Posts

Showing posts from November, 2022

जर सूर्य एकाच ठिकाणी असेल, तर जपानमध्येच प्रथम का उगवतो? खास आहे यामागचं कारण

Image
  उगवत्या सूर्याचे (Sun Rise) नयनरम्य दृश्य पाहणे प्रत्येकाला आवडते. दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहावे , असेही म्हटले जाते. यामुळे संपूर्ण दिवस चांगला असतो. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पण , प्रत्यक्षात पाहता सूर्य स्वतःच्या जागी स्थिर राहतो आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते. सूर्याच्या प्रदक्षिणाबरोबरच पृथ्वीही स्वत:भोवती फिरते. यामुळे दिवस आणि रात्र होते. पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो ? आपण सर्वांनी सूर्य उगवताना आणि मावळताना पाहिला आहे , परंतु उगवता सूर्य प्रथम कुठे दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का ? पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो ? या प्रश्नांची उत्तरे खूप मनोरंजक आहेत , हे जाणून घेणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण असेल. जपानमध्ये सूर्य प्रथम का उगवतो ? यापूर्वी जपान ही सूर्योदयाची भूमी मानली जात होती , परंतु सर्व देशांनी GMT (Greenwich Mean Time) वेळला मान्यता दिली असल्याने , तेव्हापासून हा मान न्यूझीलंडकडे गेला आहे. न्यूझीलंडची वेळ GMT+13 आहे , तर जपानची वेळ GMT+9 ...

फेसबुकवरची 'ती' एक चूक पडली महागात; थेट 2 वर्षांचा तुरुंगवास; तुम्ही करत नाही ना असं काही?

Image
  फे सबुकवरील चुकीची माहिती एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या एका चुकीमुळे त्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले. चुकीची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला दोन वर्ष जेलमध्ये टाकण्यात आले. व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे , जिथे फेसबुकवर चुकीची पोस्ट केल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं. फक्त व्हिएतनाममध्येच नाही तर भारतातही फेसबुकवर चुकीची पोस्ट करणं महागात  पडू शकतं. कारण फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकार आणि फेसबुकने कडक  नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या चुका तुम्हाला तुरुंगात टाकू  शकतात . ते जाणून घेऊया. फक्त फेसबुकच नाही , तर तुम्ही इन्स्टाग्राम , Whatsapp सारख्या इतर सोशल मीडियावर  चुकीच्या पोस्ट टाकल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. सोशल मीडियाचा वापर  सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावर चुकीची माहिती देणं टाळा. सोशल मीडियावर डोळे झाक करून  कोणताही मेसेज पाठवू नये. तसेच मेसेज पाठवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या.  अफवा पसरवणारे अनेक मेसेज हे तुफान व्हायरल होत असतात. पण हे दुसऱ्यांना पाठवू  नका. याबाबत अलर्ट ...

पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

Image
  लग्नाच्या मंडपात किंवा लग्नात गोंधळाच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर या घटनांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात. अशातच एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले. झालं असं की , एक एमबीएचा विद्यार्थी इन्व्हिटेशन नसताना एका लग्नात गेला. यानंतर असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नसेल. संशय आला आणि ओळख विचारली ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमधील आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करण्यात आल्यावर लोक यावर आक्षेप घेत आहेत की , अशाप्रकारे कुणाचा व्हिडीओ व्हायरल करणं योग्य नाही. एका लग्नात लग्न सुरू होतं. अशातच एका तरूणावर लग्नातील लोकांना संशय आला आणि त्याला ओळख विचारण्यात आली. तरूण काही सांगू शकला नाही आणि तो पकडला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार , त्याने तो जबलपूरचा असल्याचं सांगितलं आणि भोपाळमध्ये तो एका प्रायव्हेट कॉलेजमधून एमबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. जेव्हा समजलं की , तो पत्रिका नसताना आलाय तर त्याला लग्नातील भांडी घासण्यास सांगण्यात आली. त्याला शिक्षा म्हणून भांडी घासण्यास सांगण्यात आलं. भांडी घासताना त्या...

केळी हेअर कंडिशनर घरी सहज बनवता येईल, केस मजबूत आणि चमकदार होतील

Image
  केळी जशी आरोग्यासाठी चांगली असते , त्याचप्रमाणे त्वचेसाठी आणि विशेषत: केसांसाठी खूप पौष्टिक मानली जाते. वास्तविक , केळ्यामध्ये आढळणारे अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे , कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट केस मजबूत आणि चमकदार बनवतात. विशेषत: हिवाळ्यात , जे कोरडे आणि निर्जीव असतात त्यांच्यासाठी केळीचे कंडिशनर बनवून लावले तर बाजारातील केमिकलयुक्त केसांच्या कंडिशनरपेक्षा खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे केसांना नैसर्गिक पद्धतीने चमकदार , मुलायम आणि मजबूत बनवण्यासाठी केळी हेअर कंडिशनर घरी लावता येते. पिकलेल्या केळ्याच्या हेअर कंडिशनरच्या वापराने केसांसाठी आवश्यक प्रथिने , लोह , मॅग्नेशियम , झिंक , व्हिटॅमिन-सी , व्हिटॅमिन-बी 6 तसेच व्हिटॅमिन-ई देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. घरी केळी हेअर कंडिशनर कसे बनवायचे आणि ते कसे लावायचे ते जाणून घेऊया- केळीचे केस कंडिशनर कसे बनवायचे ·          सर्व प्रथम दोन पिकलेली केळी घ्या. ·          2 चमचे बदाम तेल (आपण ऑलिव्ह तेल देखील वापरू शकता) ·      ...

ऊस उत्पादकांना खऱ्या अर्थाने न्याय

Image
  बा रामती-राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. राज्य शासनाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने विशेष अभिनंदन केल्याचे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले. बारामती येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जाचक म्हणाले , साखर उद्योगाच्या पाच मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , सहकारमंत्री अतुल सावे , कृषीमंत्री अब्दुल सत्तार , माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. महाविकास आघाडीने खासगी कारखान्यांना पोषक एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. त्यामुळे उत्पादकांवर अन्याय होत होता. यंदा रिकव्हरीवर एफआरपीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एफआरपीसाठी हंगाम संपण्याची वाट पहावी लागणार होती. मात्र , शासनाने मागील रिकव्हरीवर त्वरित एफआरपी एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. अनेक कारखान्यांवर उसाच्या वजन काट्याबाबत तफावत होती. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र , आता...

आजपासून तुमच्या आयुष्यात होणार हे मोठे बदल

Image
  मुंबई :  1 डिसेंबर 2022 पासून   बँकिंग , आर्थिक आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित   अनेक नियम बदलणार आहेत. नव्या नियमांचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार असला , तरी काही बदल तुमच्या भल्यासाठी देखील असणार आहेत. या बदलांचा परिणाम प्रत्येक सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.   लाईफ सर्टिफिकेटबाबत महत्त्वाचा बदल   केंद्र व राज्य सरकारकडून पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शनरांना हे प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करायचे आहे. पेन्शनर बँक शाखेत किंवा ऑनलाइन जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात , जेणेकरून त्यांची पेन्शन थांबणार नाही आणि त्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये. हे काम ३० नोव्हेंबरपर्यंतच होणे आवश्यक होते. आतापर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली नाही. म्हणजेच आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर सादर केलेले जीवन प्रमाणपत्र वैध ठरणार नाही. गाड्यांच्या वेळा बदलणार   भारतात थंडीचा मोसम सुरू झाला आहे. या काळात देशातील बहुतांश भागात धुके वाढू लागते , ...

मुंबईपेक्षा पुणे महापालिका मोठी.नगरसेवकांची संख्या मात्र छोटी

Image
  पु णे  -पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्यानंतर क्षेत्रफळानुसार पुण्याने मुंबई महापालिकेला मागे टाकले. पुणे ही राज्यातील सर्वाधीक मोठी महापालिका झाली. पुणे शहर क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा मोठे झाले , त्याचवेळी पालिकेला विस्तारित कारभार झेपणार का ? अशी चर्चा सुरू होती. परंतु , राजकीय सारीपाटावर आखणी करताना राजकीय कारभाऱ्यांनी यामुद्याकडे दुर्लक्ष केले. 2011 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत 11 गावांसाठीचा प्रभाग क्र. 42 तयार होऊन पालिकेत दोन नगरसेवक वाढले. त्यानंतर 2017 मध्ये आणखी 23 गावांचा समावेश झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या त्यापटीत वाढेल , अशी अपेक्षा त्या-त्या गावातील राजकीय नेते मंडळींची होती. परंतु , महापालिका निवडणूक लांबली. शिवाय 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करण्याचे राज्य शासानाचे आदेश आल्याने आता 23 गावांतून अवघे 4 नगरसेवक वाढणार आहेत. मुंबई पेक्षा पुणे महापालिका क्षेत्रफळानुसार मोठी असताना जनगणना मात्र 2011 ची गृहित धरली जात असल्याने पुण्यात नगरसेवकांची संख्या वाढण्याऐवजी कमी असणार आहे. मुंबईत 227 नगरसेवक आणि पुणे महापालिकेत 166 न...

मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO

Image
  मुंबई , 01 डिसेंबर :   जगभरातील व्यक्तींना भारतीय संस्कृतीबद्दल कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. त्यामुळे जगभरातून लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. भारतीय लोक त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे आदरातिथ्यही करतात . मात्र , काही समाजकंटक आणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर मुलीची छेड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नेटिझन्सनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनीही या मागणीला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर एका दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साधारण एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे संबंधित...

पहिल्या टप्प्यात 2.39 कोटी मतदार करणार मतदान, जाणून घ्या पहिल्या टप्प्याची संपूर्ण माहिती

Image
  गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यात आज (गुरुवारी) राज्यातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होत आहे. साधारणत: आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली आहे. मात्र यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजकीय मैदानात उतरून ही निवडणूक रंजक बनवली आहे. आम आदमी पक्षाने 182 पैकी 181 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. यासोबतच मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुजरातच्या १८२ सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत. २.३९ कोटी मतदार राज्यात पहिल्या टप्प्यात मतदारांचे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊया. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण २.३९ कोटी (२ , ३९ , ७६ , ६७०) मतदार आहेत. त्यापैकी १ , २४ , ३३ , ३६२ पुरूष तर १ , १५ , ४२ , ८११ महिला मतदार आहेत. याशिवाय पहिल्या टप्...

रणशिंग फुंकले; खोके सरकारला घेरणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान ठरला

Image
  वि दर्भात अवकाळी पाऊस , कापूस , सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना भेडसावणारे महागाई , बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ईडी सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर येथे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधान भवनातील कार्यालयात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे , ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , बाळासाहेब थोरात , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , दिलीप वळसे-पाटील , एकनाथराव खडसे , हसन मुश्रीफ , अनिल परब , सुनील प्रभू , अजय चौधरी , शशिकांत शिंदे , भाई जगताप , सचिन अहिर , सुरेश वरपूडकर , अमिन पटेल , अनिल पाटील , बाळाराम पाटील , अबू आझमी , कपिल पाटील , रईस शेख असे विधिमंडळाच्य...