पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या आरक्षणात घोळ !
पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या आरक्षणात घोळ ! अधिकाऱ्यांनी डावलले निवडणूक आयोगाचे प्रमाण; आरक्षण पुन्हा काढण्याची मागणी नीरा : पुरंदर तालुक्यात सरकारी बाबूंनी डिसेंबर २३ पूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच काढले. मात्र, हे आरक्षण सदोष असल्याचे आता दिसून येत आहे. महिला व ना.म.प्र या प्रवर्गातील आरक्षण चुकीचे काढल्याचा आरोप अनेक ठिकाणांहून होऊ लागला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ता. १६ जून रोजी ग्रामसभा घेण्याची अधिसूचना प्रसिद्ध करून ता. २१ जून रोजी आरक्षण सोडत काढणे आवश्यक होते. गुळुंचे व कर्नलवाडी येथे मात्र, ता. १९ जून रोजीच आरक्षण सोडत काढण्यात आली. शासकीय नियमाप्रमाणे महिला आरक्षण अंतर्गत आरक्षण धरून ५० टक्के इतके मान्य आहे. असे असतानाही तालुक्यातील ९ सदस्यीय ग्रामपंचायतींचे आरक्षण काढताना हे प्रमाण ५५.५५ टक्के इतके झाले आहे. तर सर्वसाधारण पुरुष संख्या मात्र कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुळुंचे (ता. पुरंदर) येथील आरक्षण ता.१९ रोजी काढल्यावर त्यावर अक्षय व नितीन निगडे यांनी ता. २० रोजी पुरंदरच्या तहसीलदार...