Friday, April 21, 2023

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप जाहीर

 नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी  चिन्ह वाटप जाहीर

    आघाडीला कपबशी तर युतीला पतंग



सासवड दि.२१


       पुरंदर तालुका आणि बारामती तालुका तील  32 गावांमधून कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काल अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 108 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर 16 जागांच्या साठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी आज शुक्रवारी चिन्ह वाटप सासवड येथील निवडणूक कार्यालयात पार पडले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले, तर शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांच्या युतीच्या पॅनलला पतंग हे चिन्ह मिळाले. अपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर  सतीश निगडे यांना विमान हे चिन्ह मिळाले तर शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांना छत्री हे चिन्ह मिळाले.

          मागील अनेक वर्षांपासून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक ही शक्यतो बिनविरोध होत होती. काही ठराविक जागा सोडल्या तर संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध होत होती. त्याकाळी जनता दलाचे दादा जाधवराव, काँग्रेसचे चंदूकाका जगताप, राष्ट्रवादीचे अजित पवार, काकडे गटाचे सतीश काकडे हे सर्वजण एकत्र बसून मार्केट कमिटीची निवडणूक बिनविरोध कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करत असत. मात्र या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना  युतीने पॅनल उभा केल्याने आता निवडणूक अटळ आहे. आज चिन्ह वाटप झाल्यानंतर उद्या राष्ट्रवादीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे तर शिवसेना भाजप हे देखील आपला पॅनल निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  आघाडीच्या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुढील काळात ही निवडणूक चुरशीची होती की, आघाडीसाठी एकतर्फी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Thursday, April 20, 2023

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा

 मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा


प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश



मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा "दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" यंदा ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज मुंबईत केली.. परिषदेचे अन्य पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची विशेष बैठक काल परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात पार पडली.. बैठकीत २०२२ चे पुरस्कार नक्की करण्यात आले.. त्यानुसार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रकाश जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.. २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि वरिष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे... प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे.. पत्रकार शशिकांत सांडभोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टीव्ही पत्रकाराला दिला जाणारा पुरस्कार "न्यूज १८ लोकमत" चे मिलिंद भागवत यांना देण्यात येणार आहे.. पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार" सकाळचे पत्रकार मारूती कंदले यांना दिला जात आहे.. महिला पत्रकारांसाठी दिला जाणारा "सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कारासाठी" यावर्षी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांची निवड करण्यात आली आहे.. अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना दिला जात आहे.. मराठवाड्यातील पत्रकारांसाठी असलेला नागोजीराव दुधगावकर पुरस्कार यावर्षी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार स. सो खंडाळकर यांना देण्यात येत असून कोकणातील पत्रकारासाठीचा रावसाहेब गोगटे पुरस्कार संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना दिला जात आहे.. दत्ताजीराव तटकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायगड जिल्ह्यातील पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे..मान्यवरांच्या उपस्थितीत मे च्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.. बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव दीपककैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे आदि उपस्थित होते.. पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे...


महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह

 महाविकास आघाडीकडून शिवसेनेची गोची: एका जागेसाठी ठेवलंय ताटकळत. आघाडीवर प्रश्न चिन्ह 



सासवड दि.२० 


    पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये अजूनही एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीतून बाहेर पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


  पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुरंदर तालुक्यातील पाच आणि बारामती तालुक्यातून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत. यातून एक जागा उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एक तास उरला असताना देखील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने स्वतंत्र लढण्याचा विचार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने सकाळीच दहा उमेदवार जाहीर केले तर काँग्रेसचे अजूनही उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे या तासाभरात काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


    

Wednesday, April 19, 2023

नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी बारामती  राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर





नीरा दि.२० 


पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी बारामती राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे

उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे 


कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ (जागा - २ )

जगदाळे बाळासाहेब गुलाब ,गांव मुर्टी

निळखे पंकज रामचंद्र ,होळ


कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी मतदार संघ (जागा १)

 वाबळे शरयू देवेंद्र

कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती / जमाती मतदार संघ

 गुलदगड भाऊसो विठ्ठल 

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ (जागा - १)

 शिंदे बाळु सोमा



नीरा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर

 नीरा मार्केट कमिटीच्या  निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर



नीरा दि.२० 


पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निराच्या निवडणुकीसाठी पुरंदर राष्ट्रवादी कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनीही पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप निश्चित होणे बाकी आहे


संपूर्ण पुरंदर तालुका आणि बारामती येथील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुरंदर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या वतीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरंदर तालुक्याच्या वाट्याला आलेल्या जागा आणि त्यावरील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी जाहीर केले असून

 ही यादी पुढील प्रमाणे असणार आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजकुमार जयकुमार शहा

ग्रामपंचायत मतदारसंघातून एस सी एस टी साठी अधिकृत उमेदवार सुशांत राजेंद्र कांबळे

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार गणेश दत्तात्रय होले

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शरद नारायण जगताप ,वामन अश्रू कामठे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.


महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर यांनी वरील सर्व उमेदवार जाहीर केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार ताकतीचे व मातब्बर होते परंतु हि निवडणूक आपण महाविकास आघाडीतून लढत असल्याने ५ जागा पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. सर्वांना संधी देणे शक्य नाही तरी ज्यांना संधी मिळाली नाही असं म्हणत पक्षाच्या उर्वरित सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत ही विनंती करण्यात आली आहे


आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

 आज होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट 


बाजार समितीतील अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस



   नीरा दि.२०


              पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 142 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचं भाजपच्यावतीने सांगण्यात येतं आहे . तर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेनं ही सहभाग घेतला आहे.त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढली आहे. मात्र विजयी मतदान आघाडीच्या बाजूला आहे.त्यामुळे इतर पक्ष ऐनवेळी माघारी घेतात की, निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावे लागेल.दुपारी तीन नंतर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल .


     नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील काळात बिनविरोध किंवा काही अंशी बिन विरोध करण्यात आल्या होत्या.काही अंशी म्हणजेच एक दोन जागांवर मतदान द्यावे लागले होते. तर बहुतांश जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली होती.त्यावेळी बाजार समिती तोट्यात असल्याने व बाजार समितीकडे उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्याने कोणताही पक्ष हा पांढरा हत्ती आपल्या ताब्यात घेऊ इच्छित नव्हता.मात्र आता ही बाजार समिती तोट्यातून बाहेर काढन्यात मागील संचालकांना यश आल आहे.त्याच बरोबर समितीचा एक पेट्रोल पंप निरा येथे सुरू असून आणखी एका पेट्रोल पंपला मंजुरी मिळाली आहे. बाजार समितीची सर्व देणी नील झाली आहेत. त्यामुळे आता अनेक जण या बाजार समितीवर जाण्यास उत्सुक आहेत.सध्या 18 जागांसाठी 142 उमेदवार रिंगणात आहेत.  


Sunday, April 16, 2023

विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी

 विजय शिवतारे यांची साखर पेरणी नक्की कशासाठी 

आगामी विधानसभा निवणुळीत पराभव टाळण्याचे प्रयत्न ? 



  नीरा दि.१६ ( राहुल शिंदे)


      गेली १३ वर्ष पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामतीच्या पवार कुटुंबियांच्या नावाने खडे फोडत आले आहेत. शिवतारे यांच्या राजकारणाचा पायाच मुळात पवार विरोध आणि पवारांवरील टीका हा राहिला आहे. मात्र हेच विजय शिवतारे सध्या बारामतीचे छोटे पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना गोंजराताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवारांसमोर साखर पेरणी करताना दिसून आले आहेत.

       पुरंदर तालुक्यामध्ये राजकारणाला सुरुवात केल्यानंतर पुरंदरचे माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवारांना विरोध आणि पवारांवर जहरी टीका हे राजकारणाचे सूत्र अवलंबले .पवारांनी पुरंदरचा विकास केला नाही असं म्हणत त्यांनी नेहमीच पुरंदरची तुलना बारामतीसी केली. बारामतीतील रस्ते, बारामतीतील शिक्षण संस्था, बारामतीत झालेली बागायत शेती, बारामती मध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा याची तुलना विजय शिवतरे हे नेहमीच करत राहिले. दहा वर्ष सत्त्तेत राहिल्यानंतर बारामतीच्या अजित पवारांनी विजय शिवतरे यांना कात्रजचा घाट दाखवला. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवारांना तर "बहलोल खानाची" उपमा दिली आणि याचाच राग मनात धरून बारामतीतील अजित पवार यांनी विजय शिवतरे यांना "आता कसा आमदार होतो तेच पाहतो!" असे म्हणत चारी मुंड्या चीत केले. राज्यमंत्री राहिलेल्या विजय शिवतरे यांचा पराभव अजित पवार यांनी सहज केला. त्यामुळे मागील अडीच वर्षात विजय शिवतरे यांना सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागले. मात्र भाजप आणि शिंदेचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार कुटुंबियांना टक्कर देण्याचा विडा उचलला. आता ते सतत बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर या भागाचे दौरे करीत असतात. या भागात जाऊन शिवसेना( की भाजप?) कशी वाढेल यासाठी ते प्रयत्नशील असतात. मात्र हे करत असताना पुरंदर मध्ये वापरलेला फॉर्मुलाच ते पुन्हा इतर तालुक्यात वापरताना दिसून येतात. शिवतरे यांचा पुरंदर मध्ये हा फॉर्मुला सध्या फ्लॉप ठरत असला, तरी बारामती दौंड, इंदापूर आणि भोर तालुक्यातील लोकांना शिवतारे यांच्या बद्दल आकर्षण आहे. शिवतरे यांची बोलण्याची पद्धत आणि बेधडक भिडण्याची सवय यामुळे पवार विरोधक शिवतरेयांच्या भोवती एकवटताना दिसतात.

          मात्र काल इंदापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बारामतीतील छोटे पवार अर्थात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळलित. अजित पवार चांगले काम करणारा नेता असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अजित पवार चुकीच्या पक्षात असल्याचेही त्यांनी म्हटले. अजित पवारांनी शिंदे सेने मध्ये यावं असं एक प्रकारच आवाहन त्यांनी अजित पवारांना केले. मात्र अजित पवारांना शिवतारे यांनी हे केलेला आवाहन म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केलेली साखर पेरणीस आहे .असा अंदाज पुरंदर मधील नागरिक व्यक्त करत आहेत


          शिवतारे यांच्या विजयाला होता राष्ट्रवादीचाच टेकू 

 

       विजय शिवतरे हे मुंबहीहून पुरंदर मध्ये आले. त्यांनी पवार कुटुंबीयांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी सुरू केली आणि पुरंदर मधील पवार विरुद्ध गट हा विजय शिवतरे यांच्या बाजूला गेला. दादा जाधवराव यांच्या नंतर पुरंदर मध्ये असलेली राजकीय पोकळी त्यांनी भरून काढली. मात्र त्यांच्या विजयाला आवश्यक असलेले विजयी मतदान हे त्यांना सुरुवातीला राष्ट्रवादीकडूनच मिळालं तर दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा विजय आपलाच आहे. असं म्हणत शरद पवार यांनी विजय शिवतरे यांच्या विजयाचा मार्ग सुखकर केला आणि संजय जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला व्यासपीठावर शरद पवारांचा विरोध जरी शिवतरे करीत असले तरी ते आतून शरद पवारांचा हात धरून होते. राष्ट्रवादीतील अनेक नेते आजही विजय शिवतरे यांच्याशी संपर्क ठेऊन आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणूक काळात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीचा रोष त्यांना उडवून घ्यावा लागला आणि पराभवाचा सामना करावा लागला. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा पराभवाची वेळ येऊ नये म्हणून विजय शिवतरे यांनी आत्तापासूनच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे नेते यांचा विरोध कमी करता यावा म्हणून थेट त्यांच्या नेत्यातच तोंड भरून कौतुक केले आहे.

  

  

Saturday, April 15, 2023

कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

 

कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

 



पुणे: यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी (ता. दौंड) या गावात गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून झाला आहे किंवा काही अपघात झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही महिला गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासुर्डी गावच्या हद्दीत वाहत्या कालव्यात काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. येळी एका महिलेला एक ३५ ते ४० वर्ष वय असलेली एक महिला ही पाण्यात वाहत आल्याचे दिसून आले. समोरचे दृश्य पाहून महिलांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी ही बाब गावच्या पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पंचनामा करण्यात आला. त्यानंतर यवत पोलिसांनी सदर प्रेत हे यवत ग्रामीण

रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. यावेळी सदर महिला हि ७ ते ८ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कालव्यात आढळलेली मृत महिला गरोदर आहे. त्या दृष्टीने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.

 भव्य मिरवणुकीने करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता.



  नीरा दि .१५


पुरंदर तालुक्यातील नीरा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. नीरा येथे डॉ .बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी सर्वत्र आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर शनिवारी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक नीरा शहरातून काढण्यात आली. सर्वोदय सोसायटी पासून या मिरवणुकीला सुरवात झाली तर बुवासाहेब चौक ,शिवाजी चौक मार्गे ही मिरवणूक पुन्हा सर्वोदय सोसायटीत येवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

    या मिरवणुकी दरम्यान सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, संदीप धायगुडे, वैशाली काळे, अनंता शिंदे, दिपक काकडे, कल्याण जेधे, विजय शिंदे, सुदाम बंडगर, आर. पी. आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, अमोल साबळे, नंदु ढावरे, हरिभाऊ जेधे यांसह लहान मुले, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांनसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

 तरुणाच्या खुनाच्या निषेधार्थ सांगवी गाव एकवटले; कट रचून खून केल्याचा आरोप

सकाळी गावात कडकडीत बंद पाळून काढण्यात निषेध 

आला मोर्चा 



 बारामती दि.१५


     जमिनीच्या वादातून सांगवी (ता. : बारामती) येथे तीन दिवसांपूर्वी विनोद हिराचंद फडतरे (वय३०) या तरुणाचा चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बुधवारी (दि. १२) रोजी ही सकाळच्या दरम्यान घटना घडली होती. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी व झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि. १५) सकाळी गावात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला.


यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. तर खून करणाऱ्या विशाल फडतरे या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी यात सहभाग घेऊन गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा मिळून सह आरोपींना कठोर शासन होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


     आरोपीचे संपूर्ण कुटुंबच या कटात सामील आहे, यामुळे यातील मुख्य आरोपी इतर आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक चंद्रराव तावरे यांनी केली. यावेळी सर्व पक्षातील पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद फडतरे यांच्या हत्येनंतर कुटुंबाला दिलासा देण्यासाठी गुरुवारी (दि. १३) ग्रामस्थांकडून तातडीची बैठक घेण्यात आली होती. गावच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्दैवी घटना असल्याने विशाल फडतरे सारख्या मनोवृत्तीच्या नराधमाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुनाच्या काही तासानंतर प्रत्यक्षदर्शी खून दिल्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून वारंवार चुलत भावांमध्ये वितुष्ट येत होते...



गुन्हेगारांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; ग्रामस्थांचा

आरोप...


खून करणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र, सह आरोपी असणारे गणपत फडतरे व विक्रम फडतरे यांना फरार होण्यास पोलिसांनी मदत केली. उच्च पदस्थ लोकांच्या सांगण्यावरून व विक्रम फडतरे हा पोलीस दलात असल्याने व त्यांचे लागेबांधे असल्याने माळेगाव पोलीस इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आरोपींच्या अटकेबाबत पोलिसांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे गावकऱ्यांचा पोलिस व आरोपींवरील संताप यामुळे व्यक्त होताना दिसून आला.




राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ?

  राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट ? 




नवीदिल्ली दि.१५

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.

अशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता राहुल गांधी हे मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. असं झालं तर मातोश्रीवर येणारे ते पहिलेच नेते ठरतील. ही भेट होणार का? याची तारीख काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मातोश्रीवरच ही भेट होईल असं सूत्रांनी सांगितलं आहे. या भेटीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळ झालेल्या बैठकीनंतर नितीशकुमार, तेजस्वी यादव, राहुल गांधी यांनी संयुक्‍त पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडले ते पाहता आगामी कालावधीमध्ये विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे.

देशात कॉंग्रेस पक्षाशिवाय कोणतीही विरोधी आघाडी शक्‍य नाही, असे सतत सांगणारे नितीशकुमार यांच्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न जरी अवघड नसले, तरी याच पत्रकार परिषदेमध्ये नेतृत्वाचा प्रश्‍न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली, हेसुद्धा लक्षणीय आहे. नितीशकुमार यांनी आधीपासूनच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असे अनेकवेळा स्पष्ट केले आहे.

चक्क विधानसभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग

 चक्क विधासभेचा सदस्य अर्थात आमदार असल्याचा बोर्ड लावून फिरत होता पुरंदर मधील हा महाभाग 


 सासवड पोलिसांची कारवाई



  सासवड दि.१

  पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार mla असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता. सासवड पोलिसांनी त्याला कार सह ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केला आहे. तर पोलिसांनी हा लोगो त्याच्या कारवरून हटवला असून तो जप्त करण्यात आला आहे.


  याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात काही चार चाकी वाहने  गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते . पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता. परंतु ती वाहने मिळून आलेली नव्हते. आज शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना त्यांना यातील  क्रेेटा कार  मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता गाडीमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. किंवा ही गाडी आमदार महोदयांच्या मालकीची देखील नाही. गाडीचे मालक ऋतुराज गायकवाड राहणार काळेवाडी हे असल्याचे त्यामधून स्पष्ट झाले . त्याच बरोबर या क्रेटा गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आढळून आली .त्याच बरोबर गाडीला ब्लॅक फिलमिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता. पोलिसांनी ही गाडी पोलीस स्टेशनला आणून गाडीचा लोगो जप्त केला.तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६५०० रुपये दंड करण्यात आला आहे .

       दरम्यान सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी अशा प्रकारचे लोगो लावणे बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. कोणीही अशा प्रकारचे लोगो गाडीवर लावू नका. जर असे लोगो आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे त्यांनी म्हटलंय. ही कारवाई डीबी पथकाचे पोलीस नाईक पोटे ,पोलीस नाईक नांगरे, ट्रॅफिकचे पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.

Friday, April 14, 2023

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 8 ते 10 जणांचा मृत्यू

 

 मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 8 ते 10 जणांचा मृत्यू



 

जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर  एका खासगी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून यामध्ये 8 ते 10 मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनूसार जुना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील सात ते आठ लोक मयत झाल्याचे व वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज नारळाच्या झाडांनी झेतला पेट

 बापरे एकच गावात तीन ठिकाणी पडली वीज

नारळाच्या झाडांनी झेतला पेट



इंदापूर दि.१४


 इंदापूर तालुक्यात आज शुक्रवारी देखील विजांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यात तालुक्यातील बेडशिंगे येथील भारत मारुती चव्हाण यांच्या तर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातील शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे.याच गावात जीवननगर येथे महादेव अर्जुन शिंदे आणि आगलावे वस्ती या ठिकाणी संजय आगलावे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकट्या बावडा गावात ३ तीन ठिकाणी वीज कोसळली आहे.



चव्हाण हे बेडशिंगे गावातील रहिवासी असून ते शेतात राहतात. ज्या ठिकाणी वीज कोसळली त्या ठिकाणी जनावरे यांसह कुटुंबातील सदस्य देखील होते.घरातील महिला या जनावरांच्या गोठ्यात साफ सफाई करत होत्या. ०५ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान कडाक्याचा आवाज झाला.दरन्यान गोठ्यामागील नाराळाच्या झाडाने पेट घेतला होता असं भारत चव्हाण यांनी सांगितले आहे.

जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका

जुन जनता दल चालवतय राष्ट्रवादी काँगेस पक्ष : भाजप प्रवेश नंतर भानुकाका जगताप यांची राष्ट्रवादीवर टीका



सासवड दि.१४


      तालुक्यातील पुढाऱ्यांची लाथाळी आमच्यावर अन्याय करतायत अस म्हणत नुकतेच भाजपमध्ये गेलेले भानुकाका जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली आहे.सासवड येथे ते आज माध्यमांशी बोलत होते.


   राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भानुकाक जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे. बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.त्यांच्या या प्रवेशाने बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला फारसा फरक पडणार नसला तरी राष्ट्रवादीत फुटीचे आणि बंडाचे बीज त्यांनीं पेरले आहे.आणि भाजपला तालुक्यात हातपाय पसरायला संधी मिळाली आहे.त्यांच्या सोबत आमदार संजय जगताप यांचे कट्टर आणि मागील निवडणुकीत ज्यांनी संजय जगताप यांची बाजू नेटाने मंडळी ते प्रदीप जगताप ही भाजप मध्ये गेले आहेत.त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.यामुळे आ.संजय जगताप यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.

      आज शुक्रवारी भाणुकाका जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुना जनता दल चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.असाच आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सुद्धा पत्राद्वारे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गरटकर यांच्याकडे केला आहे. तर राष्ट्रवादीतील नेते एकमेकांची उनी धूनी काढत आहेत.त्यांच्यात एकमत मानी स्वतः त्याच्यमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक ज्येष्ठ नेता त्याच्या मुलाची,मुलीची , सुनेची वर्णी चांगल्या ठिकाणी कशी लागेल यासाठी प्रयत्नशिल आहे.त्यांना जनतेच किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याचे काही घेण देण नाही असं त्यांनी म्हटलय. सासवड नगर परिषदेत युती केली पण आम्हाला कोणतीही ताकत दिली नाही असाही त्यांनीं म्हटलंय. आमच्या दोन पिढ्या आम्ही शरद पवार यांची सेवा केली पण पक्ष श्रेष्ठी याकडे लक्ष देत नाहीत.चुकीच्या लोकांना पडे दिली आणि त्यामुळे पक्षाच आणि जनतेच नुकसान झाले आहे.

Thursday, April 13, 2023

नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी



 नीरा दि.१४


   पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायात कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रतिमा पुजना नंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुद्ध वंदना घेण्यात आली...

    नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वच महापुरुषांच्या जयंती नियमित पनेसाजऱ्या केल्या जातात. आज शुक्रवारी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध राजकीय पक्ष वा संघटना यांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      नीरा येथे सर्वच लोक एकत्र येवून जयंती उत्सव साजरा करीत असतात.हे सामाजिक एकतेच प्रतीक असल्याचे यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटलंय...तर सरपंच तेजश्री काकडे यांनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संर्वकश सविधनामुळेच आज माझ्यासारखी महिला देखील गावची सरपंच होऊ शकले असे म्हटलंय तर नीरा येथे लवकरच नीरा येथे संविधान स्थंभ उभारला जाईल असं त्यांनी म्हटलंय.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

  

            यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,

, सदस्य वैशाली काळे, अभि भालेराव , संदीप धायगुडे, अड. आदेश गिरमे गौतम भालेराव, माजी उपसरपंच कल्याण जेधे, दीपक काकडे, कुमार मोरे विजय शिंदे, उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख सुदाम बंडगर, आर पी आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, अमोल साबळे, दादा गायकवाड, बाळासाहेब ननवरे हरिभाऊ जेधे, इत्यादी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.




तर वार्ड क्रमांक चार मध्ये नितीन केदारी ,आणि माजी उपसरपंच कुमार मोरे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्याच बरोबर सर्वोदय सोसायटी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली .यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Wednesday, April 12, 2023

माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचा लेटर बॉम्ब

 माजी आमदार अशोकराव टेकवडे यांचा लेटर बॉम्ब

तालुक्यातील राष्ट्रवादीत खळाबळ




नीरा दि.१२( राहुल शिंदे )


  पुरंदर तालुक्यात सध्या एका पत्राने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.त्यातून एका पक्षातील एका नेत्याची किंवा पक्षातील अनेक नेत्यांची घुसमट बाहेर येत आहे.माजी आमदार अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सर्वत्र होत असून सोशल मीडियातून ही याच पत्राची चर्चा सुरू आहे.मात्र यामुळे राष्ट्रवादीतील दुफळी या निमित्त पुढे आली आहे.तर येत्या १७ तारखेला अजित पवार पुरंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत.त्यामुळे या पत्राचा परिणाम पुढील काळात काय होतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


      पुरंदर तालुका राष्ट्रवादी म्हणजे पदाधिकाऱ्यांचा पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापक्षात पदाधिकारी जास्त आहेत .मात्र कार्यकर्त्यांची मोठी उणीव या पक्षात आहे.त्यातही या पदाधिकाऱ्यांच्या कुरघुड्या नेहमीच सुरू असतात.या पक्षाला तालुक्यात मोठा जनाधार आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. त्याच बरोबर केवळ शरद पवार यांना विरोध करणारा सुद्धा एक वर्ग आहे.त्यामुळेच पवार या भागात फारसे लक्ष देत नाहीत.या भागात काम केल्यावर नेहमीच उपेक्षा वाट्याला येत असल्याचा अनुभव पवारांच्या गाठीशी आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मागील काळात खा.शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील जवळाअर्जुन हे गाव दत्तक घेतले.विकास केला.त्याच बरोबर आपल्या एका सहकारी खासदाराला पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गाव दत्तक घ्यायला सांगितले. दोन्ही गावात अनेक विकास कामे झाली. मात्र याच गावात पवार यांना मोठा झटका बसला.दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला लोकांनी नाकारले.त्यामुळे काम करूनही पवारांच्या वाट्याला काही आले नाही . आता त्याच गावातील म्हणजेच जवळाअर्जुन येथील असलेले व माजी आमदार असलेले अशोक टेकवडे यांनी जिल्हा अध्यक्षांना पत्र लिहून तालुका अध्यक्षांबाबत तक्रार केली आहे. यामधून त्यांनी अध्यक्षांवर गंभीर असे आरोप केले आहेत. आणि अध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. यापुढे जाऊन यापुढील काळात पक्षाच्या कोणत्याही बैठकीला किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आपण सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुका राष्ट्रवादीत मोठा बेबनाव असल्याचे स्पष्ट होते आहे.


    नेत्यांचा बेबनाव भाजपच्या पथ्यावर 


     भाजपने बारामती लोकसभा 2024 मध्ये कसल्याची परिस्थितीत जिंकायचीच दृढनिश्चय केला आहे.त्यासाठी राष्ट्रवादी,आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटाच लावला आहे.मागील दहा दिवस पूर्वीच तालुक्यातील काही लोकांनी भाजप मध्ये प्रवेश केला.असे असले तरी पदाधिकारी मात्र एकमेकाची उनीधूनी काढण्यात मग्न आहेत.त्यामूळे सुप्रिया सुळे यांना पुढील काळात मोठा संघर्ष करावा लागू शकतो.


  कोट १)

अशोक टेकवडे (माजी आमदार)

      सध्याचा अध्यक्ष पक्षाच्या कामाकडे दुर्लक्ष करतो आहे.त्यातच सतत आजाराचे कारण सांगून अध्यक्ष पक्ष कामाकडे दुर्लक्ष करतात. अध्यक्षांची मुदत एक वर्षापूर्वीच संपली आहे . त्यामूळेच आपण हे पत्र पक्ष अध्यक्ष यांना दिले आहे.तेच काय तो निर्णय घेतील 


  कोट २)

माणिकराव झेंडे (अध्यक्ष,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस )


    माझी मुदत संपली आहे.पक्षाने सांगितले तर मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करेन अध्यक्षच असायला पाहिजे असं काही नाही.आणि ज्यांनी पाच वर्ष आमदारकी केली.तरी त्यांना आपल्या गावात स्वतः च्या मुलाला सरपंच बनवता आले नाही .याला पक्षाला जबाबदार धरने योग्य नाही. मी पक्षाच्या धेय्य धोरणा नुसारच काम करतो आहे.आणि मी कधीही वरिष्ठांकडे कोणाच्या तक्रारी करीत नाही.



   कोट 3)

सोमनाथ कणसे ( सरपंच , जवळाअर्जुन )


    अशोकराव तेकावडे यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजपचा रस्ता धरला.ते स्वतः काही करीत नाहीत फक्त दुसऱ्याला दोष देतात खरतर त्यांना भाजपमध्ये जायचं होत पण त्यांना संधी मिळाली नाही.आता त्यांची त्यांच्याच पक्षात सुखी राहावं कारण त्यांच्या अगोदर आम्ही भाजप मध्ये आलो आहोत.आता त्यांच्या साठी भाजपचे दरवाजे बंद आहेत.

  


पुरंदरच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलाच्या चंदनऊटी पुजेचा मान

 पुरंदरच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलाच्या चंदनऊटी पुजेचा मान.



 नीरा  दि. 13

श्री क्षेत्र पंढरपुर येथे चैत्र व वैशाख महिण्यात श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची चंदनऊटी पुजा केली जाते. वाढत्या ऊन्हाच्या उष्णतेने देवाच्या शरीराचा दाह होऊ नये यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेस चंदनऊटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. कांबळवाडी (ता. पुरंदर) येथील श्री. अरविंद काळभोर आणि सौ. रंजना काळभोर या वारकरी दांपत्याला पंढरपुर येथे चंदनऊटी पुजेचा मान मिळाला. श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान समिती, पंढरपुर यांच्या वतीने ही पुजा घेतली जाते. श्री विठ्ठलाला आणि रूक्मिणी मातेला प्रत्येकी दिड किलोचा चंदनाचा लेप लावला जातो. नविन वस्त्रे परीधान करून गोड नैवेद्य दाखवून आरती केली जाते. जवळपास दीड तास ही पुजा चालते. 


अरविंद काळभोर हे शेतकरी असून गेली वीस वर्षे नियमीतपणे आषाढी वारी करतात. श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रुद्रगंगा परींचे परीसर भागवत प्रसारक दिंडीचे ते विश्वस्त म्हणुन काम पाहतात. रंजना काळभोर या गृहिणी असुन नियमीतपणे वारी करतात. काळभोर दांपत्याने चंदनऊटी पुजेचा मान मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी ह.भ.प. निखील महाराज घाडगे, ह.भ.प. कांतीलाल काळभोर, हिराबाई काळभोर, शालन जाधव, विजया कदम, विक्रम घाडगे, सुप्रिया घाडगे, स्वयम घाडगे हे नातेवाईक पुजेमध्ये सहभागी झाले होते.




Monday, April 10, 2023

एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न

 एक एकर स्वीटकॉर्नच्या उत्पादनातून तीन महिन्यात घेतले लाखाचे उत्पन्न

कमी पाण्यावर उत्पादन घेत तरुणाची दमदार कामगिरी

 


  नीरा दि.११ - राहुल शिंदे 

  कर्नलवाडी येथील तरुण शेतकरी विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोघ बंधूंनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कर्नलवाडी येथील शेतात स्वीटकॉर्न मक्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. तिनं महिन्याच्या या पिका मध्ये त्यांना 1 लाख 16 हजाराचे उत्पादन मिळाले आहे. तर 98 हजाराचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.


    कर्नलवाडी म्हणजे कायम पाणी टंचाई असणार गाव. अनेक वर्ष या गावातील लोकांनी दुष्काळ पहिला आहे.गावात शेती करण्या पेक्षा पुण्या मुंबईला जाऊन कोणतीतरी नोकरी करावी आणि आपले कुटुंब चालावाव हा शिरिस्ता अनेक वर्ष पासून या गावात सुरू होता. पण आता शहरातही नोकऱ्या मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे येथील.शिकलेला तरुण आता आपल्याच शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.कर्नलवाडी येथील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे हे सुद्धा आपली शेतात वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतात.या पूर्वी त्यांनी डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतले होते.अगदी परदेशी बाजारात त्यांनी डाळिंब पाठवले .मात्र मागील दोन वर्षाच्या काळात या भागात जास्तीचा पाऊस झाला आणि तेली रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे सर्वांनाच डाळिंबाच्या बागा काढाव्या लागल्या.



     यानंतर आता त्यांनी आपल्या शेतात स्वीटकॉर्नच्या मक्याचे उत्पादन घेतले आहे.त्याचे हे पीक काढणीला आले असून व्यापाऱ्यांनी त्याची जागेवरच खरेदी केली आहे.विशेष म्हणजे. १२ हजार रुपये टन असा दर त्यांना मिळाला आहे. ८ ते १० टन उत्पन्न यातून मिळेल असा त्यांना अंदाज आहे. यातून त्यांना ८ टन उत्पादन. मिळाले तरी ११६००० उत्पन्न मिळेल.तर त्यांना या पिकासाठी आज अखेर १७५०० रुपये खर्च आला आहे.यातून त्यांना ९८ हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. दोन दिवसात हे पीक काढले जाणार आहे.मकेची कणसे गेल्यानंतर राहिलेली मका जनावरांसाठी चारा म्हणून वापरली जाते. तिला एक पांड मकेसाठी १ हजार दर मिळत आहे.



  विराज निगडे ( शेतकरी )

      या पिकाला हमी भाव आहे. एका कंपनी बरोबर याबाबतचा करणार आम्ही केला आहे.साधारण ८ ते १० टन एकरी उत्पादन निघते.कंपनीने १२ ते १५ हजार भाव देण्याची हमी दिली आहे.दाराची हमी असल्याने व कामी कालावधीत हे पीक येत असल्याने आम्ही या पिकाला प्राधान्य दिले. यावर्षीचा आमचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि या पासून जनावरांना चारही उपलब्ध होतो आहे.




  निगडे यांनी तीन हजाराचे स्वीटकॉर्नच्या बियाण्याची एक एकरावर लागवड केली.त्याला ४ चार हजाराचे रासायनिक खत वापरले यामध्ये युरिया,सुफला १०:२६:२६ समावेश होता.९० दिवसात हे पीक काढणीस आले आहे.विशेष म्हणजे त्यांना यावेळी रासायनिक औषधांचा वापर करण्याची गरज भासली नाही.पाणी कमी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला.



Sunday, April 9, 2023

आल्याच्या शेतीतून शेतकरी झाला लखपती

 पाऊने दोन एकरात घेतले  २७  टन आल्याचे उत्पादन

 सेवानिवृत्ती नंतर संभाजी काकडे यांची शेती मध्ये भरारी 



  नीरा दि.९


       नीरा नजीक असलेल्या निंबुत येथील शेतकरी संभाजीराव काकडे Sambhajirao Kakade यांनी आपल्या शेतात आल्याचे  यशस्वी उत्पादन घेतले आहे. पहिलं वर्ष तोट्यात गेले असले तरी यावर्षी त्यांना आल्याला चांगला बाजार मिळाला आहे.यावेळी त्यांन प्रतिटन 66  हजाराचा भाव मिळाला आहे.त्यामुळे आल्या पासून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.


   नींबुत येथील संभाजीराव काकडे हे सोमेश्वर विद्यालयात नोकरीला होते. 2021 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले . यानंतर त्यांनी आपल्या शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरवात केली. आपल्या शेता पैकी पावणे दोन एकर शेतात त्यांनी आल्याची लागवड केली.विशेष म्हणजे पपईच्या बागेत अंतर पीक म्हणून त्यांनी हे आल्याचे पीक घेतले आहे. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10 हजाराचा भाव मिळाला.त्यामुळे पाहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावने दोन एकर क्षेत्रात आल्याची पुन्हा लागवड केली. या वर्षी मात्र त्यांना आल्याने आणि त्याला मिळणाऱ्या बाजार भावाने चांगली साथ दिली. यावर्षी त्यांना जागेवरच ६६  हजार प्रतिटन भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी आल्याच्या शेतातून फायदा झाला आहे 

           आले हे पीक तस सातारा, कोरेगाव ,सांगली या भागात घेतले जाते.पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती तालुक्यात आल्याचे पीक फारसे घेतले जात नाही.परंतु काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतले. त्यांना एकूण 6 लक्ष 12 हजार  रुपयाचे खर्च आला.त्यांना पावणे दोन एकरात 27 टन उत्पादन मिळाले.म्हणजे त्यांना 17 लक्ष  82 हजाराचे उत्पादन मिळाले.यातून खर्च वजा केले तर ११ लक्ष ६५ हजाराचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. त्यामुळे उसाच्या मागे धावण्या पेक्षा आल्याचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे.




  संभाजी काकडे ( शेतकरी )


          " यावर्षी मला आल्याचे चांगले उत्पादन मिळाले मात्र मागील वर्षी एकरी तीन लक्ष रुपये तोटा झाला होता. मागील तोट्याने खचून न जाता पीक सातत्य ठेवल्यास फायदा  झाला.आपल्या  मातीत हे पीक व्यवस्थित येईल का नाही ? या बाबत शंका होती. मात्र यावेळी चांगले पीक आले. त्याच बरोबर बाजारही चांगला मिळाला.यातून मागील तोटाही भरून काढता आला.

     शेत मालाला सरकारने जर हमी भाव दिला तर अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देतील आणि रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल "



 


सेंद्रिय पद्धतीचा जास्तीत जास्त  वापर 


 काकडे यांनी साताऱ्यातील कोरेगाव मधून स्थानिक बियाणे आणून त्याची लागवड केली. सुरवातीला शेणखत.बांधणीच्या वेळी कोंबड खत याचा भरपूर वापर केला. सेंद्रिय खतांचा जास्त वापर केला. ड्रिपच्या माध्यमातून रासायनिक खतांचा वापरही केला. मात्र रासायनिक खतांचा वापर त्यांनी केवळ 10 टक्केच  केला. पाठीमागील वर्षी रासायनिक खतांचा वापर 30 टक्के होता. आता पुढील पीक हे 100  सेंद्रिय पद्धतीने घेणार असल्याचे काकडे म्हणाले 


मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,


-मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू,



भोर दि. 10 

मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा, पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील, धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं ह्या तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नावय.14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय.


वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळच्या धिंडली  येथील एका रिसॉर्टच्या परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात मित्रांसोबत फिरायाला आलेल्या परप्रांतीय संगणक अभियंत्याचा पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे. 

मोहीत हेमंत सराफ (वय-३०) राहणार घर नं. ६९, लक्ष्मीगल्ली कुठीर, लक्ष्मीपुरा, वार्ड-सागर, राज्य-मध्यप्रदेश असे युवकाचे नाव असून बाणेर येथील एका खासगी आय. टी. कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली यांचा ग्रुप पानशेत धरणाजवळील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता.


 दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले रिसोर्ट फिरल्यानंतर मित्रांसह सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅंकवॅाटरच्या पाण्यात गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ हा पाय घसरुन खोल पाण्यात पडला.त्यावेळी निखिल किशोर बडगुजर हा देखील पाण्यात पडला. परंतु, जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला. नंतर मोहीतला काढण्यासाठी सर्वजणांनी साखळी तयार केली. सर्वांनी मोहीतला पाण्यातुन वर काढण्याचा खुप प्रयत्न करत असताना अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता त्याचा देखील पाय घसरु लागल्याने सर्वजण घाबरुन पाण्याच्या बाहेर आले. यावेळी मोहीत सराफ हा खोल पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवु शकले नाहीत.


पाण्यात पडलेल्या युवकाचा १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह मिळून आला असल्याची माहिती पानशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यानी दिली. 

यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मदतकार्य केले.


वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.

नांदगाव येथील भावंडांनी बनवले आईचे स्मारक

 नांदगाव येथील भावंडांनी  बनवले आईचे स्मारक 



 भोर  दि.१०


     पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी, आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलय.दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून, घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केलीय. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी समाजा समोर आदर्श ठेवलाय.परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलंय.


भोर तालुक्यातील नांद गावाचे रहिवासी, शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे(मेकॅनिक) यांच्या घरकाम आणि शेती करणाऱ्या मातोश्री कै. राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापुर्वी करोना मुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधना नंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतू आई विषयी असणारे प्रेम,श्रद्धा,भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरा समोरच मंदिर उभारून त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श त्यांनी समाजा समोर निर्माण केला आहे. 

कै. राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असनाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांचे सोबत ४५ वर्ष सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. कै.राहीबाई या कुटुंबावरच प्रेम करुन थांबल्यानाहीत तर आपले नातेवाईक आणि गावासाठी असनारे प्रेम आपुलकी आजही ग्रामस्थ आणि सगे सोयरे बोलून दाखवत आहेत.


आईच्या निधनानंतर घरी आई नसल्याचं दुःख सहन होत नव्हते मनात आईची आठवण सतत येत होती. त्यावेळी राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनिल, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे,प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी विचार विनीमय करुन स्मारक बांधण्याचे ठरवले आणि ते दि.८ एप्रिल रोजी पुतळा अनावरण सोहळ्याने सत्यात उतरले आहे. यावेळी होम हवन,महाप्रसाद, हभप नेहाताई साळेकर यांचे किर्तन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांचे हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी बीडी गायकवाड,सरपंच प्रिती गोळे,नातेवाईक,नांद गावातले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी

 पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग इको कार खड्ड्यात गेल्याने दोन जण जखमी




सासवड दि.९


पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे  रुंदीकरणाचे काम सध्या चालू आहे. परंतु महामार्गावर  सूचनाफलक यांचा अभाव असल्याने  महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसें दिवस वाढत चालले आहे. त्यातच अनेक ठिकाणे रस्ते एकदमच वळवले जातात. रविवारी पहाटे असाच रस्त्याचं अंदाज न आल्याने एक कार रस्त्यावरून खाली गेली आणि  खड्यात पडली.  यामध्ये दोन वृध्द गंभीर जखमी झाले. साकुर्डे  गावानजीक भोंगळे माळा येथे हा अपघात घडलाय





   सुदैवाने कोणाला मोठी   पुरंदर तालुक्यातील साकुर्डे  गावा भोंगळे मला येथे इको कार खड्ड्यात गेल्याने इको कारमधील ज्येष्ठ नागरिक यांच्या गंभीर दुखापत झाली आहे.MH 12 HF 8165 ही ईकोकार वडगाव ता.माण येथून पुणेकडे जात असताना रात्रीच्या वेळी अचानक रस्ता अरूंद झाला. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकल्याने इको कार महामार्गाकडील खड्ड्यात कोसळली या अपघातात कारमधील ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व अपघाताबाबतीत हे जेष्ठ नागरिकांचे नातू अभिमन्यू माळवे यांनी माहिती दिली.


      जेजुरी ते सासवड  या दरम्यान सध्या महामार्गाचे काम सुरू आहे .अनेक ठिकाणी रस्ते वळवण्यात आले आहेत पण ठेकेदाराने बोर्ड नीट नाl लावल्याने ते दिसत नाहीत आणि असे अपघात होत आहेत.


Saturday, April 8, 2023

नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी

नितीन गडकरी अतिरेक्यांच्या रडारवर ? गडकरींना ही धमकी 



मुंबई दि.८

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadakari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात तब्बल 2 वेळा फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सर्तक झाल्या होत्या.


तसेच नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारीचा ( jayesh Pujari ) ताबा मिळवला होता. जयेश पुजारीची वरिष्ठ पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. परंतु नितीन गडकरी हे अतिरेकी संघटनांच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीतून समोर आला आहे.


जयेश पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी आणि तुरुंगात असून सुद्धा त्याच्याकडे फोन उपलब्ध होते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांशी सातत्याने संवाद साधायचा.


त्याला मांसाहारी जेवण तुरुंगात उपलब्ध करून दिले जात होते. जयेश पुजारी मागील 12 वर्षांपासून वेगवेगळ्या तुरूंगात आहे. परंतु बेळगावच्या तुरूंगात त्याला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या सर्व सोयीसुविधा कुणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.


परंतु गडकरी धमकी केसचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल 



मुंबई दि.८ 

बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या विरोधात मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.


बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचंही युवासेनेनं तक्रारीत म्हटलं आहे. 


बागेश्वर धाम सरकारविरोधात ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 

तेल्या भुत्याच्या कावड यात्रेतील बैलगाडीला निरा येथे अपघात : टेम्पो ने धडक दिल्याने बैल झाला गंभीर जखमी

 तेल्या भुत्याच्या कावड यात्रेतील बैलगाडीला निरा येथे अपघात : टेम्पो ने धडक दिल्याने बैल झाला गंभीर जखमी




  नीरा दि. ८ 

        पुरंदर तालुक्यातील सासवड येथून शिखर शिंगणापूर यात्रेसाठी गेलेल्या सासवड येथील तेल्या भुत्याच्या कावडीचा सध्या परतीचा प्रवास सुरू आहे. ही कावड आज शनिवारी निरा येथे मुक्कामी आली. मात्र या दरम्यान या कावडीच्या यात्रेतील एका बैलगाडीला टेम्पोची जोरदार धडक बसून यातील एक बैल गंभीर रित्या जखमी झाला आहे. सुदैवाने यामध्ये दुसरं कोणीही जखमी झालं नाही. मात्र या जोरदार धडकेमुळे बैल गंभीर जखमी झाला असून तो रस्त्यातच पडला होता. यानंतर खाजगी पशुवैद्याने त्याच्यावर उपचार केले आहेत.



    पुरंदर तालुक्यातून अनेक कावडी या शिखर शिंगणापूर येथे महादेवाला कऱ्हेच्या पाण्याने स्नान घालण्यासाठी जात असतात. बार्शी दिवशी धार पडल्यानंतर या कावडी आता माघारी फिरल्या आहेत सासवड येथील मानाची असलेलो तेल्या भुत्याची कावड सर्वात शेवट येत असते. ही कावड आज निरा येथे आठ वाजता मुक्कामासाठी आली. निरा येथील नगर बायपासवर या कावडीतील बैलगाड्या आल्या असताना सातारा बाजू कडून आलेल्या एका टेम्पोने (क्रमांक एम.एच. ४६- बी.एम. ३६१८) या तांड्यातील अगदी मध्ये असलेल्या एका बैलगाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये बैल गंभीर जखमी झाला. निरा येथील ग्रामस्थांनी आणि यात्रेकरूंनी तातडीने मदत करून ही बैलगाडी बाजूला काढली आणि बैलावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.


'माणुसकीचा गाव' पुस्तकाचे चौदा एप्रिल रोजी प्रकाशन

 'माणुसकीचा गाव' पुस्तकाचे चौदा एप्रिल रोजी प्रकाशन



    नीरा  दि.८

   गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्रवीण जोशी हे माण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रवीण जोशी लिखित माणुसकीचा गाव या पुस्तकाचे प्रकाशन दहिवडी (ता.माण) येथे होणार असून यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

   शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ व ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमासाठी माण तालुका गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांसह शिक्षणविस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. जगदीश शेवते, शिवछत्रपती आर्ट्स व कॉमर्स कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. वैजीनाथ राख, मिरज येथील शेठ र. वि. गोसलीया कॉलेजचे व्याख्याते प्रा. उत्तम पांढरे, विशेष सरकारी वकील ऍड. बापूसाहेब शिलवंत, ऍड. पृथ्वीराज चव्हाण, ऍड.अमोल यादव, किरण बोधे व पत्रकार परिषदेचे भरत निगडे उपस्थित राहणार आहेत.

   लेखक जोशी यांनी माणदेशी व्यक्तिचित्रे रेखाटली असून बालाजी मंगल कार्यालय दहिवडी येथे १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक दिगंबर बामणे व विनायक पानसांडे यांनी दिली.

Friday, April 7, 2023

याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!!

 याकरणाने अजितदादां होते नॉट रीचेबल!!



पुणे:

   जेव्हा पासून अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेतली तेव्हा पासून अजित पवार यांच्या प्रत्येक हालचालींवर जनता आणि मीडिया दोघांचेही लक्ष असते . दादांनी एखादा कार्यक्रम रद्द केला किंवा फोन बंद केला तरी लगेच दादा फुटले की काय असा प्रश्न सर्वानाच पडतो .केला पासून असाच गोंधळ राज्य भारत पाहायला मिळतोय मात्र आता खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केलाय 

       " अरे बाबांनो मी काल एका कार्यक्रमा साठी जात असताना मला प्रवासातच ऍसिडिटी चा त्रास जाणवायला लागला, दोन-तीन दिवस प्रवास, कार्यक्रम, दगदग यामुळे पित्ताचा त्रास असह्य झाल्याने मी पुढचे दौरे रद्द करून डॉक्टराकडे गेलो. आणि आराम करणे पसंत केले.". " आता माध्यमांनी लगेच अजित पवार नॉट चेबल, राजकीय कारण अशा बातम्या केल्या, हे योग्य नाही. उगाच राईचा पर्वत माध्यमे करत आहेत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. दोन दिवस नोट रीचेबल असलेले अजित पवार आज पुण्यात एका खाजगी कार्यक्रमात माध्यमांना दिसले. यावेळी बोलताना दादांनी आपल्या स्टाईल मध्ये माध्यमांच्या बातम्यांवर सडकून भाष्य केले. आता माझी तब्येत ठीक नसेल तर अराम पण करू नये का? असे म्हणत माध्यमे बातम्यांची करत असलेली घाई आणि त्यामुळे जनतेत निर्माण होणारा संभ्रम यावर नाराजी व्यक्त केली.

तांबेवाडी येथील किशोर तांबे यांची निघृण हत्या

तांबेवाडी येथील किशोर तांबे यांची निघृण हत्या




पुणे दि. ८ 

 बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी किशोर तांबे राहणार तांबेवाडी तालुका जुन्नर हे रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार आळेफाटा पोलीस स्थानक मध्ये देण्यात आली होती.



किशोर तांबे हे बेल्हे सोसायटीचे संचालक होते त्यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत आपला अर्ज देखील नुकताच दाखल केला होता.त्यामुळे तांबे यांचा घातपात नक्की कोणत्या कारणामुळे झाला अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु झाली आहे.



दरम्यान पोलिसांच्या चौकशी वरून किशोर तांबे यांचे चुलत बंधू संतोष तांबे यांनी म्हटले होते की रात्री दूध घालण्यासाठी समर्थ दूध डेअरीमध्ये किशोर तांबे व त्यांचे बंधू यांची भेट झाली होती त्या ठिकाणाहून ते दोघे घरी परतल्यानंतर किशोर तांबे हे त्यांची दुचाकी एम एच 15 सी एन 92 18 21गाडी घेऊन ते रात्री आठ वाजता शेतात जातो असे सांगून गेले होते मात्र सहा एप्रिल रोजी सकाळी पर्यंत घरी न आल्यामुळे सर्वांनी शेतात जाऊन त्यांच्या दुचाकीचा शोध घेतला परंतु मोटरसायकल ही दिसून आली नाही.


अदयाप त्याचा शोध लागला नसल्याने त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी तक्रार दिनांक 6 एप्रिल रोजी आळेफाटा पोलीस ठाण्यात केली.

यावरून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तपास सुरू करून पोलिसांनी दिलेल्या वर्णनावरून त्याचा शोध सुरू केला मात्र ते सापडले नाही.


अखेर शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी त्यांचा मुर्तदेह त्यांच्या शेताजवळील असलेल्या विहिरीत आढळून आला एका गोणीमध्ये हा मोठा मूर्तदेह सापडला.त्यानंतर मुर्तदेह विहिरीतून काढून शवविशेदनासाठी आळे येथे पाठवण्यात आला असून हा घातपात झाला असल्याची चर्चा तांबेवाडीत जोरदार सुरु झाली आहे.



या संदर्भात पोलिसांनी कुठलीही माहिती दिली नाही नेमका हा घात कशामुळे झाला याविषयी माहिती अदयाप दिली नाही परंतु पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असे माहिती देखील मिळाली आहे परंतु अद्याप हा घातपात नेमका कुठल्या कारणामुळे झाला आहे अद्याप समजू शकले नसले तरी पोलिसांकडून लवकरच माहिती मिळेल अशी अपेक्षा निर्माण होत आहे.

संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला. संजय राऊत : वृत्तपत्रासह सर्वच स्तंभ विकलेले

 संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला. 

संजय राऊत : वृत्तपत्रासह सर्वच स्तंभ विकलेले 



कर्जत (जि. अहमदनगर) दि. ७ :

        'देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे. आज न्यायालय जनतेचे राहिले नाही, ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्या सुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत. संसदेला टाळे लागल्या आहे, प्रशासन हे गुलामासारखा पायरीवर बसलेला आहे. हे सर्व पाहता समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे, ते समाजापुढे मांडले पाहिजे. क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज अशाच पद्धतीने तेवत राहिला पाहिजे,' असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल असा घाणाघात राज्यसरकार केला. 


      नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे होते, तर कर्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार होते. 


     खासदार संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही आणीबाणीचा काळ पाहिला त्यावेळेला एवढे कोणी गुलाम झाले नाही, तेवढे यांच्या कार्यकाळात आता गुलाम होऊ लागलेले आहेत. इंदिरा गांधी समोर कोणी झुकलो नाही, मात्र आता मालक या सत्याधारांसमोर झुकत आहे. आज एका व्यक्तीच्या भोवती हे वृत्तपत्र फिरत आहेत, ही अत्यंत भयंकर बाब आहे. त्यामुळे आपली मान व शान जर टिकवायची असेल व पत्रकारांची जी परंपरा आहे तीच आपल्याला पुढे न्यायची असेल, तर आपल्याला जे काही सत्य आहे ते जनतेसमोर मांडलं पाहिजे,' असेही ते म्हणाले. 


     अजूनही मी पूर्णवेळ पत्रकार आहे, अजूनही मी अग्रलेख लिहितो. मला मधल्या काळात तुरुंगात पाठवलं, मी जेलमधूनही अग्रलेख लिहित होतो. मी जरी राजकारणात असलो तरी लोकांनी मला पत्रकार म्हणूनच ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. दिल्लीत गेलो तर अजूनही मला सामना वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक म्हणूनच मला ओळखलं जातं. वृत्तपत्र क्षेत्र केवळ अडचणीत न्हाई तर वृत्तपत्र क्षेत्राच हवन सूरु आहे. 


      पूर्वीच्या काळात पत्रकारांची संख्या खूप कमी होती. पत्रकरांचे नेटवर्क आता गावपातळीपर्यंत पोहचले आहे, त्याचा वापर समाजासाठी व्हावं. ज्याचे हृदय जळतय तोच लिहू शकतो, सध्याची परिस्थिती पाहून त्याच हृदय जळत त्याने स्वतःला पत्रकार समजावे. क्रांती रसाच्या चिळकांड्या कुठून उडू शकतील तर त्या लेखणीततूनच उडू शकतात. ९० टक्के मीडिया हा भांडवलदाराच्या ताब्यात आहेत. या देशात न्यायालय जनतेची राहिली नाहीत, न्यायालयात जनतेला न्याय मिळेल का याची शंका आहे. असे खासदार राऊत म्हणाले 


     आज बोलण्यावर निर्बंध आहेत, लिहिण्यावर बंधन आहेत. वृत्तपत्राचे संपादक, टीव्ही चॅनेलचे संपादक सर्व राजकीय नेते नेमतात. आज एका व्यक्तीच्या सेवेत पत्रकारिता रुजू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. ते संस्कार आमच्यावर झाले असल्याने आम्ही वाकायला आणि झुकायला तयार नाही, असे ते म्हणाले 


      आजच्या राज्यकर्त्यांना अस वाटतं की सत्तेचा अमरपट्टा आम्ही घेऊन आलो आहे. त्यांना वाटतं न्यायालय आमच्या खिशात आहे पत्रकार आमच्या खिशात आहे. सध्या सरकारच्या विरोधात बोलणार्यांना, व्यंगचित्र काढणाऱ्याला तुरुंगात टाकलं जात. पत्रकाराला पत्रकारिता करू द्यावी, भांडवलदारांनी एजंट बनवू नये. टिळकांना वृत्तपत्र गहाण ठेवावं लागलं होतं. आता मात्र गौतम अदानी सारखे लोक येतात आणि वृत्तपत्रच विकत घेतात त्यामुळे गहाण ठेवण्याची वेळच येत नाही.



       'ज्याचे हृदय जळते, तोच पत्रकार जनतेचे मत मांडू शकतो, ही वास्तवता आहे. समाज परिवर्तन करण्याची ताकद ही पत्रकारांमध्ये आहे. वर्तमानपत्रांमध्ये आजही काळ्याचे पांढरं होतं. याच्यावर सर्वांचा विश्वास आहे. तसा माझा पण आहे, म्हणून आज सुद्धा मी लिखाणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडत असतो. माझा लिहिण्यावर विश्वास आहे, म्हणूनच क्रांतीच्या ठिणग्या जशा लिखाणाच्या माध्यमातून घडल्या गेल्या, तशाच आता सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून घडविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकारांवर हल्ले होतात, हे काही आजचे नाही. ब्रिटिश काळापासून हे हल्ले होत आहेत. देशभरात आत्तापर्यंत बाराशे पत्रकारांना हल्ले झालेले आहेत, ही सुद्धा गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले. आज या हुकूमशाहीच्या पुढे मालक लोक सुद्धा काहीच बोलायला तयार नाही. उलट आता यांच्याच मांडीला मांडी लावून हे मालक लोक बसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांचे फावले गेले आहे. मग पत्रकारांनी आवाज उठवायचा कसा? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे,' असेही ते म्हणाले. 


'माझे पत्रकारितेकडे दुर्लक्ष झाले नाही. मध्यंतरी मला जेलमध्ये काहींनी पाठवलं, असतानाही मी अग्रलेख लिहित होता. पत्रकारांना असत्यांच्या भिंती उभ्या आहेत. ज्याने बोलला पाहिजे त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. या देशात न्यायालये लोकांची राहिली नाहीत. Haven't उत्कृष्टट पत्रकारिता कराराची,  त्यांनी टिव्हीच्या बातम्या पाहणे बंद करावे. बोलण्यावर, लिहिण्यावर बंधनं येत आहेत. वृत्तसंस्था राजकीय लोक नेमतात, या पत्रकारीतेचा विरोध करतो. लिहिण्याला, बोलण्याला बंधनं येतात, ही हुकुमशाही आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेला मोठी परंपरा आहे. सत्य लिहीले म्हणून, १,२०० पत्रकारांवर खोटे गुन्हा दाखल झाले. सगळ्या राजकीय पक्षांनी टिका सहन करुन संयम पाळली होती. पत्रकारांना पत्रकारिता करु द्यावी, मालकांनी एजंटगरी करु नये. ग्रामीण भागातील पत्रकार ही अन्याय विरोधात लढणारी फौज आहे. माझे आजही शस्त्र माझी लेखणी आहे. हवा ते करुन दाखवण्याची ताकद वृत्तपत्रात आहे, असेही संजय राऊत शेवटी सांगितले. 


आमदार रोहित पवार म्हणाले की , 'पत्रकारांच्या अनेक संघटना झाले आहे. संघटना एकत्रितपणे आल्या पाहिजे. भविष्यामध्ये पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज या क्षेत्रामध्ये बदल होत चाललेला आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये लिखाण्याला स्वातंत्र्य होते. पत्रकारांनी जे जे काही लिहिलं ते जनतेसमोर आणलं, त्यामुळेच या देशांमध्ये बदल घडला हे सुद्धा मान्य केले पाहिजे. त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तसेच चॅनलच्या माध्यमातून जे काही घडलेलं आहे, ते सत्य जनतेसमोर आणावं व आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये काय आहे, ते सांगावं. जेणेकरून जनतेचे प्रश्न त्या माध्यमातून सुटतील, असे ते म्हणाले. आज मीडियाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे. त्यामुळे सहजपणे जनतेपर्यंत पोहोचण्याचे आता माध्यम सुद्धा हे झालेले आहे. एवढे होत असताना कोणत्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही,याची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. आज राजकारणामध्ये जे जे काही वेगळं चाललेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा पत्रकार ने लिखाण केलं पाहिजे,' असेही ते म्हणाले . 'आज खरच प्रेस फ्रीडम राहिला आहे का? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. खऱ्या गोष्टी या लोकांसमोर आणल्या पाहिजे, तरच ही लोकशाही टिकून राहील. तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्याच्या पाठीशी आम्ही राजकीय मंडळी निश्चितपणे उभे राहू,' अशी ग्वाही सुद्धा पवार यांनी यावेळी दिली. 


परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख म्हणाले की, 'आज मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रश्न मांडत आहोत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विशेषता भर देत आहोत. पण राज्य शासन या प्रश्न सोडवण्यामध्ये उदासीन आहे. संघटनेने केलेल्या कामातून पत्रकारांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केलं. ६० लाख रुपयांची मदत आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत पत्रकारांसाठी  दिलेली आहे,' असेही ते म्हणाले. 'आज पत्रकारांवर हल्ले वाढत चाललेले आहेत. जो काही कायदा केला आहे, त्याचा म्हणावा असा उपयोग होत नाही. भविष्यामध्ये हा कायदा अधिक कडक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणे गरजेचे आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांच्या बाबतीत रेल्वे प्रवासामध्ये जी सवलत देण्यात आलेली होती, ती बंद करण्यात आलेली आहे, ती तात्काळ सुरू करावी,' अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. तसेच पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे, हा प्रामुख्याने मुद्दा आहे, तोही प्रश्न मार्गी लावावा,' असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश जेवरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर आभार परिषदेचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी मानले. यावेळी राज्यसरच सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा संजय राऊत व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 


      कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, अहमदनगर प्रेस क्लब चे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, परिषदेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जान्हवी पाटील, संयोजन समितीचे गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदी उपस्थित होते.



चौकट 


पत्रकारांचे खासदार सर्व संजय राऊत यांच्याकडे अधिक लक्ष झाले आहे. राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन करताना ज्या वेळेला महत्त्वाचा दुवा लागतो तो दुवा खासदार संजय राऊत यांनी निर्माण केला असे आमदार रोहित पवार यांनी म्हणताच सभागृहामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला 


चौकट 


मला मराठा या वृत्तपत्राचे संपादक व्हायचं होतं, पण ते जमलं नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला सामनाच संपादक केलं पण मी पहिल्यापासूनच मला पत्रकार व्हायचे व संपादक व्हायचा अशी खूणगाट मनाशी बाळगलेली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले. मी आजही पत्रकार आहे व भविष्यात सुद्धा मी पत्रकार म्हणूनच ओळखलं जाणार आहे व हीच पत्रकारिता माझी आयुष्याची ओळख राहणार आहे असे खासदार राऊत म्हणाले 


चौकट.. 


यंदाचे पुरस्काराचे मानकरी 

तालुके पुढील प्रमाणे 


नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा

अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती

लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली

नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव

पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे

कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली

छत्रपती संभाजीनगर विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड 


……………………..

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...