२०२२ नंतर २०२४ ला नीरा नदीत पहिला विसर्ग. दोन वर्षांनंतर नीरा नदी दुथडी वाहणार.

 २०२२ नंतर २०२४ ला नीरा नदीत पहिला विसर्ग.


दोन वर्षांनंतर नीरा नदी दुथडी वाहणार.




पुरंदर :
     पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील ४८ तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


    वीर धरण ७५.८० टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या ४८ तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     २०२२ साली नीरा नदीला आठवडाभर पुर होता. मात्र २०२३ साली पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने वीर धरण १०० टक्के भरलेच नाही पर्यायाने नदीपात्रात वर्षभरात एकदाही विसर्ग करण्यात आला नव्हता. तरी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करत निरा डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन वेळेत केले. नियमित कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?