Posts

Showing posts from May, 2022

पोंढे येथे महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.

Image
 पोंढे येथे महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल. जेजुरी दि.१   पुरंदर तालुक्यातील पोंढे येथे महीलेच्याघरासमोर येवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आले आहे याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम  ३५४(अ) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल.केला आहे.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  या संदर्भात पोंढे येथे राहणाऱ्या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.तिने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ३० मे व ३१ मे रोजी आरोपी आकाश मुरलीधर वाघले अंदाजे वय २२ वर्ष रा.पोंढे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा या महिलेच्या घरा समोर येऊनघरी  ती एकटी असताना व तिचे पती घरी नसताना आकाश मुरलीधर वाघले हा त्याचे मोटरसायकलवर तिच्या घरा समोर येऊन त्याच्या मोटर सायकलची रेस वाढवून हॉर्न वाजवून वाईट नजरेने तिच्याकडे पाहून हातवारे केले. त्यावेळी ती  व  शेजारील महिलांनी त्यास तो असे वाईट भावनेने हातवारे का करतोस असे विचारले असता तो घरा समोरून निघून गेला. तसेच यापूर्वीसुद्धा हिंमहीला  शेतात एकटीच येत असताना व  शेतात एकटी काम करीत असताना ...

वीर येथे जमावाकडून रस्ता अडवून मारहाण

Image
 वीर येथे जमावाकडून रस्ता अडवून मारहाण कार व मोटारसायकलचे ही केले नुकसान  सासवड दि.१    पुरंदर तालुक्यातील वीर येथील धुमाळ वाडी येथे २४ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करण्यात केली असून त्यांची मोटारसायकल व मारुती अल्टो कारचे नुकसान केले आहे.या प्रकरणी सासवड पोलिसात 24 जणांविरोधात फिर्याद देण्यात आली आसून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 143,147,149,341,427,323,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात मुलाचे वीर येथील रहिवाशी व सध्या सासवड येथे राहणारे अमीर बबनराव धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.त्यानीं दिलेल्या फिर्यादी  दिनांक नुसार वीर येथील धुमाळ वाडी येथे ते दिनांक 27/05/2022 रोजी सकाळी 11:00वा.चे सुमारासशेतातून घरी येत असताना आरोपी अमोल धोंडीबा धुमाळ, 2)अक्षय पोपट रणनवरे, 3)विनोद बालासाहेब धुमाळ, 4)रविंद्र रघुनाथ धुमाळ, 5)रविंद्र तुकाराम धुमाळ, 6)अक्षय भाऊ धुमाळ, 7)दत्तात्रय विठ्ठल धुमाळ, 8)रघुनाथ भगवंत धुमाळ, 9)मोहन आप्पासाहेब धुमाळ, 10)बाळासाहेब पंढरीनाथ धुमाळ, 11)गुरूवर्य दत्तात्रय धुमाळ, 12)...

वन्य प्राण्यांची तहान भागवून साजरा केला लग्नाचा २५ वा वाढदिवस... परिंचे येथील जाधव दांपत्याचा उपक्रम

Image
 वन्य प्राण्यांची तहान भागवून साजरा केला लग्नाचा २५ वा वाढदिवस... परिंचे येथील जाधव दांपत्याचा उपक्रम परिंचे प्रतिनिधी दि.३१         सध्या कडक उन्हाळा सुरू असून सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.. मानव जातीबरोबरच मुक्या प्राण्यांना देखील त्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत.. हेच सामजिक भान राखून पुरंदर तालुक्यातील परिंचे गावचे रहिवासी आणि सध्या व्यवसाया निमित्त बारामती येथे स्थायिक झालेले विजय गणपत जाधव आणि सौ हेमलता विजय जाधव यांनी आपला लग्नाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे वेगळा आदर्श उभा केला आहे. या उभयतांनी आपल्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त परिंचे हरणी रस्त्यांवरील वन खात्याच्या हद्दीतील पाणवठ्यात सुमारें सहा हजार लिटरहून अधिक पाणी टँकरद्वारे सोडुन ऐन उन्हाळ्यात पशु पक्ष्यांची तहान भागवण्याचे मोठे काम केले आहे..           त्यांच्या या उपक्रमाला पेशाने शिक्षकअसणारे त्यांचे बंधू अजय व त्यांच्या पत्नी सुषमा जाधव तसेच त्यांचे मेहुणे संतोष एकनाथ जगताप यांनी हजेरी लावत मोलाचा वाटा उचलला. पावसाळा सुरू होईपर्यंत ...

नीरा येथे पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करण्यात आली साजरी

Image
 नीरा येथे पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती करण्यात आली साजरी  नीरा दि.३१          नीरा (ता.पुरंदर ) येथे आज दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक आहील्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.       नीरा ता.पुरंदर येथे आज सकाळी १० वाजळेच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने,,नीरेचे उपसरपंच राजेश काकडे,ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे राधा माने, अभिजित भालेराव,सोमेश्वर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन वसंत दगडे,माजी उपसरपंच दीपक काकडे,गणेश गडदरे, बाबुराव दगडे,गणपत लकडे,महेश धायगुडे,तात्या लकडे,संदीप जावळे, मच्छिंद्र लकडे,सुनील धायगुडे, भैय्या दगडे आणील दगडे, ग्रामसेवक मनोज ढेरे,पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.   यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश क...

भिगवण येथे महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

Image
 भिगवण येथे महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेवून आत्महत्या भिगवण : प्रतिनिधी        भिगवण (ता. इंदापूर) येथे २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) रात्री११ वजलेच्या सुमारास घडली आहे.             स्वामी चिचोली (ता.दौंड) येथे दत्तकला विद्यालयात शिक्षण घेत असलेला ऋषीकेश हरीविजय चव्हाण (वय २१, रा.सुस्ते ता पंढरपूर) असे या युवकाचे नाव असून आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचा तपास पोलीस करत आहेत. पुणे- सोलापूर महामार्गालगत भिगवण येथील यश हाईट्स इमारतीतील फ्लॅट नं. सी ५ मधील बेडरूममध्ये गळफास घेवुन या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती इमारतीत राहणार्‍या नागरीकांकडून पोलिसांना मिळाली. याबाबतचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे हवालदार करे करत आहेत.

वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या मुर्तींना घालण्यात आले नीरा स्नान

Image
 वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या मुर्तींना घालण्यात आले नीरा स्नान   वाल्हे(दि.30)          वाल्हे (ता.पुरंदर) येथे वाल्हे ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या मुर्तींना , सोमवती अमावस्या निमित्ताने, वीर येथील घोडेउड्डाण (ता.पुरंदर) या ठिकाणी नीरा नदी मध्ये पवित्र स्नान घालण्यात आले.  वाल्हे (ता.पुरंदर) येथे सोमवती अमावस्येनिमित्त पारंपारिक ढोलांच्या तालावर उत्सवमुर्तींना पालखीत बसविण्यात आले. गावांतर्गत पालखीची व श्रींच्या कावडीची पारंपारिक वाद्यांच्या तालावर सवाद्य मिरवणुक काढुन 'नाथ साहेबाचं चांगभलं' च्या जयघोषात पालखी निरा नदीवरील घोडेउड्डाण येथे नेण्यात आली.   त्याच बरोबर आडाचीवाडी येथील श्री काळभैरवनाथ व मदनेवस्ती येथील मसनेर देवाच्या पालख्या, सुकलवाडी येथील पालखी वीर येथील घोडेउड्डाण येथे नेहून नीरा नदीवर मूर्तींना स्नान घालण्यात आले. यावेळी मानकरी, सालकरी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन उत्सवमुर्तींना जलाभिषेक घालण्यात आला. पुजारी राजेंद्र गुरव, सिद्धेश आगलावे यांच्या हस्ते विधिवत पुजा करण्यात आली. स्नानान...

अखेर त्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

Image
 अखेर त्या अनोळखी व्यक्तीचा  मृत्यू  प्रकरणी  खुनाचा गुन्हा दाखल   सासवड दि.३०            पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका वाईनच्या दुकानासमोर दिनांक चोवीस मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. असे पोलिसांकडून सांगितलं जात होतं. मात्र या नंतर आता या प्रकरणी नवीन माहिती उजेडात आल्याने या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे, अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याच मारहाणीत जखमी झालेला आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला प्रकरणी सुद्धा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसापासून हा खुनाचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या राजकीय नेत्याची मोठी गोची झाल्याचे दिसते आहे.               पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका दारूच्या दुकाना समोर तीन व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांच्यावर उकळते तेल टाकल्याची व जबर मारहाण केल्याची चर्चा सासवड शह...

जाणून घ्या अविवाहित जोडापे लॉजवर एकत्र राहू शकते का? पोलिसांनी त्रास दिल्यास करा तक्रार

Image
 जाणून घ्या अविवाहित जोडापे लॉजवर एकत्र राहू शकते का? पोलिसांनी त्रास दिल्यास करा तक्रार पुणे दि 30 जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये असाल आणि पोलिस तुमची चौकशी करण्यासाठी आले तर घाबरण्याची गरज नाही. अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही.                सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील राजेश बागवान याबाबत म्हणतात की, अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की, दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणाशीही जगण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाह...

जेजुरीत सुमारे चार लाख भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

Image
 जेजुरीत सुमारे  चार लाख भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन जेजुरी ,दि.३०(वार्ताहर)  सदानंदाचा येळकोट ,,,,येळकोट येळकोट जयमल्हार ,,,असा जयघोष ,,,आणि भंडा-याची उधळण करत सुमारे चार लाख भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत सोमवती यात्रेचा कुलधर्म -कुलाचार केला.. सोमवारी,दि.३० पूर्ण दिवस सोमवती अमावस्येचा असल्याने रविवारपासूनच जेजुरी नगरीत गडकोट ,पायरीमार्गावर  भाविकांची गर्दी झाली होती. सोमवारी ,पहाटे ३वाजण्याच्या सुमारास भाविकांना मंदिर देवदर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ११वाजण्याच्या सुमारास प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश देताच  घडशी समाजबांधवाच्या पारंपरिक सनई -चौघड्याच्या मंगलमय सुरात आणि भाविकांच्या भंडारा उधळणीत श्रींच्या पालखी  सोहळ्याने गडकोट आवारातून कऱ्हास्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी समस्त ग्रामस्थ -खांदेकरी मानकरी ,सेवेकरी पुजारी -सेवेकरी वर्ग ,,देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,शिवराज झगडे ,पंकज निकुडेपाटील ,अशोकराव संकपाळ ,संदीप जगताप ,प्रसाद शिंदे ,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे ...

धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार.

Image
 चंदननगर येथे धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार.     पुणे दि.२८          पुण्यातील चंदननगर येथे एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.  पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याने  हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.       विशाल पिराजी शिखरे  अस अटक करण्यात आलेल्या वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो खराडी परिसरातील रहिवासी आहे. हा आरोपी ओळखीचा असून पिडीतेच्या घरी  त्याच येणे जाणे होतं. आरोपीने ओळखीतून या पिडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकारची कुणाला माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी  या पिडीत मुलीला दिली. या पीडित मुलीची वैद्यकीय त...

पिसुर्टी येथील रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यानी केले रक्तदान

Image
 पिसुर्टी येथील रक्तदान शिबिरात ३०  रक्तदात्यानी केले  रक्तदान  नीरा दि. २९        पिसुर्टी (ता.पुरंदर) येथे आज दिनांक २९ मे रोजी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त मोरया ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले      पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज दिनांक २९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर उद्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३१ मे रोजी  सकाळी दहा  ते  चार  या वेळेत  बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती मोरया ग्रुपच्या वतीने देण्यात आली आहे. आज झालेल्या या रक्तदान शिबिराला  राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ...

सासवड मधील त्या अनोळखी व्यक्तीचां मृत्यू नैसर्गिक की घातपात?

Image
 सासवड मधील त्या अनोळखी व्यक्तीचां मृत्यू नैसर्गिक की घातपात?   शहरात मृत्यू बाबत दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा  सासवड  दि.२९       सासवड ता.पुरंदर येथे दिनांक २४ मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा  मृतदेह आढळून  आला होता.या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.मात्र   हा घातपात असावा अशी चर्चा सासवड शहरात दबक्या आवाजात रंगली आहे.त्या मुळे याबाबतचा तपास  लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.       सासवड शहरात दिनांक २४ मे रोजी एका अनोळखी व्यातीचा मृत्यू   आढळून   झाला होता.सुरवातीला तो दारू पिलेला असावा असे समजून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.मात्र रात्री नऊ वाजालेच्या सुमारास या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. आणि  हा मृत देह  शवविच्छेदनासाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या नंतर या बाबतचा तपास सासवड  पोलीस करीत आहेत. दारु पिल्याने व अनेक.दिवस उपाशी राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.मात्र ...

जेजुरी सोमवती यात्रेच्या अनुषंगाने रविवार व सोमवारी चालकांनी पर्यायी बाह्यवळणाचा वापर करावा

Image
जेजुरी सोमवती यात्रेच्या अनुषंगाने रविवार व सोमवारी चालकांनी पर्यायी बाह्यवळणाचा वापर करावा जेजुरी पोलिसांचे आवाहन  जेजुरी   वार्ताहर  दि २८          महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा दि ३० रोजी भरत असून या यात्रेस मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जेजुरीत वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी पुणे,लोणंद,बारामती कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी रविवार दि 29 व सोमवार दि 30 रोजी  पर्यायी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले आहे.    कोरोना संकटाच्या काळानंतर अडीच वर्षांनी जेजुरी शहरात खंडोबा देवाचा सोमवती यात्रा सोहळा होत आहे.  या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून या निमित्ताने शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी बाह्यवळण मार्गे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बेलसर-कोथळे,नाझरे कडेपठार ते बारामती तसेच बारामतीकडून पुण्याकडे जाणाऱ्यांनी मोरगाव मार्गे नाझरे कडेपठार-कोथळे-बेलसर- त...

नीरा परिसरातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणार : फौजदार सुदर्शन होळकर यांची ग्वाही.

 नीरा परिसरातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणार : फौजदार सुदर्शन होळकर यांची ग्वाही.  नीरा दि.२८    गेल्या आठ पंधरा दिवसात नीरा आणि परिसरात दोन वेळा भुरट्या चोरीचे प्रकार घडले आहेत.त्यामूळे लोकांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे.मात्र अशा चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी नीरा दूरक्षेत्राचे फौजदार आणि इतर कर्मचारी पुढे सरसावले आहेत.        नीरा दुरर्क्षेत्राच्यावतीने परिसरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यास पोलिसांना यश आले होते.यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजना राबवल्या होत्या..स्थानिक चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.त्याच बरोबर स्थानिक तरुणांना बरोबर घेऊन चोरी होऊच नये यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न शिल होती.त्याच बरोबर पोलिसांनी रात्र गस्त वाढवली होती. मात्र १५ दिवसात दोनदा दुकाने फोडीच्या घटना घडल्याने आता नीरा दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी सुदर्शन होळकर यांनी या चोरांचा बंदोबस्त करणार असल्याचे म्हटले आहे.आज दिनांक २८ मे रोजी ते माध्यमांशी बोलत होते. वाढत्याा भुरट्या चोरांना संदर्भात प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावेळी त्यांनी लवकरच अशा...

नीरा बारामती रस्त्यावर निंबुत येथे चार चाकी गाडीचा अपघात .

Image
  नीरा बारामती रस्त्यावर निंबुत येथे चार चाकी गाडीचा अपघात .   बारामती दि.२८     बारामती तालुक्यातील निंबुत देते श्याम काका काकडे यांच्या बंगल्या जवळ निरा बारामती रस्त्यावर एका महिंद्रा एस यू व्हीं कारचा अपघात झाला आहे. ही गाडी लोणंद तालुका खंडाळा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.    पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असून या गाडीमध्ये चालकासह दोन प्रवासी असल्याचे स्थानिकांनी सांगितले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना स्थळाला वडगाव निंबाळकर पोलिस यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.       दरम्यान या रस्त्यावरती निंबुत तसेच वाघळवाडी या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या रस्ता अरुंद असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण होईल याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

कडक उन्हाळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने वाल्हे पालखी मैदानातील झाडांना तारले.

Image
 कडक उन्हाळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने वाल्हे पालखी मैदानातील झाडांना तारले. आठवड्यातून एक दिवस दोन टॅंकरच्या माध्यमातून पालखी मैदानातील झाडांना मुबलक प्रमाणात मिळतेय पाणी. वाल्हे (दि.२६) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचे मुक्कामी ठिकाण असलेल्या, वाल्हे (ता.पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुर्वी मुक्कामाचे ठिकाणी जागा कमी पडू लागल्याने, मागील काही वर्षांपासून सुकलवाडी फाट्यानजीक (ता.पुरंदर) असलेल्या ओसाड माळरानावर पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाण करण्यात आले असून, शासकीय मालकीचा असलेल्या भव्य पालखी तळ मागील पाच- सहा वर्षांपासून, पालखीतळ सुशोभीकरणातुन, भव्य पालखी मैदानास सीमा भिंत , दोन स्वागत कमाण, हायमास्ट दिवे, पालखी विसावा ओटा आदी कामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.  मात्र, संपुर्ण माळरान असल्याने, या माळावर पावसाळा संपल्यानंतर फक्त वाळलेले गवत होते. या भव्य पालखी मैदान परिसरात विविध संस्था, तसेच 'हरितवारी उपक्रमांतर्गत' आळंदी देवस्थान, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराई संस्था, बाणेर येथील वसुंधरा अभियान...

वाल्हे महावितरणकडून वीज वाहिनीची देखभाल दुरुस्ती.

Image
 वाल्हे महावितरणकडून वीज वाहिनीची देखभाल दुरुस्ती.   वीज वाहिनी अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी. वाल्हे (दि.२६)) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २७ जुन रोजी वाल्हे (ता.पुरंदर) मुक्कामी येत असून, पालखी सोहळ्यातील वैष्णवांना वीजपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये. तसेच काही ठिकाणी उघड्यावर असलेले विद्युत बॉक्स दुरूस्तीची तसेच, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. त्या अनुषंगाने वाल्हे येथे महावितरणच्या वतीने, वीज वाहिनीची देखभाल दुरूस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.   वाल्हे परिसरामधील प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, पोल सरळ करणे, घरावरील विद्युत ...

जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ, उपाध्यक्षपदी रत्नकांत तांबे बिनविरोध.

Image
 जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ, उपाध्यक्षपदी रत्नकांत तांबे बिनविरोध. वाल्हे (दि.२६) जेऊर (ता. पुरंदर) येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर भिकोबा धुमाळ व उपाध्यक्षपदी रत्नकांत साधू तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार (दि. २३ एप्रिल ) अटीतटीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा तेरा शून्य असा धुरळा उडवत  सोसायटी ताब्यातील ठेवण्यात यश मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता.  सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने भैरवनाथ-जयमल्हार विकास परिवर्तन पॅनेलचा तेरा-शून्य असा धुरळा उडवत सोसायटीवर निर्विवाद सत्ता कायम राखली. दोन्ही पॅनेलमधील घमाशान लढाईनंतर सत्ताधारी श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनेलने स्वत:च्या ताब्यातील सोसायटी ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. दरम्यान, सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटल्यानंतर बुधवार (दि.२५) जेऊर येथील, जेऊरग...

सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप

Image
 सैरभैर टोळीच्या प्रमुखावर मानसोपचाराची गरज; प्रशांत जगताप पुणे दि.२७     राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत. तर त्या सर्व टोळीचा प्रमुख असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातूनच ते काहीही बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत.' ना घर का ना घाट का' अशी अवस्था झालेल्या आणि मानसिक स्वास्थ्य बिघाडलेल्या व्यक्तींनी असे सार्वजनिक जीवनात वावरणे धोकेदायक आहे. त्यामुळे त्यांनी घरी जावे घरातील माय माऊली स्वयंपाक करून त्यांची वाट पाहत असेल दोन घास खावे. आणि मानसिक आजारावर उपचार करून आराम करावा.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.      चंद्रकांत पाटील यांची जीभ पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्या वर घसली होती. मासानात जा असा शब्द त्यांच्या तोंडातून निघाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा मानसिक दिवाळखोरीच...

केतकी चितळेचा जेल मुक्काम वाढला, आजही जामीन अर्ज फेटाळला

Image
  केतकी चितळेचा जेल मुक्काम वाढला , आजही जामीन अर्ज फेटाळला   मुंबई  दि.२६ अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल   गुन्ह्यात तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला   आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जबाब येणे बाकी आहे. सध्या केतकी चितळे ही ठाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे ठाणे कारागृहात आहे. या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे गेल्या अनेक दिवासांपासून अभिनेत्री केतकी चितळे ही वादात सापडली आहे. केतकीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीविरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल गेल्या काही दिवसांत केतकी चितळेविरोधात जवळपास राज्यभर गुन्हे दाखल झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर जवळपास २०   ठिकाणांहून जास्तठिकाणी  गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र फ...

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

Image
 पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक पुणे दि.२६    पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि व्यवसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी किडीने चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून अविनाश भोसले यांचा शोध ते घेत होते. इडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत  भोसले यांची चौकशी केली होती. गेल्या काही दिवसापासून भोसले यांच्या घरी छापे टाकण्यात आले  होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर काय कारवाई करणार हे येणाऱ्या  काळातच समोरील येईल.  ईडीने  गेल्या वर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सी बीआय कडून  त्याचा शोध घेतला जात होता. त्यांना आज (दि.२७) पुण्यात अटक करण्यात आली.  अविनाश भोसले यांच्यावर इडीने गेल्यावर्षी  कारवाई केली होती. भोसले यांची 40 कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती.  त्यांच्या व्यावसायिक भगिदरांवर  देखील छापे टाकण्यात आले होते.  डीएचएफएल लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्य...

अवैध दारू विक्रेत्याची येरवडा जेलमध्ये रवानगी : एमपीडीए अंतर्गत कारवाई केली.

Image
 निंबुत  येथील अवैध  दारू व्यावसायिक विरोधात  एमपीडीए अंतर्गत कारवाई केली.   बारामती. दि.२६ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबुत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारु विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले (वय ५२) याच्याविरोधात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.  वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी नवले याच्या विरोधातील प्रस्ताव तयार केला होता. नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देत नवले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी नवले याला येरवडा कारागृहात दाखल केले आहे.     वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक लांडे यांच्यासह उपनिरीक्षक योगेश शेलार, सलिम शेख, सहाय्यक फौजदार जगताप, हव...

वीर धरणात अजही निम्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक.शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांची माहीती

Image
 वीर धरणात अजही निम्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक.शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांची माहीती  लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चिंता नाही. नीरा : दि.२६      पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, तर सातारा जिल्यातील खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीसाठी वरादान असणाऱ्या व ०९ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर (ता. पुरंदर) धरणात आजही निम्यापक्षा जास्त म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शाखा अभियंता . शाखा अभियंता औदुंबर महाडिक यांनी दिली आहे त्यामुळे जरी पाऊस लांबला तरी नदिकाठच्या व दोन्ही काल व्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता चिंता नाही.         मॉन्सूनची चाहूल लागत असताना या धरणाच्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला असून यंदा नीरा खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. मॉन्सून पूर्वतयारी म्हणून धरण दुरुस्ती, देखभाल, बिनतारी संदेश, धरण सुरक्षा, पूर नियंत्रण कक्ष आदी कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.         पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदाय...

वेश्या व्यवसाय संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;

Image
 वेश्या व्यवसाय संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;    हा व्यवसाय कायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईवर येणार निर्बंध नवी दिल्ली :         सर्वोच्च न्यायालयाने देशातील व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली आहे. पोलीस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत किंवा संमतीने हे काम करण्याचा सेक्स वर्करवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लैंगिक कर्मचाऱ्यांना कायद्यासमोर सन्मान आणि समानतेचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.    सेक्सवर्करच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी खंडपीठाने सहकारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या शिफारशींवर सुनावणीसाठी न्यायालयाने २७ ही जुलै पुढील तारीख निश्चित केली आहे. यावर केंद्राला उत्तर देण्यासाठी त्यांनी सांगितले आहे याबाबत न्यायालयाने आणखी पुढे म्हटले आहे की, स्वइच्छेने केलेला वेश्याव्यवसाय व्यवसाय बेकायदेशीर नाही.मात्र वेश्य...

भरधाव टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार तर एक जण जखमी

Image
 भरधाव टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार तर एक जण जखमी  टँकरचालक घटनास्थळावरून पसार  बारामती दि.२६ बारामती शहरातील रस्त्यांवर ढवन चौकापासून काही अंतरावर एका टँकर आणि दुचाकीचा अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक २५ रोजी रात्री घडली आहे. मुलाच्या लग्नाची बोलणी करण्याकरता निघालेल्या पती पत्नी यांच्या दुचाकीला अपघात झाला .यामध्ये भरधाव वेगाने एका टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली आहे. या घटनेत भरधाव आलेल्या टँकर खाली दुचाकीवरील महिला सापडल्याने तिच्या डोक्यावरून चाक गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर टँकर ड्रायव्हरने कोणतीही मदत न करता टँकर घेऊन तो भरधाव वेगाने कारभारी सर्कलच्या बाजूने पळून गेला. घटनेनंतर काही काळासाठी बारामतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलिस करत आहेत.

चुकून पडलेल्या क्षेपणास्त्र प्रकरणी अमेरिकेनं दिला भारताला थेट इशारा.म्हणाले....

Image
 चुकून पडलेल्या क्षेपणास्त्र प्रकरणी अमेरिकेनं दिला भारताला थेट इशारा.म्हणाले....... नवी दिल्ली. दि.२६               अमेरिकेनं नुकताच एक अहवाल जारी केलाय. यात त्यांनी म्हटलं आहे की, चीन, भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांना आण्विक देशांमधील युद्धाचे धोके आणि परिणामांची चांगली जाणीव आहे. दक्षिण आशियातील वाढत्या राष्ट्रवादामुळं युद्धाची ठिणगी पडू शकते, असं अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसनं तयार केला आहे.    मार्च २०२३ मध्ये भारतच एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडलं होत.या अहवालात घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. दक्षिण आशियातील बदलत्या परिस्थितीमुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. त्याच बरोबर भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक धोका कमी करण्यावर भर देण्याचं आवाहन अमेरिकेला करण्यात आले आहे.         अमेरिकेला भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं अहवालात म्हटले आहे. USIP अहवालात बायडन प्रशासनाला तालिबानसोबत चालू असलेल्या चर्चेचा उपयोग अफगाणिस्तान आणि पाक...

पालखी तळांची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Image
  पालखी तळांची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना  पुणे : दि.२६          करोनाच्या साथीनं  दोन वर्ष न झालेली पायीवारी यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे.   दोन वर्षानंतर  नंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी देहूतून पंढरपूपर्यंत पायी मार्गस्थ होणार आहे. मात्र, करोनामुळे गेली दोन वर्षे वाहनाने पालख्या पंढरपूरला न गेल्याने पालखी तळांवर अनेक कामे बाकी आहेत. याबाबत आळंदी आणि देहू संस्थानांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालखीतळ, विसावा या ठिकाणची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला बुधवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात देहू आणि आळंदी संस्थानांच्या प्रमुखांसोबत एक बैठक हेण्यात आले होती.. त्यामध्ये हे आदेश दिले.  संत ज्ञानेश्वर महाराजांची पायी पालखी २१ जून रोजी आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज पायी पालखी २० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. गेली दोन...

निरेत डोंबारी वस्तीतील घरांवर फिरला रेल्वेचा बुलडोझर

Image
   निरेत डोंबारी वस्तीतील घरांवर फिरला रेल्वेचा बुलडोझर नीरा : दि.२५             नीरा येथील वार्ड नंबर एक मध्ये रेल्वेच्या हद्दीत गेली चाळीस वर्षांनहून अधिक काळ राहणाऱ्या गोर-गरिबांची पक्की घरे व झोपड्यावर बुधवारी रेल्वेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर फिरवला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता पत्यांच्या घरांप्रमाणे घरे पाडली. त्यामूळे याठिकाणी राहणाऱ्या लोकांना हताशपणे घरे पडताना पाहण्या शिवाय दुसरे काही करता आले नाही. बहुतांश लोकांनी आधीच आपली घरे मोकळी करुन या भागातून काढता पाय घेतला होता. आपल्या मोकळ्या घरांवर बुलडोझर फिरताना पाहुन स्थानिकांच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले होते.      नीरा (ता. पुरंदर) येथील पुणे-मिरज रेल्वे लाईन शेजारील प्रभाग १ मधील गोपाळ वस्तीतील सुमारे ४५ कुटुंबांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने मंगळवार दि. २४ मे पूर्वी घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवार दि. २५ मे रोजी रेल्वे कोणाच ही मुलाहिजा न बाळगता अतिक्रमण विरोधात कडक कारवाई केली. दोन जेसीबीच्या सहायाने सर्व परिसरतील कच्चे पक्के बांधकाम जमिनदोस्...

ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे?

Image
 ओबीसी बाबत शरद पवारांचे मोदींना आव्हान: म्हणाले एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे?    मुंबई दि.२५       ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यामुळे याला मोठे उधाण आले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्यात यावी असं म्हटल आहे. 'एकदा देशाला कळू द्या ओबीसी की संख्या किती आहे' असं पवार यांनी म्हटलंय. मुंबईतील ' वाय. बी. चव्हाण' सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा पारपडला यावेळी पवार बोलत होते. पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपलाही सुनावले. शरद पवार यांनी म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या लोकसंख्या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आज ओबीसी जनगणनेची मागणी होते आहे. एकदा देशाला कळू द्या ओबीसी संख्या या भारत देशामध्ये किती आहे ?हीच मागणी बिहारमधील मुख्यमंत्र्यांनी देखील केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र केंद्रातील सरकार हे ओबीसी जनगणना होऊ देणार नसल्याचे त्यांन...

चंद्रकांत पाटलांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Image
 “घरी जा आणि स्वयंपाक करा” या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी त्याचा इतका विचार करीत नाही"  पुणे दि.२५          ओबीसी आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यावरून महाराष्ट्र सरकारवर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे.               मध्य प्रदेश सरकारला जे करू शकते, ते महाराष्ट्र सरकारला का नाही? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. यां बाबत भाजपाकडून मोर्चे काढून निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना केलेल्या शेरेबाजीवर आता सुप्रिया सुळेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.         ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिय...

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली; ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द

Image
 कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली; ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द   पुणे           “कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितले आहे.त्यामूळे दि. २३ मे ते दि. ३० मे पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आर्शिवाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद,” असे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्‍टरांनी सक्तीची विश्रांत...

नीरा येथील कीर्तन मोहत्सवाची सांगता

Image
 नीरा येथील कीर्तन मोहत्सवाची सांगता  कोविड योध्यांचा करण्यात आला सन्मान  नीरा दि.२३   नीरा ता.पुरंदर येथे सुरू असलेल्या किर्तन मोहत्सावाची आज दुपारी सांगता करण्यात आली सांगता. नीरा येथील सुभाष महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने व कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या विविध व्यक्ती व संस्थांचा यावेळी ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.     नीरा येथे दरवर्षी कीर्तन मोहत्सवाचे आयोजन श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव समिती ट्रस्टच्यावतीने केले जाते. यावर्षी दिनांक १७/५/२०२२ ते आज सोमवार दिनांक २३ /५/२०२२ पर्यंत हा महोत्सव पारपडला.आज कल्याचे कीर्तन झाल्यानंतर ट्रस्टच्यावतीने कोरोना काळात निर्भिडपणे पुढे होत कर्तव्य बजावणाऱ्या विविध मान्यवर व संघटनांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत नीरा,प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा, पोलीस दुरर्क्षेत्र नीरा, डॉक्टर असोशियशन नीरा, नीरा शहर पत्रकार संघ.आणि आशा स्वयंसेविका याचा सन्मान करण्यात आला.यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता (आबा) चव्हाण,उपस...