Type Here to Get Search Results !

माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषत नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान 



माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप 


नीरा : (राहुल शिंदे ) 


नीरा भिवरा पडता दृष्टी ! 

स्नान करिता शुद्ध सृष्टी! 

अंती तो वैकुंठप्राप्ती ! 

ऐसे परमेष्ठी बोलिला !! 


      माऊली माऊली' नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज रविवारी माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन, माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.  



          पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावाला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन - भाकरी, वेगवेगळ्या चटण्या,खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

     


        नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. उन्हाची ताव्रता असल्याने यावर्षी ग्रामपंचायतीने दर्शनरांगेवर मंडप टाकून सावली केली होती. पालखीतळ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.  


    माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सिमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान घातले जाते. दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. 



    नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना (मंद वारा सुटला होता.) पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त अँड.विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती. माऊलींचा स्नान सोहळा देशभरात पाहता यावा यासाठी टिव्हि चँनल व माध्यम प्रतिनीधींनही मोठ्या संख्येन उपस्थीत होते. 


            माऊलींच्या स्नानापुर्वी पालखी सोहळ्याला प्रशासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक  अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंदभोईटे, पुरंदर-भोरचे पोलिस उपअधिक्षक तानजी बरडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगव न पवार, डॉ. अभय तिडके, गटविकास अधिकारी अमिता पवार, पुणे , माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, कांचन निगडे माजी उपसरपंच कुमार मोरे ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप दिला. 


१) 

   दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदितून निघण्यापूर्वी वारकरी आपल्या शेता पेरणी करुन वारीला जात असतात. पालखी सोहळा पुरंदर मधून मार्गस्त होतान पावसाचा शिडकाव असतो. मात्र यावर्षी पालखी सोहळ्या दरम्यान पाऊस न पडल्याने शतकरी वारकरी शिंतेत असुन ; यावर्षी पालखी कोरडी गेल्याचे ते बोलत होते. 


२)

     वाल्हे ते नीरा दरम्यानच्या रस्त्यावरील जुनी झाडे तोडल्याने वारकऱ्यांना सावली दुरापास्त होती. प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींना रस्त्याच्या कडेला सावली करण्याच्या सुचना दिल्या होत्या. प्रशासनाने तशी सोय करण्याचा प्रयत्न ही केला मात्र लखो वारकऱ्यांच्या फुढे ही सोय तोकडी पडली. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याला उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

३) 

      पालखी सोहळा काळात आरोग्य विभागाचे काम कसोटीचे असते. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना मोठी कसरत करावी लागते.यावर्षी जास्तीचा उन्हाचा चटका असल्याने आरोग्य विभागाने औषध पुरवठा केला त्याच बरोबर नीरा येथे विशेष प्रथोमापाचार केंद्र उभारण्यात आले होते त्याच बरोबर महिलांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies