Posts

Showing posts from October, 2023

नीरा येथे गुरुवारी रस्ता रोको : जरांगेंची तब्बेत खालावल्याने मराठा समाज आक्रमक

Image
   नीरा येथे  गुरुवारी रस्ता रोको : जरांगेंची तब्बेत खालवल्याने मराठा समाज आक्रमक      नीरा दि.३०              मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नीरा येथे गुरवारी सकाळ पासून पुणे पंढरपूर मार्गावर रस्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे.तत्पूर्वी उद्या मंगळवार पासून ग्रामपंचायत कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.आज सोमवारी नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात मराठा समाजाची एक बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.            मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्बेत खालावली असल्याने आता मराठा समाज हवाल दिलं होताना पाहायला मिळतो आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जरांगे यांना जर काही झाले तर काय ? अस प्रश्न आता सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. सरकारला जरांगे यांना मारायचे आहे काय ? असा सवाल लोकांनी व्यक्त केला आहे.सत्ताधारी आणि विरोधक या दोघां विरोधात आता मराठा तरुण आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.नीर...

सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू ५ नोव्हेंबर पासून धावणार : पुण्यात पोहचणार सकाळी..

Image
  सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापर्यंत सुरू ५ नोव्हेंबर पासून धावणार : पुण्यात पोहचणार सकाळी... पुरंदर : कोव्हिड काळात रेल्वे बंद झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर गेली दोन वर्षांत सह्याद्री एक्स्प्रेस बंद होती. वेळोवेळी रेल्वे प्रशसनाला पत्रव्यव्हार करुनही प्रतिसाद मिळत नव्हता. नुकतेच पुणे विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सह्याद्री एक्स्प्रेस बाबत निर्णय घेण्यात आला आहे.      कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रात्री धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईत सकाळी अकराच्या सुमारास पोचत असे. सायंकाळी सहा वाजता पुन्हा कोल्हापूरकडे रवाना होत असे. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी नीरा शहरात पहाटे साडेचार वाजता येत असे व मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास येता ये होती. यामुळे नीरा शहरासह पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यातील शंभर गावातील व्यावसायिक, नोकरदार यांना मुंबईला जाऊन यायला सोईची होती. दिवसभराचे काम करुन पुन्हा नीरेत येता येत होते. पण गेली दोन वर्षांपासून ही गाडी बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.   आता पुन्हा सह्याद्री...

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

Image
 पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध  पुरंदर तालुक्यात तीन ग्रामपंचायती बिनविरोध सासवड (पुढारी वृत्तसेवा) ता २५ : पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे.       आज आर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामांचायातीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज शिल्लक राहिला.तर इतर उमेदवारांनी आपले आर्ज माघारी घेतले.त्यामुळे वाल्हे आणि सुकलवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिन विरोध झाली तर  आडाचीवाडी ग्रामपंचायतीसाठी विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यात आले नव्हते त्यामुळे ही ग्रामपंचायती बिनविरोध झाली आहे.            वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अतुल सोमनाथ गायकवाड यांनी  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर सदस्यपदी तेजस बाळासाहेब दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ, साम्राज्ञी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ, अ...

गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या रिंगणात किती उमेदवार व कोण. उद्या पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू.

Image
  गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या रिंगणात किती उमेदवार व कोण. उद्या पासून प्रचाराची रणधुमाळी सुरू. पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार आहे. सात सदस्यांच्या जागांसाठी ३३ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते. आज बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठीचे १८ अर्ज व सरपंचपदासाठीचे ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सदस्य पदासाठी १५ व सरपंच पदासाठी दोन अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. श्री. ज्योतिबा ग्रामपरिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सुवर्णा तानाजी महानवर. प्रभाग क्रमांक १ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण दिपक रामचंद्र भोसले, सर्वसाधारण महिला राखीव आशा सचिन चव्हाण, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव प्रतिक्षा रामचंद्र गदादे. प्रभाग २ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण नंदकुमार वसंतराव निगडे, सर्वसाधारण महिला राखीव स्वप्नाली विराज निगडे. प्रभाग ३ मधुन सदस्य पदासाठी सर्वसाधारण अरविंद गुलाबराव निगडे,...

नीरा येथे अंगावरून ट्रक केल्याने ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांचा मृत्यू

Image
  नीरा येथे अंगावरून ट्रक गेल्याने ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांचा मृत्यू पुरंदर :        पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज शनिवारी अडीच वाजलेच्या सुमारास बस स्थानकासमोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू झाला आहे. बाबासाहेब संतराम मरकड अस त्यांचं नाव असून ते जेजुरी येथील रहिवाशी आहेत.            याबाबत प्रत्यक्षदर्षी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार मरकड हे चालत पुणे पंढरपूर रस्त्याने नीरा बस स्थानकाकडे चालले होते. ट्रक क्रमांक एम. एच. १२- इ.एफ.९१५७ या ट्रकची त्यांना धडक बसली. त्यामुळे ते चाका खाली गेले यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नीरा येथील पोलिस हवालदार संदीप मदने, निलेश जाधव, होमगार्ड बरकडे व स्थानिक युवकांनी यावेळी मदत करून या व्यक्तीचा मृतदेह प्रहारच्या रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. यासंदर्भात अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान ट्रक चालक ट्रकसह नीरा पोलीस चौकीत हजर झाला आहे.

पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७३ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज. एक ग्रामपंचायती बिनविरोध.

Image
  पुरंदर तालुक्यात १५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ७८ अर्ज. १३५ सदस्यांसाठी ४१२ अर्ज. एक ग्रामपंचायती बिनविरोध. पुरंदर :         पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी (दि.२०) अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३५ सदस्यांच्या जागांसाठी ४१२ अर्ज आले तर पाच ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी ८ अर्ज आले आहेत. १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी तब्बल ७३ अर्ज आल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.२५) अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.       पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. गुळुंचे ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्याच्या जागांसाठी ३९ अर्ज आले आहेत व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले आहेत, कर्नलवाडी ग्रामपंचाय...

गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा

Image
  गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या गुळूंचे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, गाव नेत्यांची निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असून ते सर्वसाधारण महिला राखीव असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.       २ हजार ६०० मतदार असलेल्या गुळूंचे गावात तीन प्रभाग असून प्रत्येकी तीन सदस्य संख्या असून थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. दोन्ही गटांना आपापल्या पॅनेलला उमेदवार मिळवण्यासाठी जय्यत तयारी असून, पॅनेल पूर्ण ताकदीने उभे करण्याकडे गावनेत्यांचा कल आहे. त्यामुळे कोणाचा कसा पॅनेल असणार, कोण उमेदवार असणार व सरपंचपदासाठी कोणकोणते उमेदवार असणार यावर निवडणूक व प्रचार काळात वारे वाहणार आहेत.      येथील गावनेत्यांनी गावपातळीसह वेगवेगळ्या राजकारणात सहभाग घेतलेला आहे, तसेच गावात पर्वीपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते...

जेऊर येथे झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

Image
 जेऊर येथे झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या नीरा  दिनांक १६ पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. बापूराव मुरलीधर तांबे वय ४२ वर्षे रा. जेऊर ता पुरंदर अस या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे .त्यांनी जेऊर येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महतेचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास नीरा पोलिस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मोकाशी करत आहे त.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा ग्रामीण पत्रकारांशी संवाद, सेलू पत्रकार संघाचा पुढाकार

Image
 मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा ग्रामीण पत्रकारांशी संवाद, सेलू पत्रकार संघाचा पुढाकार  मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पहिली व सर्वसमावेशक राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी यांच्या वतीने 11 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सेलू येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित सर्व पत्रकारांसोबत दिलखुलास संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन करत येणाऱ्या भविष्य काळात प्रसार माध्यमामध्ये डिझीटल मीडिया हे माध्यम कसे प्रभावी ठरणार आहे, या बद्दल माहिती दिली.                                                              तसेच  साप्ताहिक, ज्येष्ठ पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य विमा, पत्रकारांवर वाढते ...

साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन

Image
  साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन मुंबई : 'मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव अशी संघटना आहे, ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल न्यूज पोर्टल तसेच युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांचा ही समावेश आहे. परिषदेने पत्रकारांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. कारण आपला लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साप्ताहिकांच्या पत्रकारांना जाणून-बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र काहीजण करत आहेत. साप्ताहिकांच्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करताना दिसतात. मात्र साप्ताहिकांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला सुद्धा अधिस्वीकृती मिळावी, यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेत असून साप्ताहिकांच्या हक्कासाठी आपला लढा सुरू राहणारच,' असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केल...

मंत्री शंभूराजे देसाई यांच्या यापुढील सर्व पत्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार

Image
  मंत्री शंभूराजे देसाई यांच्या यापुढील सर्व  प त्रकार परिषदांवर पत्रकारांचा बहिष्कार सातारा :        राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या  पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सातारयातील पत्रकार संघटनांनी एकत्रित घेतला आहे.        शंभूराजे देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारया पत्रकारांशीच हुज्जत घातली..  प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत होता. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी पत्रकार परिषदेसह सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे.       मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर, जिल्हाध्यक्...

दत्तात्रय रोकडे यांना मुख्याध्यपक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान

Image
 दत्तात्रय रोकडे यांना मुख्याध्यपक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान सासवड|ता:05- पुणे जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.४ ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे याठिकाणी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.सदर पुरस्कार सोहळ्यात पुरंदर तालुक्यातील श्री.भैरवनाथ विद्यालय वनपुरी या शाळेतील दत्तात्रय रोकडे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सपत्नीक यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.याबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष सतिशभाऊ उरसळ,कार्याध्यक्ष अजितदादा निगडे,सचिव उत्तम निगडे,उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर व संचालक मच्छिन्द्र कुंभारकर तसेच प्राचार्य राहुल येळे,सोमनाथ इंदलकर,मुख्याध्यापिका लता बोकड,नागनाथ ओव्हाळ तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व प्रसिद्ध लेखक शरद तांदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाच...

नीरा येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक झाला पलटी सुदैवाने जिवीतहाणी नाही

Image
 नीरा येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक झाला पलटी सुदैवाने जिवीतहाणी नाही   नीरा दि.४      पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर बुधवारी पहाटे लोखंडी पाईप  घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.साईटपट्टी खचली असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे.       या संदर्भात ट्रकचालक शहाजन शेख (वय 38 रा.तुळजापूर)   यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे ते पुण्याहून साताराकडे निघाले होते. त्यांच्या ट्रक मध्ये लोखंडी पाईप भरलेले होते. पिंपरे आणि निरा यांच्या दरम्यान पुणे पंढरपूर महामार्गावर असताना समोरच्या बाजूने एसटी बस आल्याने त्यांनी त्यांचा ट्रक साईड पट्टीवर उतरवला. मात्र साईटपट्टीवर चिखल झाला असल्याने व ती मजबूत  नसल्याने ट्रकची डाव्या बाजूचे दोन्ही चाके या चिखलामध्ये खचली आणि ट्रक हळूहळू करत गटारामध्ये पलटी झाला.  ट्रक चालक  वेळीच ट्रकमधून खाली  उतरल्याने त्याला काही झाले नाही. मात...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर पुण्याचे पालकमंत्री ?

Image
 राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर  पुण्याचे पालकमंत्री ?  मुंबई :         राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.  सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-  पुणे- अजित पवार  अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील  सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील  अमरावती- चंद्रकांत दादा पाटील भंडारा- डॉ.विजयकुमार गावित  बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील  कोल्हापूर- हसन मुश्रीफ  गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम बीड- धनंजय मुंडे  परभणी- संजय बनसोडे  नंदुरबार- अनिल पाटील  वर्धा - सुधीर मुनगंटीवार     उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांंना पुन्हा पुणे जिल्ह्याचे पालकमु केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत क...

सत्ताविरोधी पत्रकारांना जाणिवपूर्वक लक्ष्य देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय याची चाहुल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून निषेध

Image
 सत्ताविरोधी पत्रकारांना जाणिवपूर्वक लक्ष्य  देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय याची चाहुल  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून निषेध  मुंबई :        देश हुकूमशाहीकडे वेगानं वाटचाल करतोय याची चाहूल केव्हाची लागली आहे. आजची ताजी बातमी त्याचीच पुढची पायरी आहे. सत्ताविरोधी पत्रकारांना देशात जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जाऊ लागलंय. आज सकाळी सकाळी दिल्लीहून जी बातमी आली आहे, ती माध्यमांचा भविष्यकाळ कसा असू शकेल याची जाणीव करून देणारी आहे.       दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी दिल्लीतील पत्रकार आणि लेखकांच्या घरावर छापे घातले आहेत. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल लॅपटॉप जप्त करण्यात आलेत. याशिवाय पत्रकार संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरी पोलिसांनी छापे घातले आहेत.       यातील काही जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे. माध्यमांचा आवाज बंद करून देशातील पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्यासाठी के...

गावकारभारी व्हाचय ! लागा कामाला. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले.

Image
  गावकारभारी व्हाचय ! लागा कामाला. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले. पुरंदर :       राज्यभरात गेली वर्षभरापासून रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अखेर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. एक महिन्याचा निवडणुक कार्यक्रम असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान तर ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.       राज्यभरात ग्रामपंचायतीच्या नव्याने स्थापित झालेल्या तसेच २०२२ मध्ये चुकीच्या प्रभाग रचना योजना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकांसह या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर ९ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोट निवडणूका जाहीर झाल्या आहेत.      पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हा, बागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेव...

पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीचे बिगूल वाजले. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका

Image
  पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीचे बिगूल वाजले. राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका मुंबई  :  राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच २ हजार ९५० सदस्यापदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकांमुळे आता पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींना आता कारभारी मिळणारं आहेत. आचारसंहिता लागू - निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबरला होईल. २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.    २५ ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख ५ नोव्हेंबर असणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या व...