Posts

Showing posts from October, 2022

सासवड येथे खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकारांचे आमरण उपोषण सुरू

Image
  न्याय मागण्यासाठी आता पत्रकारांनाही करावा लागतेय संघर्ष सासवड येथे खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकारांचे आमरण उपोषण सुरू       सासवड दि.१           पुरंदर तालुक्यातील नीरा औट पोस्टच्या खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकारांचे उपोषण करण्यास सुरवात केलीय.आज सोमवारी सकाळी पत्रकार संघटनेचे भरत निगडे हे उपोषण सुरू केलंय. पोलिसांनी हडप केलेल्या लोकवर्गणीची व वाहतूक कोंडीच्या बातम्या लिहल्या प्रकरणी खोटा तक्रारी अर्ज दाखल करून चौकशीसाठी बोलावून पत्रकार भरत निगडे यांना एक लाख रुपयांच्या खंडणीची पोलिसांनी मागणी केली.ती देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्यांना मारहाण केली.निगडे यांनी तक्रार दिली असता पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही व त्यांच्या विरोधात खोटा गुन्हाही दाखल केला. त्यामुळे निगडे यांनी आज पासून उपोषण सुरू केलंय.        पोलिसांच्या चुकीच्या कमाबद्दल निगडे यांनी वृत्तपत्रातून पोल खोल केली होती याचा राग घेऊन पोलिसांनी   खोटा तक्रारी अर्ज दाखल करून घेऊन निगडे ...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन

Image
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर मधून मोटारसायकल रॅलीचे आयोजन    सासवड दिनांक. ३०     अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यातून मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले याबाबत शनिवार (दिनांक 29) रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक पारपडली या बैठकीत मोटरसायकल रॅली काढण्याचं जाहीर करण्यात आले   पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३.नोव्हेंबर रोजी सासवड ते लोणावळा अशी ही मोटार सायकर रॅली कढण्यात येणार आहे .आज सासवड येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गणेश जगताप ,तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरूगे , व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण

Image
  पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण पुरंदर :  दि.२९         पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पोलीस दुरर्क्षेत्रातील पोलिसांनी पत्रकार भरत निगडे यांना  चौकशीसाठी बोलून कथित प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हे नोंद करू असा इशारा देत पत्रकार संघटनेच्या राहुल शिंदे व भरत निगडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढे होऊनही कथित प्रकरणाचा गुन्हा तब्बल दोन महिन्यांनी दाखल करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला. खंडणी वसूल करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी करूनही वरिष्ठांनी गुन्हे नोंद न केल्याने व्यथित होऊन शिंदे, निगडे व इतरजणांनी सोमवार ता.३१ पासून सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.              पत्रकार व पोलीस हे कायद्याचे रक्षक असून लोकशाहीचे स्तंभ आहेत. मात्र, पोलिसांच्या हातातील अतिरिक्त अधिकारांमुळे पत्रकारांची गळचेपी नित्याची झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत निगड...

ऊस दराबाबत आंदोलन चिघळले : आंदोलकांनी आडवली ऊस वाहतूक करणारी वाहने

Image
  ऊस दराबाबत आंदोलन चिघळले : आंदोलकांनी आडवली ऊस वाहतूक करणारी वाहने शिरोळ : ऊस दरासाठी सुरू असलेले शिरोळ तालुक्यातील आंदोलन चिघळले असून, भरलेली ऊस वाहने रोखत असताना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.वाहने आडवीत असताना काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या उसाचे नुकसान होऊ नये, वाहनातील ऊस साखर कारखान्याकडे गाळपास जावा, अशी भूमिका आंदोलकांच्या समोर घेतल्याने पोलिस संरक्षणात वाहने कारखान्याकडे रवाना करण्यात आली. शिरटी फाटा येथे अडविली वाहने आंदोलन अंकुशच्या वतीने गेली चार दिवस 'ऊस दर जाहीर करा, मगच ऊस गाळप करावा' अशी भूमिका घेत ऊसतोड व ऊस वाहतूक बंद करण्याचे आंदोलन सुरू केले होते. याकरिता सकाळी शिरोळमधील शिरटी फाटा येथे सर्व साखर कारखान्याकडे जाणारी उसाने भरलेली वाहने रोखून धरली होती.. या ठिकाणी धनाजी चुडमुंगे व आंदोलन अंकुशचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठाम भूमिका घेत साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय ग...

पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती

Image
पोलीस भरतीसाठी आता पुढचा मुहूर्त   पुढील महिन्यातील भरती प्रक्रियेला स्थगिती मुंबई: पोलीस भरतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी १ नोव्हेंबरपासून भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली   आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य राखीव दलातील पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज (दि.२९) स्थगिती देण्यात आली आहे .भरती बाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कारणामुळे पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. गेली ३ वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी अपात्र ठरणार होते. भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरतील तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आह...

मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी

Image
 मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी  पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..  मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती - जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणारया पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.. "मी अँकर" हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणारया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब...

जेऊर येथे युवकांनी दिले हरणाला जीवदान

Image
 जेऊर येथे  युवकांनी दिले हरणाला  जीवदान नीरा दि.२८    पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे युवकांनी व छोट्या मुलांनी एका हरणाला  जीवदान दिले आहे. कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका करण्यात या मुलांना यश आले आहे.या हरणाला आता वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार  आहे.       आज शुक्रवार दिनांक 28 रोजी  जेऊर येथील प्रज्वल प्रकाश जाधव श्रावणी विजय जाधव,  श्रावण विजय जाधव,  व विजय जाधव हे शेतात काम करीत होते.यावेळी जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या हरणाचा आवाज त्यांना आला .त्यांनी आवाजाच्या दिशेने पहिले असता दोन कुत्री त्या हरणाला मारत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.यानंतर  त्यांनी वनविभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली आहे या हरणाला ते वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत.या युवकांनी दाखवलेल्या धाडस बद्दल त्यांचं ग्रामस्थांनी कौतुक केलय...

भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!

Image
भांडण बापाशी जीव घेतला चिमुकल्याचा , पूणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!!        चार वर्षांच्या मुलावर ; थेट ट्रॅक्टरच अंगावर घातला आणि चिमुरड्याचा केला खुन पुणे इंदापूर तालुक्यात एका चार वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षांच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला आणि त्याचा खून करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय. इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजलीय. अबुजर जब्बार शेख असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. जमीन व्यवहाराच्या भांडणातून हा प्रकार घडला. वडिलांसोबत असलेल्या भांडणाचा वचपा त्याच्या निष्पाप मुलावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरसेवाडी गावच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. यात अबुजरचा मृत्यू झाला.इंदापरू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. प...

बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला

Image
बापरे !!!!! अंत्यसंस्काराला घेऊन जात असताना "हा" तरुण अचानक तिरडीवरुनच उठला ; स्वतःला मृत घोषित करून जिवंत असल्याचा केला स्टंट अकोला  पातूर तालुक्यातील विव्हरा येथील गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. हा अघोरी कृत्याचा प्रकार चान्नी पोलिसांनी फेटाळून लावला आहे. या घटनेत सदर युवकाचा मृत्यूच झाला नव्हता. तो जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं पोलीस म्हणतायत. या युवकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो शारीरिक दृष्टीने सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील विव्हरा या गावात एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली. त्याची अंत्यविधीची तयारी सुरू झाली. त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. त्या युवकाची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. मग अचानक त्या तरुणाला जाग आली. तो तिरडीवरुन उठून बसला. प्रशांत मेसरे असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेत मागची सत्यता समोर आणली. संबंधितांची चौकशी केली. डॉक्टरांनी मृत घोषित न करता किंवा मृत्यू झाल्याचा कुठलाच पुरावा नसतानाही प्रशांत मेसरे मृत झाला असल्याचे क...

जेजुरी मोरगाव मार्गावर भीषण अपघात, कारने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू

Image
जेजुरी मोरगाव मार्गावर भीषण अपघात, कारने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू बारामती तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर अर्बन क्रूजर कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या तिघांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. दशरथ साहेबराव पिसाळ (62), अतुल गंगाराम राऊत (22) आणि  नंदा राऊत अशी मृतांची नावं आहेत.पिसाळ हे रस्त्यावरून जात होते. तर राऊत कुटुंबीय दुचाकीवरून प्रवास करत होते.याचदरम्यान तिघांना कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. नंदा राऊत या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेले दशरश पिसाळ माळवाडी येथील फोंडवाडाचे रहिवाशी होते. तर राऊत कुटुंबीय करावागज येथे राहत होते. क्रूजर बारामतीहून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. तर दुचाकी पुण्याहून बारमतीकडे रवाना झाली होती. फोंडवाडाजवळ कारने दुचाकील धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघात झालेली कार पोलिसांनी जप्त केली. ...

धक्कादायक !!!! “आनंदाचा शिधा" तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला

Image
 धक्कादायक !!!! “आनंदाचा शिधा" तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला औरंगाबाद सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने 'आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केली. मात्र 'आनंदाचा शिधा' सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. आधी 'आनंदाचा शिधा'च्या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने वाटपास उशीर झाल्याचा आरोप झाला. त्यातच आता 'आनंदाचा शिधा' पाकिटातून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज दिवाळीच्या दिवशी देखील औरंगाबाद जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. मात्र यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहे. सद्या अनेक ठिकाणी रवा, साखर आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून, गोड तेलाचा पुडा मात्र गायब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण तालुक्यासह इतर ठिकाणी देखील तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि साखरच द्यावी लागते, यासाठी 75 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तेल विकत घ...

मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी

Image
 मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाची जोरदार तयारी  उपमुख्यमंञी फडणवीस खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण :  तर मुख्यविश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा       मुंबई-- मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19, व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून या ची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे...

नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल

Image
  नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल ;   पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरच एक्स्प्रेस थांबवण्याची मागणी  नीरा:             नीरा (ता.पुरंदर) रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबई, नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांंचे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, नीरा रेल्वेस्थानकावर पूर्वीप्रमाणेच जुन्याच प्लॅटफॉर्मवरच गाड्या थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.         नीरा स्थानकातून पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. नीरा- पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २०) रात्री बारा पासून रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस (गाडी नं. ११०३०) तसेच गोंदिया, नागपूरकडे जाणारी महारा...

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

Image
ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती   औ रंगाबाद :  शिवसेनेच्या औरंगाबाद मध्य, पश्चिम आणि पूर्व विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी किशन तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली. अखेर तनवाणींचा हट्ट मातोश्रीने पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून जिल्हाप्रमुखपद मिळाल्याने आता तरी तनवाणी सक्रीय होतील का ? असेही बोलले जात आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना पक्षाने कोणताही पक्षाने कोणतेही पद दिले नव्हते. शिवसेनेत आल्यानंतर जिल्हाप्रमुख पद देऊ असा शब्द त्यांना देण्यात आला होता. मात्र, पक्षाने त्यांना त्यांची कदर केली नव्हती. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेले. शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला त्यांची आठवण आली. अडीच महिन्यापूर्वी त्यांना शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरप्रमुख स्वतंत्र कारभार असलेले पद देण्यात आले होते. परंतु, या पदावर ते समाधानी नव्हते याविषयी त्यांनी नाराजी ही व्यक्त केल्याची चर्चा होती ....

पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...!

Image
  पुराच्या पाण्यात पडल्यानंतर सांगलीचा पठ्ठ्या पोहत जाऊन बायकोला भेटला...! बारामती तालुक्यातील मुर्टी - मोरगाव रस्त्यावर सानिका हाॅटेल येथे मुर्टी गावच्या हद्दीतील ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आल्यामुळे बुधवारी रात्री बारा वाजता एक दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. मात्र, पुरातून पोहून बाहेर निघत तो रांजणगाव गाठत बायकोला भेटला. सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील तरुण सागर अरविंद पाटील (वय २९) हा कऱ्हाडवरून सातारा, नीरा, मोरगावमार्गे रांजणगाव येथे कामाला असणाऱ्या प्रिया सागर पाटील यांना दिवाळीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी जात असताना मोरगाव - मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्तीशेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला होता. याच दरम्यान सागर पाटील हा दुचाकी या पाण्यातून घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने 'पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आतमध्ये जाऊ नकोस', असे सांगितले. मात्र, सागर पाटील हे न ऐकता पुढे गेला असता, हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व...

अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच

Image
  अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच सेलिब्रिटी मंडळी सहसा त्यांच्या खासगी आयुष्याला गुलदस्त्यातच ठेवतात. कोणत्याही नात्यामध्ये अमुक एका वळणावर आल्यानंतरच ते नात्याची ग्वाही देतात. गंमत म्हणजे सेलिब्रिटी जोड्या विविध पार्टी आणि कार्यक्रमांमध्येच नकळतपणे त्यांच्या खासगी आयुष्याचे संकेत देत असतात. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की  रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या नात्यावर अशाच एका सोहळ्यादरम्यान कबुली दिली होती. अगदी ऋतिक आणि सबा आझादही  याला अपवाद नाहीत. यातच आता आणखी एका जोडीचं नाव जोडलं जाऊ शकतं. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा  याच्या घरी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी या जोडीनं हजेरी लावली आणि त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. मुख्य म्हणजे या पार्टीआधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा झाली. इतकंच काय, तर एकमेकांच्या नावांवरून त्यांना छेडलंही गेलं. आता अखेर हे सेलिब्रिटी कपल पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आलं. हे Couple म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर  आणि अभिनेत्री अनन्या पांडे...

मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब युक्रेनला :युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती

Image
मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब   युक्रेनला युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती मॉ स्को :  रशिया आणि युक्रेन यांच्यात गेले कित्येक महिने सुरू असलेल्या युद्धाचे इतर सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत. आता रशियाची राजधानी असलेल्या मास्को शहरांमध्ये रस्त्यावरून पुरुष अदृष्य झाले आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये जबरदस्तीने लष्करात सामील करण्याच्या भीतीने अनेकांनी घराबाहेर पडणेच टाळले आहे तर अनेक पुरूषांनी रशियाला लागून असलेल्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मॉस्को शहराची लोकसंख्या एक कोटी वीस लाख एवढी प्रचंड आहे पण सध्या मात्र मॉस्कोतील रस्ते निर्जन दिसत आहेत. शहरातील हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये कोणत्या प्रकारची गर्दी नाही दुकानांमध्ये सुद्धा तुरळकच गर्दी दिसत आहे, त्यामध्ये महिलांची गर्दी जास्त आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात जबरदस्तीने सहभागी करून घेण्याची शक्यता असल्याने अनेक पुरूषांनी देशही सोडला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख पुरुषांनी मास्को सोडून कजाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. शेजारी असलेल...

पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह

Image
  पिंपळे येथे ओढ्याच्या पाण्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह सासवड दि.१५     पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे एक मानवी मृत देह आढळून आला आहे.याबाबत स्थानिक लोकांनी सासवड पोलिसात माहिती दिली आहे. हा मृत देह महिलेचा असावा असा अंदाज स्थानिक लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे   आज शनिवारी सकाळी वीर सासवड रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांना पिंपळे येथे पोमान नगर कमानीच्या समोर पाण्या मध्ये एक मानवी मृत देह असल्याचे लोकांना दिसले आहे.यानंतर या ठिकाणीं लोकांची गर्दी जमली आहे. स्थानिक लोकांनी या बाबतची माहिती सासवड पोलिसात दिली आहे. हा मृत देह अडचणीत असल्याने अद्याप तिथे कोणीही गेले नाही. या बाबत पोलिस घटना स्थळी जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.दोन दिवसा पूर्वी एक वेडसर महिला या भागात फिरत होती. कदाचित तिचा तो मृत देह असावा असा अंदाज स्थानिक लोकांनी व्यक्त केलाय 

अजित पवार यांचे शरद पवार यांच्या समोरील धडाकेबाज भाषण

Image

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला

Image
  एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला खोचक टोला जळगाव : दि.१३       शिंदे गट आणि भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंना खोचक टोला लगावला आहे. गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणत आमचा पक्ष हा वाणी, ब्रह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येने खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही, असे देखील महाजन यांनी म्हटले आहे.     ...

पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५०,०००/- दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

Image
  पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार  ५०,०००/-                      दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास    मुंबई : दि.१३ हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना 50,000 हजारांचा दंड आणि पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्याला ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, पत्रकाराला धमकी देणाऱ्याला आतमध्ये तुरुंगात पाठवण्यात येईल.पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही सीएम योगी म्हणाले की, पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांशी आदराने बोला, नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तन करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर एफआयआर नोंदवला जाईल, अन्यथा एसएसपीवर कारवाई केली जाईल. पत्रकार जमावाचा भाग नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदार...

डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल- एस.एम.देशमुख

Image
  डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासाहर्ता मिळविली तर या माध्यमालाही लोकमान्यता मिळू शकेल-  एस.एम.देशमुख अहमदनगर - दि.१२             डिजिटल मिडियाने प्रिंट मिडियासारखी विश्वासार्हता मिळविली तर या माध्यमाला लोकमान्यता देखील मिळू शकेल असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.. त्यावेळी देशमुख बोलत होते.. यावेळी नगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अफताब मन्सूरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली.. कार्यक्रमास परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते.. एस.एम देशमुख यांनी डिजिटल मिडिया परिषदेच्या स्थापनेपासून मागची भूमिका विस्तारानं मांडली.. ते म्हणाले, डिजिटल मिडियाने माध्यमातील मोठा अवकाश व्यापला आहे.. राज्यात पाच हजारपेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल कार्यरत आहेत.. या माध्यमात वीस हजारांवर पत्रकार काम करीत असून त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत.. डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळत नाहीत, ...

कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली

Image
  कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली   नीरा दि.१२    पुरंदर तालुक्यातील कडेपठार डोंगरावर पिंगोरी आणि दौंडज या गावांच्या क्षेत्रात आज पहाटे जोरदार पाऊस झालाय.त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे जेऊर आणि पिसुर्टी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय.त्यामुळे पिसुर्टी गावाचा संपर्क तुटला असून हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी व शालेय मुलांना अडचण निर्माण झाली आहे.पिसुर्टी येथील अनेक मुले माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथील शाळेत  जातात त्यांना  या पुरा मुळे शाळेत जात आले नाही त्यातच आता शाळेत परीक्षा सुरू आहेत.   तालुक्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय.त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.आज पहाटे झालेल्या या पावसामुळे पिंगोरी, दौंडज, वाल्हे,या भागातील.शेतीला देखील फटका बसला आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी  पिसुर्टीकर ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर आज दिवसभर आजूनही तसाच आहे.

बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले. सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

Image
  बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले. सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प नीरा :         सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील  बुवासाहेब ओढ्याच्या तकलादू पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले आहे. काल मंगळवारी सायंकाळी नीरा परिसराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी संततधार सुरूच होती. त्यामुळे राख, गुळूंचे या परिसरातील ओढ्यांतून पाणी वाहून ते पाणी बुवासाहेब ओढ्याला आले. त्यामुळे रात्री बारानंतर या तकलादू पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक सकाळी साडे दहा  वाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे नीरा - बारामती व सातारा - नगर या मार्गावर वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत.       गेली दीड वर्षापासून नीरा शहराच्या नजीक बारामती पुरंदरच्या शिवेवरील बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम संतगतीने सुरू आहे. हे काम सुरू असल्याने ठेकेदाराने ओढ्यातून फक्त तीन सांमेटच्या नळ्या टाकून तकलादु पुल तयार केला आहे. या तकलादू पुलावरून मागील महिन्यात सलग चार दिवस पाणी वाहिले होते....

राजस्थान मधील कराटे स्पर्धेत नीरा येथील विद्यार्थ्यांनी मारली बाजी

Image
  राजस्थान मधील कराटे स्पर्धेत नीरा येथील विद्यार्थ्यांनी मारली बाजी   सहा सुवर्ण,दहा रौप्य तर सहा कांस्य पदकांची केली कमाई  नीरा दि.१०        राजस्थान मधील जयपुर  या ठिकाणी झालेल्या खुल्या भव्य  राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत  नीरा(ता.पुरंदर) येथील आयडियल के. के .बी च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नाव राजस्थान या ठिकाणी गाजवले आठ आणि नऊ आक्टोबरला  झालेल्या नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये, आयडियल तायक्वांदो कराटे कीक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन गटात ६ सुवर्ण,१० रौप्य  व ६ कांस्य पदकाची कमाई केली    यामध्ये शुभ्रा भुजबळ , शोहिब मुल्ला ,सक्षम मोरे, सूर्या शिंदे, आदित्य पवार, पृथ्वीराज ढमाळ यांनी सुवर्ण पदक मिळविले.हर्षद कोंडे ,उमंग अग्रवाल ,महेश पवार, ऐश्वर्या पाध्ये,शुभम मोरे ,कृतिका घाटे, जिया शेख, यश कापरे, साहिद मुल्ला, ओम भोसले यांनी कांस्य पदक मिळविले.तर  सई पवार ,आदर्श पवार ,सानिया शेख, अथर्व कोलते,सोहन हजारे ,अभिषेक लकडे, याना कांस्य पदक ...

कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

Image
 कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला  नीरा  :         नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) सोमेश्वरनगर येथे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी कालव्याचे पाणी बंद पाईपलाईनने द्या, अशी मागणी करणारी मंडळी आता विरोध करण्याची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत असा घणाघात पवार यांनी केला. शेतकऱयांचा पाठिंबा असेल तरच अस्तरीकरण करणार असल्याचेही ते म्हणाले.  सोमेश्वरनगर येथे शेतकरी मेळाव्यात पवार यांनी कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार घणाघात केला. यंदा वीर धरणातून ४० टीएमसी पाणी वाहून गेले. निरा खोऱयातील चार धरणांची क्षमता ४८ टीएमसीची आहे. त्यातील ४० टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे शेततळे व इतर पर्यांयाचा विचार व्हावा, असे पवार म्हणाले. निरा डावा कालव्याची वहन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सध्या कालवा ६५० क्युसेक वेगाने वाहतो. ही क्षमता ११०० ते १२०० क्युसेकवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी कालव्याचा पाझर, गळती कमी करावी लागेल. ...

एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा

Image
  एस.एम.देशमुख यांनी घेतला :अधिवेशनाच्या तयारीचा आढावा   पिंपरी - चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज पिंपरी चिंचवडला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला..पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन अधिवेशनाची तयारी सुरू असल्याबद्दल देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.. यावेळी बोलताना अरूण नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी मराठी पत्रकार परिषदेने विश्वास दाखवत अधिवेशनाची जबाबदारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघावर सोपविल्याबददल एस.एम देशमुख यांचे आभार मानले.. परिषदेचं हे अधिवेशन परिषदेच्या नियमानुसार आणि धयेयधोरणानुसार तसेच परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेशा पध्दतीने साजरे केले जाईल असा विश्वास नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केला.. अधिवेशन सर्वसमावेशक व्हावे यासाठी संघाच्या सर्व सदस्यांची मतं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी दर शनिवारी सर्व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.. आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असून त्या संबंधीचे अहवाल न...

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.

Image
 मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडचा गौरव : मा. उपमुख्यमंत्री अजित पवार.  अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन  पिंपरी :          राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन १९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे तयारी व इतर बाबींची माहिती घेतली, तसेच या अधिवेशनासाठी म्हणून राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये हे अधिवेशन होत असल्याने हा पिंपरी चिंचवड शहराचा गौरव आहे असे उद्गार यावेळी काढले.          अधिवेशन कोठे होत आहे, त्या स्थळाबाबतची माहिती, पत्रकारांच्या निवास व्यवस्थेबाबतची माहिती तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती अजित पवार यांनी यावेळी घेतली. या बैठकीस आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, ...

बेकायदेशीर डुक्कर पालणामुळे सासवडकर नागरिक हैराण.

Image
 सासवड येथील बेकायदेशीर डुक्कर पालना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन  कर्कश्श आवाज, दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक त्रस्त  सासवड ( ता पुरंदर ) येथील वीर बाजी पासलकर शाळेच्या शेजारील  लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर डुक्कर पालन करण्यात आले आहे. याबाबत सर्व कैकाडी समाजाच्या वतीने सासवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आले           लोकवस्तीत केलेल्या डुक्कर पालनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दिवसा व रात्री  कर्कश्श आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परीसरात दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे.            आत्तापर्यंत अनेक विनंती अर्ज सासवड नगरपालिकांना देण्यात आले आहेत परंतु आजतागायत कसलीही कारवाई करण्यात आली नाही यासाठी समस्त कैकाडी समाज यांच्यावतीने पुन्हा एकदा बेकायदेशीर डुक्कर पालन बंद व्हावे म्हणून सासवड नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे.        या लोकवस्तीत...

नीरा येथील अमर झेंडे यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा "कलादर्पण २०२२" पुरस्कार

Image
  नीरा येथील अमर झेंडे यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा "कलादर्पण २०२२" पुरस्कार नीरा दि.८    पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राहणारे रंगभूषाकार अमर झेंडे यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने दिला जाणारा २०२२ चा कलादर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यांनी मिळवलेल्या या पुरस्काराबद्दल निरेतिल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केलय.      नीरा येथे राहणारे रंगभूषाकार आमार झेंडे हे अनेक दिवसा पासून चित्रपटासाठी रंगभूषाकाराचे काम करतात. विषेता ऐतिहासिक चित्रपटासाठी त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय ठरले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला खा.अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेला "शिवप्रताप गरुडझेप" या चित्रपटासाठी मेकअप आर्टीस्ट म्हणून त्यांनी काम केलंय.त्यांच्या या कामाचं खा.अमोल कोल्हे यांनी सुद्धा केलंय. त्यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच सांस्कृतिक कार्यमंत्रालय यांच्या कडून कलादर्पण पुरस्कार' २०२२ देण्यात आला आहे. अमर झेंडे यांचं निरेतील लोकांकडून कौतुक होतंय. निरेच्या सरपंच तेजश्री...

रविवारी वाल्ह्यात महर्षी वाल्मिक जयंती

Image
 रविवारी वाल्ह्यात महर्षी वाल्मिक जयंती.       जेजुरी -- रामदास लांघी.       सालाबाद प्रमाणे गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून जेजुरीनजिक वाल्हे, तालुका- पुरदर, जि. पुणे येथील महर्षी वाल्मिक ऋषींच्या संजीवनी समाधी स्थळी ठाणे येथील महानगर पालिकेचे माजी महापौर व माजी आमदार स्वर्गीय अनंतरावजी तरे साहेब यांच्या पुढाकाराने साजरी होत होती. गतवर्षी त्यांचे कोरोनाकाळात देहावसान झाले आहे.         नेहमी तरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जयंतीचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी असलेले पंचक्रोशितले अनेक समाज कार्यकर्ते झटून कार्यक्रम यशस्वी पार पाडत होते. तेही यावेळी नाउमेदच झाले होते.            परंतू या वेळी स्वर्गीय अनंतरावजी तरे साहेब यांचे चिरंजीव जयेश अनंत तरे यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.         या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक आदिवासी समाज कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने येऊन हजेरी लावत असतात. स्नानिक ग्रामस्थांचेही बऱ्यापैकी सहकार्य ...

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे काम रद्द. रस्ता वाहतुकीसाठी खुला

Image
 पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे काम रद्द. रस्ता वाहतुकीसाठी खुला दसऱ्याला गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४० किलोमीटरचा वळसा टळला   नीरा दि.३       पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वेगेट आज सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून बुधवारी सकाळी सात पर्यंत रेल्वेच्या कामासंदर्भात बंद राहणार होते. ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांना याचा त्रास होणार होता याबाबत बातमी माध्यमातून प्रशसिद्द करण्यात आली होती. याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने परवाणगी नकारल्याने हे काम आज रद्द झाले असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४०किलोमीटरचा वळसा टळला आहे.       मागील सहा महिन्यात पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामुळे पिसुर्टी येथील २७ नंबरचे गेट पाच वेळा बंद ठेवण्यात आला होते. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवा आधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून यावे जावे लागत होते. यावेळीही रेल्वे प्...

नीरा मोरगाव मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकजण जखमी : खडीवरू घसरली मोटरसायकल

Image
 नीरा मोरगाव मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकजण जखमी : खडीवरू घसरली मोटरसायकल नीरा दि.२ पुरंदर बारामतीच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा मोरगाव मार्गावर नीरा-गुळुंचे दरम्यान जगताप वस्ती येथे रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.    या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारीक खाडीचा वापर केलाय. यावरून वाहने घसरन्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आज रविवारी गुळुंचे येथील मधुकर शंकर कांबळे वय वर्षे ६० हे नीरा येथून गुळुंचे येथे जात होते.ते त्यांच्या एमएच १२ सीझेड ४५३ या दुचाकीवरून घरी जाताना जगतापवस्ती येथे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरल्याने हा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना नीरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच दिवसात दोन चारचाकी कार पलटी होऊन तीन जण जखमी झाले होते.त्यानंतर अजूनही या रस्त्यावर खडी असल्याने असे अपघात होत आहेत.

मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?

Image
  मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?    तुमचा फोन जर का हरवला तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायला? काय करायला पाहिजे तीन गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे.   सुरवातीला म्हणजे फोन तुमच्याकडे फोन असतानाच फोन मधील फाईंड माय फोन ही ऍक्टिवेट करा. यामुळे तुमचा मोबाईल गुगल आकाऊंटव्दारे तुम्ही पाहू शकता. फोन हरवल्याचे लक्षात आल्यास त्यांनतर तुम्ही तुमचे सिम. लगेच डीऍक्टिव्हेट करा.त्यानंतर तुम्ही तुमचे गुगलचे अकाउंट आणि इतर बँकिंग अकाउंट किंवा अन्य अकाउंटचे पासवर्ड चेंज करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईल बद्दल एफ आय आर नोंदवा. कारण अशा मोबाईलचा वापर गुन्हेगारी क्षेत्रात होऊ शकतो. यातून अनेक चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. याचा आरोप आपल्यावर यायचा नसेल तर मोबाईल चोरीला गेला किंवा गहाळ झाला तर एफ.आय.आर.अवश्य नोंदवा त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट पुन्हा ४८ तास राहणार बंद,

Image
  पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट पुन्हा ४८ तास राहणार बंद,  दसऱ्या निमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.   नीरा : १      पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा ते जेजुरी दरम्यान पिसुर्टी येथे असणारे रेल्वे गेट दि. ०३ ते दि.०५ या काळात वाहतुकीसाठी ४८ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दि.०२ ते दि.०५ हा काळ नवरात्रीतील शेवटचे तीन दिवस व दसरा हा महत्त्वाचा सण असुन त्या आधी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवल्याने सातारा जिल्ह्यातील व स्थानीकांनी या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.     पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर पिसुर्टी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी सोमवार दि. ०३ आक्टोंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते बुधवार दि. ०५ आक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी...

यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही : रामदास तांबे.

Image
  यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही : रामदास तांबे. नीरा  १        स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे. तसेच यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व  जलनिसारण  विभागाचे सहाय्यक अभियंता रामदास तांबे यांनी केले.        पुरंदर ऑफिसर्स चारिटेबल फाउंडेशन पुणे. यांच्या वर्धापन दिनानिमित जेऊर येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जेऊर या विद्यालयातील आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व विकास -मी कसा घडलो? या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनंत तांबे सरपंच शोभा तांबे, उपसरपंच तेजस जाधव, माऊली धुमाळ, पोलीस पाटील कुंडलिक तांबे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धुमाळ, नारायण तांबे, प्रतीक धुमाळ, संभाजी ठोंबरे, पोपट जाधव मेघनाथ तांबे, घनश्याम तांबे, सेवानिवृत शिक्षक चोरगे गुरुजी, मोतीराम तांबे, ...