Posts

Showing posts from December, 2022

एकेकाळी झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे नाना पाटेकर, असाही काळ पाहिलाय की आजही खात नाहीत मिठाई

Image
  ' वेलकम ' ( २००७) या चित्रपटात नाना पाटेकर यांनी विनोदी भूमिका साकारली तेव्हा लोकांना मोठे सरप्राईज मिळाले होते. केवळ हीच नाही , तर यापूर्वीही त्यांनी अशा काही भूमिका साकारल्या होत्या ज्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते , समजासेवक तर आहेतच , त्यासोबतच ते स्पष्ट वक्ते म्हणूनही ओळखले जातात. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांच्या वडिलांचा टेक्सटाईल पेंटिंगचा एक छोटा व्यवसाय होता. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची फसवणूक केली आणि त्यानंतर त्यांचं सर्वकाही हिरावून गेलं. याचाच नाना पाटेकर यांच्यावरही परिणाम झाला आणि ते वयाच्या १३ व्या वर्षापासून काम करू लागले. चुनाभट्टी येथे चित्रपटांचे पोस्टर रंगवण्यासाठी ते ८ किलोमीटर पायी जा ये करत होते. तसंच यासाठी त्यांना महिन्याला ३५ रुपये मिळत होते , असं त्यांनी एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं. नाना पाटेकर यांनी झेब्रा क्रॉसिंगदेखील रंगवले आहे. आपल्या मुलांना खाण्यासाठी देण्यासही आपल्याकडे काही नाही , या विचाराने वडिल दु:खी होते , असं त्यांनी एका चर्चेदरम्यान सांगितलं होतं. ते कायम याच ...

अब्दुल सत्तारांना डब्बल धक्का, थेट CBI आणि ED कडे तक्रार दाखल

Image
  मुंबई , 01 जानेवारी :   हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजला. वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपात पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला . आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआयकडे तक्रार दाखल झाली आहे. सीबीआयपाठोपाठ ईडीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह 5 शेतकऱ्यांची 1400 पानी तक्रार सीबीआयकडे केली होती. या तक्रारीत 200 शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरावे दिल्याचा दावा केला आहे. तसंच 28 मुद्द्यांवर सत्तार यांच्या संपत्ती चौकशीची मागणी केली आहे. कथीत गायरान घोटाळा , टीईटी घोटाळा , सिल्लोड महोत्सव यानंतर शेतकरी जमीन घोटाळ्याचा अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाला आहे. आता सिल्लोडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे सत्तार यांच्याविरोधात सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच ईडीकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तारांच्या अडचणी...

आज राजकीय भूकंप? शरद पवार इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर

Image
  इं दापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे राज्याच्या व देशाच्या राजकारणात सातत्याने लक्ष असते ; मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्‍यावर विशेष लक्ष शरद पवारांची नेहमीच असते 2023 या नववर्षात शनिवारी (दि. 31) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली पाटील यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात , शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी , शरद पवार उपस्थित राहणार असल्याने , शरद पवार यांची एन्ट्री नव्या वर्षात राजकीय वेगळा भूकंप घडवणार का ? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासकामातून अत्यंत मजबूत केलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती पाठोपाठ इंदापूर तालुका हा पवारांच्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो ; मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने , इंदापूर तालुका व बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट करून अनेक चकरा वाढवलेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पावरफुल मानले जाणारे ...

".तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील आणि सरकार घरी गेलेले दिसेल" वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'या' नेत्याने व्यक्त केले भाकीत

Image
  मुं बई - ' मावळत्या वर्षाने काय दिले , हा प्रश्न नेहमीचाच आहे. भयाच्या सावटाखाली सगळेच जगत आहेत. लोकशाहीचे काही खरे नाही ही भावना दुःखद आहे. फक्त सत्तेचेच राजकारण चालले आहे. राहुल गांधी भारत जोडण्यासाठी चालत आहेत. त्यांच्या चालण्यास यश मिळो. नव्या वर्षात आपला देश भयमुक्त होवो ! ” अशी आशा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून व्यक्त केली आहे.तसेच राऊत यांनी सध्या सुरु असलेले सरकार नव्या वर्षात पडेल असे भाकीत देखील केले आहे. “ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही पह्डण्यात आली. सत्तेच्या गैरवापराचे हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडले. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. 16 आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल ” असं भाकीत राऊत यांनी वर्...

जेजुरी एमआयडीसी मध्ये अपघात : एका तरुणाचा मृत्यू

Image
 जेजुरी एमआयडीसी मध्ये अपघात : एका तरुणाचा मृत्यू जेजुरी दि.३१         पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मधिल बर्जर पेंट कंपनीत काल ( शनिवारी ) रात्री अपघात झाला असुन एका युवकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे... तर काही तरुण जखमी झाले आहेत .   जेजुरी एम.आय.डी.सी मधील बर्जर् पेंटस् या रंग बनवण्याच्या कंपनीतील बॉयलर मध्ये पावडर गुळगुळीत करण्यासाठी लोखंडाचे गोळे फिरवले जातात त्यातील गोळा बाहेर उडाल्याने हा अपघात झाला आहे.यामध्ये कंपनीतील भिंतही पडली आहे. या अपघातात पुरंदर तालुक्यातील राख येथील रोहित जयवंतराव माने या २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहेे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नाही मात्र या घटनेला जेजुरी पोलिसांनी दुजोरा दिला आहे...   

विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्याचे अजित पवारांचे आश्वासन.

Image
  नागपूर -   विदर्भ , मराठवाड्याला प्राधान्य देत राज्याच्या सर्वंकष विकासाचे ध्येय ठेवून महाविकास आघाडी सरकारने काम केले. कोरोना संकटातही विदर्भ-मराठवाड्याचा विकास कायम ठेवला. भाजप काळातल्या २०१९ - २० पेक्षा जिल्हा नियोजन समितीच्या निधीत ८०० कोटी रुपयांची वाढ करुन तो ९ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत वाढवला. २०२१ - २२ मध्ये पुन्हा त्यात वाढ केली आणि तो ११ हजार ३५ कोटी रुपयांपर्यंत वाढवला. २०२२ - २३ मध्ये पुन्हा भरीव वाढ केली आणि तो १३ हजार ३४० एवढा केला. नागपूरसाठी २०२० - २१ मध्ये ४०० कोटी रुपये होते , त्यात २०२१ - २२ मध्ये १०० कोटींची वाढ करुन ५०० कोटीची तरतूद केली. २०२२ - २३ मध्ये पुन्हा अतिरिक्त १७८ कोटीची भर घालून ६७८ कोटी रुपयांपर्यंत तरतूद वाढवली. २०१९ - २० मध्ये विदर्भासाठी २७६३ कोटी रुपयांची तरतूद होती , महाविकास आघाडीने २०२२ - २३ पर्यंत दोन वर्षात ती ३ हजार ३५६ कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नागपूर मेट्रोसाठी २०२० - २१ , २०२१-२२ आणि २०२२ - २३ मध्ये ४३४ कोटी रुपये दिले. चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी ६०२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता व निधी दिला , अशी आकडेवारी सादर करीत विधानसभेचे...