Posts

Showing posts from February, 2023

पुरंदर मधील शेतकऱ्याला १०० किलो वांग्याला मिळाले ६६ रुपये..! शेतकऱ्याची सटकली त्याने पीकच टाकले उपटून

Image
पुरंदर मधील शेतकऱ्याला  १०० किलो वांग्याला मिळाले ६६ रुपये..! शेतकऱ्याची सटकली त्याने पीकच टाकले उपटून सासवड दि.२७   राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे ३ रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे समोर असताना  आता पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला १०० किलो वाग्याला फक्त ६६ रुपये मिळाल्याचे  समोर आले आहे.  पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये हा प्रकार घडला आहे. तिथेच वांग्याची विक्री करण्यात आली आहे. या प्रकाराने शेतकऱ्याने संतप्त होत वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे हे शेतकरी  आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात ११ गुंठ्यांत वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी  पीक चांगले खत औषधे वापरून मोठे केले.  या ११ गुंठ्यांत पीक देखील चांगले आले. १०० किलो वांगे निघाले ते विक्री साठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे नेले मात्र त्याला बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून १०० किलो वांग्याना फक्त ६६ रुपये मिळाले. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे....

नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व- वासुदेव काळे

Image
  नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व-  वासुदेव काळे चांबळी येथे भाजप नेते जालिंदर कामठे आयोजित मन की बात  कार्यक्रम गराडे दि. 26 (वार्ताहर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामातून सध्या भारत देशाचा गतिमान विकास सुरू आहे. एकखांबी नेतृत्वामुळे गतिमान निर्णय घेतले जात आहेत. नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.     चांबळी (ता. पुरंदर ) येथे पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना श्री. काळे बोलत होते.     यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस माऊली शेळके, पुरंदर तालुका भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत रणवरे, संघटक शिवाजी शेंडकर, अनिल कामठे, गौरव कामठे, गणेश शेंडकर, रमेश कामठे, मधुसूदन शेंडकर, विशाल शे...

गुळूंचे कर्नलवाडी नियोजित खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा.

Image
 गुळूंचे कर्नलवाडी नियोजित खडिमशीन विरोधात  आंदोलनाचा इशारा.  खा. सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक नियोजिन केले.  नीरा :           गुळूंचे कर्नलवाडीसह चार गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडिमशीन मालाक कामाच्या हालचाली सुरुच आहेत. खडिमशीन मालकाने नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी मागील आठवड्यात जिलेटीनचा स्फोट उडवल्याने बोलाईमातेच्या प्रचिन गुफेत हदरे बसले होते.  ग्रामस्थांनी या नंतर प्रशासनाला खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बैठक नियोजित केले होती. यानिमित्ताने ग्रामस्थांनी या खडिमशीन विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दादा मागतली आहे.        बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांंनी गेली तीन वर्षांपासून खडिमशन टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी, पिंपरे, थोपटेवाडी, वाल्हे, सुकलवाडी, कामठवाडी या गावातील लोकांचा या नियोजित खडिमशीनला विरोध आहे. या खडिमशीन विरोधात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह ग्रामस्था...

नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

Image
 नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.  निर्भयपने, गैरमार्गाचा वापर न करता पेपर लिहिण्याचा दिला संदेश.  नीरा :         नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भीडपने पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी निर्भयपने व गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.     नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर १७२ मुले, १७९ मुली असे एकुण ३५१ विध्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सौ. लिलावती रिखावलाल शहा कन्या शाळा व महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथील विध्यर्थी या परीक्षा केंद्रावर  परीक्षा देत आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्हा बँकेच...

पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पत्रकार परीषदेचे नेते एस. एम. देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश.

Image
 पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पत्रकार परीषदेचे नेते एस. एम. देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश.   रत्नागीरी (प्रतीनीधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्या वर मराठी पत्रकार परीषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपी वर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटक हि झाली या कुंटूंबाला शासनाने मदत केली व इतरानीही मराठी पत्रकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांनी परीषदेच्या पदाधीकाऱ्यां सह वारिशे कुंटूंबाची भेट देऊन परीषदेचा मदतीचा धनादेश देऊन या कुंटूंबाला आधार दिला व सर्वोपरी सहकार्याचा शब्द दिला. पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली, कुटुंब रस्त्यावर आलं. वृध्द आई आणि मुलगा निराधार झाले. अशा स्थितीत त्यांला मदतीचे आवाहन केल्या नंतर महाराष्ट्रातून जवळपास दोन लाख रूपये यशच्या खात्यावर जमा झाले. काही रोख रक्कम आली. मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमूख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबई शहराध्यक्ष राजा आदाटे, मुंबई विभ...

राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करायला हवी : शरद पवार यांची मागणी

Image
  राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची  चौकशी करायला हवी : शरद पवार यांची मागणी  पुणे दि.१२  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा म मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे. पण राज्यपाल म्हणून त्यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल रमेश बैस है कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, पवार यांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवे राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? राज्यपाल कोश्यारी यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले ...

राज्यपालांच्या राजीनाम्याला खूपच उशीर झाला : उशिरा मिळालेला न्याय अन्यायच असतो. खा.उदयराजे भोसले यांची प्रतिक्रिया

Image
  राज्यपालांच्या राजीनाम्याला खूपच उशीर झाला : उशिरा मिळालेला न्याय अन्यायच असतो. खा.उदयराजे भोसले यांची प्रतिक्रिया    मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. विशेष म्हणजे यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देत कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले, “जसं राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख असतो, तसं राज्यपाल हे पद.. यावर जे कोणी विराजमान असतात ते या राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणं हे त्यांच्याकडून लोकांना अपेक्षित असतं. कारण नसताना कुठलही विधान करणं. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे कारण नसताना जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होतात, हे कशासाठी? " “जगभरातील मोठे योद्धे आणि शिवाजी महाराजांमध्ये एकच फरक होता, तो म्हणजे ते ...

शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने

Image
 शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचं एस.एम देशमुख यांचं आवाहन मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतील.. नंतर अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील.. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना उद्या दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील.. यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटना एकत्र येत आपल्यामधील एकजुटीचं दर्शन घडवत आहेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या आज झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोल...

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे?

Image
 पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे? मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा समाज घटकांना सवाल    सासवड दि.८ रत्नागिरी- समाजस्वास्थ्य आणि माध्यम स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे....भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार असल्याने लोकहितासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटनांनी पत्रकार शशिकांतच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढं आलं पाहिजे.. असं झालं नाही तर कोणताही पत्रकार कोणत्याच विषयावर भूमिका घेणार नाही.. मग पत्रकार भूमिका घेत नाहीत हा टाहो देखील आम्ही ऐकून घेणार नाही.. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी समाज काय करणार आहे? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी समाज घटकास केला आहे. मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, विरोधी भूमिका घेणारा पत्रकार कोणत्याच नेत्याला अथवा राजकीय पक्षाला आवडत नाही.. शशिकां...

राष्ट्रीय नियोजित महामार्गासाठी जेजुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समांतर जागा संपादित करावी .

Image
 राष्ट्रीय नियोजित महामार्गासाठी जेजुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समांतर जागा संपादित करावी .           अन्यथा जेजुरीत जनआंदोलनाचा ईशारा – अन्यायग्रस्त नागरिक  जेजुरी वार्ताहर दि ७ आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग रस्ता क्र ९६५ चे रुंदीकरण सुरु आहे. या रस्त्याला जेजुरीकर नागरिकांचा विरोध नाही मात्र मुख्य रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला खुणा करून हि केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील नागरिकांच्या वर सतत अन्याय केला जात आहे. जेजुरी शहरातून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणासाठी समांतर जागा संपादित करावी अन्यथा प्रशासना विरोधात शांततेच्या मार्गाने रास्ता रोको,आमरण उपोषण असे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे.      जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी विजय झगडे, ऋषिकेश दरेकर, संतोष झगडे,रियाज पानसरे,सागर काकडे,जोयेब खान,रमेश शेरे,मंगल काकडे, महानंदा खोमणे,विमल खोमणे, कमल खोमणे,,लीलाबाई खोमणे,सुशील काकडे, जब्बार...

शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत; विजय शिवतारे यांचे अनुमान काय ते पहा

Image
  शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत ; विजय शिवतारे यांचे अनुमान काय ते पहा    बारामती: देशाचा इतिहास , भूगोल , अर्थकारण राजकारण , सहकार , शेतकरी , कष्टकरी वर्गाच्या समस्यांविषयी जाण आणि राजकीय क्षेत्रात १८ तास काम करण्याची क्षमता तसेच प्रचंड दूरदृष्टी नेतृत्व असणारा देशातील एकमेव नेतृत्व म्हणजे शरद पवार. देशात पवारांच्या कर्तृत्वाबाबत कुणाचेही दुमत नाही , असे वक्तव्य माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत केले. विजय शिवतारे सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की , २०१४ साली पंतप्रधान कोण होणार याबाबत कल चाचणी घेतली जात होती. या चाचणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४३ टक्के , सोनिया गांधी १७ टक्के , राहुल गांधी यांना ८ टक्के आणि शरद पवार यांना दीड टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली होती. याचाच धागा पकडत शिवतारे म्हणाले की , या कलचाचणीत पवारांना दीड टक्के मते पडण्याचे कारण म्हणजे शरद पवारांचे राजकारण हे सेल्फ स्टॅंडर्ड तर मोदींचे राजकारण हे मिळालेल्या संधीतून राज्य घडवणे. देश सर्वात पुढे असल...

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

Image
 पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे.

आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती

Image
  आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती  अभिनंदनीय व अनुरकणीय म्हणून पुरंदरच्या पत्रकार मित्रांचा आम्हाला अभिमान आहे :  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले पुरंदर तालुका  मराठी  तालुका पत्रकार संघाचे कौतुक पुणे :             एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत, एव्हढ्या भव्य स्वरुपात उभं राहणार, किमान साडेतीन-चार कोटींचा, खर्च अपेक्षीत असलेले आचार्य अत्रेंच्या जन्मभूमीतील सासवड येथील भव्य-दिव्य पत्रकार भवन हे एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत एव्हढ्या भव्य स्वरुपात उभं राहणारं कदाचित राज्यातील पहिलेच पत्रकार भवन असेल म्हणूनच आम्हाला पुरंदर तालुका पत्रकार संघाचा अभिमान वाटतो. पुरंदरच्या पत्रकारांचे प्रयत्न अभिनंदनीय असून राज्यातील पत्रकारांसाठी अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांस येथे भेट दिली त्यावेळी बोलतांना केले.  आपल्या भावना व्यक्त करतांना एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, If yo...

'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख

Image
   'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख  मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुरंदरच्या पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी पुरंदर :          'पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्रीत येत पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत स्वमालकीची सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य वास्तू होत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी लगत असलेल्या या पत्रकार भवनाचा लाभ राज्यभरातील पत्रकारांसह यात्रेकरूंना होणार आहे. राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत, असाच आदर्श राज्यातील इतर पत्रकारांनी ही घ्यावा' असे प्रतिपादन एस. एम. देशमुख यांनी पुरंदरमध्ये केले.           मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाने सहा गुंठे जागा खरेदी करुन भव्य इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या इमारतीचे भुमिपूजन रविवार दि. ०५ रोजी माजी केंद्र मंत्री शरद पवार व पुण्याचे पालकमं...