Posts

Showing posts from August, 2023

८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

Image
  ८ वर्षांपूर्वी मंदीर चोरीतील फरार आरोपींच्या जेजुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या. पुरंदर :      पुरंदर तालुक्यातील पिंगोर येथील ग्रामदेवतेचे मुकुट व दागिने असे ९६ हजारांच्या मालाची चोरी २०१५ साली झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ही चोरी झाल्याची फिर्याद विश्वास लक्ष्मण क्षीरसागर (वय ७० वर्षे) रा. पिंगोरी यांनी दिली होती. जेजुरी पोलीसांनी तब्बल आठ वर्षांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.      पिंगोरीची ग्रामदेवता असलेल्या वाघेश्वरी देवीच्या मंदिराच्या दरवाजा शेजारील लोखंडी ग्रीलची साखळी तोडुन आत प्रवेश करून मुकुट व दागिने असा ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज लबाडीचे इरादयाने चोरून नेवुन धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले होते. अशा मजकुरचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणेत आला होता. या गुन्हा दाखल झालेपासुन गुन्हयातील आरोपीत हे फरार होते.       भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पो.स.ई राहुल साबळे, ...

पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजी काकडे यांची निवड...

Image
 पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजी काकडे यांची निवड...  पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले , बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री.अविनाश सावंत सर यांची तर पुरंदर तालुक्यामधून बा.सा.काकडे -देशमुख विद्यालय पिंपरे ता.पुरंदर येथे कार्यरत असलेले बारामती तालुका मराठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष पत श्री.शिवाजीराव काकडे यांची संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे मार्गदर्शक श्री.एस.पी.जगताप सर यांनी त्यांना दिले. तीन हजार सभासद व सुमारे ५० कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची स्थापना १९७६ मध्ये झालेली असून, संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. वैयक्ति...

चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली

Image
 चिमुरड्याचा आई प्रेमात पडली आणि स्वतःच्या मुलाची वैरीण ठरली मावशीच्या तक्रारी नंतर जेजुरी पोलिसांनी लावला खुनाचा छडा       जेजुरी दि.२९      मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या चिमुरड्याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ४ वर्षाच्या मुलाचा खून केल्यानंतर  त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील घाटात फेकून दिला होता. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दोघांना ताब्यात घेतल आहे.. खून झालेल्याचार वर्षीय मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार असून त्याची आई रेणू शंकर पवार  व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके  या दोघांना जेजुरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती      या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल साबळे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, दशरथ बनसोडे, प्रवीण शेंडे, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांचा समावेश होता...या प्...

सुकलवाडी परिसरातील बिबट्या जेरबंद

Image
  सुकलवाडी परिसरातील बिबट्या जेरबंद पुरंदर :      काल रविवारी दुपारी वाल्ह्याच्या सुकलवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले होते. संध्याकाळी जेजुरी वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सुकलवाडी येथे भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली होती. आज सोमवारी सकाळी या परिसरातून एक बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले असून, अजून एक बिबट्या या परिसरात असल्याची शंका वन विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.         सुकलवाडी परिसरात वावरत असलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागला यश आले असुन सुकलवाडी परिसरात अजुन ऐका बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी विनंती वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. वनविभाग अधिकारी व त्यांच्या सर्व टिमचे सुकलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनःपुर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.

नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने एक जखमी. वाहतूक ठप्प, झाड काढण्याचे काम सुरू.

Image
 नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने एक जखमी.  वाहतूक ठप्प, झाड काढण्याचे काम सुरू.  पुरंदर :        नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बुवासाहेब ओढ्यालगत असलेले एक झाड रस्त्यावर कोसळले. यामध्ये एक दुचाकीस्वार सापडला असून तो गंभीर जखमी आहे.  सातारा नगर रोड व नीरा बारामती रस्त्यावर असलेल्या येथील पंचायत मंदिरासमोरील एक जुने झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळताना विद्युत वाहक तारांवर ही पडले आहे. यामध्ये बुलेट वरून जाणारा शंभू वाघमारे रा. कोळेवस्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला नीरेतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेली एक तासभर या रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तासभरानंतर नुकतेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबीच्या सहायाने पडलेले झाड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शंभू वाघमारे हे बुलट मोटारसायकल क्र एम.एच. ४२ बी. ए. ७०१ वरुन जात असताना अचानक झाड त्यांच्यावर कोसळले. 

पुरंदरच्या या गावात बिबट्याचे दर्शन. युवकांनी केले व्हिडिओ चित्रीकरण.

Image
  पुरंदरच्या या गावात बिबट्याचे दर्शन. युवकांनी केले व्हिडिओ चित्रीकरण. पुरंदर :      वाल्हे नजिकच्या सुकलवाडी गावच्या पुर्वेस आज बिबट्याचे दर्शन झाले. काही युवक शेतात कामानिमित्ताने दुचाकीवरुन जात असताना एका ऊसाच्या शेता शेजारील मोठ्या झाडाखाली सावलीला बिबट्या शांत बसल्याचा दिसला. शेतकऱ्यासह युवकांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.     पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील सुलकवाडी येथून कर्नलवाडीच्या झिरिपवस्ती येथे जाण्यासाठी रस्ता आहे. चिंचेचा मळा येथे रविवारी (दि.२७) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोलाईमाता डोंगराच्या मागील बाजूच्या पायथ्याशी बिबट्या दिसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यादरम्यान बिफट्याचा मुक्त वावर होता. युवकांच्या हालचाली वाढल्यावर बिबट्याने ऊसाच्या शेतात पळ काढला. विद्यार्थी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार यांनी ही सर्व घटना मोबाईल चित्रीत केली.        वन विभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी राहुल रासकर, वनरक्षक पोपट कोळी, तसेच गोविंद निरडे यांनी घ...

मराठी पत्रकार परिषदेचा परळीतील ज्येष्ठ पत्रकाराला मदतीचा हात पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांची बहुमोल मदत

Image
  मराठी पत्रकार परिषदेचा परळीतील ज्येष्ठ पत्रकाराला मदतीचा हात पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांची बहुमोल मदत पुणे :      परळी येथील जेष्ठ पत्रकार आनंत भातांगळे गुरुजी हे जेजुरीला सहकुटुंब दर्शनासाठी गेले होते. जेजुरी ते सासवड प्रवासादरम्यान त्यांची बॅग अ ज्ञात चोरट्याने लंपास केली. यात त्यांचे पैसे व इतर उपयोगी वस्तूही चोरीस गेल्या. सदरील घटनेची माहिती भातांगळे गुरुजी यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या परळी येथील पदाधिकाऱ्यांना तात्काळ दिली.परळी येथील मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी यांनी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष शरद पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांना संबंधित घटनेची माहिती दिली. शरद पाबळे यांनी सुनील लोणकर यांना तातडीने मदत करण्याबाबत सूचना दिल्या.त्यानंतर सासवड येथे प्रत्यक्ष जाऊन  सुनील लोणकर यांनी जेष्ठ पत्रकार अनंत भातांगळे गुरुजी यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना धीर दिला. जेवणाची व्यवस्था केली. सासवड ते परळी बसचे तिकिटाची व्यवस्था करून त्यांना परळीकडे रवाना केले. मराठी पत्रकार प...

चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतर नीरेत जल्लोष फटाकडे फोडून नागरिकांनी व्यक्त केला आनंद

Image
 चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतर नीरेत जल्लोष फटाकडे फोडून नागरिकांनी व्यक्त केला आनंद   नीरा दि.23         भारताचा चंद्रयान ३ आज चंद्रावर पोहचले चंद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर नीरेकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. नीरा येथील बुवासाहेब चौकामध्ये फटाके फोडून आणि 'भारत माता की जय' असा जयघोष करून नीरा येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक नागरिकांकडून करण्यात आलं. आज साडेपाच वाजल्यापासून लोक आपल्या टीव्ही संचा समोर बसून होते. चंद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग कशाप्रकारे होतं हे पाहण्यासाठी सर्वच नागरिक दूरदर्शन संचाकडे अगदी डोळे लागून बसले होते. सव्वा सहा वाजल्याच्या दरम्यान या यांनाच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं आणि भारताच्या सिरे पेचात मानाचा तुरा रोवला गेला. यानंतर सात वाजता नीरा येथील बुवासाहेब चौकामध्ये एकत्र येत फटाके फोडून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा येथील तरुणांनी 'भारत माता की जय, वंदे मातरम, इस्रोचा विजय असो' अशा प्रकारच्या घोषणा देत आनंद...

निरेत धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धा. शेकडो महिलांच्या उपस्थित महिलांच्या समुहांचे आकर्षक सादरीकरण

Image
  निरेत धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धा. शेकडो महिलांच्या उपस्थित महिलांच्या समुहांचे आकर्षक सादरीकरण पुरंदर :          निरा (ता.पुरंदर) शहरातील शंभरहून अधिक महिला सदस्य असलेल्या धमाका गृपच्या वतीने महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत. आज मंगळवारी या धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.        श्रावणातील नागपंचमी हा महिलांचा सण म्हणून मानला जातो. नवीन लग्न झालेल्या नवविवाहिता पंचमीच्या सणानिमित्त माहेरी येत असतात. या काळात विविध खेळ, खेळत फेर धरले जातात. मोबाईलच्या युगात हे खेळ लुप्त पावत चालेल आहेत. या खेळांना नवसंजीवनी देण्यासाठी नीरेतील धमाका गृपच्या वतीने निरा परिसरातील महिलांच्या समुहांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले होते.     निरेतील राधाकृष्णन मंगल कार्यालयात या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दुपारी दोन ते पाच वाजेच्या दरम्यान केले होते. कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थित लावून स्पर्धेत ही सहभाग घेतला. उत्कृष्ट सादरीकरणाला स...

पुरंदर मध्ये पत्रकार भवन कामाचा पायाभरणी समारंभ संपन्न लोकवर्गणीतून ६ गुंठे जागेची खरेदी : सुमारे तीन ते चार कोटींच्या बांधकामास सुरूवात.

Image
  पुरंदर मध्ये पत्रकार भवन कामाचा पायाभरणी समारंभ संपन्न लोकवर्गणीतून ६ गुंठे जागेची खरेदी : सुमारे तीन ते चार कोटींच्या बांधकामास सुरूवात.   पुणे : पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने होत असलेल्या सुसज्ज अशा इमारतीचा पायाभरणी समारंभ पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला व प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली. यावेळी पत्रकार व प्रसिद्धी शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी सपत्नीक पुजा विधी केले तर कार्यक्रमाचे पौराहीत्य जेष्ठ पत्रकार व खंडोबा देवाचे पुरोहित प्रकाश खाडे यांनी केले.        यावेळी पुणे जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य बी. एम. काळे, जिल्हा प्रतिनिधी प्रकाश फाळके, जवळार्जुनचे आर्दश सरपंच सोमनाथ कणसे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, खजिनदार निलेश भुजबळ, कार्यकारिणी सदस्य समीर भुजबळ, सोशल मिडीया सहसचिव हनुमंत वाबळे, पुष्कर खाडे, ठेकेदार प्रमोद इंगळे, नारायण शिवरकर, आदित्य रोकडे, विश्वास बनकर, किरण रोकडे, वैभव रोकडे आदी उपस्थित होते.   ...

सासवड येथील दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला लागली आग

Image
 सासवड येथील दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला लागली आग दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची ही नवी शाखा    सासवड दि.२२           सासवड येथे अवघ्या पावणेदोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची शाखा आगीत जळून भस्मसात झाली आहे .. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या दरम्यान या बँकेच्या सासवड येथील नव्या शाखेला आग लागली. आग लागल्यानंतर सासवड पोलिसांनी सासवड नगरपरिषदेच्या अग्नी शमन यंत्रणेच्या साहाय्याने ही आज आटोक्यात आणली आहे. मात्र यामुळे बँकेतील सर्व साहित्य जळून गेलं आहे ....बँकेच्या नुकसानी बाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही मात्र. बँकेचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर आता या बँकेच्या फायर ऑडीटचा प्रश्न ही पुढे आला आहे.... कारण आवघ्या दोनच महिन्यांत ही आग लागली आहे.. त्यामुळे लोकांमधून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत...     याबाबत सासवड पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी अंदाजे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान सासवड पोलीस स्टेशन येथे बँकेमध्ये आग लागल्याचा फोन आला व त्यानंतर या ठिकाणी अ...

सासवड येथे मोटार सायकरल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्या धडकेत एकाचा मृत्यू

Image
 सासवड येथे मोटार सायकरल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्या धडकेत एकाचा मृत्यू  ७० वर्षीय मोटरसायकल स्वराचा झाला जागेवरच मृत्यू  सासवड दि.२१                  पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एक मोटरसायकल आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्यामध्ये झालेल्या धडकेमध्ये एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.. शहाजी संताजी देशमुख अस त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.. घटने नंतर सासवड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी वाहातुक सुरळीत केली आहे.          तर टेम्पो चालक स्वतःहून पोलिसात हजार झाला आहे.याबाबत मयत देशमुख यांचा मुलगा गिरीश शहाजी देशमुख यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे .   तर याबत प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार आज सोमवारी मयत शहाजी देशमुख हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 12 aq 9350 व टेम्पो क्रमांक mh 12 hx 5936 यांच्यामध्ये अपघात झाला आणि त्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला मार लागला .यामध्येच त्यांचा मृत्यू झाला .याबाबतचं अधिक...

जेजुरी जवळील भोरवाडी फाटा येथे एस.टी. बस आणि दुचाकीचा भीषण अपघात

Image
  जेजुरी जवळील भोरवाडी फाटा येथे एस.टी. बस आणि दुचाकीचा भीषण अपघात  अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी  जेजुरी दिनांक २०             पुणे पंढरपूर महामार्गावरील जेजुरी नाजूक भोरवाडी फाटा येथे दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे ..यामध्ये दुचाकी वरील दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर झाला आहे.     पुण्याहून संगोळला निघालेली बस आणि वाल्हे हून जेजुरीला निघालेली मोटरसायकल यांची समोर समोर धडक झाली.दुचाकीवरील एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत दाते अस या तरुणाच नाव असून तो वाल्हे नजीक सुखलवाडी येथील रहिवाशी आहे तर दुसरा तरुण वाल्हे येथील असून तुषार अस नाव असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.  घटनेनंतर वाल्हेकर ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.त्यामुळे पुणे पंढरपूर मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला होता.जेजुरी पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र लोक आक्रमक झाले होते .चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ल...

मराठी पत्रकार परिषदेची उपक्रमशीलता नागपूरमध्ये ,शुध्द लेखनाचं महत्व', नगरमध्ये 'जागतिक छायाचित्र दिवस', तर सांगलीत 'डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळा'.

Image
  मराठी पत्रकार परिषदेची उपक्रमशीलता नागपूरमध्ये , शुध्द लेखनाचं महत्व', नगरमध्ये ' जागतिक छायाचित्र दिवस', तर सांगलीत ' डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळा'. मुंबई :       उपक्रमशीलता हा मराठी पत्रकार परिषदेचा स्थायीभाव आहे. मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका संघाच्यावतीने राज्यभर सातत्यानं विविध आणि अभिनव उपक्रम सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात नागपूर जिल्हा संघाने शुद्धलेखन कार्यशाळा, नगर जिल्हा संघाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकारांचा काल सत्कार, तर सांगली जिल्हा संघाने डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या तिन्ही उपक्रमशील जिल्हा शाखांचै अभिनंदन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे.      'शुध्द लेखन' हा विषय आज दखल घ्यावा असा राहिला नाही असं मत व्यक्त केलं जातं. शुध्दलेखन महत्वाचे नाही आशय महत्वाचा आहे असंही अनेक जण बोलतात. मात्र आमच्या नागपूर जिल्हा संघानं पत्रकारांसाठी आणि आम जनतेसाठी शुद्धलेखन कार्यशाळेच्या माध्यमातून शुध्द...

उद्या रविवारी रेल्वेने प्रवास टाळा... सातारा पुणे दरम्यान दिवसभर रेल्वे वाहतूक बंद.

Image
  उद्या रविवारी रेल्वेने प्रवास टाळा... सातारा पुणे दरम्यान दिवसभर रेल्वे वाहतूक बंद. नीरा : मुंबई कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द व पुणे कोल्हापूर दरम्यान धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे सातारा दरम्यान रद्द झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.     कोल्हापूर पुणे लोह मार्गावरील मिरज पुणे दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व काही ठिकाणी नव्याने अंडरपासची कामे सुरू आहेत. रविवारी नीरा लोणंद दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक नव्या रेल्वे रुळांना  जुन्या रुळांशी जोडण्याची काम व इतर कामे होणार आहेत. यामुळे काही दिवसभरासाठी संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागत असते. रविवार दि. २० ऑगस्ट रोजी गाडी नंबर ११०३० कोल्हापूर हुन मुंबईकडे जाणारी व ११०२९ मुंबई हुन कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस धावणार नाही तसेच ११४२५ पुणे ते कोल्हापूर व ११४२६ कोल्हापूर ते पुणे पॅसेंजर गाडी पुणे ते सातारा दरम्यान बंद राहणार आहे. कोयना एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडीच्या दोन्ही दिशांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा असे आव्हान रेल्वे ...

पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुरंदर तहसीलला आंदोलन. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन

Image
 पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुरंदर तहसीलला आंदोलन.  पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन पुरंदर :               महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. याच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकार 'पत्रकार कायद्याचा होळी' व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आ. एस. एम. देशमुख सर व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदर तहसील कार्यालयावर आंदोलन करत निवेदन दिले.         पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार निलेश भुजबळ, महिला संघटक छायाताई नानगूडे यांनी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांना निवेदन दिले.        पत्रकारांवर होणारे अन्याय व त्यावर न मिळणारा न्याय यातच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी न होणे यामुळे राज्यात विविध ठिकाणी पत्रका...

पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमला पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी : एस.एम.देशमुख यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार.

Image
  पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमला पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी : एस.एम.देशमुख यांनी मानले राज्यातील पत्रकारांचे आभार. मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभर होळी करण्यात आली. मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची होळी करण्याचा प्रयत्न करणार्‍या एस. एम. देशमुख यांच्यासह पन्नासाहून अधिक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. राज्यात आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनास राज्यभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.        महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. राज्यात चार वर्षात २२५ पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले. चार वर्षात या कायद्यान्वये एकाही आरोपीला शिक्षा झालेली न...

पुरंदरच्या पत्रकार निखिल जगताप यांना आदर्श युवा पुरस्कार जाहीर

Image
  पुरंदरच्या पत्रकार निखिल जगताप यांना आदर्श युवा पुरस्कार जाहीर पुरंदर प्रतिनिधी :         पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील दैनिक प्रभातचे पत्रकार, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य निखिल सतिश जगताप यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे.       रविवार (दि.20)रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, अंथुर्णे (ता.इंदापुर) या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.         निखिल जगताप हे मागील अनेक वर्ष ग्रामीण भागात पत्रकारीता क्षेत्रात काम करीत आहेत. राजकीय, कृषी, सामाजिक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पत्रकारीतेच्या माध्यमातुन युवा पत्रकार म्हणून आपला ठसा उमटविला आहे. तर वंचित घटकांना न्यायहक्कांसाठी जगताप यांची पत्रकारीता प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलन कार्याध्यक्ष रानकवी...

जेजुरी येथे शिवसेनेचे नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन

Image
   जेजुरी येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आंदोलन  जेजुरी दि.१४

सासवड येथे सेवानिवृत्त कर्नल एम. डी. कदम यांच्या हस्ते होणार पालखी तळावर ध्वजारोहण

Image
  सासवड येथे सेवानिवृत्त कर्नल एम. डी. कदम यांच्या हस्ते होणार पालखी तळावर ध्वजारोहण   सासवड दि.१४ सासवड येथील पालखी तळावर असणा-या ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त कर्नल एम डी कदम यांच्या हस्ते आणि शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे अध्यक्षतेखाली ध्वजारोहण होणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशसेवा करणा-या जवानांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आणि सैन्यदल आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा पुरंदर हवेली तालुक्यातील युवक युवतींचा सन्मान होणार असल्याची माहिती सासवड येथील राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष अनिल गद्रे यांनी दिली आहे. सासवड येथील शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रध्वज समितीच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून येथील पालखी तळावर उभारण्यात आलेल्या उंच ध्वजस्तंभावर दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १ मे महाराष्ट्र व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १ म...

संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी. दि.१७ ऑगस्ट रोजी ११ संघटना राज्यभर निदर्शने करणार

Image
  संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी. दि.१७ ऑगस्ट रोजी ११ संघटना राज्यभर निदर्शने करणार मुंबई :  पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध करण्यासाठी येत्या १७ ऑगस्ट २२ रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या ११ पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.        या दिवशी मुंबईत दुपारी १२ वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन होईल. बैठकीच्या आरंभी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी पाचोऱ्यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आमदाराच्या दादागिरीच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे असा आग्रह धरला. तेव्हा सर्व उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास संमती दर्शवत १७ ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.          यावे...

पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण मुंबईतील अकरा संघटनांनी राज्यपालांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.

Image
 पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण  मुंबईतील अकरा संघटनांनी राज्यपालांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मुंबई :         पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आज पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. एक बंदुकधारी पोलीस त्यांच्या रक्षणार्थ ठेवण्यात आला आहे. मुंबईतील अकरा संघटनांच्या प्रतिनिधींनी काल राज्यपालांची भेट घेऊन संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांना तसे निवेदन पाठविण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाचे एस. एम. देशमुख यांनी स्वागत केले आहे.     जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसऱ्या दिवशी गुंडाकरवी मारहाण केली. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला. शुक्रवारी मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून पत्रकार संदीप महाजन यांना प...

नीरा कालव्याच्या मजबुती कारणासाठी अस्तरीकरण गरजेचे पाटबंधारे विभागाचे आंदोलकांना पत्र कालवा १४० वर्ष जुना झाल्याने मजबुतीकरण गरजेचे. नीरा दि. १२ निरा डाव्या कालव्याचा अस्तरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला निरा आणि परिसरातून काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. नीरा ग्रामपंचायतीच्या समोर एकत्र येत शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होते.यानंतर आता पाटबंधारे विभागाच्यावतीने या आंदोलकांना शनिवारी नीरा येथील कार्यालयात बोलावून या संदर्भातील एक पत्र देण्यात आले आहे. कालव्याचे अस्तरीकरण का महत्त्वाचा आहे याबाबत या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र आंदोलकांनी हे कारण अमान्य असल्याचे म्हटले असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या नीरा डाव्या कालव्याचे सध्या अस्तरीकरण करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट आणि मध्ये प्लॅस्टिक पेपर टाकून कालव्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मात्र या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अस्तरीकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नीरा येथे नुकतेच याबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलकांना आज दिनांक 12 रोजी पाटबंधारे विभागाकडून एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार नीरा डाव्याचे आयुष्य १४० वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कालव्यामध्ये खेकड्यांनी अनेक ठिकाणी घळ निर्माण केले आहेत. यामुळे अनेक वेळा कालवा फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याचबरोबर कालव्यातील एकूण पाण्या पैकी 50 टक्के पाणी हे गळती होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ही गळती थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे मजबुतीकरण करण्यात येत असल्याचे पाठाबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी कालवा अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक महेश जेधे, नीराचे उपसरपंच राजेश काकडे, दत्ता चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य,संदीप धायगुडे,भाजप युवक तालुका अध्यक्ष सुरेंद्र जेधे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जगताप व अनेक शेतकरी उपस्थित होते. महेश जेधे ( अस्तरिकरण विरोधी समितीचे समन्वयक) पाटबंधारे विभागाने कालव्याचे मजबुती कारण जरूर करावे.पण ते मुरूम आणि मातीयाचा वापर करून करावे.याला आमची काही हरकत नाही.पण शासन प्लॅस्टिक पेपर टाकून काँक्रिटच्या साह्याने मजबुती कारण करीत आहे.त्यामुळे कलाव्या शेजारील पाझर पाण्यावर असणारी शेती धोक्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी काँक्रिट करायला आमची हरकत नाही परंतु.सर्वच कालवा काँक्रिट टाकून लोकांना पाण्यासाठी भिक मागायची वेळ सरकार आणणार आसेल तर पुन्हा आंदोलन करावे लागेल.हे पाणी कोण सरकारच नाही तर ते जनतेच आहे.आमचा या पाण्यावर हक्क आहे.सरकारनं जनतेच हित पाहावं व्यापारी बनू नये.नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

Image
  नीरा कालव्याच्या मजबुती कारणासाठी अस्तरीकरण गरजेचे पाटबंधारे विभागाचे आंदोलकांना पत्र       कालवा १४० वर्ष जुना झाल्याने मजबुतीकरण गरजेचे.  नीरा दि. १२         निरा डाव्या कालव्याचा अस्तरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला निरा आणि परिसरातून काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. नीरा ग्रामपंचायतीच्या समोर एकत्र येत शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होते.यानंतर आता पाटबंधारे विभागाच्यावतीने या आंदोलकांना शनिवारी नीरा येथील कार्यालयात बोलावून या संदर्भातील एक पत्र देण्यात आले आहे. कालव्याचे अस्तरीकरण का महत्त्वाचा आहे याबाबत या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र आंदोलकांनी हे कारण अमान्य असल्याचे म्हटले असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे      पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या नीरा डाव्या कालव्याचे सध्या अस्तरीकरण करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट आणि मध्ये प्लॅस्टिक पेपर टाकून कालव्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. मात्र या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अस्तरीकरणाला तीव्र विरोध दर्शव...

*अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट* *आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

Image
  *अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट* *आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी* मुंबई :  पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मुंबईतील अकरा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली. या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले.       पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसऱ्या दिवशी गुंडाकरवी मारहाण केली याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला. आज शुक्रवारी मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. यावर या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपाल महोदयां...

संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध. महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले.

  संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध. महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले. मुंबई : पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून "किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जवितास धोका असल्याची तक्रार" महाजन यांनी पोलिसात केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटलांच्या या मुजोरीचा तीव्र शब्दात धिक्कार केला असून किशोर पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.       पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ...

एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यापेक्षा लाख मराठा एक होणं महत्वाचे आहे.: अभिजित जगताप

Image
 एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यापेक्षा लाख मराठा एक होणं महत्वाचे आहे.: अभिजित जगताप  सासवड दि.९           सासवड येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र्य लढ्यातील सैनिकांना अभिवादन करण्यात आले. तर मराठा क्रांती मोर्चाच्या आठवणींना ही यावेळी उजाळा देण्यात आला. याच दिवशी सासवड येथे धरणे आंदोलनाची सुरवात करण्यात आली होती.         पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नऊ ऑगस्ट या क्रांती दिना निमित्त सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर सहा वर्षांपूर्वी क्रांती दिनाचा औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या आठवणींना सुद्धा उजाळा देण्यात आला. मराठा समाजाच्यावतीने आत्ता पर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. मूक मोर्चा काढला. मात्र शासनाने याकडे फारसे लक्ष दिले नाही. एक मराठा लाख मराठा असं म्हणण्यापेक्षा लाख मराठा एक होण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पुरंदर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्...

ही आहे चीड... हा आहे संताप... मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेत्यांच्या नावाने शिमगा! रस्त्याच्या समस्येसाठी रायगड प्रेस क्लब उतरली रस्त्यावर.. लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंधच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत - एस एम देशमुख

Image
  ही आहे चीड... हा आहे संताप... मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेत्यांच्या नावाने शिमगा! रस्त्याच्या समस्येसाठी रायगड प्रेस क्लब उतरली रस्त्यावर.. लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंधच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत - एस एम देशमुख आता रायगड प्रेस क्लबचे आंदोलन प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या दारात होणार ! रायगड :       वाकन - रोहा - रायगड प्रेस क्लबच्या वतीने नागोठणा ग्रामिण पत्रकार संघाच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्याची वडखळ ते इंदापूर पर्यत झालेल्या दुरावस्थेच्या विरोधात आज वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलनाचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे मार्गदर्शन एस. एम. देशमुखांनी या महामार्गाच्या कामात सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींचे असलेले आर्थिक हितसंबंध हेच महामार्गाच्या विलंबास व दुरावस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप करीत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पुर्ण न झाल्यास १५ सप्टेंबर रोजी रायगड मधील सर्व लोकप्रतिनिधींच्या दारा समोर पत्रकारांचे बोंबाबोंब आंदो...

नीरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुंबई गोवा मार्गाच्या कामासाठी करण्यात आले एसएमएस आंदोलन

Image
 नीरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुंबई गोवा मार्गाच्या कामासाठी करण्यात आले एसएमएस आंदोलन  नीरा दि. ९       पुरंदर तालुक्यातील निरा येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. पुणे जिल्हा पत्रकार संघ पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ व मराठी सोशल मीडिया परिषद यांच्या वतीने एसएमएस आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे यांना  एसएमएस पाठवून मुंबई गोवा राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.                  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गाचा दुरुस्ती साठी  स आंदोलन आज राज्यभर सुरू आहे. या आंदोलनाला पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ त्याचबरोबर पुणे जिल्हा सोशल मीडिया संघाच्या वतीने सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे.    यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सहप्रशिद्दीप्रमुख भरत निगडे,पुणे...

गारडे धरण १०० टक्के भरले

Image
 गारडे धरण १०० टक्के भरले  सासवड  दि. ८             पुरंदर तालुक्यातील सासवड शहराला पाणीपुरवठा  करणारे गाराडे धरण. आता १०० टक्के भरले असून  आता धरणाच्या संडव्यातून कऱ्हा नदीत पाणी वाहू लागले आहे.   ६५.३७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण  आता १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या धरणातून कर्‍हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्‍यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग चालू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली. कर्‍हा नदीवरील गराडे धरणातून सासवड शहरासह गराडे गावासह कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्‍हा नदी प्रवाहित होत गराडे धरण 100 टक्के भरले आहे. दुसरीकडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी पूर्व भरून वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे ...

कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन लोकप्रतिनिधींना १०,००० एस.एम एस पाठविणार

Image
  कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन लोकप्रतिनिधींना १०,००० एस.एम एस पाठविणार महाड :        मुंबई - गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली १२ वर्षे रखडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार बुधवारी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करीत आहेत. वाकण नाक्यावर हे आंदोलन होत असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.       मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. १२ वर्षे होऊन गेले तरी काम पूर्ण झालेले नाही. सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले पण काम पूर्ण झाले नाही. चौपदरीकरण तर होत नाहीच उलट रायगड जिल्ह्यात या रस्त्याची चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींनी या ख्ड्याबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत. त्य...

पिंगोरी येथे बिबट्या हल्यात कालवड जखमी भर वस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

Image
 पिंगोरी येथे बिबट्या हल्यात कालवड जखमी  भर वस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला       नीरा दि ५          पिंगोरी  (ता.पुरंदर) येथे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील कलावडींवर बिबट्याने हल्ला केला आहे.यामध्ये एक कालवड गंभीर जखमी झाली आहे. तर एक कालवड बिबट्याने ओढू नेली आहे. शनिवारी रात्री एक वाजलेच्या सुमारास भर वस्तीत असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने हा हल्ला केला आहे.           शनिवारी रात्री  १ वाजालेच्या सुमारास बिबट्याने पिंगोरी येथे हरिश्चंद्र दशरथ यादव यांच्या गोठ्यातील कालावडींवर हल्ला केला. यादव यांचे पुतणे नुकतेच जेजुरी एमआयडीसी मधून कामावरून घरी आले होते. कुत्र्यांच्या भुकण्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता. त्यांच्या चुलत्याच्या  गोठ्यात जनावरे ओरडत असल्याने त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या दिसून आला.त्यांना पाहताच बिबट्याने कालवड घेऊन पळ काढण्यास  सुरवात केली. मिलिंद यादव यांनी इतर लोकांना मदतीला बोलावून बिबट्याच्या तावडीतून कलावडीची सुटका केली.मात्र या दरम्यान ती कालव...

शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ?

Image
 शासनआपल्यादारी कार्यक्रमासाठी आता मधपाची दिशा आणि जागा थोडी बदलली           आतातरी कार्यक्रम निर्विघ्न होणार का ?   जेजुरी दि ५    पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम सलग चार वेळा पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर आता सोमवारी म्हणजे दिनांक सात ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम जेजुरी ते पुन्हा होणार आहे. मात्र हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाचे ठिकाण मात्र बदलण्यात आले आहे.   पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे शासन आपल्यादारी हा कार्यक्रम घेण्याचे राज्य सरकारने ठरवलं होतं. संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम होणार होता. अनेक लाभार्थींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ दिला जाणार होता. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जेजुरी येथील नवीन पालखीतळाची निवड केली होती. मोठी जागा असल्यामुळे या ठिकाणी दोन लाख लोक बसतील असा अंदाज करून या ठिकाणी मंडप टाकण्यात आला होता. स्टेज सजवण्यात आले होते. मात्र सलग चार वेळा या ठिकाणी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या ठिकाणचा मांडव ही काढण्यात आला...

नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Image
 नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा     नीरा. दि. ४       नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही काळापासून पडत असलेल्या पावसामुळे या खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या वीर, भाटगर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांचा एकूण पाणी साठा ८० टक्क्यांहून जास्त झाला आहे. गेल्या वर्षी याची दिवशी हा पाणी साठा कमी होता.    राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मात्र बेताचाच पाऊस झाला आहे. त्यातही पुरंदर आणि भोर तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमी पेक्षा कमीच आहे. भोरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने भोर आणि वेल्हा तालुक्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. तर पुरंदर आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी या धरणांचा एकूण पाणीसाठा ८२ टक्के झाला आहे. त्यामुळे निरा डावा कालवा आणि उजवा कालवाच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे. आज शुक्रवारी सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती न...