Posts

Showing posts from June, 2024

धक्कादायक पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे!

Image
  धक्कादायक पुरंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे! पुरंदर : पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूला शेजारी दुचाकीवर जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. पोलिसांनी विचारपूस केली असता हा गावठी कट्टा व मोटारसायकल मित्राची असुन त्यांच्याकडे अजुन एक अशाच प्रकारचा पिस्तुल असल्याचे सांगितल्याने दोघांन विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     भोर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक सोमेश भंगवतराव राउत यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल आढळून आल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटलेनुसार सोमेश राऊत हे शुक्रवार दि.२८ जून रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जेजुरी गावचे हदीत जेजुरी रेल्वे ब्रिजजवळ विधीसंघर्षित अल्पवयीन बालक संग्राम दत्तात्रय चव्हाण वय १७ वर्षे रा.जवळाअर्जुन (ता. पुरंदर) हा त्याचे ताब्यात बेकायदा बिगरपरवाना २० हजार रूपये किंमतीचे एक सिल्वर रंगाचा लोखंडी, त्याचे हॅन्ड ग्रीपजवळ दोन्ही बाजुला लाल रंगाचे फायबर असलेला पिस्तुल बाळगताना आढळून आला. त्या पिस्त...

भारतातील युवा वर्गापर्यंत आदि गुरु शंकराचार्यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची विशेष मोहीम

Image
पुणे : ब्रिटीश संसदेतील 'युनायटेड किंग्डम' येथील 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बहुसांस्कृतिक कार्यक्रमात 'सनातन धर्माचे महान शिक्षक, गुरु आणि तत्वज्ञ आदि गुरु शंकराचार्य' यांनी रचलेले आध्यात्मिक ग्रंथ असलेल्या 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' या शृंखलेच्या सांगितीक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. आज पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे 'दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य' व आदि गुरु शंकराचार्य लिखित 'सौंदर्य लहरी'चे सादरीकरण - लोकार्पण आणि याविषयीची माहिती पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवालजी आणि कविता पौडवाल यांनी पत्रकारांना दिली. जगाला सनातन धर्माची ओळख करुन देणे हे अनुराधाजींचे ध्येय आहे, आजच्या तरुणाईपर्यंत आदि गुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान पोहचविण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी आखली असून याची सुरुवात पुणे येथून करीत असल्याचे त्या म्हणाल्या. पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या 'वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य' या नवीन संगीत श्रृंखलेचे अनावरयाप्रसंगी करण्यात आले, आदिशंकराचार्यांच्या तत्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणी मुळे ...

आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची भव्य मिरवणूक वरुणराजाचे आगमन; ढोलताशांच्या दणदणाटात फटाक्यांची आतषबाजी

Image
आळंदी : येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखी रथ ओढणा-या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास हौश्या - बाजी आणि माऊली - वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे महाद्वार चौक अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात वाजतगाजत झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ढोलताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरा समोरील महाद्वार ऐवजी महाद्वार रस्त्यावरील हॉटेल समोर केले. पहिल्यांदाच माऊली मंदिरा समोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजना अभावी पूजा करण्यास नेण्यात आले नाही. मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे वतीने दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथजी योगी, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, बैल समितीचे प्रमुख बबनराव क...

थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळा प्रमुखा कडून पाहणी

Image
आळंदी : वडमुखवाडी पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराची पालखी सोहळ्या निमित्त पालखी सोहळा प्रमुख व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी पाहणी केली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, साहेबराव काशीद, शिवाजी तळेकर, पांडुरंग काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन मंदिरात करण्यात आला. माऊली मंदिरातुन पालखीचे प्रस्थान आणि पहिला मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा वैभवी पालखी सोहाळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्त होतो. यावेळी श्रींचे पालखी सोहळ्याचा पहिला सकाळचा विसावा थोरल्या पादुका मंदिरात होत असतो. त्यावेळी माऊलींचे पादुकांची पूजा आणि आरती परंपरे प्रमाणे अनेक वर्...

शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ॲड. मंगेश ससाणे यांचे उपोषण मागे

Image
पुणे : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषणकर्ते ॲड. मंगेश ससाणे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांबाबत २१ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. बैठकीत विविध मागण्यासंदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा होऊन, काही मागण्यांबाबात निर्णय घेण्यात आले आहेत तर काही मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार सुरू आहे. महाजन म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, कुणावरही अन्याय होणार नाही. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती महाजन यांनी...

विवाहितेचे अपहरण करून दिली भूल, गाडीत ठेवले डांबून, स्वतःची सुटका करत गाठले पोलीस स्टेशन

Image
पुणे : घरगुती वादातून पती पासून दूर राहत असलेल्या ,पीडित महिलेचे १९ जून रोजी दुपारी तिच्या कामाच्या ठिकाणाहून तिचा पती, सासू आणि गाडीवरील चालक यांनी अपहरण केल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात आता वाकडं पोलिसनी गुन्हा दाखल केला आहे. वाकडं पोलिसात पती सुमित शहाणे, सासू आणि चालक विक्रांत यांच्या विरोधात मानसिक छळ केल्या प्रकरणी भा. द.वी. कलम ३६५, ३२८, ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली होती की, 19जूनला मला मी काम करत असलेल्या ठिकाणाहून माझा पती, सासरा आणि चालक यांनी फरफटत नेऊन माझे अपहरण केले होते. त्यानंतर मला तिघांनी गाडीतच डांबून ठेवत मला भुलीचे इंजक्सन दिले होते. पोलिसानी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसनी दिलेली माहिती अशी की, विवाहित महिलेचे 2023 मध्ये मंचर मध्ये सुमित सोबत लग्न झाले आहे. लग्नाच्या आठवड्याभरानंतर पती सुमित हा विवाहितेकडे नको त्या मागण्या सुरु केल्या. मात्र पत्नीने त्या पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर ती सुमितपासुन वेगळी राहू लागली. त्यानंतर त...

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Image
लोणावळा : विकेंड असल्याने पर्यंटनासाठी लोणावळ्याकडे येणाऱ्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेंनवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जातं आहेत. शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या आल्याने अनेक पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत. सकाळच्या सुमारास अनेक वाहने लोणावळ्याकडे निघाले असताना ही वाटून कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटन खुलू लागले आहे. त्यामुळे पुणे मुंबई सह राज्यभरातून मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने अवजड वाहने देखील वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासंतास वाट पहावी लागत आहे. मुंबईहून पुण्याकडे अनेक नागरिक ये जा करत असतात. त्यात शनिवार रविवार सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक...

निंबुत येथील तरुणांनी नोकरी सोडून सात एकर माळरानावर फुलविली अंजीर बाग

Image
 तरुणांनी शेती नाही केली तर देश शेतीप्रधान कसा राहील ?  निंबुत येथील तरुणांनी नोकरी सोडून  सात एकर माळरानावर फुलविली अंजीर बाग   सोमेश्वरनगर     बारामती तालुका हा नेहमीच ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे उत्पादन घेत असताना पाणीटंचाई आणि ऊस वेळेवर तोडला न जाणे यामुळे या भागातील शेतकरी सुद्धा आता ऊसाला पर्याय शोधू लागला आहे. त्यातच आता बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील निंबुत  गावातील शेतकरी तरुणांनी आपल्या सात एकर माळरानावर अंजीर फळबागाचं नंदनवन फुलवलं आहे. या अंजीराच्या माध्यमातून वर्षातील  सतत दहा महिने उत्पादन घेण्याचा विक्रम देखील या दोन तरुणांनी केला आहे.      दीपक जगताप आणि गणेश जगताप या दोघा भावांनी  निंबुत येथील  पठारवस्तीवर आपल्या सात एकर माळरानावर अंजिराची लागवड केली आहे. दीपक जगताप यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. मुळातच घरात सर्वांना शेतीची आवड असल्याने दीपक यांनी सुद्धा शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपल्या सात एकर जमिनीमध्ये डाळि...

प्रवीण जोशी लिखित गल्हाटा काव्यसंग्रहाचे २३ जून रोजी नीरा येथे होणार प्रकाशन

Image
 गल्हाटा काव्यसंग्रहाचे २३ जून रोजी नीरा येथे होणार प्रकाशन ता.    प्रसिद्ध ग्रामीण लेखक, कवी प्रविण जोशी यांच्या आगामी गल्हाटा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार ता.२३ जून रोजी सकाळी १० वा. ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.      गल्हाटा हे बहुचर्चित पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार असून डॉ. सबनीस यांना ऐकण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.     राजकारण, शिक्षण, समाजव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था यातील सावळा गोंधळ व अव्यवस्था यांवर सडकून टीका करणारे पुस्तक वाचकांना दिशा देणारे ठरेल असा विश्वास आहे. आदिवासी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तसेच प्रसिद्ध लेखिका, कवयित्री व गोंडी भाषेच्या अभ्यासिका, संशोधिका उषाकिरण अत्राम यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. तर ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होत असल्याने दोन दिगग्ज व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीं...

मराठा आरक्षणासाठी पुण्यात एकाची आत्महत्या

Image
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा म्हणून ओळख झालेले मनोज जरंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यात दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसला आहे. हे आंदोलने सुरु असतानाच आता पुण्यातील मराठा समाजाच्या तरुणाने चिठठी लिहून आत्महत्या केली आहे. शंभू प्रसाद देठे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने लाईव्ह आणि चिठठी लिहून आत्महत्या केली आहे. हा तरुण मूळचा बार्शी येथील राहणारा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. तिथेच एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठत म्हटले आहे की, जयोस्तु मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार...

पुण्यात कंपनीची भिंत कोसळली..! एका कामगाराचा मृत्यू, तीन कामगार जखमी, वाहनांचे मोठे नुकसान

Image
पुणे : शिरूर रालुक्यातील कोरेगाव भिमा येथील डिंग्रजवाडी असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळील पार्किंगभिंत कोसळल्याने एकाचा जागेवर मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यात चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. राजीव कुमार असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंजित कुमार गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे अशी जखमी झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुकायत डिंग्रजवाडी येथे असलेल्या आय टी डब्ल्यु कंपनी जवळ आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाच्या सुमारास कंपनीची भिंत कोसळली. कंपनीची भिंत पडल्याने कामासाठी कामगार दबले गेले आहेत. यात एका कामगारांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत ०९ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा पोलिसनाकडून केला जात आहे. या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला असून त्यात भिंत कोसळल्याचे पहायला मिळत...

अंकलीतून माऊलींच्या आश्वाचे आळंदीकडे प्रस्थान

Image
पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आता सुरु होताना पहायला मिळत आहे. राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहे. त्यातच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला ज्या आश्वाना मान असतो ती माऊलींची आश्वाचे अंकलीहून आळंदीकडे आज प्रस्थान झाले आहे. अंकली येथील राजवाड्यात अश्वाचे पूजन करण्यात आले. श्रीमंत सरदार शितोळे अंकलीकर यांच्या राजवाड्यात श्री देवी अंबाबाईचे दर्शन घेऊन श्रीमंत शितोळे सरदार यांनी ध्वजपूजन करून माऊलींच्या अश्वांनी प्रस्थान करण्यात आले आहे, अशी माहिती अश्व चालक तुकाराम कोळी यांनी दिली आहे. यावेळी अश्वाची टाळ मृत्युंदूंगाच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्ञानोबा माउलींच्या जयघोषत यावेळी मिरवणूक काढण्यात आली. माऊलींच्या अश्वांचे नाव हिरा आणि मोती असे असून त्यांचे आळंदी कडे प्रस्थान झाले आहे. आळंदीत येण्यासाठी राज्यभरातून शेतकरी भाविक आपली शेतीतील कामे आवरून माउलींच्या भेटीची आस मनात ठेवून आळंदीकडे निघाले आहेत. राज्यभरतून वारकरी देहू आणि आळंदीत दाखल होत आहेत. यंदाच्या वर्षी 10 ते 15 लाखापर्यंत वारकरी पालख...

सासवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा, आमदार संजय जगताप यांना निवेदन

Image
सासवड : सासवड येथील कार्यालयात वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत आज आमदार संजय जगताप यांना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. पुढील आठवडय़ात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करून तालुक्यातील तसेच सासवड शहरातील वीज वितरणा संदर्भातील अपूर्ण कामे ४/५ दिवसांमध्ये पुर्ण न केल्यास पुरंदर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पुरंदर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन महाजन सासवड शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार जगताप यांनी निवेदन दिले. यावेळी सासवड शहर काँग्रेस पक्षाचे खजिनदार नितिन भोंगळे, सा. कार्यकर्ते मुन्ना शिंदे, सासवड शहर असंघटित कामगार सेलचे उपाध्यक्ष सागर जगताप, बेलसर गण युवक अध्यक्ष अतिश जगताप,विद्यार्थी कॉंग्रेस उपाध्यक्ष कुलदीप कोंडे, शुभम खेंगरे, सुनिल रिठे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ.

Image
 नवनियुक्त पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करावे : एस. एम. देशमुख  पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ.  पुणे :        ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढील काळात कार्यरत होणार आहे. स्थानिकांकडून पत्रकारांना त्रास दिला जातो. या पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा संघाच्या कार्यकारणी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करावे. नवनियुक्त पदाधिकार्यांनी प्रत्येक महिन्याला एका तालुक्यातील सदस्यांसोबत बैठक घेऊन मराठी पत्रकार परिषद आपल्या पाठीशी खंबीर असल्याचा विश्वास देणे गरजेचे आहे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले.         मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मेळावा व नियुक्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि.१७) मधुबन लॉन्स, कवडीपाठ ता. हवेली, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...

भामचंद्र डोंगरावर वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण...! अश्लील चाळे करण्यापासून रोखल्याचे कारण

Image
पुणे : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड ) वारकरीपंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारकरी विद्यार्थ्यांनी या डोंगरावर आलेल्या मुल आणि मुलींना अश्लील चाले करण्यापासून हटकल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून अभ्यास करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आजही जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येथे आहेत. मात्र रविवारी एक तरुण मुलगा आणि मुलगी या ठिकाणी आले होते. त्यानंतर त्या दोघांचे या ठिकाणी अश्लीश चाळे सुरू होते. त्यामुळे तिथे अभ्यास करण्यासाठी आलेल्या कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांना हटकले. त्यावर या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने संध्याक...

AI तंत्रज्ञानाचा वापर करून 70 वर्षीय रुग्णाचा कर्करोग केला बरा...! राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Image
पुणे : दिवसेंदिवस जगात नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातच AI हे तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत. असेच AI तंत्रज्ञान वापरून चक्क कर्करोग बरा करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कर्करोग बरा करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून कर्करोगी रुग्णाचा रेडिओलॉजिस्टच्या मदतीने कर्करोग बरा करण्यात आला आहे. राज्यातले हे पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मावळ येथील एका एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुफुसाचा कॅन्सर झाला होता. त्यांची घरची परिस्थिती फारच हालाखीची होती. त्याने मावळच्या तळेगाव दाभाडे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये या रुग्णाने उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या रुग्णाला फुफुसाचा कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाला रेडिएशनच्या मार्फत कॅन्सरची गाठ काढण्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी फुफ्फुसातील या रुग्णाची कॅन्सरची गाठ एआय टेक्नॉलॉजी च्या मार्फत काढली. या प्रक्रियेल...

दौंड तालुक्यात विजेचा धक्का लागून आईवडिलांसह मुलाचा मृत्यू

Image
पुणे : दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात त्यांची मुलगी वाचली आहे. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मूळचे सोलापूर येथील राहणारे असून दापोडी येथे राहत आहेत. याबाबत अधिक माहिती आधी की, भालेराव कुटुंबं हे दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या होत्या. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवन्यात येत आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास सुरेन्द्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारखेला धक्का बसला. त्यांच्या आवाजाने तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील तत्काळ त्या ठिकाणी आली होती. त्यांना देखील धक्का बसला. चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमावा लागला. कुटुंबप्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिस...

पुण्यात महिलेला अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलाचा पराक्रम

Image
पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरणानंतर खेड तालुजातील आळंदीजवळ असणाऱ्या वडगाव घेनंद या गावात एका अल्पवयीन मुलाने जुन्या भांडणाचा राग मानत धरून भरधाव वेगात कार चालवून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी जवळ असलेल्या वडगाव घेणंद येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या कार चालकाने सुरुवातीला कार रिवहर्स घेऊन मग गाडी पुन्हा वेगाने चालवून महिलेला जोरात धडक दिली. त्यानंतर घाटनास्थलावरून तो जोरात निघून गेला. अंगावर शहाहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढेच नाही तर यानंतर या गाडी चालकाने गाडीच्या टपावर बसून शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलानी गाडी चालवून अपघात करणाऱ्याच्या घटना समोर आ...

मुख्यमंत्र्यानी दुष्काळ परिस्थिती उपाययोजनाबाबत बैठक घ्यावी : शरद पवार यांची मागणी

Image
विशेष प्रतिनिधी नीरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी १२ आणि १३ जून रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे शरद पवार यांना दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील शरद पवार यांच्याकडून सुचवण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने स...

पुरंदर विमानतळाचे भूसंपादन लवकरच : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Image
नीरा : पुरंदर विमानतळाला डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन), एएआय (एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया) यांची मान्यता मिळाली आहे. त्यासोबत एमएडीसीकडूनदेखील एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, यासंदर्भात तिघांची एकत्रिक बैठक घेऊन येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून लवकरच भूसंपादन प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावरील विविध प्रश्नांसंदर्भात रविवारी (दि.16) पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी या वेळी येथे उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचीदेखील पाहणी केली. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व प्रशासनातील अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

पक्षातील नवीन नेते त्यांना डावलू पाहतायेत, जयंत पाटील यांच्याबाबत सुनील शेळके यांचे विधान...

Image
पुणे : जयंत पाटील साहेबांसारखे जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये आहे याचे आम्हला समाधान आहे. पण काही नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे. पक्षामध्ये त्यांना सारख सारख डावलल जाणं त्यांना पक्षातून बाजूला ठेवणं हे पक्षातील काही नवीन नेते करू पहात आहेत. जयंत पाटील साहेबाना हेच सांगणे आहे. राज्याचे अभ्यासू नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अशी प्रतिक्रिया मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथे सुनील शेळके यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुनील शेळके म्हणाले कि, सुनेत्रा पवार यांची खासदार. पदी निवड होणे ही सर्व वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना आलेले यश आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्री पदाबाबत पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्यावर मी अधिक बोलणार नसल्याचे शेळके यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ययुवक अध्यक्ष पदासाठी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना युवक अध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत ...

पिंपरी चिंचवमध्ये पुन्हा हिट अँड रन...!भरधाव चारचाकीने महिलेला उडवले

Image
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रन च्या घटनामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. भोसरी परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातून पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव चार चाकीने महिलेला उडवले आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसानी अखेर 24 तासानंतर गुन्हा दाखल केला आहे. चालक हा पोलीस हवालदारचा मुलगा आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर एका भरधाव कारने एका महिलेला उडवले आहे. महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेला. या अपघाताच्या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे. ती कार एवढ्या भरधाव होती की ती महिला हवेत उडाली होती.  भोसरी येथे बुधवारी दुपारच्या सुमारस ही घटना घडली आहे. एक महिला मुलींसोबत रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात भरधाव कारने त्या रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी भीषण होती कि, धडक बदल्यानंतर ती महिला जवळपास 8 ते 9 फूट उंचावर उडाली आणि खाली पडली. यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून या घटनेचा सिसिटीव्ही समोर आला आहे. ...

भरधाव कारची धडक महिलेला उडाली हवेत, थोडक्यात बचावली, नियंत्रण सुटल्याने कार गेली दुकानात, कार चालकावर गुन्हा

Image
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सिसिटीव्ही आता समोर आला असून या अपघातातील महिला थोडक्यात बचवाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघातात 23 मे रोजी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात २३ मे २०२४ रोजी ही महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने त्या महिला पाठीमागून जोरात धडक दिली. तयामुळे महिला जोरात उडून पडली. कारवरील चालकाचा ताबा सुटलेली कार ही पुन्हा एका दुकानात शिरली. त्यानंतर या अपघाताचे सिसिटीव्ही व्हायरला झाला आणि हा प्रकार समोर आला आहे. या. घटनेतनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना संपर्क केला. मात्र, आपली कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. तसेच, संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचे सिसिटीव्ही समोर आल्यानंतर पुण्यातील पोर्शे अपघाताची आठवण ताजी झाली. या...

माळशेज घाटात रिक्षावर कोसळली दरड, चुलता पुतण्याचा जागेवर मृत्यू, आई वडिलांनी डोळ्यादेखात गेले प्राण

Image
जुन्नर , पुणे : जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात पावसाळा सुरुवात झाली आहे. त्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई येथे राहात असलेले कुटुंबं आपल्या मुलगावी म्हणजे संगमनेर येथे रिक्षाने जात असताना माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. आई वडिलांच्या डोळ्यादेखत आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालबाल बचावला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे. राहुल भालेराव ( वय 37) आणि स्वयंम भालेराव ( वय 6) या काका पुतण्याचा जागेवरच मृत्यू झाला असून आई वडील आणि थोरला भाऊ यातून बचावले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा मधून एम.एच. ०३ डी. एस. ३२११ चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी जातं होते. मात्र, माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षामध्ये बसलेल्या चुलता पुतण्याच्या अंगावर अचानक भला मोठा दगड कोसळला आणि मोठा अनर्थ झाला. यात सोयंम भालेराव, राहुल भालेराव...

मुख्यमंत्र्याना संयुक्त बैठक घ्यायला भाग पाडू : शरद पवार यांची पुरंदरवासियांना ग्वाही

Image
वाल्हे : प्रश्न सोडवायचा असेल तर काही लहान थोर प्रकल्प गेल्या काही दिवसापासून प्रलंबित राहिले आहेत. आपण पुरंदर उपसा योजनेचे काम काही प्रमाणात केले. त्याच्यातही काही प्रमाणात कमतरता आहे. त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे, याकरिता राज्य सरकारने काही गुंतवणूक करायला हवी. तसेच गुंजवणीच्या प्रश्नाबाबत अनेकांची भाषणे झाली. त्याची मान्यता माझ्या सहीने झाली. त्याचे भूमिपूजन माझ्या उपस्थितीत झाले. पण आपल्याला जे हवंय त्याची पूर्तता आज होत नाही. ज्यावेळी अशा प्रकल्पांना विलंब लागतो त्यावेळी त्याला फाटे फार फुटतात. त्यासाठी अधिकाधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी ही योजना आहे अशा पद्धतीचा आग्रह झाला पाहिजे ते करण्यासाठी राज्य सरकारला आम्ही भाग पाडू. याकरिता सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत एक संयुक्त बैठक घ्यायला पार पाडू अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार आज पुरंदर तालुक्यातील दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच...

पुरंदरच्या दोन शेतकऱ्यांना कोथिंबिरीने केले लखपती, बांधवरच मिळाले लाख रुपये, वीर येथील शेतकऱ्यांचा कष्टाचे झाले चीज

Image
राहुल शिंदे नीरा : रोजच्या स्वयंपाकात कोथंबिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाजीत थोडी तरी कोथंबीर टाकलीच जाते. मात्र कोथिंबिरीने सध्या चांगला भावा खाल्ला आहे. त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला झाला आहे. या कोथिंबिरीने शेतकऱ्याला लखपती केले आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावातील दोन शेतकऱ्यांना कोथिंबिरीने लखपती केले आहे. त्यांची चर्चा आता पंचक्रीशीत होऊ लागली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर येथील शेतकरी राजेंद्र धुमाळ आणि प्रतापराव धुमाळ यांना कोथंबरीने लखपती बनवले आहे. राजेंद्र धुमाळ यांनी दोन एकर शेतात कोथंबिर लावली होती. त्यांना यातून साडे तील लाख रुपये मिळाले आहेत. तर दुसरे शेतकरी प्रतापराव धुमाळ यांना दहा पांड कोथंबरीचे एक लाख रुपये मिळाले आहेत .विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेताच्या बांधावर ही खरेदी केली आहे. त्याच बरोबर स्वतः मजूर लावून ती उपटून मार्केट मध्ये नेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या काढणी व वाहतूक खर्चातही बचत झाली आहे.        पुणे जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई आहे. त्यातच प्रचंड उष्णतेमुळे अनेकांनी लावलेली कोथंबीर जागेवरच जळून गेली. त्यामुळे बाज...

पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा : मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Image
पुणे : पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत आहे. यामुळे शहरातील काही स्पॅाटवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथून व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या. शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करुन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत? याचीही विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूरपरिस्थितीनिर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच ‘वर्क ॲार्डर’ देण्यासंदर्भातही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांसाठी १४७ कोटी रुपयांची आवश्यकता असू...

डॉक्टरचा पत्नीला पैसे आणण्यासाठी त्रास, अखेर संपवली जीवनयात्रा

Image
सोलापूर : व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणून डॉक्टर पत्नीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.ऋचा असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याला अटक केली आहे. या प्रकरणी ऋषिकेश संजय पाटील (रा. पद्मावती प्लाझा मार्ग, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैद्यकीय व्यवसायाकरिता एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पत्नी ऋचा हिच्या नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी सतत डॉ.पत्नी कडे कागद पत्रावर सहया कर, नाहीतर तुझे माहेरहून रक्कम आणुन दे म्हणत त्रास सुरु केला. घडलेला प्रकार आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसांमध्ये सांगोल्याला येतो असे माहेरच्यानी सांगीतले देखील होते. मात्र, 6 जूनला पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ...

वारकऱ्यांना पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह सुरक्षेची काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Image
पुणे : जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सीडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचा (आयआरएस) प्रभावी उपयोग करावा. सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामकाजासाठी संपर्क अधिकारी नेमून त्याला पालखी सोहळ्यासंबंधित जबाबदारी द्यावी जेणेकरुन समन्वय साधताना गोंधळ होणार नाही. पाऊस पडत असल्याचे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे...

पुण्यात सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, पाच जणांवर गुन्हा, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

Image
आंबेगाव, पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात दोन सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चौघानी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे त्यांनी त्या घटनेचा विडिओ तयार करून दुसऱ्याला पाठवला.त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणी आता चौघाविरोधात पारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, दोन अल्पवयीन मुले, सर्व रा. धामणी ता. आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून दोघीं अल्पवयीन बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोप...

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याबाबत दक्षता घ्या : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Image
मुंबई : राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा. तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव श्री. चांदवले आदी उपस्थित होते. तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पां...

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

Image
पुणे : संपूर्ण देशांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार यांचा यांचा पराभव केला. देशात सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनिता पवार यांची राज्यसभेवर निवड करावी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचविसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त पुण्यात पक्ष कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते व दीपक मानकर व राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ठराव मांडण्यात आला या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनिता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती...

शेषनाग आणि डाळिंबांची 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आकर्षक आरास

Image
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. सोमवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी ४ ते ६ यावेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत गणेशयाग, दुपारी १ ते ३ सहस्त्रावर्तने आणि रात्री ९ ते ११ गणेशजागर देखील पार पडला. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट क...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात १० टक्के पाणी कपात लागू

Image
मुंबई : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही, ०५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी क...

पहिल्यांदा खासदार थेट केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांना लागली लॉटरी

Image
पुणे : पुण्यातून खासदारकीची निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री पदाची देखील लॉटरी लागली आहे. त्यामुले पुणेकरांनी जल्लोष केला आहे. रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या मोदी यांच्या सरकारमध्ये मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना अधिकृत फोन आला. मोहोळ यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची चर्चा सुरू असताना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी मोहोळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून भाजपचे अवघे 9 खासदार विजयी झाले आहेत. भाजपची महाराष्ट्रात मोठी पडझड झाली. मात्र, पुण्याची जागा भाजप जिंकणार, याचा आत्मविश्वास आधीच पासूनच पुणे भाजपला होता. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख 23 हजार येवढे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे पुण्यातील खासदार आता केंद्रात मंत्री झाला आहे.