Type Here to Get Search Results !

पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७३ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज. एक ग्रामपंचायती बिनविरोध.

 पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७८ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज.

एक ग्रामपंचायती बिनविरोध.




पुरंदर :

        पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी (दि.२०) अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३५ सदस्यांच्या जागांसाठी ४१२ अर्ज आले तर पाच ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी ८ अर्ज आले आहेत. १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी तब्बल ७३ अर्ज आल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

      पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. गुळुंचे ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्याच्या जागांसाठी ३९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले आहेत, कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्याच्या जागांसाठी ३३ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले आहेत, वाल्हा ग्रामपंचायतीच्या १३ सदस्याच्या जागांसाठी ३८ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले आहेत, आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आले आहेत, सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वनपुरी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २६ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले आहेत, उदाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले आहेत, कोथळे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ३१ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ९ उमेदवारी अर्ज आले आहेत, रानमळा ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २१ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले आहेत, वीर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्याच्या जागांसाठी ६० अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ११ उमेदवारी अर्ज आले आहेत, माळशिरस ग्रामपंचायतीच्या ११ सदस्याच्या जागांसाठी ४७ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज आले आहेत, राजुरी व एखतपुर-मुंजवडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी २ उमेदवारी अर्ज आले आहेत. पाच गावच्या प्रत्येकी एक सदस्यांसाठी पोट निवडणूक होणार आहे. नायगाव व पानवडी येथे १ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. पांढे व राख येथे ३ अर्ज आले आहेत. सुपे खुर्द येथील एका जागेसाठी एक ही अर्ज आला नाही.

    निवडणूक अर्जांची छाननी सोमवारी २३ ऑक्टोबरला होईल. बुधवारी २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. बुधवारी २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान रविवारी ५ नोव्हेंबर रोजी असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर सोमवार ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies