निरा खोऱ्यातील चारही धरणांतून विसर्ग सुरू. चार धरणांनमध्ये ९१.४२ टक्के पाणीसाठा.

निरा खोऱ्यातील चारही धरणांतून विसर्ग सुरू. चार धरणांनमध्ये ९१.४२ टक्के पाणीसाठा. पुरंदर : निरा खोऱ्यातील चार ही धरणातून आता विसर्ग सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात गुरवारी निरा नदिवरील वीर धरण ९७ टक्के भरल्याने ६१ हजार क्युसेक्सने व गुंजवणी धरणातून ४ हजार ३६९ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला होता. तर आज बुधवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून निरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने व भाटघर धरणातून १ हजार ७५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ४८.३२९ टिएमसी क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणात बुधवारी सायंकाळी ४४.१८३ टिएमसी म्हणजे ९१.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेली दोन आठवडे निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. सुरवातीला गुंजवणी धरण ७१.०१ टक्के भरल्याने गुरुवारी (दि.२५) पहाटे सहा वाजता २ हजार ७२४ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. सकाळी दहा वाजता ४ हजार ३६९ क्युसेक्सने वाढवण्यात आला. याच दरम्यान अकरा वाजता वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वीर धरणातून १३ हजार ९११ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी दिड वाजता ३२ हजार...