नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उसंती घेतल्याने मागील रविवारपासून (दि.२० जुलै) विर धरणातून विसर्ग बंद केला होता. मात्र गुरुवारपासून (दि.२४) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काल शनिवारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्युसेक्सने, आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज चारही धरणांच्या भांड्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून ४ हजार १३० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे ४ हजार क्युसेक्सने तर विद्यूत निर्मिती केंद्रातून...