Posts

Featured Post

नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

Image
 नीरा नदीतल पाणी वाढतंय.  नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग  लोकमत न्यूज नेटवर्क  नीरा :  नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उसंती घेतल्याने मागील रविवारपासून (दि.२० जुलै) विर धरणातून विसर्ग बंद केला होता. मात्र गुरुवारपासून (दि.२४) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काल शनिवारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्युसेक्सने, आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला आहे.  आज चारही धरणांच्या भांड्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.         नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून ४ हजार १३० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे ४ हजार क्युसेक्सने तर विद्यूत निर्मिती केंद्रातून...

"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम. देशमुख. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन

Image
"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम.  देशमुख.  पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन  पुरंदर :        "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहात असल्याचा विशेष आनंद आम्हाला आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहात आहे. साडेचार - पाच कोटी रूपयांच्या खर्चातून हे अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहात आहे, ही बाबा सोपी नव्हे. भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यांवर मात करीत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमने पत्रकार भवनाचे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले.          पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्य...

नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार

Image
  नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन  नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार  पुरंदर:       महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान व लोकशाही दिनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे मंडल अंतर्गत नीरा येथे सोमवारी (दि.२१) या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.        पुरंदर तालुक्यामध्ये वेग-वेगळया मंडलस्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरीकांच्या विविध विभागाच्या अडीअडचणी, तक्रारी, समस्या जाणून घेऊन त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्याच्या सुचना संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याना दिल्या जात आहेत. नागरिकांचे प्रश्‍न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस...

सायकल स्पर्धेचे नीरेकरांनी केले स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धा.

Image
 सायकल स्पर्धेचे नीरेकरांनी केले स्वागत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धा.  पुरंदर :          उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धा आज शनिवारी पारपडली. नीरा येथे सायकल स्वारांचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले. स्पर्धकांचे व आयाजक संदिप कदम यांचे स्वागत हल्लीच्या निनादात मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.     पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२५ चे आयोजन केले होते. पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, समर्थ पतसंसथेचे चेअरमन राजेश चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, सरचिटणीस राजेंद्र थोपटे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटनिस तनु...

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार

Image
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना  एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार  : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा   आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार  मुंबई, दि. १७ :      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.     अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना  एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.  एसटी बस सीट आरक्षित करण्यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात येईल तसेच आठ हजार की.मी. पर्यंत प्रवासाची मर्यादाही काढणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.       विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रक...

सत्य बातमी देणं गुन्हाय काय? नक्कीच नाही.. पण सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे.. कारण बातम्यांमुळे ते नागडे होतात..

Image
 सत्य बातमी देणं गुन्हाय काय? नक्कीच नाही.. पण सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे.. कारण बातम्यांमुळे ते नागडे होतात..  बघा,  मुंबई :       बातमी दिली म्हणून इकडं महाराष्ट्रात स्नेहा बर्वे नावाच्या महिला पत्रकाराला रॉडनं मारहाण केली जाते आणि तिकडं बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या संदर्भात सत्य उजेडात आणल्याबद्दल पत्रकार अजीत अंजूम यांच्या विरोधात निवडणूक आयोग एफआयआर दाखल करते. दोन्ही घटनांमागचा उद्देश पत्रकारांचा आवाज बंद करणे एवढाच आहे. सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे. कारण अशा बातम्यांमुळे ते नागडे होतात. असे परखड मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.       देशमुख पुढे म्हणाले, अजीत अंजूम हे हिंदी पत्रकारितेतलं मोठं नाव. प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम केल्यानंतर अजीत आता डिजिटल मिडियात कार्यरत आहेत. निर्भिड आणि लोकशाही प्रेमी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.        बिहार निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी आपल्या युट्यूब चँनलसाठी...

डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगरात राज्यव्यापी मेळावा

Image
डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगरात राज्यव्यापी मेळावा  मुंबई : डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा १४ सप्टेंबर २०२५ रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.      अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार राज्यभर झपाट्याने होत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट युट्यूब चॅनल आणि पोर्टल चालविणारया दहा संपादकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.     दोन सत्रात होणाऱ्या या मेळाव्यात व्यावसायिक पध्दतीने चँनल कसे चालवावे, त्यातून महसूल कसा उभा करावा, या संबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्य...