Posts

Showing posts from June, 2025

नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास

Image
नीरेत रात्री चोरी; दागिने व रोख लंपास  पुरंदर :  नीरा ता.पुरंदर येथील प्रभाग २ मधिल एका घरात चोरी झाल्याची तक्रार नीरा पोलीसांत देण्यात आली आहे. रोख रक्कम दहा हजार, आईचे व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याची लेखी तक्रार वसीम रफीक बगवान (रा.नीरा वाई नं.२) यांनी दिली आहे.      नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार वसीम रफीक बगवान यांच्या घराचे बांधकाम चालू असलेया मुळे बागवान त्यांचे घरचे आई, वडील भंडारी यांच्या घरी घर भाड्याने घेऊन राहत आहे. २८ जून रोजी रात्री त्यांच्या घरातील पैसे व दागिने चोरीला गेले आहे. रोख रक्कम दहा हजार व आईचे दागिने व बहीणीचे दागिने असा ऐवज चोरीला गेलेला आहे. बगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार आईचा दोन तोळ्याचा राणीहार, एक तोळ्यांचे दोन तीन प्रकारचे कानातले, लहान बाळाचे मनगटे, बहीणीचे अडिच तोळ्यांचा गंठण व दिड तोळ्यांचा लेक्लेस चोरांनी लंपास केल्याचे तोंडी सांगितले. या चोरीचा पोलीसांनी तपास होण्यासाठी अर्ज केला आहे.  दरम्यान त्याच रात्री चारच्या सुमारास संशयास्पदरीत्या एक व्यक्ती या परिसरात चालत जाताना दिसत असल्याचे दोन ठ...

धक्कादायक विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Image
धक्कादायक  विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच अंत ; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू  फलटण :         राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. विठ्ठल रुक्मिनी सह माऊली माऊलीचा जयघोष करत वारकऱ्यांची पाऊले पंढपुराकडे चालली आहेत. ज्ञानोबा तुकाराम नाम जपत वारकऱ्यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. याच विठुरायाच्या दर्शनाची ओढ बाळगून असलेला एका वारकरी विसाव्यासाठी थांबले. मात्र, अचानक या वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या वारकऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.      संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वडजल ते तांबेमळा दरम्यान निंबाळकर वस्ती येथे नामदेव किसन मारकड वय ८० रा. न्हावी ता. इंदापूर जिल्हा पुणे हे विश्रांती घेत होते व तेथेच झोपी गेले. पालखी पुढे निघाल्यावर नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कारासाठी गावी नेले. फलटण पोलिस ठाण्यात आकस्म...

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम

Image
 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रगतीशील शेतकरी हनुमंत लवांडे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून प्रेरणादायी उपक्रम  पुरंदर दि.२५ :       पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचे सुपुत्र, प्रगतशील अंजीर व सीताफळ शेती व्यावसायिक हनुमंत शिवदास लवांडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून मूळचे लातूरचे पण सध्या नारायणपूर येथे राहत असलेले अभिनव शंकर हलसे व अनिकेत शंकर हलसे या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.      उच्चशिक्षण घेण्याची अतोनात इच्छा असलेल्या हलसे बंधूंची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण घेणे जिकीरीचे झाले होते. हा विषय पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, हॉटेल लोणकरवाडा डायरेक्टर, शिक्षक नेते सुनील लोणकर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या १९९२ ते १९९४ अकरावी बारावी कला विभागाचा मित्र-मैत्रिणींच्या सदाबहार जिव्हाळा मित्र परिवाराला कळविला. त्या सर्वांनी हनुमंत लवांडे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या वतीने त्यांच्या शुभहस्ते सासवड मधील प्रसिद्ध हॉटेल मोहिनी येथे हलसे बंधूंन...

"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची प्रभावी मोहीम

Image
"दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची"  संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी  आपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीतील जनजागृतीची  प्रभावी मोहीम सासवड दि.२४ :         पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची शान असलेली परंपरा आहे. याच पवित्र वारीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे – "दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची" राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य शासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांमध्ये आपत्ती विषयक सजगता निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चित्ररथ आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम वारीमध्ये आकर्षक पद्धतीने सजवलेले चित्ररथ, पथनाट्य पथक, माहितीपूर्ण स्टॉल्स, मोबाईल वॅन आणि जनतेस सुलभ भाषेतील माहितीपत्रके वापरून पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, गर्दी नियंत्रण यासारख्या आपत्तींविषयी माहिती दिली...

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन

Image
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन  मुंबई - अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी देखील १० पत्रकारांचा मा. शरद पवार आणि मा. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जवळपास ६५ वर्षे निष्ठेने पत्रकारिता करणारे ज...

डिजिटल मिडिया परिषदेचा लवकरच राज्यव्यापी मेळावा होणार : एस.एम.देशमुख यांची कोल्हापुरात घोषणा

Image
डिजिटल मिडिया परिषदेचा लवकरच राज्यव्यापी मेळावा होणार : एस.एम.देशमुख यांची कोल्हापुरात घोषणा कोल्हापूर : महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार झाला असून उर्वरित जिल्ह्यात परिषद स्थापन होताच डिजिटल मिडियाचा एक राज्यव्यापी मेळावा पुणे किंवा संभाजीनगर येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी काल येथे केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक शाखा असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पत्रकारांचा मेळावा, आणि ओळखपत्र वितरण समारंभ काल कोल्हापुरात संपन्न झाला. मेळाव्यास दोन्ही जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापुरात डिजिटल मिडिया परिषदेचे काम जोरात सुरू आहे. एस.एम.देशमुख यांनी या कामाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच पोर्टलचा उल्लेख नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार अस...

कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती

Image
कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पूण्यनगरीचे कोल्हापूर आवृत्ती प्रमुख विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिनमानचे वरिष्ठ पत्रकार राहूल मगदूम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपलेली होती. मात्र नव्या नेमणुका झालेल्या नव्हत्या. अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं दोन दिवस कोल्हापुरात होते. काल कोल्हापुरातील काही मान्यवर पत्रकारांबरोबर चर्चा करून नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.        विजय पाटील आणि राहूल मगदूम यांनी महिनाभरात सर्वांशी चर्चा करून कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्याशी विचार विनिमय करून जिल्हा कार्यकारिणी तयार करावी अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.        नवीन पदाधिकारी नेमताना ज्या तालुक्यात परिषदेचे काम व्यवस्थित सुरू आहे तेथील पदाधिकाऱ...

नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर

Image
  नीरा खोऱ्यात पावसाने घेतली गती ; चार धरणांमध्ये एकूण साठा 35.93 टक्क्यांवर पुणे : नीरा खोऱ्यात मागील चोवीस तासांत समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, त्यामुळे चार प्रमुख धरणांमध्ये एकूण मिळून 1.513 टीएमसी इतका नवपाणी (Inflow) झाला आहे. यामुळे धरणसाठा वाढून 35.93 टक्क्यांवर पोहोचला असून, तो गतवर्षी याच दिवशीच्या तुलनेत चारपट आहे. गतवर्षी या दिवशी केवळ 10.05 टक्के साठा होता . नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमधील 22 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतचे तपशील पुढीलप्रमाणे  --- 🔹 भाटघर धरण : पावसाची नोंद : 4 मिमी एकूण साठा : 231 मिमी पाणीसाठा : 4.812 टीएमसी टक्केवारी : 20.47%  धारणात येणारे पाणी: +599 क्यूसेक्स --- 🔹 नीरा देवघर धरण : पावसाची नोंद : 20 मिमी एकूण साठा : 414 मिमी पाणीसाठा : 2.749 टीएमसी टक्केवारी : 23.43% धारणात येणारे पाणी : +228 क्यूसेक्स --- 🔹 वीर धरण : पावसाची नोंद : 0 मिमी एकूण साठा : 134 मिमी पाणीसाठा : 8.209 टीएमसी टक्केवारी : 87.26% धारणात येणारे पाणी : +586 क्यूसेक्स विसर्ग : 2000 क्यूसेक्स NLBC : 00, NRBC : 300 --- 🔹 गुंजवणी धरण : पावसाची नोंद : 27 ...

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग.. कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग

Image
 🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग..  कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग  पुरंदर :       पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील सहा तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ८१.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर  धरणातून शनिवारी सायंकाळी ६ वाजता विसर्ग सुरू करण्यात येणार आहे         नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      वीर धरण ८१.८७ टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये शनिवारी सायंकाळी सह वाजल्यापासून २ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टी...

नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा

Image
 नीराखोऱ्यात दमदार पावसामुळे ४ धरणांमध्ये १३.६२१ टीएमसी पाणीसाठा नीरा खोरे अपडेट | २० जून २०२५ | सकाळी ६.०० गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या जलसंपत्ती विभागाच्या अहवालानुसार, भाटघर, निरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांमध्ये एकूण १३.६२१ टीएमसी म्हणजेच २८.१८ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ४.६८४ टीएमसी (९.६९%) पाणीसाठा होता, यामुळे यंदा दुप्पटहून अधिक पाणीसाठा झाल्याचे स्पष्ट होते. धरणनिहाय सविस्तर माहिती: भाटघर धरणात आज ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा ३.३८४ टीएमसी (१४.४०%) इतका झाला आहे. सध्या धरणात १२१४ क्यूस्सेकने नवीन पाणी येत आहे. निरा देवघर धरणात ६८ मिमी पाऊस पडला असून, एकूण साठा १.९७० टीएमसी (१६.७९%) झाला आहे. येथे २४२ क्यूस्सेकचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २० मिमी पाऊस झाला असून, साठा ६.९०१ टीएमसी (७३.३५%) पर्यंत पोहोचला आहे. येथून कालव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रा...

वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच. कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग

Image
वीर धरणातून नीरा नदीत पहिला विसर्ग लवकरच.  कितेक वर्षातून जून महिन्यात विसर्ग  पुरंदर :       पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील सहा तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ६२.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर  धरणातून शुक्रवारी सकाळी  विसर्ग सुरू करण्यात येणार आहे         नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.      वीर धरण ६२.६० टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या १२ तासात नीरा नदीमध्ये शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून २ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी ...

विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Image
विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?  मुंबई : अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण समोर आले. हे कारण आहे थ्रस्ट. अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही. अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला मेडे अर्थात इमरजन्सी कॉल दिला. 650 फूट उंचीवरून सबरवाल यांनी मेडे मेडे मेडे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला. नो थ्रस्ट, लूजिंग पॉवर अनएबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झेपावण्यासाठी शक्ती मिळाली नाही. त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही. त्यावर तात्काळ अहमदाबादचे एटीसीने पायलट सभरवाल यांच्याशी संपर्क साधला. पण सभरवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.  अन् विमान खाली कोसळलं टेकऑफपासून 40 सेकंदात विमान कोसळल्याचं दिसत असलं तरी पायलट सभरवाल यांच्याकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सारं काही अवघ्या 15 सेकंदातच झालं असावं. त्यानंतर सभरवाल यांना पुन्हा रिप्लायचा वे...

पोलीस हवालदार बेपत्ता.... पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ..

Image
 इंदापुरातून पोलीस हवालदार बेपत्ता.... पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ..... आज पहाटेपासून पोलीस हवालदार विष्णू सुभाष केमदारणे बेपत्ता..... इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली तक्रार....केमदारणे यांच्या कुटुंबीयांना घरात एक चिठ्ठी सापडली.... चिठ्ठीत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.....   बारामती (पुणे)        पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत...केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.      मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाष...

भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

Image
भीमथडी मराठी साहित्य संमलेनाध्यक्षपदी म.भा.चव्हाण यांची निवड : महादेव जानकर संमेलनाचे उदघाटक राज्यस्तरीय चौथे संमेलन १४ व १५ जून रोजी चौफुुला येेेेथे होणार  दौंड,ता.८ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमलेनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.  संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले यांची तर निमंत्रकपदी सुयश देशमुख व सह निमंत्रकपदी मोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष ढमाले हे गेली २० वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत असून, आरोग्य व शिक्षण या मूलभूत घटकात अग्रेसर काम करीत आहे. चौथे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि.१४ व १५ जून २०२५ रोजी चौफुला ता.दौंड येथे...

कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल.. माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान.

Image
कैवल्य साम्राज्या चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले पाऊल.. माऊलीच्या आश्वांचे कर्नाटक अंकली येथून प्रस्थान.   पुणे :       श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील अश्व प्रस्थान वारीसाठी रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी कर्नाटक अंकली येथील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघाले. अंकली ते आळंदी हा सुमारे ३१५ किलोमीटरचा प्रवास करत मानाचे हिरा व मोती अश्व बुधवार दिनांक १८ जून रोजी माऊली पालखी सोहळा प्रस्थानाच्या एक दिवस आधी आळंदी मध्ये पोहोचणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत असताना आषाढी वारीसाठी मान असणारे कर्नाटक अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले की, आषाढी पायी वारीचे यावर्षचे हे १९३ वे वर्ष असून तब्बल ११ दिवसाचा प्रवास करून मानाचे अश्व आळंदी माऊली पालखी सोहळा प्रस्थानासाठी परंपरेप्रमाणे सहभागी होऊन माऊली चरणी सेवा रुजू करतील.        रविवारी ८ जून रोजी सकाळी १० वाजता माऊलीचे अश्व आळंदीसाठी अंकलीतील शितोळे सरकार यांच्या वाड्यातून परिसरातील ग्रामस्थ, भाविक, वारकरी य...

धक्कादायक नीरा लोणंद रोडवर तडिपार गुंडांकडून ६ पिस्टल, मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

Image
 धक्कादायक नीरा लोणंद रोडवर तडिपार गुंडांकडून ६ पिस्टल, मोकळ्या मॅग्झीन, ३० जिवंत काडतूसासह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.  पुरंदर :       पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा लोणंद रस्त्यावरील रेल्वे पुलावर सापळा लावून सातारा जिल्ह्यांतून तडिपार असलेले दोन व्यक्ती कार मधून पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळली होती. त्या अनुषंगाने धडक कारवाई करत सिनेस्टाईलने वाहने आडवी लावून ऐन पुलावर पोलीसांनी ती कार थांबवत दोन मोक्क्यातून जामिनावर असलेले व सातारा जिल्हा बंदी असलेले आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे.       गुरुवारी (दि. ५) सातारा जिल्हा बंदी असलेले व मोक्क्यातून जामिनावर सुटलेले अमित उर्फ बिऱ्या कदम रा. लोणी व विशाल महादेव चव्हाण रा. भोळी ता. खंडाळा, जिल्हा सातारा हे दोघे मारुती कार क्र. एम.एच. १२- टि.एस.-१८८९ मधून नीरा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण ...

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश

Image
 डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती  मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश  मुंबई :        डिजिटल मीडियावरील फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्राम या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल पत्रकारांना शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकताच तसा शासन निर्णय घेतला असून यामुळे डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना हक्काचा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.      डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे व संपूर्ण डिजिटल मीडिया परिषद सातत्याने पाठपुरावा करत होती. आज अखेर या संघटनात्मक पाठपुराव्य...