पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.

इमेज
 पुरंदरमध्ये कोराना रुग्ण.  नीरा :  दि. २८          पुरंदर तालुक्यात कोव्हिड रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात यापूर्वी दोन रुग्णांचे अहवाल बाधित आले असुन, आता सुपे (खुर्द) येथील एक युवकाचा सोमवारी कोरोना बाधित अहवाल आला आहे.     मागील आठवड्यात सासवड शहर व वनपुरी येथे प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल कोरोना बाधित आला होते. ते दोघे आता पुर्ण बरे झाले असुन, सोमवारी पुण्यातील सिरम कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी कंपनीत करण्यात आली होती. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील पानवडी रोडवरील सुपे (खुर्द) येथील एक व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसून तो होम आश्युलेशन मध्ये आहे. त्यांच्या संपर्कातील १३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली आहे.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द

इमेज
 अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द; सदावर्ते यांना नेमकं काय भोवलं?  मुंबई. दि. २८             प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून आता पुढील दोन वर्ष त्यांना कोणतीही केस लढता येणार नाही .       मुंबईतील वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. बार कौन्सिलच्या नियम सात नुसार गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केलं होतं आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंड...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

इमेज
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द नवी दिल्ली दि.२४ देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यां...

आंतरजातीय विवाह करा आणि बना सरकारचे जावई मिळणार 10 लाख रुपये हुंडा

इमेज
 आंतरजातीय विवाह करा आणि बना सरकारचे  जावई मिळणार 10  लाख रुपये  हुंडा  नवी दिल्ली दि.24    आपली भारत देशात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना नेहमीच विरोध केला जातो. आजही  जात किंवा धर्माबाहेर लग्न केल्यामुळे अनेक समाजात आणि कुटुंबात वाद होतात. किंवा अशावेळी मुला मुलींची हत्या देखील केली जाते पण आता हा विवाह झाल्यास मोठी रक्कम त्या जोडप्याला मिळणार आहे.आणि त्यामुळे समाजाने नाकारले तरी नवं जोडप्याचा रोजी रोटीचा प्रश्न मिटणार आहे. पण सामाजिक समता आणि सलोखा राखण्यासाठी त्याच बरोबर अस्पृश्यता निर्मुलनासाठी सरकार काम करत आहे. राजस्थानमध्ये आंतरजातीय विवाहाला देण्यासाठी  प्रोत्साहन रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम 5 लाख रुपये होती.  राजस्थानमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागातर्फे संचालित डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना  अंतर्गत, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन रक्कम आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत...

सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन

इमेज
 सासवड येथे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आंदोलन राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप. आदानी आणि मोदींचा रिस्ता काय ?  काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी     सासवड दि.२४             पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दुपारी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या निर्णयाचा निषेध या आंदोलनातून करण्यातआला.             केंद्र सरकार जाणून-बुजून राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत मोदी आणि आदानी यांचा संबंध काय ? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच सरकार त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सासवड येथील शिवतीर्थ चौकामध्ये एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल. काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीप प...

१९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार

इमेज
 १९८६ सालाच्या पदवीधराची जिद्द, मेहनत...! खडकाळ माळरानावर फुलवले शिवार पुरंदर तालुक्यातील गोपाळ कदम यांची सक्सेस स्टोरी.... शासनाची मिळाली मदत, झाला शेतीत फायदा पुणे:   शेतकरी जर उच्च शिक्षित असेल आणि त्याला शासनाच्या योजनांची साथ मिळाली तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील शेतकरी  गोपाळ गजानन कदम. यांनी पुरंदर तालुक्यातील सटलवाडी  या आपल्या गावी खडकाळ माळ रानावर शेतीचा  यशस्वी प्रयोग करत  पिकांचे.शिवार फुलवले आहे. त्यांनी खडकाळ  माळ रानावर डाळींब, सीताफळ यांच्या उत्पन्न तर घेतलेच पण  ते सोबतच तरकारी मालामध्ये कारले, घेवडा कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील घेतले. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आहे.  पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील शेतकरी गोपाळराव कदम हे वारकरी कुटुंबातील. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. त्या काळात शासकीय नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या काळी शिक्षकाला दीड ते दोन ह...

लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला

इमेज
  लग्नाच्या पहिल्याच रात्रीच नवरीन नवरदेवाला दिला मोठा झटका. सत्य समजताच नवरदेव हादरला नवी दिल्ली दि.२३     आपल्याकडे समाजात लग्नाला खूप शुभ मानले जाते. ज्या घरांमध्ये लग्नं होणार आहे, तिथे आनंदाचं वातावरण असतं. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात इतकं काम असतं की लोक रात्रंदिवस व्यस्त असतात. लग्नाच्या काही दिवस आधी वधू-वरांच्या घरी मंगल गीते सुरू होतात. घरे सजवली जातात. पाहुण्यांची कोणतीच तक्रार नसावी म्हणून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुसरीकडे, वधू आणि वर पहिल्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. भेटीची पहिली रात्र संस्मरणीय करण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाला धोका मिळाला तर त्याची काय अवस्था होईल? अशीच एक घटना इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली.नवरीकडील लोकांनी कट रचून हे लग्न लावलं होतं. दलालाने त्या व्यक्तीचं लग्न ठरवलं. ठरलेल्या तारखेला रीतिरिवाजांसह विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी, वर आपल्या वधूसह नवीन जीवन सुरू करण्यासाठी उत्सुक होता. मात्र नवविवाहित वधूने वराला सांगितलं की तिला मासिक पाळी सुरू झाली आहे, त्...

शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये बैठक, संजय राऊत उपस्थित राहणार? : EVM चा मुद्दा ही तापणार

इमेज
  शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये बैठक, संजय राऊत उपस्थित राहणार? : EVM चा मुद्दा ही तापणार लोकसभा निवडणुकांचे  वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. देशात २०२४ मधील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी  आणि भाजप सरकारची सत्ता उलथवून देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकजुटीनं प्रयत्न करायला हवेत, असा सूर उमटतोय. आणि म्हणूनच आज खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची एक बैठक होते आहे.या बैठकीला शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत.    भाजपचे सरकार हटवण्यासाठी  काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरु आहेत. देशभरात भाजपविरोधी नेत्यांवरील कारवाया आणि छापेमारीचं वातावरण तापलं असतानाच दिल्लीत आज एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनुभवी राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार या बैठकीचं नेतृत्व करत आहेत. देशातील विरोधी पक्षांचे बहुतांश नेते आज २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. शिवसेना खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहणार का, अशी चर्चा आहे. स्व...

अखेस संजय राऊत यांना पदावरून हटवले

इमेज
 संजय राऊत यांना पदावरून हटवले  नवी दिल्ली दि. २३     शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हटवण्यात आले आहे.तर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचं अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे.  शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी संजय राऊत होते. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालं होतं. त्यानंतर संजय राऊत यांची मुख्य गटनेते पदावरुन हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत होती.  दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं असून यामध्ये असं म्हटलं की, "२१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली या बैठकीत एकमतानं ठराव करण्यात आला की, संजय राऊत हे यापुढं संसदेतील मुख्य नेते नसतील तर गजानन किर्तीकर असतील. आता आमची संख्या जास्त असल्...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

इमेज
 काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा  सुरत येथील न्यायालयानं सुनावली शिक्षा  मुंबई दि.१३     2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी केलेल वक्तव्य राहुल.गांधी यांच्या एका वक्तव्याने ते चांगलेच आदचानित आले आहेत.मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? राहुल गांधीयांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून आता त्यांना दोषी ठरवत सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे        सन 2019 साली राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरातचे त्यावेळचे मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगि...

पुणे जिल्ह्यातील हा मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद

इमेज
 नीरा मोरगाव मार्ग वाहतुकीसाठी करण्यात आला बंद वाहन चालकांना आता नीरा जेजुरी मोरगाव असा प्रवास करावा लागणार नीरा दि.२३         पुरंदर तालुक्यातील नीरा ते बारामती तालुक्यातील मोरगाव दरम्यानची नगर- सातारा मार्गावरील वाहतूक बांधकाम विभागाने बंद केली आहे . त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात आली असून पुढील सात दिवस हा मार्ग बंद राहणार आहे.     सातारा नगर मार्गावर नीरा मोरगाव दरम्यानची वाहतूक बारामती बांधकाम विभागाच्या वतीने बंद करण्यात आली आहे. या मार्गावर गुळूंचे ते कर्नलवाडी दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.. आजपासून सात दिवस म्हणजेच 23 मार्च ते 27 मार्च दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.. याबाबतची माहिती बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.... त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा म्हणजेच नीरा-जेजुरी-मोरगाव या मार्गाचा वापर करावा असं आवाहन बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे ते बेंगलोर हून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे बेंगलोर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

इमेज
 कर्जत येथे मराठी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्नसरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांचे उपस्थितीचे आवाहन कर्जत (अहमदनगर)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा अहमद नगर जिल्ह्यातील कर्जत येथे ७ एप्रिल २०२३ रोजी होत आहे.. या मेळाव्याच्या दिवशीच म्हणजे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी पत्रकार परिषदेची बैठक होणार आहे.. बैठकीस अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सर्व संघटक, विभागीय सचिव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, राज्य प्रसिध्दीप्रमूख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.. कृपया नोंद घेऊन नियोजन करावे. या बैठकीस मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व विभागीय सचिवांनी परिषदेच्या सभासद नोंदणी व वर्गणीसह आपल्या भागातील जिल्ह्यांचा आढावा सादर करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन परिषदेचे सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय ...

हुर्रे संप मिटला!!! मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे.....!

इमेज
 हुर्रे संप मिटला!!!  मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप घेतला मागे.....! मुंबई दि.२०             राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना दिलेल्या  लेखी आश्वासन नंतर राज्यात मागील सात दिवसापासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेसाठी ही खरतर आनंदाची बातमी आहे.कारण या संपामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता             आज राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथर शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेले सात दिवस सुरू असणारा संप मागे मागे घेण्यात आला आहे,याबाबतची धोषणा  विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन लागू करण्यासंदर्भात सहकार्य करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला सहकार्य करावे असं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर सरकारने याबाबत लेख...

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे : एस.एम.देशमुख

इमेज
 पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई -चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे धनदांडगे मालक व सरकार आपल्या विरोधात आहे, आपल्या संघटनेला चहुबाजुंनी कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आपले फळांचे झाड आहे, त्या झाडाला बहर येऊ द्यायचा की वांझोटे ठेवायचे? याचा गंभिरपणे विचार करावा. पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून परिषदेच्या प्रसिद्धी विभागाने अधिक जागृत राहून परिषद करीत असलेले विधायक काम सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे’’ असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. देशमुख यांनी काल रात्री राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, ‘‘विरोधकांच्या अपप्रचाराकडे लक्ष न देता ...

बापरे ! पुरंदरच्या या पट्ट्यान बारामतीत जाऊन पावरांपुढे थोपटले दंड

  बापरे ! पुरंदरच्या या पट्ट्यान बारामतीत जाऊन पावरांपुढे थोपटले दंड    विजय शिवतारे यांचे शरद पवार उद्धव ठाकरे यांना दम असेल तर लढण्याचे आव्हान    

अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच

इमेज
 अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच  नवी दिल्ली दि १९      पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता एक नवीन एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी पहिल्यांदा २३ फेब्रुवारी रोजी अजनालाप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी त्याच्या सात सहकाऱ्यांना जालंधरच्या मेहतपूरजवळ ताब्यात घेतलं. त्या सात जणांना आता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. अवैधरितीने शस्त्र बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला. अमृतसर (ग्रामीण)चे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी सांगितलं की, अमृतपालचे सात सहकाऱ्यांना शस्त्र अधिनियमातील तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. एसएसपी यांनी सांगितलं की, आम्ही काल ...

फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

इमेज
 फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का ? शिरसाटांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल     मुंबई दि १८ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप- शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त ४८ जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार...अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बे-बनाव येतोय, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त ४८ जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला...

गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर

इमेज
 गुरोळीच्या उपसरपंचपदी संदीप खेडेकर सासवड : गुरोळीच्या (ता. पुरंदर) उपसरपंच पदी संदीप खेडेकर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायतच्या विशेष निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच मोहिनी मस्कु खेडेकर या होत्या .तसेच सहाय्यक म्हणून ग्रामसेविका अनिता भोस यांनी काम पाहिले गावची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती . सत्ताधारी गटांत ठरल्याप्रमाणे मधुकर खेडेकर यांनी राजीनामा दिला . त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती . त्या जागे करीता संदीप खेडेकर यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली . खेडेकर हे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचे खाजगी सचिव प्रशांत खेडेकर यांचे बंधू होत. पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नूतन उपसरपंच खेडेकर हे समर्थक आहेत .यावेळी कार्यक्रमास गुरोळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, माजी उपसरपंच मधुकर खेडेकर, सदस्य जीवन खेडेकर, रेणुका खेडेकर, सुरेश भोसले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी

इमेज
 पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जेडणाऱ्या रेल्वे मार्गाची खा.सुप्रिया सुळे यांची मागणी  सर्व्हे करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र भोर : दि.१८          बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी...

मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन

इमेज
 PUNE BREAKING!!!!! मोठ्या पगाराची नोकरी तरी आनंद मिळेना ; २७ वर्षांच्या तरुणान संपवलं जीवन    पुणे दि १८              पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या  ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंडवडमधील चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आज सकाळी आठ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या २७ वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे. वीरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता. वीरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुक मध्ये आपल्या आत्महत्या करण्याबद्दलचे कारण लिहून ठेवला आहे. मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहेत तरी मला आन...

नायगाव सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न

इमेज
 नायगाव सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न नायगाव दि.१७ पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नायगाव या सोसायटीच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे,आमदार संजय जगताप,माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले सोसायटीच्या इमारती साठी कर्ज उपलब्ध करून देऊ.नाबार्डच्या माध्यमातून काही योजना राबवू जेणे करून सोसायटीवर त्याचा बोजा पडणार नाही.पात्र शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचे आहे ते लवकरच मिळेल.शेतकऱ्यांना मिळणारी ६ टक्के व्याज रक्कम ह्या मध्ये केंद्र सरकार ३ टक्के व राज्य सरकार ३ टक्के आशी मिळते परंतु केंद्र सरकारचे ३ टक्के रक्कम न मिळाल्यामुळे राज्य सरकारची ३ टक्के रक्कम देणे बाकी आहे.तीही लवकर मिळेल.प्रत्येक तलावा पर्यंत पाईपलाइन आणणार आहे.नायगाव मधील राहिलेली कामे लवकरच पूर्ण करू. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ प्रा दिगंबर दुर्गाडे म्हणाले गुगल पे,फो...

सरपंचाच्या आश्वासनानंतर मुस्लिम बांधवांचे उपोषण घेण्यात आले मागे

इमेज
 सरपंचाच्या आश्वासनानंतर मुस्लिम बांधवांचे उपोषण घेण्यात आले मागे नीरा दि.१७    नीरा (ता.पुरंदर) येथील मुस्लिम दफन भूमीमध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी थांबवण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांकडून नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आलं होते. मात्र निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी याबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. नीरा येथील तरुण अन्वर सादिक शेख आणि अकबर सय्यद हे उपोषणास बसले होते तर त्यांना मुस्लिम समाजाकडून पाठिंबा देण्यात आला होता.    नीरा येथील पुणे पंढरपूर मार्गालगत वार्ड नंबर 2 मध्ये मुस्लीम समाजाची दफन भूमी आहे.या दफन भूमीच्या आसपास आता अनेक निवासी बांधकामे झाली आहेत.त्या भागातील सांडपाणी दफन भूमीतील कबरित जात आहे.आणि त्या ठिकाणी चिखल होत आहे.मुस्लिम समाजाकडून ग्रामपंचायतीला या बाबत अनेक वेळा कळवण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीकडून याबाबत दखल घेण्यात आली नाही.त्यानंतर आज दि.१७ रोजी मुस्लिम ग्रामस्थांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरपंच तेजश्री काकडे व उपसरपं...

राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी

इमेज
राज्यातील  महिलांसाठी आनंदाची बातमी  एसटीचे 50 टक्के सवलतीची तिकीट योजना महिलांसाठी आजपासून सुरू     नीरा दि.१६ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एसटीच्या प्रवासामध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास तिकीट देण्याची घोषणा केली होती .या घोषणाची अंमलबजावणी आज दिनांक 17 मार्च पासून सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो आहे. त्यामुळे आता महिलांचा प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.      पुरंदर तालुक्यातील नीरा एसटी स्थानकावर आज निरा येथील प्रवासी महिलांनी एकमेकींना पेढे भरून ही योजना सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यावेळी निरा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या राधा माने यांच्या सह अनेक प्रवासी महिला व भाजपच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरून शिंदे सरकारचे आभार मानले व शिंदे सरकारचं धोरण महिलांसाठी चांगला असल्याचे म्हटले आहे 

स्री पुरुषाने सहमतीने एकत्र रहाणे म्हणजे शारीरिक संबंधांना परवानगी नव्हे. उच्च न्यायालयाचा निर्वाळा

इमेज
  स्री पुरुषाने सहमतीने एकत्र रहाणे म्हणजे शारीरिक संबंधांना परवानगी नव्हे. उच्च न्यायालयाचा निर्वाळा  मुंबई दि.१५   एखादी महिला तिच्‍या सहमतीने पुरुषाबरोबर राहण्‍यास आली तर त्‍याचा अर्थ तिने शारीरिक संबंधांना परवानगी दिली, असा होत नाही. एखाद्या महिलेने सहवासात राहण्‍यास संमती देणे आणि शारीरिक संबंधांना परवानगी देणे, या दोन वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत. त्‍यामुळे सहवासात राहण्‍यात आली म्‍हणून महिलेची लैंगिक संबंधास परवानगी आहे, असा अर्थ पुरुष काढतो याला आधार नाही, असे स्‍पष्‍ट करत दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने झेक रिपब्लिक येथील बलात्‍कार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. झेक रिपब्लिक येथील आरोपीने १२ ऑक्‍टोबर २०१९ रोजी दिल्‍लीतील एका वसतिगृहात आपल्‍याच देशातील महिलेचा विनयभंग केला. यानंतर ३१ जानेवारी २०२० रोजी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज आणि ७ फेब्रुवारी २०२० रोजी बिहारमधील गया येथील हॉटेलवर महिलेवर बलात्‍कार केला, असा आरोप झेक रिपब्लिक येथील नागरिकावर होता. आरोपीची जामिनासाठी उच्‍च न्‍यायालयात धाव या प्रकरणी ६ मार्च २०२२ रोजी दिल्‍लीत गुन्‍हा दाखल झाला. पीडित महिलेने ...

सरकारकडून मेस्मा कायद्याला विनाचर्चा मंजुरी संपकऱ्यांची डोके दुखी वाढली

इमेज
  सरकारकडून मेस्मा कायद्याला विनाचर्चा मंजुरी          संपकऱ्यांची डोके दुखी वाढली     मुंबई दि.१५  जून्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्वच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने मंगळवारी पहिल्या दिवशी राज्यातील कारभार ठप्प झाला.यानंतर मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई बडगा उगरण्यात येणार आहे. संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात मंगळवारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) घाईत मंजूर केला. संप करणाऱ्यांना ताक्ताळ अटक करण्याची तरतुद करण्यात आली आहे.   याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2018 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असलेला मेस्मा कायदा 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपला होता. त्यामुळे 28 फेब्रुवारीनंतर राज्यात मेमसा कायदा अस्तित्वात नव्हता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने हा कायदा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काल हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडून चर्चेविना मंजूर करण्यात आले. ह...

वाल्हे येथे रेल्वे खाली येवून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

इमेज
 वाल्हे येथे रेल्वे खाली येवून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू   नीरा दि.१४   पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रेल्वे स्टेशन नजीक एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांना या व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. यानंतर रेल्वे पोलीस या ठिकाणी दाखल झाले. असून तो मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. या संदर्भात रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाल्हे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आज सकाळी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. हा व्यक्ती स्थानिक असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर या व्यक्तीचे वय  अंदाजे  ६० ते ६५ वर्ष असावे. उंची पाच फूट तीन इंच असून  पांढरा शर्ट आणि पांढरी  प्यांट परिधान केली आहे. या वर्णनाचा  कोणाच्या घरातील व्यक्ती हरवला असल्यास रेल्वे पोलीस तसेच स्थानिक पोलिसांची संपर्क साधण्याचा आवाहन रेल्वे पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.  

श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी" साजरी

इमेज
 श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी" साजरी सासवड (प्रतिनिधी) बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर फाल्गुन कृष्ण पंचमीला पहाटे मंदिरात ४ ते ६ काकडा, सकाळी ६ते ७ आभिषेक पुजा होऊन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थाच्या वतीने दुपारी १२ वाजता नाथांची आरती झाली. त्यानंतर १२.३० वा. पारंपारीक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यांत आला. मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण रंगपंचमी ने यात्रा उत्साहात संपन्न झाली.          श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली. सकाळी ९ वाजता बोपगाव येथून पालखी - काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची, सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला. पुणे येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळ यांच्यावतीने सर्व भाविक भक्तांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले.      ग्रंथराज ज्ञानेश्वरी व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन देखील...

नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
   नीरा येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल    नीरा दि.११   नीरा ता.पुरंदर येथे माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी या बाबतची फिर्याद दिली आहेत तर मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्या पायाला मारलागला आहे.     माजी उपसरपंच कुमार मोरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कुमार मोरे यांनी जनरल स्टोअरचे दुकान चालवण्यासाठी शकुंतला जगताप यांच्याकडून वार्ड नंबर २ मधील सिटी सर्वे नंबर 432 व 433 मध्ये एक गुंठे जागा भाड्याने घेतली होती या ठिकाणी त्यांनी दुकानासाठी १० x १० ची टपरी टाकली होती. मात्र ही टपरी नितीन नितीन कांतीलाल बोरा यांच्या दुकानाच्या पुढील बाजूचे असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला दिनांक ९ मार्च 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजलेच्या सुमारास मोरे हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी गेले असता नितीन कांतीलाल बोरा यांनी मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ केली.त्याच बरोबर हातात गज घेऊन म...

नीरा येथे मोटरसायकल कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू

इमेज
  नीरा येथे मोटरसायकल कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू कंटेनरच्या चाकाखाली डोक चिरडल्याने झाला जागेवरच मृत्यू     नीरा  १०          नीरा (ता.पुरंदर)येथे असलेल्या नीरा नदीच्या पुलावर झालेल्या कंटेनर आणि मोटारसायकलच्या अपघातात पाडेगाव येथील एकाचा मृत्यू झालाय.. मोटासायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झालाय..अशोक रघुनाथ भोसले अस या मृत व्यक्तीचं नाव आहे...     याबाबत प्रत्यक्ष द्रशी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार पाडेगाव येथील आंबेडकर सोसायटी येथील राहणारे अशोक रघुनाथ भोसलेहे नीराकडे येत होते त्यावेळी लोणंद कडून एक कंटेनर येत होता.कंटेनर मोटार सायकल ला ओव्हर टेक करीत असताना मोटार सायकलला धक्का लागला त्यामुळे त्यांची मोटरसायकल पडली यावेळी भोसले देखील खाली पडले त्यांचे डोके कंटेनर च्या चाकाखाली गेले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला .. लोणंद पोलिसांनी मृत ताब्यात घेतला असून पुढील तपासणी साठी लोणंद येथे पाठवण्यात आलाय..        पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृत देह एक तास रस्त्यावर    ...

मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश

इमेज
 मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश अर्थमंत्र्यांकडून पत्रकार कल्याण निधीत 50 कोटीची वाढ   मुंबई- मराठी पत्रकार परिषदेने केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत आणखी ५० कोटींची वाढ करण्यात आल्याची घोषणा आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे.. त्यामुळे ठेवीतील रक्कम आता १०० कोटी झाली आहे.. या ठेवीच्या व्याजातून पत्रकार आरोग्य योजना आणि पत्रकार सन्मान योजना चालविल्या जातात..ठेवीतील रक्कम वाढविल्यामुळे पत्रकार सन्मान योजनेचा लाभ आता अधिकाधिक जेष्ठ पत्रकारांना मिळेल अशी अपेक्षा मराठी पत्रकार परिषदेने व्यक्त केली असून अधिक ५० कोटींच्या घोषणेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने धन्यवाद दिले आहेत.

आधी मटण खाल्ल,मग देवदर्शन ?

इमेज
  आधी मटण खाल्ल,मग देवदर्शन ? येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, शिवतारे यांची खोचक टीका शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करून केली टीका  शिवतारे यांनी मटणाचा व्हिडिओ आणि दर्शनाचे फोटो केले पोस्ट    बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सासवड येथे नागेश्वर मंदिर आणि संत सोपान काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले.. त्याच बरोबर त्यांनी मंदिराच्या माहिती घेतली... यानंतर पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केलीय.. सुळे यांनी अगोदर मटन खाल्लं आणि नंतर देवदर्शन घेतलं असं म्हणत त्यांनी फेसबुक वर सुळे यांचा एका हॉटेलमधील मटणाच्या थाळी बद्दल बोलत असतानाचा व्हिडिओ आणि फोटो त्यांनी फेसबुक वर शेअर केलेत..   शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. " आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदि...

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड

इमेज
 छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ बालाजी जाधव यांची निवड स्वागत अध्यक्षपदी प्रशांत पाटणे निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे : दशरथ यादव यांची माहिती सासवड, ता. ४ः राज्य स्तरीय १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी प्रशांत पाटणे यांची निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांची निवड करण्यात आली आहे, उदघाटक म्हणून शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक व प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.  मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी सासवड (ता.पुरंदर) येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनाचे हे १४ वे वर्षे आहे.  डॉ जाधव इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत, औरंगाबाद येथे पंचफुला प्रकाशन चालवीत आहेत,  स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे पुरंदर प्रतिष्ठान चे अध्यक्ष असून, पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभ...