Posts

Showing posts from May, 2023

वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल

Image
 वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल  भोर: दि.२३              तालुक्यातील भोंगवली येथे वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्याचे लेणे बहाल करण्यात आले.पतीच्या प्रथम वर्ष श्राध्द दिनाचे (दि.२३) औचित्याने समारंभपूर्वक सौ.विजया यांना कुंकू लावून साडी,चोळी,बांगड्या देण्यात आल्या.     भोंगवली येथील सी आर पी एफ जवान नवनाथ शंकर भांडे यांना रायपूर ( छतीससगड ) येथे दि.३जून २०२२ रोजी वीरगती प्राप्त झाले.दि.२३ मे २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध होते.याच दिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांचे सौभाग्य लेणे त्यांना सन्मान पूर्वक देण्याचे कार्य जयहिंद फौंडेशनच्या सभासदांनी केले.कार्यक्रमासाठी उपस्थित महिला व पुरुषांच्या मान्यतेने वीर पत्नी सौ.विजया यांना हळद - कुंकू लावण्यात आले.हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.जोडवी घातली. केसात गजरे व गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले.साडी देवून ओटी भरण्यात आली.कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना वीर पत्नीने हळद - कुंकू लावले.याच पद्धतीने वीर माता सौ.पार्वत...

पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे

Image
 पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे उठसुठ माध्यमांनाच काय दम देतात?- एम.एम.देशमुख मुंबई- वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवरून प्रसिध्द झालेल्या एखाद्या बातमीमुळे अलिकडे दंगल झालीय असं महाराष्ट्रात कुठं घडलंय का? अकोल्यात जी दंगल झाली ती सोशल मिडियावरून कोणी तरी धार्मिक भावना दुखावल्यामुळे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी पत्रकारांना नोटीस पाठवून त्यांनी कशा बातम्या द्याव्यात यावर प्रवचन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण ठेवायचेच असेल तर ते मोकाट सुटलेल्या सोशल मिडियावर ठेवले पाहिजे.. ते न करता पोलीस ऊठसुठ माध्यमांना काय दम देतात? या शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी माध्यमांनी नेहमीच घेतलीय.. दंगलीच्या काळातही माध्यमांनी संयमानं वार्तांकन करीत जबाबदार माध्यमं म्हणून आपली भूमिका नेहमीच पार पाडली.. त्यामुळे आम्ही कश्या बातम्या द्यायच्या हे पोलिसांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही.. असं असताना देखील...

जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी

Image
 जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी   नीरा दि. 24    वाहतुकीसाठी धोकेदायक असलेल्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज बुधवारी सकाळी जेजुरी नजीक भोरवाडी फटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो थेट पुणे मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी अथवा मृत्यू झाला नाही.        प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी औद्योगिक वसाहत सोडल्यानंतर भोरवाडी फाट्यापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा एकेरी होतो. याच दरम्यान भरधाव टेम्पो जेजुरीकडून नीरा बाजूकडे भरधाव निघाला होता. चारपदरी रस्ता अचानक एकेरी झाल्याने टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेल्या टेम्पो थेट रस्त्याच्या डाव्या बाजूने दगड गोट्यातून रस्त्याच्या लगत असणाऱ्या पुणे मिरज रेल्वे लाईन वर जाऊन पलटी झाला. या टेम्पोमध्ये ब्रिटानिया कंपनीचे बिस्किटचे बॉक्स होते. मोठ्या उंचीवरून हा टेम्पो खाली पडला.सुदैवाने टेम्पो चालक मात्र सुखरूप बाहेर आला. तो किरकोळ जखमी आ...

बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी

Image
 बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी नीरा दि.२४       कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची किंवा स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत यापूर्वी होती. ती पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे. याबाबतची मागणी करणार पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार विभाग आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडे दिले आहे.       सहकारी क्षेत्रातील बहुतांश संस्थांमध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची पद्धत पूर्वीपासून सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद होती. मात्र २०१६ मध्ये या तरतुदीमध्ये राज्य सरकारकडून बदल करण्यात आला आणि तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर तज्ञ संचालक नियुक्ती करणे बंद झाले. ही पद्धत पुन्हा सुरू करावी आणि तज्ञ संचालक किंवा तज्ञ शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यां...

पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ

Image
 पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ     नीरा  दि. २२         पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे 3 कोटी 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अशोकराव टेकवडे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तालुक्यात आता विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरवात केलीय...   पिंगोरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 94 लक्ष रुपयांची नळ पाणी पुरवठा येजना,60 लक्ष रुपयांचा आदर्श नगर येथील साकव पुल ,50 लक्ष रुपयांचा हरणी - पिंगोरी रस्ता, 20 लक्ष रुपयाचा आदर्श नगर ते पिंगोरी गावठाण रस्ता, त्याच बरोबर शहीद रमेश शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या 10 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे भूमी पूजन यावेळी करण्यात करण्यात आले         यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार , दिलीप यादव , भाजपचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन लंबाते,भाजप तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे ,आरपिआरचे तालुका अध्यक्ष पंकज धीवार, पुरंदर पंचाय...

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरद जगताप यांची बिन विरोध निवड

Image
 नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी  शरद जगताप यांची बिन विरोध निवड     नीरा दि.२२        पुरंदर तालुका आणि  बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा  कृषी उत्पन्न समितीच्या सभापती पदासाठीची  निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी सासवड येथील बाजार समितीच्या कार्यालयात  पारपडलीय..यामध्ये राष्ट्रवादीचे शरद जगताप यांची  सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आलीय...       या बाजार समितीच्या  संचालक पदाच्या निवड निवडणुकीत आघाडीने सर्व जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 8 उमेदवार होते.निवडी नंतर आमदार संजय जगताप यांनी  सभापती शरद जगताप  यांचा सत्कार करून अभिनंदन केलंय... यावेळी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, बारामती तालुका अध्यक्ष    संभाजी होळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमान, शिवसेना तालुका अध्यक्ष अभिजित जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य  सुदाम इंगळे, दत्ता झुरूंगे,माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, ...

सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Image
 धक्कादायक! सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या    नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता    सासवड दि.18         सासवड ( ता.पुरंदर ) येथील  तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ईश्वर रोहिदास शिंदे  असून वय २९ वर्षे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा तरुण  महात्मा फुले हौ.सोसायटी,सासवड ता.पुरंदर जि.पुणे  या ठिकाणचा रहिवाशी आहे..हा तरूण हा ११ मे २०२३ पासून बेपत्ता होता. तरूण बेपत्ता असल्याची तक्रार मयत तरुणाचे वडील रोहिदास शिंदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिली होती. सासवड पोलीस या तरुणाचा शोध घेत असतानाच दिनांक 17 मे 2023 रोजी हा करून घरी परतला. तरुण घरी परतल्यानंतर वडिलांनी त्यास सासवड पोलीस स्टेशन येथे आणून हा तरुण सापडल्याचे कळविले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी दिनांक 18 मे 2023 रोजी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण हा कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याची ही प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत सासवड पोलीस...

कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या

Image
 कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित दि.18 कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.  सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?  सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपद...

लहान मुलांना मारहाण प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दखल

Image
 पुणे शहर पोलिसांचे वैभव लोणी काळभोरकरांच्या मुळावर, घऱासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना, नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण, मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी..  लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांच्याते मोठा रोष पसरला आहे.  पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे हे त्या मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असुन, वैभव मोरे यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चाळीतील नागरिकांनी केला आहे. या मारहानीच्या व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, पोलिस उपनि...

हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड

Image
 हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड     लोणी काळभोर दि.१७            मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचेशी संलग्न असलेल्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.       हवेली पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड बुधवारी हॉटेल एसफोरजी येथे पार पडली. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच बरोबर इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या.कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर,मंगल बोरावके,मिलन दाभाडे,सुवर्णा हिरवे यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे ...

थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून

Image
 थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून       पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून      नीरा दि.१६           पुण्यातील पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका पन्नास वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृनपणे  खून केल्याची घटना समोर आली आहे.. यासंदर्भात या महिलेच्या जावयाने जेजुरी पोलिसात सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. अत्यंत निर्दयीपणे हा खून करण्यात आले नाही परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या कोणाचा तपास लावणे आता पोलिसांकडे मोठा आव्हान ठाकले आहे .       याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी सायंकाळी साडेसात वाजलेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे... थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आहे. ही महिला  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापडगाव येथील ही महिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलय... तर संगिता शरद करे अस या महीलेच नाव आहे. माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा के...

अग्रभागी असणाऱ्या पत्रकारांना योग्य सहाय्याची गरज

Image
 अग्रभागी असणाऱ्या पत्रकारांना योग्य सहाय्याची गरज पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पेन्शन योजना शुभारंभ समारंभात आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन पिंपरी पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो परंतु त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही हे कोविडच्या काळात दिसून आले. कोविड काळात अग्रभागी राहून काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी मी प्रयत्न केले अशा पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे सहाय्याची आवश्यकता आहे असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने वय वर्षे साठ वरील पत्रकारांना दरमहा 5000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज येथे केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील, पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक गोविंद वाकडे, मर...

भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Image
 भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका  महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन  नीरा : दि.११    भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष विश्वास ठेवण्यासारखे पक्ष नाहीत. हे दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकतात आणि म्हणूनच यापुढे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विश्वास ठेवू नका. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा त्याचबरोबर माजी खासदार महादेव जानकर यांनी केल आहे ते गुरुवारी निरा येथे बोलत होते.    भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे राजकारण हे दिल्लीतून चालते. ते राज्य पातळीवरील पक्ष्यांना फारशी किंमत देत नाहीत. ते त्यांना बरोबर घेतात आणि संपवून टाकतात. त्यामुळे अशा पक्षांवर विश्वास न ठेवलेला बरा. त्यापेक्षा शरद पवारांचा पक्ष असो, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो की एकनाथ शिंदेंचा पक्ष असो अशा छोट्या पक्षांना यापुढे मदत करा. पण राष्ट्रीय पक्षांना मदत करू नका असे स्पष्ट आवाहन जानकर यांनी यावेळी केले.सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रसंघटना व राष्ट्रीय समाज पक्ष पुरंदर तालुका य...

ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार

Image
 ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार  पिंपरीत दोन बसच्या धडकेत महिला मेकॅनिकचा मृत्यू         पिंपरी चिंचवड :      ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार झाली आहे .          मृत्यू कुणाला  कुठे गाठेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बससमोर तिचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनिक विभागातील सहाय्यक शिल्पा कैलास गेडाम (वय ३८ वर्ष) यांचा दोन्ही बसच्यामध्ये चिरडून दुःखद अंत झाला. पिंपरीतील वल्लभ नगर बस आगारातील एसटी बाहेर काढताना बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ती समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन धडकली. त्यावेळी एसटी विभागतील महिला कर्मचारी त्या बसचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या होत्या. या दोन्ही बसच्या मधोमध सापडून त्यांचा मृत्यू झाला आहे. शिल्पा कैलास गेडाम (व...

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात : राजेंद्रकुमार सराफ

Image
विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात.: राजेंद्रकुमार सराफ सोमेश्वरनगर: ७ मे  आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी  शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रो. प्रा. डॉ अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर रो. गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक सचिन पाठक, रो. दर्शना गुजर, रो. अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड चे अध्यक्ष रो. प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रोट्रॅक्टर आदित्य भावसार, रोट्रॅक्टर आशिष आदी मान्यवर उपस्थित होते. आपले म्हणजे मानवाचे भ...

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव

Image
 शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव शरद पवारांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडाली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांनी आपल्या भूमिका प्रतिक्रिया आग्रहीपणे मांडण्यास सुरुवात केली आणि शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांना विनंती व विनवणी केली जात आहे पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील आज पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचा आयोजन करून एकत्रितपणे ठराव संमत करण्यात आला या ठरावांमध्ये शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा व कार्याध्यक्ष ची निर्मिती करून या पदावर ती त्यांना योग्य असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी आणि कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्षाचा कारभार चालवा शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तेच प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच पद या पदावर ती कोणाचीही नेमणूक केली जाऊ नये फक्त त्यां...

कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह : घातपात की आत्महत्या चर्चांना उधाण

Image
 कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह  : घातपात की आत्महत्या  चर्चांना उधाण  दि.३        पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे एक मृतदेह आढळून आला आहे. कर्नलवाडी गावचे हद्दीतील झिरपवस्ती या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे.          कर्नलवाडी ता. पुरंदर येथे झिरीपवस्ती जवळ असलेल्या निर्जन शेतामध्ये  अनोळखी व्यक्तीचा हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह रानटी जनावरांनी किंवा कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे आता केवळ हाडांचा सांगाडा हाडांचा सांगाडा उरला आहे.... या मृत व्यक्तीने निळ्या रंगाची प्यांट परिधान  केली असून पिवळ्या रंगाचा शर्ट त्याच्या बाजूला पडलेला दिसून येतो आहे.... तर हा मृतदेह सत्तर टक्के जनावरांनी खाल्ला असून पायाच्या मांडीचा भाग केवळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे  या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड असणार आहे. अत्यंत निर्जनस्थळी हा मृतदेह असल्याने याबाबतची माहिती कोणाला मिळून आली नाही..आज बुधवारी दुपारी कर्नलवाडीचे  पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दा...

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

 महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन दि.2 महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे कोल्हापुरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिली अरुण गांधी हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध लेखक होते ते दीर्घ काळापासून आजारी होते अखेर मंगळवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला   अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथे झाला त्यांचे वडील इंडियन ऑपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशित होती वरून गांधी यांनी नंतर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केले त्यांनी काही पुस्तके लिहिले आहेत ते गिफ्ट ऑफ अंगर लेसन फॉर्म माय गॉडफादर महात्मा गांधी हे त्यापैकीच एक पुस्तक आहे वरून गांधी 1987 मध्ये सहकुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले ते त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष घालवली ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठातील संबंध...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा

Image
 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा दि.2           राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून जोपर्यंत हा निर्णय माघारी घेतला जात नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी यशवंतराव चव्हाण सहभागृहात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.        शरद पवार यांच्या 'लोक माझ्यासंगती: या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकर्षणाचा सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच बरोबर नेत्यांनी विरोध केला. संपूर्ण सभागृह वाहक झालं होतं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी थ...