मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार. ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार. ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात पुरंदर : देशाच्या पंतप्रधानपदाची ओळख पूर्वी प्रामाणिकपणा, समाजवाद आणि लोकशाही मूल्यांशी जोडली जात होती; मात्र सध्याच्या पंतप्रधानांची ओळख ‘सगळ्यात जास्त खोटं बोलणारा आणि फेकणारा नेता’ अशी झाली असल्याचा तीव्र आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरंदर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत भाजपचा कारभार म्हणजे ‘आजची औरंगजेबी प्रवृत्ती’ असल्याचे म्हटले. पुरंदर तालुक्यातील निरा येथे झालेल्या सभेत सपकाळ पुढं म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त पंतप्रधान अशी होती. माहिती अधिकार, अन्न सुरक्षा आणि शिक्षणाचा हक्क देत त्यांनी लोकशाही अधिक मजबूत केली. मात्र आजचे पंतप्रधान दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना दीडपट भ...