Posts

Showing posts from April, 2022

"मी अजूनही मनसेतच मी मनसे सोडल्याच्या बातम्या निव्वळ अफवा" -वसंत मोरे यांचा खुलासा

Image
 "मी अजूनही मनसेतच मी मनसे सोडल्याच्या बातम्या निव्वळ अफवा" -वसंत मोरे यांचा खुलासा सासवड दि. ३० पुणे शहरातील मनसे म्हटलं की सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे भोंग्यांवरून राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्याला प्रतीविधान केल्यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना हटविण्यात आले व शशिकांत बाबर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आले तसे वसंत मोरे हे  पहिल्यापासून त्यांच्या विविध कामांतून त्यांच्या कार्यातून चर्चेत असतात एक आक्रमक नेता म्हणून वसंत मोरे यांची आगळी वेगळी  ओळख आहे.  राज ठाकरे यांची १  मे ला औरंगाबाद येथे सभा आहे काल राज ठाकरे हे मुंबईहून पुण्यात आले आहे. पुण्यात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी उपस्थित होते त्या वेळी प्रकर्षाने वसंत मोरे हे अनुपस्थिती असल्याचं निदर्शनास आलं माध्यमांमध्येही  आज त्यांच्या अनुपस्थिती बाबत "वसंत मोरे यांनी मनसे सोडली", "वसंत मोरे यांचा मनसेला रामराम" अशा आशयाच्या बातम्या झळकू लागल्या याबाबतीत चावडी न्युजने  वसंत मोरे यांच्याशी संपर...

भाऊचामळा सोसायटीच्या चेअरमनपदी विलास थोपटे, व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत थोपटे.

Image
 भाऊचामळा सोसायटीच्या चेअरमनपदी विलास थोपटे, व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत थोपटे. नीरा : दि.३०             पुरंदर तालुक्यातील ऊस बागायती गाव असलेल्या पिंपरे (खुर्द) येथील भाऊचामळा सोसायटीच्या चेअरमनपदी भैरवनाथ सहकर विकास पँनलचे बिनविरोध निवडून आलेले विलास थोपटे, तर चंद्रकांत थोपटे यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड  करण्यात आली. निवडीनंतर सोसायटी कार्यालयासमोर फटाके वजवून गुलालाची उधळण करण्यात आली.     नीरा येथील सोसायटी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील जगताप यांनी निवडणूक प्रक्रिया पारपाडली. निर्धारित वेळेत चेअरमनपदासाठी विलास थोपटे व व्हाईसचेअरमन पदासाठी चंद्रकात थोपटे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. जगताप यांना सचिव मचिंद्र लकडे यांनी सहकार्य केले.      पिंपरे (खुर्द) येथील भाऊचामळा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुकीक चुरशी होणार असल्याने कोणत्या पँनलचे उमेदवार निवडून येणार याकडे नीरा पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचा...

गुळुंचे येथील भैरवनाथ सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी नितीन निगडे व लालासाहेब निगडे.

Image
गुळुंचे येथील भैरवनाथ सोसायटीच्या स्विकृत संचालकपदी नितीन निगडे व लालासाहेब निगडे. नीरा दि.३० गुळुंचे (ता.पुरंदर) येथील भैरवनाथ वि.कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत  संचालकपदी नितीन बबन निगडे व लालासाहेब निगडे यांची निवड करण्यात आली आहे .आज (दि.३०) रोजी नीरा येथील सोसायटी कार्यालयात झालेल्या सभेत चेअरमन मल्हारी निगडे यांनी या निवडीची घोषणा केली. सर्व संचालकांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिंनदन केले. निवडीनंतर सोसायटी कार्यालयासमोर फटाके वजवून गुलालाची उधळण करण्यात आली.   नितीन  निगडे व लालासाहेब निगडे हे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक,मानले जातात. या  निवडी नंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कांचन निगडे, उत्तम निगडे, राजेंद्र निगडे, सोमनाथ खोमणे, विलास निगडे, बँक अधिकारी भुजबळ साहेब, यांनी त्याचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेचे  चेअरमन मल्हारराव निगडे, नितीन गायकवाड,मा चेअरमन जगदीश निगडे, चालक भानुदास निगडे, जेष्ठ नेतृत्व संचालक हरीकाका निगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सासवड येथे दोन महिलांनी वकिलाच्या बॅग मधील ५० हजार लांबवले

Image
 सासवड  येथे दोन महिलांनी वकिलाच्या बॅग मधील ५० हजार  लांबवले सासवड दि.३०     पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुणे जिल्हा बँकेत  पैसे काढायला गेलेल्या वकिलाला  येथे असणाऱ्या दोन अनोळखी महिलांनी चांगलीच हातचलाखी दाखवली आहे यामध्ये त्यांचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले आहेत.या बाबत त्या वकिलाने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम   ३७९ व ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.     याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात वकील असलेले व खानवडी तालुका पुरंदर येथे राहणारे स्वप्नील एकनाथ होले यांनी फिर्याद दिली आहे.त्यानीं दिलेल्या फिर्यादी नुसार काल दिनांक 28 रोजी सासवड येथे जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी ७५ हजार रुपये काढून त्यांच्या बॅग मध्ये ठेवले होते.थोडावेळ ते त्यांच्या मित्र सोबत बोलत असताना संशयित दोन महिला त्यांच्या पाठीमागे  उभ्या होत्या .त्यातील एका महिलेने त्यांच्या बॅग मधील पन्नास हजाराचा बंडल काढून घेतला.याबाबाच सिसी टिव्ही पुटेजही त्यांना ...

सासवड येथे पत्रकार व पोलीस यांच्यावतीने मुस्लीम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन

Image
  सासवड येथे पत्रकार व पोलीस यांच्यावतीने मुस्लीम बांधवांसाठी   इप्तार पार्टीचे आयोजन सासवड दि.२९ पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दिनांक २९ एप्रिल रोजी इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लीम बांधवांचे सध्या रोजे सुरु आहेत. अनेक मुस्लीम बांधव या महिन्यात रोजे पाळत असतात्त सायंकाळी हे रोजे सोडले जातात.          सासवड पोलीस स्टेशन व सासवड शहर पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी इप्तार परतीचे आयोजन करण्यात येते. त्या प्रमाणे आज या पार्टीचे   आयोजन करण्यात आले होते. यावेळी   सासवड शहरतील सर्व   मुस्लिम बांधवाना पत्रकार संघाच्यावतीने तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने   रमाजनच्या   शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी   पत्रकार   हेमंत ताकवले, श्रीकृष्ण नेवसे, बाळसाहेब कुलकर्णी,   वामन जगताप,   आरोग्य आधिकारी मोहन चव्हाण, तसेच मुस्लिम समाज चे आरीफ आतार,   हासन तांबोळी, आकबर ईनामदार, समस्त मुस्लिम समाज उपस्तीत होता.  

वाल्हे येथील कुस्ती आखाड्यात १०० पैलवानांचा सहभाग.

Image
 वाल्हे येथील कुस्ती आखाड्यात १००  पैलवानांचा सहभाग. वाल्हे (दि.२७) वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्राच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा चांगलाच रंगला.  पुरंदर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो पहिलवान यांनी हजेरी लावली होती.  आखाड्यातील पुरंदर केसरी विजेत्यासह,  मुलींच्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या. कुस्ती आखाड्यामध्ये जवळपास १०० मल्लांच्या लढती झाल्या. वाल्हे येथील श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त सहा दिवशीय यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते.  कुस्ती आखाड्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष साहेबराव पवार, वाल्हे गावचे पाटील गिरीश पवार, सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी सरपंच महादेव मंदिर, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, आडाचीवाडी सरपंच दत्तात्रेय पवार, उद्योजक गोरख कदम,  राहुल यादव, प्रविण कुमठेकर, बाळासाहेब राऊत, प्रा. संतोष नवले, वाल्मिकी सोसायटीचे चेअरमन मदन भुजबळ, उपाध्यक्ष जयवंत भुजबळ आदिंसह ग्रामस्थ व...

वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर यांची निवड

Image
  वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर यांची निवड   वाल्हे  ( दि.२७) पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची असणा-यां   वाल्हे   ग्रामपंचायतीच्या   उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य अंजली दिपक कुमठेकर  यांची बिनविरोध निवड झाली.    माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने , रिक्त झालेल्या जागेवर बुधवार (दि.२७) निवडणुक घेण्यात आली. सरपंच अमोल खवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत , उपसरपंचपदासाठी अंजली कुमठेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने , बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडूक अधिकारी बबनराव चखाले यांनी जाहिर केले.     अंजली कुमठेकर या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विक्रमी मताने निवडून आलेले असून ,  वाल्हे   ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या मध्ये त्या जेष्ठ सदस्या आहेत.  अंजली कुमठेकर यांच्या निवडीनंतर , सरपंच अमोल खवले , माजी सरपंच दत्तात्रय पवार यांचा सत्कार करण्यात आला.     यावेळी , माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे , सूर्यकांत भुजबळ , पोपट पवार ,...

खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी अजित लकडे यांची निवड

Image
 खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी अजित लकडे यांची निवड  सोमेश्वरनगर दि.२९     ग्रामपंचायत खंडोबाचीवाडीच्या सरपंचपदी अजित लकडे यांची निवड करण्यात आली आहे.मावळत्या सरपंच सरपंच भाग्यश्री धनंजय गरदडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली        निवडणूक निर्णय अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी आज दिनांक २९/४/२०/२२ रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता . सकाळी दहा वाजता सर्व सदस्यांची बैठक आयोजित करन्यात आली होती यामध्ये या अजित विलास लकडे यांना सरपंच करण्याचे ठरले त्यानुसार लकडे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , तलाठी दादासाहेब आगम , ग्रामसेवक सीमा गावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मदत केली.               यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतराव मदने , विद्यमान संचालक , लक्ष्मणराव गोफणे , अभिजित काकडे , जेष्ठ नागरिक नाना ...

शरद पवार आणि उद्भव ठाकरे यांच्यात काय झाली चर्चा.? गूढ वाढले...

Image
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये दीड तासापेक्षा अधिक काळ चर्चा मुंबई दि.२९ राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून विविध मुद्द्यावरून वातावरण गढूळ झालेले असतानाच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली. साधारणपणे एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली त्यामुळे राज्यभरात या चर्चेविषयी चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळते आहे.          या बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जाते राज्यामध्ये हनुमान चालीसा, भोंगे आणि राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे होणारी सभा यामुळे वातावरण तंग झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेची बाजू व्यवस्थित हाताळने हे राज्य सरकारपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या विषयावर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कोणता कानमंत्र दिला? हे आगामी काळच सांगून देईल. मात्र तत्पूर्वीच या बैठकीबाबत राज्यभरात वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला उधाण आल्याचे पाहा...

पालखी मार्गावरील पिसूर्टी रेल्वेगेट जैसेथे ठेवल्याने प्रवाशांसह वारकऱ्यांमध्ये नाराजी

Image
 पालखी मार्गावरील पिसूर्टी रेल्वेगेट जैसेथे ठेवल्याने प्रवाशांसह वारकऱ्यांमध्ये नाराजी पालखी मार्गावरील पिसूर्टी रेल्वे क्रॉसिंगला उड्डापूलाची गरज नीरा : दि.२८        देशभरातील रेल्वे मार्ग  फाटक मुक्त करण्याचा मानस रेल्वे मंत्रालयाचा असुन ; पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - मिरज रेल्वे लाईनवरुन जणऱ्या प्रत्येक रस्त्यावरील फाकट हटवून रेल्वे खात्याने भुयारी मार्ग काढुन दिलेत आहेत . पण अत्यंत रहदारीच्या पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हे दरम्यानचे पिसूर्टी हद्दीतील रेल्वे फाकट क्रमांक २७ बाबत जैसेथे परिस्थिती रेल्वे विभागाने ठेवल्याने प्रवाशांनसह पायीवारी करणाऱ्यां वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.        ब्रिटिश काळात मिटर गेज व स्वातंत्र्यानंतर ब्रॉडगेज रेल्वे या मार्गावरून धावू लागली. गेली सत्तर वर्षे ही रेल्वे एकाच ट्रँकवरुन धावत आहे. मागील पाच वर्षे पुणे - मिरज दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण सुरु झाले. तसेच विद्युतीकरण ही शेवटच्या टप्यात आहे. मे महिण्याच्या पहिल्या आठवड्यात प्रायोगिक तत्वावर काही गाड्यांना इलेक्ट्रिक ...

पिंगोरीच्या सरपंचपदी जीवन शिंदे बिनविरोध निवड

Image
 पिंगोरीच्या सरपंचपदी जीवन शिंदे बिनविरोध निवड वाल्हे. दि.२९  पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आज जीवन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या निवडणुकीत जीवन शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.   पिंगोरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यामध्ये जीवन शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद लाखे यांनी जाहीर केले.त्यांना ग्रामसेवक अनिल हिरसकर यांनी सहाय्य केले. यावेळी उपसरपंच प्रकाश शिंदे,संदीप यादव, भाग्यश्री शिंदे सुषमा भोसले, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.दोन सदस्य अनुउपस्थित होते.       पिंगोरी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले होते.यानंतर उपसरपंचपदी प्रकाश शिंदे यांची निवड करून अतिरिक्त पदभार देण्यात आला .आज शासनाच्या आदेश नुसार सरपंचपद खुल्या वर्गासाठी ठेवण्यात आल्याने शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचे जीवन शिंदे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली . ...

वाघापूर येथे तीन ठिकाणी घरफोडी लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

Image
 वाघापूर येथे तीन ठिकाणी घरफोडी  लाखोंचा मुद्देमाल केला लंपास   जेजुरी दि.२९    पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथे विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी मध्ये  ५४४९०० रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याबाबत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४५७ व ३८० नुसार  अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दखल केला आहे.       याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या बाबत वाघापूर येथील पंढरीनाथ रघुनाथ चव्हाण  यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २७/४/२०२२  रोजी रात्री १० ते  दिनांक २८/४/२०२२ रोजीचे ३  वाजालेच्य  दरम्यानत्यांच्या घराची कडी  कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून घरातील सोन्याचे दागिने  चोरून नेले आहेत. तसेच गावांमधील विठ्ठल लक्ष्मण कुंजीर व सुभाष शंकर कुंजीर यांचाही घरात चोरी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण रोख रक्कम ४० हजार सह ५४४९०० रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोली...

हसन शेख खून प्रकरणामधील फरार आरोपी गोविंद वाघमारे जेरबंद

Image
 हसन शेख खून प्रकरणामधील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी गोविंद वाघमारे जेरबंद  स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई  सासवड दि २८ पुरंदर तालुक्यातील कोडित गावच्या हद्दी मध्ये  हसन शेख यांचा खून करण्यात आला होता यानंतर या खुनातील आरोपी मागील तीन वर्षापासून फरार होता. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला २६/४)२०२२ रोजी जेरबंद केल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.    पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे दिनांक २/२/२०१९ रोजी सकाळी १०:४० वाजण्याचे सुमारास  पूर्ववैमनस्य व  आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून  आरोपी मंगेश कदम रा.कोल्हेवाडी ता.हवेली जि.पुणे त्यांचे इतर 14 ते 15  सहकार्य यांनी मिळून हसन शेख रा.धायरीगाव यांचा गावठी काट्यातुन फायरिंग व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे येथे भारतीय दंड विधान कलम ३०२ तसेच आर्म अॅक्ट ३ चा २५ व ४ चा २६ प्रमाणे गुन्हा दाखल होता.     हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस यांनी तत्काळ अट...

सासवड मधील एकास पोस्को कायद्यांतर्गत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

Image
   सासवड मधील एकास पोस्को कायद्यांतर्गत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सासवड दि २८   पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या उमेश जाधव या आरोपीला शिवाजीनगर कोर्टाने  एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.   उमेश जाधव यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 354 354 ड प्रमाणे सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मे . जहागीरदार , शिवाजीनगर कोर्ट पुणे यांनी भारतीय दंड विधान कलम 354, 354 डी  मध्ये त्यास दोषी धरून त्यास एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.   . या गुन्ह्याचा तपास सपोनी  एस .व्ही . सावंत यांनी केला होता तर   अंमलदार सहाय्यक फौजदार शशिकांत वाघमारे, सासवड पोलिस स्टेशन व सहाय्यक फौजदार निचीत  यांनी   काम पाहिले असून सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती ब्रम्हे  मॅडम यांनी कामकाज पाहिले. 

सुनिता कसबे यांचा भाजपला रामराम

Image
 सुनिता कसबे यांचा भाजपला रामराम सासवड दि.२८   भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य मीडिया सदस्या सुनिता कसबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याबाबत ची माहिती त्यांनी आज दिनांक २८ एप्रिल रोजी माध्यमांना दिली आहे.      पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या सुनिता कसबे यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्य मीडिया सदस्य पदी दिनांक २१/५/२०१९ रोजी निवड करण्यात आली होती. गेली तीन वर्ष त्या या पदावर काम करीत होत्या. कसबे या आता पत्रकारिता करीत असल्याने त्यांच्या कामात अढथळा येऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील नगरपालिका महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीचा बार दिवाळीचे लाडू खाऊनच उडणार:

Image
 राज्यातील नगरपालिका महापालिका आणि  जिल्हापरिषद निवडणुकीचा बार दिवाळीचे लाडू खाऊनच उडणार:  निवडणूक आयोगाच्या सचिवांची माहिती मुंबई.           राज्यांमधील मुदत संपलेल्या वीस महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीचे निवडणुकांची रणधुमाळी ही दिवाळीचे लाडू खाल्ले नंतरच होणार हे आता  स्पष्ट झाले आहे. या निवडणुका जून-जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार नसल्याचं  स्पष्ट झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुका लवकरच  होतील याचा अंदाज व्यक्त केला होता.     मात्र या अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाकडून सादर करण्यात आले असल्याचे  सचिव किरण कुरुंदकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. कोल्हापूर मध्ये 23 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्याची सांगता झाली. त्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाची सुनावणी २५ तारखेला होईल. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास  राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणु...

कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा :उद्धव ठाकरे

Image
  कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा :उद्धव ठाकरे  मुंबई दि.२८         राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौथी लाठ उंबरठ्यावरच रोखायची असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर लोकांनी स्वत: हून मास्क वापरणे महत्त्वाचे आहे त्याच बरोबर प्रत्येकाने  लस घ्यायला हवी. असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहे. रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास अशा लोकांनी तत्काळ कोटना टेस्ट करायला हवी. राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढबावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.         कोविड संदर्भात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अध...

सांगली मध्ये संभाजी भिडे सायकलवरून पडले. गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Image
 सांगली मध्ये संभाजी भिडे सायकलवरून पडले. गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सांगली दि.२७      शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगली मध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. भिडे हे सायकलवरून जात असताना त्याच्या चक्कर आल्याने ते सायकलवरून पडले आणि त्यातून त्यांच्या गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.         भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी सायकलवरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे सायकलवरून खाली पडले संभाजी भिडे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत भिडे यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. संभाजी भिडे हे एकेकाळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होत. 1984 मध्ये त्यांनी शिवप्रतिष्ठानची स्थापना केली या नंतर ते शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करताना आढळून येतात. भिडे हे नेहमीच सायकलवरून प्रवास करत असतात. त्यांच्या सायकल प्रवासामुळे लोक त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. या अपघातात त्यांच्या ड ...

राज्यांमुळे इंधनाच्या दरात वाढ नाही. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्य नंतर उद्धव ठाकरे यांचे चोख उत्तर

Image
 राज्यांमुळे  इंधनाच्या दरात वाढ नाही : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्य नंतर उद्धव ठाकरे यांचे चोख उत्तर मुंबई दि.२७     राज्य सरकारने लावलेल्या  करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं  होत. लोकांच्या कल्याणासाठी  इंधनावरील वेट कमी करा अस त्यांनी म्हटलं होत मात्र यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्रीय  कराची आकडेवारी जाहीर केलीय.त्याच बरोबर केंद्राला सर्वात जास्त कर महाराष्ट्र देत.पा त्या प्रमाणात केंद्राकडून राज्याला वाटा मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दररोजच्या इंधन दर  दरवाढीच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आता आमने-सामने येताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरेंकडून इंधन दरवाढ संदर्भातील पंतप्रधानाच्या  मुद्द्यावर उत्तर देण्यात आले आहे.केंद्राकडून निधी वाटप करताना महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. सर्वात जास्त कर महाराष्ट्र राज्य केंद्र देते.मात्र केंद्राकडून वारंवार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात येते असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारव...

विवाह समारंभात चोरट्यांनी 3,60,000 रुपयाचे दागिने केले लंपास

Image
    विवाह समारंभात चोरट्यांनी 3,60,000 रुपयाचे दागिने केले लंपास   सासवड दि.२७            पुरंदर तालुक्यातील सासवड  नजीक असलेल्या जाधवगड येथील लग्न समारंभात चोरट्यांनी तब्बल 3,60,000 रुपयाचे दागिने व भेट वस्तूंवर हात साफ केला आहे. घटनेनंतर आठ दिवसानंतर सासवड पोलिसात संशयइतांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसानी भारतीय दंड विधान कलम    379 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.       याबाबत सासवड पोलिसानी दिलेली माहिती अशी कि, या संदर्भात फिर्याद पिंपळे गुरव पुणे येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला आलका सुरेश खाडे यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी विवाह समारंभात मेकअप करण्यासाठी आलेल्या तीन मुलींवर संशय व्यक्त केला आहे .    यामध्ये त्यांचे 1,35,000 रू किमतीची   तीने तोळे वजनाची सोन्याची मोहन माळ   40,000 रू किमतीचे   एक तोळा वजनाचे कानातील एक झुमके, 75,000 रुपये   रोख रक्कम   1,10,000/ रू किमतीचे   टायटन कंपनीचे कपंनीचे...

पिंपरे येथील रेल्वे फाटकामध्ये लोहमार्ग विस्तारीकरणाचे काम सुरु

Image
  पिंपरे येथील रेल्वे फाटकामध्ये लोहमार्ग विस्तारीकरणाचे काम सुरु पुणे पंढरपूर मार्ग जेजुरी ते नीरा वाहतुकीसाठी करण्यात आला बंद. नीरा दि.२९              पुरंदर तालुक्यातील   लोहमार्गाचे काम सुरु असल्याने नीरा नजीक असलेल्या पिंपरे   येथील रेल्वे फाटक क्रमांक २७ मध्ये आज लोहमार्गाची   दुसरी पटरी टाकण्याचे काम सुरु आहे .यासाठी पुणे पंढरपूर मार्ग   जेजुरी   ते नीरा दरम्यान बंद ठेवण्यात आला आहे. त्या ऐवजी वाहतूक जेजुरी –मोरगाव- नीरा अशी वळवण्यात आली आहे. आज दिनांक   २७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. साधारण शुक्रवार सकाळी ६ वाजे पर्यंत हे काम सुरु राहील असा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे . तालुक्यातील बहुतेक सर्व ठिकाणी   लोहमार्गाचे    दुहेरी करणाचे काम पूर्ण झाले आहे . पुणे- पंढरपूर मार्गावर असलेल्या २७   नंबरच्या रेल्वे फाटकावर काम अपूर्ण होते ते पूर्ण करण्यासाठी रेल्वेने हे फाटक दोन दिवस बंद ठेवले आहे.    

राणा दाम्पत्यावर राज्य सरकारन नक्की कोणत कलम लावले आहे ?

Image
राणा दाम्पत्यावर राज्य सरकारन नक्की  कोणत कलम लावले आहे ?   यात त्यांना   किती शिक्षा होऊ शकते ?                 अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारन गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकही केली आहे. त्यांना आप न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी याबाबात सावध भूमिका घेतली तर काही पुढाऱ्यांनी अत्यंत उथळ प्रतिक्रिया दिल्या आहेत.काहींनी तर थेट केंद्र सरकारचे गृह सचिवांची भेट घेतली आहे.अनेक हिंदी माध्यमांनी महाराष्ट्र सरकारने   केवळ हनुमान चालीसा म्हटल्यामुळे हा देशद्रोहाचा   दाखल केल्याच म्हटलं असून महाराष्ट्र   सरकार हिंदू विरोधी असल्याच भासवण्याचा प्रयत्नही केला आहे . पण काय आहे हे प्रकरण ? राणा दाम्पत्यावर नक्की कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शिक्षा काय आहे ? किती आहे ? व तो अशा पकारे दाखल करता येतो ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.        मनसेचे राज ठाकरे यांनी ह...

नवीन अपडेट : नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ४८ तास राहणार बंद, रेल्वेची माहिती

Image
 नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ४८  तास राहणार बंद, रेल्वेची माहिती पर्यायी मार्गाचा वापर करण्याची रेल्वे प्रशासनाची सूचना .  नीरा दि.२५      पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवार आणि   गुरुवार दोन दिवस वाहतुकीसाठी  ४८  तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.               पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर या पालखी महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट  रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी  बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ६  ते  शुक्रवार  दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी  सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी निरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्...