पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडे

पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडे पुरंदर दि.३१ पुरंदर आणि बारामती तालुक्यातील काही गावांसाठी संजीवनी ठरलेली पुरंदर उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र याबाबत पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांनी ही योजना पूर्णपणे बंद ठेवू नका अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून ही योजना पूर्णपणे बंद ठेवणार नसल्याची माहिती माजी आ. अशोकराव टेकवडे यांनी माध्यमांना दिली आहे पुरंदर उपसा योजना ही दुरुस्ती यासाठी दीड महिना बंद राहणार होती. परंतु या योजनेवर अवलंबून असणारे शेतकरी, उद्योजक यांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला होता. पारगाव,आंबळे,टेकवडी, माळशिरस,पोंढे, पिसर्वे, नायगाव, मावडी सुपे, नायगाव, राजेवाडी, राजुरी आदी गावातील शेतकऱ्यांना घेऊन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी जलसंपदा विभागाच्या पुणे येथील सिंचन भवन या ठिकाणी धडक देत मुख्य अभियंता ह.वी.गुणाले यांच्याशी चर्चा करून अडचणी समजून सांगितल्या. त्य...