पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी

इमेज
दादांच्या आठवणींचा वारसा, जबाबदारीचा भार आणि सेवाभावाची शपथ… सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी  मुंबई :       महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असतानाच, त्या दु:खातूनच कर्तव्याचा नवा अध्याय सुरू झाला. दिवंगत दादांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी राजभवनात साध्या पण भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वैयक्तिक आघात बाजूला ठेवत, जनसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला.         बुधवारी (दि. २८) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्याच रात्री सुनेत्रा पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळीच राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली आणि सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ...

२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

इमेज
२२ फेब्रुवारीला कर्जत येथे पत्रकारितेचा सन्मानसोहळा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर  मुंबई :         ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा झेंडा उंचावणाऱ्या पत्रकार संघांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण होणार असून, यानिमित्ताने राज्यातील तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावाही संपन्न होणार आहे.       कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात सकाळी ११ वाजता हा सन्मानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.         ग्रामीण महाराष्ट्रात कार्यरत असलेले अनेक तालुका पत्रकार संघ केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहेत...

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात

इमेज
पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात  पुरंदर :        पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून खरी निवडणूक लढत सुरू झाली आहे. एकूण ८७ अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८ जागांसाठी विविध पक्षांचे व अपक्ष असे ३३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आगामी ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.        पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि. २७) हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज वैधतेनंतर तब्बल पाच दिवसांची मुदत मिळाल्याने विविध पक्षांतील नाराज उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. या काळात अनेक 'अर्थपूर्ण' राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.       आता पंचायत समितीच्या ...

पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात

इमेज
पुरंदरचा राजकीय रणसंग्राम तापला; अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार मैदानात  पुरंदर :       पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढली असून, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही जिल्हा परिषद गटांमध्ये आता थेट लढती निश्चित झाल्या असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.        पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होत असून, मंगळवारी (दि.२७) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांतून तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात शिल्लक राहिले आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी घेण्यात आल्या असून, दाखल केलेल्या अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. परिणामी आता ३३ उमेदवारांचे ...

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इमेज
 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळ देण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी गुळूंचे (ता.पुरंदर) येथील सुरेश आनंदराव जगताप-निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.       या नियुक्तीमुळे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व खडकवासला ग्रामीण तालुक्यांची महत्त्वाची जबाबदारी सुरेश जगताप-निगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना अधिक मजबूत करणे व तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे. नियुक्तीबद्दल संभाजी होळकर यांनी जगताप-निगडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर विश्वास व्य...

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

इमेज
एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध पक्षांच्या रणनीतींना वेग आला आहे. त्यात पुण्यासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  या सोडतीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. अकोला, चंद्रपूर, जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि लातूर या महापालिकांमध्येही महिला आरक्षण लागू झाले असून, त्यामुळे महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, ठाणे परिसरातील अनेक महापालिकांमध्ये सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले असून, ठाणे आणि लातूर महापालिकेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. ओबीसी प्रवर...

शिरूरचा झालाय उडता पंजाब

इमेज
ड्रग्ज प्रकरणात पुढे काय होणार ? नशेली पदार्थांपासून युवकांना रोखणार कोण ?  शिरूर : शिरूर तालुक्यात आठवड्यात सलग कोट्यावधींची ड्रग्ज प्रकरणे पुणे ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढली असून याची पाळेमुळे शोधणे पोलिसांसमोर खरे आव्हान निर्माण झाले आहे.शिरूर तालुक्याचा उडता पंजाब झालेला असून पोलिस कारवाई कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून युवकांमध्ये नशेली पदार्थांचे सेवन करणे, घातक एम डी पर्यंत मजल गेली आहे.या महिन्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी पान मसाला मध्ये वापरणारे नशा येणारी बंटा गोळी चे रॅकेट उघडकीस आणले होते.त्या पाठोपाठ शिरूर मध्ये एम डी ची दोन कोटी ची कारवाई करत जप्ती केली होती.यानंतर लगोलग पोलिसांनी सुमारे २० कोटी चे ड्रग्ज जप्त केले आहे.या प्रकरणात खाकी चा अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिस अंमलदार देखील ताब्यात घेतला आहे.या प्रकरणानंतर एम डी ड्रग ची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे.एकीकडे निवडणुकीचे वातावरण असताना पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईची चर्चा होत असून आता मूळ सूत्रधार शोधणे, पाळेमुळे शोधून हे रॅकेट उध्वस्त करणे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठ...

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

इमेज
 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा पारंपरिक गड, मागील निवडणुकीत शिवसेनेने निर्विवादपणे ताब्यात घेतला होता. त्याची पुनरावृत्ती यावेळी हे होण्याच्या आशा निर्माण झाली आहे. माजी पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के यांच्या पत्नी भारती अतुल म्हस्के या शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रबळ दावेदार झाल्या आहेत तर, कोळविहीरे गुळूंचे गणातून कर्नलवाडीच्या उपसरपंच स्वप्नाली विराज निगडे या प्रमुख दावेदार झाल्या आहेत. तसेच निरा वाल्हा गणातून निरेतील ताकदवान उमेदवाराची चाचपणी शिवसैनिकांकडून सुरू आहे.        नावळी येथील अतुल म्हस्के हे शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून गणले जातात. पुरंदरच्या पाणी प्रश्नासाठी पोलीसांच्या काठ्या व तुरुंगवास भोगलेले कणखर नेतृत्व म्हणून सुपरिचित आहे. या कष्टाचे चिज मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापतीपदी विराजमान झाल्यावर झाले होते. माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विश्वासू सहकार्यांपै...

लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल

इमेज
 लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल  पुरंदर :       खर्चिक वरात, आहेर-भेटवस्तूंच्या ऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील नवदांपत्याने घालून दिला. लग्नाच्या निमित्ताने ज्या शाळेने आयुष्याला आकार दिला, त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी रोख देणगी देत राहुल व प्राजक्ता यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण सादर केले.           लग्न म्हणजे केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून समाजाशी नाते जपण्याची संधी असल्याचे पिसुर्टी येथील राहुल व प्राजक्ता यांनी कृतीतून दाखवून दिले. आपल्या शुभविवाहाच्या आनंदात वरातीचा खर्च टाळत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिसुर्टी या आपल्या बालपणाच्या शाळेसाठी ₹५,००१/- इतकी रोख देणगी शाळा विकासासाठी दिली. देणगी स्वीकारताना नवदांपत्याने गुरुजनांना नमस्कार करून शुभाशीर्वाद घेतले.        राहुल हे कै. साधू भिमाजी बरकडे (पाटील) यांचे नातू व श्री. बाळू साधू बरकडे (पाटील) यांचे कनिष्ठ चिरंजीव असून, प्राजक्ता ...

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

इमेज
 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :         राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जालना, पुणे, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, बीड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व धाराशिव या १२ जिल्ह्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग येणार आहे.            निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. अर्ज छाननीनंतर २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.          या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.           दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमु...

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

इमेज
 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ‘कृषी 2026’ कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन यंदा तब्बल आठ दिवसांचे असणार असून, मागील वर्षी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील प्रदर्शनाला दररोज सुमारे ७० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली होती. या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार असून, यावेळी देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने बारामतीत पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. या प्र...

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद

इमेज
  वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई; शेळी-बोकड चोरी करणारी टोळी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून टोळीतील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. शेळी-बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले होते. याची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली. या टोळीतील आणखी दोन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या अशोक बाबुराव जाधव याच्यावर वडगाव निंबाळकर, लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडील पिक-अप वाहनाची तपासणी केली असता २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, १ स्क्रू ड्रायव्हर, १ तार कटर, १ चाकू, १ लाकडी काठी आणि १ प्लास्टिक पाईप असा घातक मुद्देमाल जप्त करण्यात ...

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

इमेज
"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे  नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा  नीरा :     “पत्रकारितेचा विस्तव आम्ही तळहातावर घेऊन आमच्या ग्रामीण भागातील पत्रकारांची सुरू आहे. तो विस्तव भाजत असला, तरी चेहऱ्यावर वेदना दाखवणार नाही. पत्रकारिता हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नसून आनंदाने स्वीकारलेले व्रत आहे. परिणामांची पर्वा न करता समाजातील चांगल्या-वाईट घटना निर्भयपणे लोकांसमोर मांडणे, हाच आमच्या पत्रकारितेचा खरा उद्देश आहे.” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले.       पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर येथे मंगळवारी (ता. ६) मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल व गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.           यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग सल्लागार समित...

दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास

इमेज
  दर्पण ते ‘गोदी मीडिया’ : माध्यमांच्या अधोगतीचा प्रवास  मुंबई :        ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. या ऐतिहासिक घटनेला उद्या १९४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी पत्रकारितेचा तो जन्मकाळ केवळ माध्यमाचा आरंभ नव्हता, तर सामाजिक, वैचारिक आणि राष्ट्रीय जागृतीचा प्रारंभ होता.        दर्पण सुरू झाले तेव्हा देश पारतंत्र्यात होता. इंग्रज सत्तेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला जागे करण्याचे, शिक्षित करण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्या काळातील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून केले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक हे पत्रकारही होते. पत्रकारिता ही तेव्हा मिशन होती, धंदा नव्हता. लेखणी ही तलवार होती आणि वृत्तपत्रे ही परिवर्तनाची रणभूमी होती.          स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय व सामाजिक रचनेत बदल झाले, तसेच माध्यमांचे प्राधान्यक्रमही बदलत गेले. लोकशिक्षण हे माध्यमांचे मूलभूत उद्दिष्ट हळूहळू मागे पडले. त्याजागी लोकरंजन आले आणि आज दुर...

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

इमेज
 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन  - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा  नीरा : प्रतिनिधी           'सन २००४ मध्ये मला आमदारकीला उभे राहण्यास दादांनी माझ्यात मोठा आत्मविश्वास निर्माण केला. तसेच मी आमदार होण्यात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली त्यामध्ये तसेच सन १९८० मध्ये संभाजी कुंजीर यांना निवडून आणण्यास लक्ष्मणदादा चव्हाण यांचा मोठा वाटा' असल्याचे प्रतिपादन पुरंदरचे  माजी आ. अशोक टेकवडे यांनी नीरा येथे केले.          पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचंतन सोहळा नीरा ( ता.पुरंदर) येथे पार पडला. त्यावेळी माजी आ. अशोक टेकवडे बोलत होते.        टेकवडे पुढे म्हणाले की, 'पुरंदरच्या जडणघडणीत दादांचा मोठा वाटा असून माझ्या ४१ वर्षाच्या राजकीय सहवासात लक्ष्मणदादा चव्हाण यांनी माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन करून राजकारणात उत्तम कार्...