Saturday, July 27, 2024

वीर धरणातून विसर्ग वाढवला निरा खोऱ्यातील धरणासाठ्यात मोठी वाढ

 वीर धरणातून विसर्ग वाढवला 


निरा खोऱ्यातील धरणासाठ्यात मोठी वाढ 





पुरंदर : गुरवारी निरा नदिवरील वीर धरण ९७ टक्के भरल्याने ६१ हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. गुरवारी रात्री व शुक्रवारी निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंती घेतली व विसर्ग ५ हजार ९९७ क्युसेक्सने करण्यात आला. शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता दुपारी २ वाजता वाढवून २३ हजार १८५ क्युसेक्सने करण्यात आला आहे. 


    शनिवारी सकाळी निरा खोऱ्यातील भाटघर धरण ७८.४९ टक्के, निरा देवघर ७५.६४ टक्के, गुंजवणी ७१.०१ टक्के तर वीर धरण ९८.५५ टक्के भरल्याने वीर धरणातून २३ हजार १८५ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असून गुंजवणी धरणातून ९२६ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. वीर धरणावरील निरा डाव्या कालव्यातून ६५० क्युसेक्सने तर निरा उजव्या कालव्यातून १ हजर १०१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.  ४८.३२९ टिएमसी क्षमता असलेल्या निरा खोऱ्यातील या चारही धरणात आज शनिवारी दुपारपर्यंत ३८.९६१ टिएमसी म्हणजे ८०.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी तो ३२.०३४ टिएमसी म्हणजे ६६.२८ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणे लवकर ओव्हरफ्लो झाल्याने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. 

No comments:

Post a Comment

Featured Post

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  बारामती :           डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह...