पोस्ट्स

शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली जयकुमार गोरे यांची भेट; तीन दिवसांपूर्वी झाला होता अपघात

इमेज
  पु णे - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवारांनी गोरे यांच्या तब्येतीबाबत विचारपूस देखील केली. राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशनामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शरद पवार यांनी गोरे यांची भेट घेतल्यामुळे एका वेगळ्या राजकारणाचे दर्शन यावेळी सर्वांना पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला होता. अपघातामध्ये ते चांगेलच जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक , बाँडीगार्ड आणि चालक असे चौघेजण जखमी झाले होते. अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील गोरे यांची भेट घेत तब्येतीबाबतची माहिती जाणून घेतली. कसा झाला होता अपघात आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण-लोणंद रस्त्यावर फलटण शहरानजिकच्या स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील प...

"परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय": कोर्ट

इमेज
  न वी दिल्ली :   परीक्षांमध्ये कॉपी आणि फसवणूक करणे , हे प्लेगच्या साथीसारखे आहे. ज्यामुळे समाज आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते. असे अयोग्य मार्ग वापरणाऱ्यांना जड हाताने धडा शिकविला पाहिजे , असे मत दिल्लीउच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण व्यवस्थेची अखंडता अतुलनीय असायला हवी , असे निरीक्षण नोंदवत मुख्य न्यायधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की , जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडवू शकत नाहीत. या प्रकरणात , काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फोडली होती. गोपनीयता राखा. प्रश्नपत्रिका तयार करणारे , विद्यार्थी किंवा पर्यवेक्षक असोत , सर्व संबंधितांनी निर्दोष वर्तन करणे , गोपनीयता राखणे गरजेचे आहे , अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. न्यायालयाने अपील फेटाळून लावले आणि एकल न्यायाधीशांच्या आदेशाला कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

इमेज
  मुंबई :   बऱ्याचदा   शेतकऱ्यांना   बदलत्या   हवामानामुळे   फटका बसतो. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. त्यामुळे पिकांचंच नुकसान झालं तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून हा प्रश्न असतो. मग अशावेळी पिकाचा   विमा   देखील उतरवला जातो. ज्यामुळे नुकसान झाल्यास सरकारकडून त्याची एक ठरावीक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. पिकाची पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना बराच काळ वाट पहावी लागते. दरम्यान , त्यांना सिंचन , तण व इतर कामांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात आणि पीक तयार असतानाही कापणी व वाहतुकीसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामात पीक घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशातच जर वादळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा पडू शकतो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. पीक विमा योजनेत विमा मिळाला तर त्याचा लाभ घेता येईल. सध्या रब्बी पिकांचा विमा ...

अनिल देशमुखांची आज सुटका होणार, आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर बाईक रॅली काढण्यात येणार

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख   हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची ( CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान , देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. नेमकं प्रकरण काय ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्...

बोगस 'एनए'ने दस्तनोंदणी प्रकरणी गुन्हे दाखल करणार ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधिमंडळात माहिती

इमेज
  पु णे -शहरातील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 3 आणि हवेली क्रमांक 24 येथे बोगस एनए ऑर्डर , भोगवटापत्र , नियमितीकरण दाखला जोडून 115 दस्तनोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये 26 प्रकरणांमध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून , उर्वरित 86 प्रकरणांची पडताळणी सुरू आहे. त्यांची सत्यता पडताळणी करुन गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दस्त नोंदणीसाठी बनावट दाखला जोडून दस्तनोंदणी केल्याप्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शहरातील हवेली क्रमांक 24 कार्यालयात बोगस एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी केल्याची तीन प्रकरणे आढळून आली. त्यानंतर दि. 27 जानेवारी 2022 रोजीच्या पत्रानुसार विशेष तपासणी पथक स्थापन केले होते. या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये हवेली क्रमांक 3 या कार्यालयातील दि. 5 ऑक्‍टोबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत नोंदविलेल्या दस्तांची तपासणी केली असता त्यामध्ये बोगस एनए ऑर्डर जोडून 112 दस्त नोंदविल्याचे आढळून आले....

शिंदे-फडणवीस सरकारकडून तातडीची मदत, अजित पवारांना मुंबईत येण्यासाठी सरकारी विमान

इमेज
  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार   हे तातडीने नागपुरातून (   Nagpur ) मुंबईला (   Mumbai ) येणार असल्याची माहिती मिळत आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने अजित पवार यांच्या तातडीच्या प्रवासासाठी सरकारी विमान उपलब्ध करुन दिल्याची माहिती समोर आली आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येण्याची शक्यता आहे. सध्या अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात ( Nagpur winter session) आहेत. तरच विरोधी पक्षनेत्याला सरकारी विमानाची परवानगी अजित पवार दुपारी एक वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्याला अशाप्रकारच्या सोयी उपलब्ध असतात परंतु त्यासाठी त्यांना कारण नमूद करावं लागतं. त्या कारणाची पडताळणी केल्यानंतरच विमानाची परवानगी देण्यात येते. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे अजित पवार त्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आ...

"दोन वर्षांत तुम्हाला देईन उज्ज्वल भारत"; केसीआर यांचा आता राष्ट्रीय राजकारणासाठी प्लान

इमेज
  हैदराबाद :   तेलंगणामध्ये यशस्वीपणे सरकार चालवणारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) लवकरच देशव्यापी संघटना बनवण्यासाठी ठोस मोहीम राबविणार असून , याची सुरुवात सर्वाधिक संकटग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या महाराष्ट्रातून होईल , असे बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मला दोन वर्षे द्या , मी उज्ज्वल भारत देईन , अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत राव म्हणाले की , तख्त सचखंड श्री हुजूर साहिब अबचलनगर साहिब हे शिखांच्या पाच तख्तांपैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथून पक्ष विस्ताराची सुरुवात करणार आहोत. तेलंगणाचा यशस्वीरित्या विकास केल्यानंतर तेथील मॉडेल देशभरात गाजत असून , भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणासाठी ' प्लान ' तयार केला आहे. यासाठी देशातील सहा लाख गावांमध्ये भारत राष्ट्र समिती पोहोचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी ' लोकमत ' ला सांगितले. बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ' लोकमत ' शी खास बातचित केली...