मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ
मोदींच्या काळात देशातील कर्जाच्या रकमेत अडीच पटीहून अधिक वाढ
मुंबई दि.२५
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशावरील कर्जा मध्ये मोठी वाढ झाली आहे. हे कर्ज २.६५ पटीने वाढून ही रक्कम आता १५५.६० लाख कोटीं रुपये इतकी झाली आहे.
३१ मार्च२०२३ पर्यंत देशात नोंदविल्या गेेलेल्या एकूण जीडीपीच्या ५७.१० टक्के इतके या कर्जाचे प्रमाण आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याची रक्कम त्यावेळच्या जीडीपीच्या तुलनेत ५२.२० टक्के इतकी होती.
ते २०१८-१९ मध्ये भारत कर्जाच्या व्याजापोटी ५.८३ लाख कोटी रुपये द्यावे लागत होते. २०२२-२३ मध्ये हे प्रमाण वाढून ९.२८ लाख कोटी झाले आहे.
२०१९-२० मध्ये कर्ज १०५.२० लाख कोटी रुपये होते.तर
२०२०-२१मध्ये १२१.०९ लाख कोटी रुपये झाले तर
२०२१-२२ मध्ये १५५.६०लाख कोटी रुपये झाले.
९ वर्षांत २.६५ पट अशी विक्रमी कर्जवाढ झाली आहे. म्हणजेच देशावरील कर्ज कमी होण्या ऐवजी ते दर वर्षी वाढतच चालले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा