईमपास करणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करावं’ अस विजय कोलते यांनी म्हटले आहे.



दररोजच्या वापरण्यातील आल्याचे औषधी गुणधर्म

 

आल्याचे उपयोग





          दररोजाच्या स्वयपाकात आपल्याकडे आल्याचा नेहमीच वापरले जाते.त्याचा आपल्या शरीराला खूप चांगला उपयोग होतो.  मराठीत आपण आले म्हणतो त्याला हिंदीत अद्रक म्हणतात तर  याला इंग्रजीत 'जिंजर' असे नाव आहे. आयुर्वेदात आपल्याला विश्वभेजक, विश्व-औषधी असे पर्यायी नाव दिलेले आहे. यावरून त्याच्या औषधी गुणधर्माची कल्पना येईल. आल्याची साल काढून उन्हात वाळविल्यावर ती सुंठ तयार होते. बऱ्याचशा आयुर्वेदीक औषंधामध्ये सुंठीचा वापर केला जातो. तसेच काही औषधींना आल्याचा रसाचाही वापर केला जातो. भारता बाहेरील चीन व ग्रीक ग्रंथांमध्येही आल्याचा उल्लेख आढळतो.  परदेशात  आल्याचा आहारात उपयोग न करता केवळ औषधी म्हणूनच उपयोग केलेला आढळतो. ग्रीक फिजिशियन गॅलेन यानेही आल्याचा उल्लेख केलेला आढळतो. गॅलेन याने पक्षघातासाठी आल्याचा वापर केला होता. आल्यासंबंधीचे आयुर्वेदात महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत.

       आले चवीला तिखट असून, उष्ण द्रव्य आहे. लहान मुलांमध्ये सर्दी पड़शावर कपाळ, छाती तसेच नाकाच्या भोवती आल्याच्या लेपाने अपेक्षित फायदा होतो. घाम फार येणे, घामाला दुर्गंधी असणे यासाठी सुंठीचा लेप लावतात, आले, सुंठ, वात, व्याधींवर उत्तम औषध आहे. सेवनाने रक्तवाहिन्यांना बळ मिळते. वेदना कमी होतात. आमवात, सांधेदुखी या आजारांमध्ये सुंठीचा वापर फारच महत्वाचा समजला जातो. या आजारांमध्ये सुंठीचा बाहेरून लेप लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.

 

          आले, सुंठ याचा उपयोग पचन संस्थेच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावते. अरुची, अग्निमांद्य, मळमळ, अजीर्ण, भूक न लागणे, अपचन, गॅस धरणे, उदरशूळ,आदी विकारांमध्ये याचा अतिशय चांगला लाभ होतो. आल्याचा तिखट रस आणि उष्ण गुणधर्म याद्वारे श्वसनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. गुळ आणि सुंठ एक करून घेतल्यास सर्दी पडसे, अरुची कमी होते. स्थूल स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी कमी रक्तस्त्राव व वेदनायुक्त होत असेल त्यांनी नियमित आल्याचा काढा (एक कप) सकाळी घ्यावा. आल्यामध्ये प्रामुख्याने उडनशील तेल, फेनॉल जास्त प्रमाणात आहेत. आल्यातील तिखट रस प्रामुख्याने जिंजीरॉल या घटकद्रव्याच्या असून त्याद्वारे औषधी परिणाम घडून येतात. जिंजीरॉल व शेगॉल या दोन घटकांमुळे पाचकस्त्रावाचे प्रमाण वाढते व त्याद्वारे अन्नपचन क्रिया सुधारते. वांती, मळमळ, गॅसेस कमी होतात. ज्यांना प्रवासात मळमळ, उलटी होते त्यांनी प्रवासाला निघण्याच्या आगोदर आल्याचा लहान तुकडा तोंडात धरल्यास प्रवासात कुठलाही त्रास होत नाही. आपल्याकडील उडनशील तेल व फेनॉलमुळे श्वासवाहिन्यातील रक्तपुरवठा सुधारतो. श्वासवाहिन्या मोकळ्या होतात व कफ सुटण्यास मदत होते. त्याद्वारे सर्दी, पडसे, श्वास, कफ  कमी होतो. आले हे आजार कमी करणारे आहे. आल्याच्या सेवनाने रक्तभिसरण क्रिया सुधारते. रक्ताची गुठळी तयार होत नाही (अॅन्टी क्लॉटिंग) हे कार्य अॅस्पिरीन या औषधी द्रव्याप्रमाणे दिसून येते. म्हणूनच हृदयरोगी अथवा हृदयरोग होवू नये यासाठी नित्य आल्याचे सेवन हितावह आहे. स्त्रियांना मासिक स्त्राव अनियमित, कमी आणि वेदनायुक्त असेल त्यांनी अवश्य आल्याचे सेवन करावे. आल्याच्या सेवनाने कामवासना वाढत नाही तसेच लैंगिक अशक्तपणा कमी होतो. येणेप्रमाणे आले बहुपयोगी आहे. आले सेवन करताना प्रमाणशीर घ्यावे  वेळोवेळी वैद्यांचा सल्ला घेतल्यास अधिक चांगले....!

टीप: 

वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.

अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Featured Post

पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह

 पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह  पुरंदर :         निसर्ग अनेकदा अशा घटना घडवतो की ज्या पाहून मा...